DNA मराठी

ताज्या बातम्या

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम असणार आहे.  तर याच ठिकाणी पाटिल एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल 20 ते 25 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची , नाश्त्याची तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  पाटील यांच्या होणाऱ्या सभामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन संघटनेकडून करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम Read More »

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.  संपूर्ण वेळापत्रक मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.  दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा) 21 जानेवारी मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.   तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. 22 जानेवारी बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 23 जानेवारी रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 24 जानेवारी चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा) 25 जानेवारी  लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)  26 जानेवारी वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक Read More »

Weather Update: नागरिकांनो, मिळणार नाही थंडीपासून दिलासा! जाणून घ्या अपडेट्स

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात होणाऱ्या पावसामुळे आता राज्यात देखील थंडी हळूहळू वाढत चालली आहे.   सध्या राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र राज्यात 21 जानेवारीपर्यंत थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आणि दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईतही थंडीची तीव्रता वाढत आहे. शहरात थंड वारे वाहत आहेत. सकाळच्या वेळी उपनगरात वाढत्या थंडीमुळे शहरातील काही नागरिक उबदार कपडे परिधान करून शेकोट्या पेटवत आहेत. गेल्या आठवड्यापासून पुण्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुणेकरांना गुलाबी थंडीबरोबरच गारवाही सहन करावा लागत आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात आज सर्वात कमी 9.7 अंश तापमानाची नोंद झाली. मंगळवारी मुंबईत या हंगामातील नीचांकी तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान आठवडा संपेपर्यंत मुंबई आणि उपनगरात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुरुवारी हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान 17.5 अंश, तर कुलाबा केंद्रावर 20.5 अंश होते. दिवसाचे तापमान 30 अंशांच्या खाली आहे. IMD च्या कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रांवर कमाल तापमान अनुक्रमे 28.6 आणि 29 अंश नोंदवले गेले. संपूर्ण भागात हवामान कोरडे असल्याचे हवामान खात्याने सांगितले. किमान तापमानात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे आज किमान तापमान 10.3 अंश नोंदले गेले. मात्र, गुरुवारी विदर्भात थंडी कमी झाली असून तापमानाचा पारा चढला आहे.

Weather Update: नागरिकांनो, मिळणार नाही थंडीपासून दिलासा! जाणून घ्या अपडेट्स Read More »

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.  किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली. या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला  समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.  तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी  काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट Read More »

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.  22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.  आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील Read More »

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक

Pune Prostitution Racket: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पॉश भागात चालवले जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या राजस्थानी अभिनेत्री आणि दोन परदेशी मॉडेल्सना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुण्यातील विमाननगर भागात ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यात आलिशान हॉटेल्समध्ये वेश्याव्यवसायाचे काळे साम्राज्य चालवताना अभिनेत्री पोलिसांनी पकडल्या आहेत. नुकतेच पुण्यात एका कारवाईदरम्यान एका अभिनेत्रीला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. ऑनलाइन ग्राहकांशी संपर्क साधून हा वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अभिनेत्री आणि रशियन मॉडेल पुण्यात वेश्याव्यवसायासाठी आल्याची खबर पोलिसांना मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विमाननगर परिसरात सापळा रचला. अटक करण्यात आलेली राजस्थानी अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे फोटो आणि बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत असते. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. राजस्थानी अभिनेत्रीसह अन्य दोन रशियन मॉडेलनाही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑनलाइन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीचा पुणे पोलीस शोध घेत आहेत.  आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही अनेकवेळा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.  पोलिसांनी ताथवडे येथील एका लॉजवर छापा टाकून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली. तर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या एका अभिनेत्रीसह अन्य दोन मुलींची सुटका करण्यात आली.

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक Read More »

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार…

Ahmednagar News:  जामखेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी ते म्हणाले, विखे पाटील परिवार कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नेहमी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत खूप उपक्रम या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील परिवाराने राबवले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी शनिशिंगणापूर शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करून महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिणमध्ये साखर वाटप देखील करत आहोत असे सांगून या उपक्रमाचा हेतू म्हणजे सदरील सोहळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल असेही डॉ. सुजय विखेंनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे. आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी संगितले.  विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो. त्यामुळे सदरील विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. दरम्यान आज खासदार सुजय विखेंनी जवळा, खर्डा, शिवूर, मोहा, जामखेड शहरांमध्ये आज चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ahmednagar News: जामखेड तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ! खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले,विखे पाटील परिवार… Read More »

Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता

Weather Update :  देशातील सर्वच भागात आता थंडीमुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मैदानापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत कडाक्याची थंडीची लाट आहे.  दिल्ली-पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये किमान तापमान 2 अंशांवर पोहोचले आहे. त्याच वेळी,  यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमधील अनेक भागात तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले.  हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. यासोबतच, IMD ने जारी केलेल्या बुलेटिननुसार, पुढील 5 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.  संपूर्ण उत्तर भारतात धुक्याचा कहर 18 जानेवारीला सकाळी दिल्ली-राजस्थान, यूपी, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या अनेक भागात दाट धुके दिसले. या राज्यांमध्ये 22 जानेवारीपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 19 जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पुढील तीन दिवसांत पूर्व भारतातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते आणि त्यानंतर त्यात कोणताही विशेष बदल होणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टी बराच उशीर झाला असला तरी, बुधवारी संध्याकाळी शिमल्याच्या चंशाल, नारकंडा आणि हातू शिखरावर तसेच खडा पाथर आणि चुरधर शिखर सारख्या इतर उंच भागात हलकी बर्फवृष्टी झाली. या उच्च उंचीच्या भागात आजही बर्फवृष्टी सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 18 जानेवारी 2024 रोजी देशाच्या पूर्वेकडील भागात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये हिवाळी पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये थंडीच्या दिवसाबाबत सतर्कता हवामान खात्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, झारखंड, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील 5 दिवस दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे. त्याच वेळी, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये थंड दिवसाची स्थिती कायम राहू शकते. या राज्यांमध्ये आज पाऊस पडू शकतो स्कायमेट हवामान अहवालानुसार, 18 जानेवारी रोजी बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये वेगळ्या ठिकाणी गारपीट होऊ शकते.  अंदमान आणि निकोबार बेटांवर, तामिळनाडूचा दक्षिण भाग आणि लक्षद्वीपमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये प्रदीर्घ कोरडा काळ पावसाने संपू शकतो.  पुढील 3-4 दिवसांत, पाऊस लक्षणीयरीत्या कमी होईल किंवा बहुतेक ठिकाणी थांबेल. मात्र, पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

Weather Update: कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा? ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता Read More »

Petrol- Diesel Price : डिझेल आणि पेट्रोल 10 रुपयांनी होणार स्वस्त? ‘या’ दिवशी होणार घोषणा

Petrol- Diesel Price : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत   सर्वसामान्य जनतेला लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार डिझेल आणि पेट्रोलच्या दरात लवकरच मोठी कपात होऊ शकते. रिपोर्टनुसार, डिझेल आणि पेट्रोलच्या किमती एकाच वेळी 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. डिझेल आणि पेट्रोलच्या किमती एवढ्याने कमी झाल्या तर अनेक वस्तूंच्या किमती कमी होतील कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचाही त्यांच्या किमतींवर परिणाम होतो. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत तेल कंपन्यांचा नफा 75 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. एप्रिल 2022 नंतर सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. तेल कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला आता असे बोलले जात आहे की तेल कंपन्यांच्या नफ्याचे मार्जिन 10 रुपये प्रति लीटरपर्यंत असू शकते, अशा परिस्थितीत ते आता जनतेला देखील दिले जाईल. आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तेल कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. तिसऱ्या तिमाहीतही हाच ट्रेंड कायम राहील अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी करण्याचा विचार करत आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 5826.96 कोटी रुपयांचा निव्वळ एकत्रित नफा कमावला आहे. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने याच तिमाहीत 8244 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की आता भारतातील तेलाच्या किमती फक्त तेल कंपन्याच ठरवतात.

Petrol- Diesel Price : डिझेल आणि पेट्रोल 10 रुपयांनी होणार स्वस्त? ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »