DNA मराठी

ताज्या बातम्या

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर ….

Biscuits Side Effects : डायजेस्टिव बिस्टिकटच्या जाहिराती आपल्याला जेवणामधील जास्त कळाचं अंतर व भूक सहन करण्याच्या सवयीवरून घाबरवतात.  यापासून बचाव करण्यासाठी डायजेस्टिव बिस्किट चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. शुगर, फॅट व सोडियम फ्री असल्याचा दावा करणा-या बिस्किटामध्ये खरं तर खूप प्रमाणात साखर, फॅट, सोडियम व रिफाइंड पीठ असतं. शिवाय चविष्ट लागावं म्हणून यामध्ये केमिकलयुक्त टेस्ट इनहेंसर देखील वापरलं जातं. यामध्ये वापरली जाणारी सामग्री आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि खरंच ही बिस्किटं आरोग्यासाठी लाभदायक असतात का? डायजेस्टिव बिस्किट खरं तर डॉक्टर्सच्या सल्ल्यावरून जुलाब  व खराब डायजेशनमधून जाणा-या रुग्णांसाठी बनवली गेली आहेत.  बाजारात मिळणा-या इतर बिस्किटांच्या तुलनेत डायजेस्टिव बिस्किटात फायबरयुक्त, प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल असण्यासोबतच कोलेस्ट्रॉल व फॅट फ्री असल्याचं सांगितलं जातं व नाश्ता किंवा चहासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.  ही बिस्किटं मधुमेहांच्या  रुग्णांसाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समजलं जातं. ग्लुटेनची मात्रा करू शकते घात बेकरी आयटम्स मैद्यापासून बनलेले असतात. डायजेस्टिव बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं. वेगवेगळ्या ब्रॅंडच्या डायजेस्टिव बिस्किटांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते.  जर तुम्हाला ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असेल तर हे बिस्किट तुमच्यासाठी लाभदायक नाही. ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडीटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात. सॅच्युरेटेड फॅटमुळे नुकसान डायजेस्टिव बिस्किटांच्या पाकिटावर फॅट फ्री असं लिहिलेलं असतं. पण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गैस्ट्रोइंटेस्टाइनलशी निगडीत आजारांचं शिकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जरी ही बिस्किटं तुम्ही खात असाल तरी मर्यादीत प्रमाणात सेवन करणे कधीही उत्तम. प्रिजरव्हेटिव्हसचा भडिमार बाजारात डायजेस्टिव बिस्किटाला खूप मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर बिस्किटांप्रमाणेच यामध्ये प्रिजरव्हेटिव्हस मिसळले जातात. जेणे करून बिस्किटं बराच काळ खराब न होता टिकून राहतील. सोबतच सुगंधासाठी यामध्ये इसेंस टाकणंही मजबूरी असते.  आता ही बिस्किटं तुमच्यासाठी लाभदायक आहेत की नुकसानकारक, हे त्यामध्ये मिसळलेल्या प्रिजरव्हेटिव्हसच्या प्रमाण व क्वालिटीवरच अवलंबून असते. हे प्रिजरव्हेटिव्हस व इसेंस शेवटी केमिकलच आहेत. शुगरलेस नाही डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. याचाच अर्थ ही बिस्किटं शुगरलेस नाहीत. ही बिस्किटं खालल्याने तुम्ही नकळतच एक्स्ट्रा साखरेचं सेवन करता. त्यामुळे जर यातील साखरेचे प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर लठ्ठपणा, ह्रदयाशी निगडीत आजार व डायबिटीज सारख्या आजारांचा धोका कमी होताना दिसतच नाही. सोडियममुळे होऊ शकतात समस्या बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकंसं नमकिन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं. प्रत्येक आजार व रुग्ण वेगवेगळा असतो. त्यामुळे कोणताही पदार्थ डोळे झाकून सेवन करण्याआधी ते बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सामग्रीची माहिती लक्ष देऊन वाचा. डायजेस्टिव बिस्किटाऐवजी ड्रायफ्रुट्स, स्प्राऊट्स आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करावा.  यासोबतच भात, साबुदाणा किंवा कोकोनट बिस्किटं किंवा असे पदार्थच खा जे कोणत्याही प्रकारचं नुकसान, अ‍ॅलर्जीपासून बचाव करून आरोग्यास फायदे मिळवून देईल.

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर …. Read More »

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर

Ranji Trophy Final:  मुंबईने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत विदर्भ विरोधात खेळण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात विजेते पटकावले आहे.    मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने विदर्भाचा 169 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत 42 व्यांदा विजेतेपद पटकावले.  मुंबईसाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सरफराज खानचा भाऊ मुशीर खान यांनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. या सामन्यात मुंबईने शार्दुल ठाकूरच्या 75 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ अवघ्या 105 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने शानदार फलंदाजी करत मुशीर खानच्या 136 धावा, श्रेयस अय्यरच्या 95 धावा, कर्णधार रहाणेच्या 73 धावा आणि शम्स मुलानीच्या 50 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर 418 धावा केल्या. मुंबईची एकूण आघाडी 537 धावांची असून विदर्भाला 538 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने 103 धावांचे शतक झळकावले. त्यांच्याशिवाय करुण नायरने 74 आणि हर्ष दुबेने 65 धावा केल्या. करुण नायर आणि अक्षय वाडकर यांनी पाचव्या विकेटसाठी 173 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली. मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियनने सर्वाधिक चार बळी घेतले. तर मुशीर खान आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलाणी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला.

Ranji Trophy Final: मुंबई पुन्हा चॅम्पियन! ‘हे’ खेळाडू ठरले गेम चेंजर Read More »

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल

Loksabha Election 2024 : पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.   पटियाला काँग्रेस लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रनीत कौर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ, विनोद तावडे आणि अरुण सिंग, पंजाब भाजपचे प्रभारी विजय भाई रुपाणी आणि पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रनीत कौर यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सांगितले की, त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, त्या परराष्ट्र राज्यमंत्रीही राहिल्या असून त्यांच्या येण्याने निश्चितपणे पंजाबमध्ये भाजप मजबूत होईल आणि पंजाबच्या जनतेलाही फायदा होईल.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रनीत कौर म्हणाल्या की आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत काम केले, पंजाबसाठी काम केले आणि लोकशाहीसाठी काम केले. आता वेळ आली आहे जेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला पुढे नेऊ शकतील, जगात भारताची प्रतिष्ठा वाढवू शकतील. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी करत असलेले काम आणि धोरणे पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षात समाविष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत प्रनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगसह आधीच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  प्रनीत कौर यांनी पंजाबच्या पटियाला मतदारसंघातून चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत गेल्या वर्षीच त्यांना निलंबित केले होते. पंजाबमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेली भाजप प्रनीत कौर यांना लोकसभेची उमेदवार बनवू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल Read More »

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

Maharashtra News : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे? याची कोणालाच कल्पना नाही.  तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना शरद पवार यांचे फोटो निवडणूक प्रचारामध्ये वापरल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत.   शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जावर आज  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विचारले की, वेगळे झाल्यानंतरही अजित पवार गट शरद पवारांचे फोटो का वापरत आहे? निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांच्या फोटोचा वापर का? करत आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केला.  न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्यांच्यासोबत (शरद पवार) न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग तुम्ही त्यांचे (शरद पवार) फोटो का वापरता… आता तुमची ओळख घेऊन निवडणुकीत जा…”   उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे. अजित पवार गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांच्या नावाचा, फोटोचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने करून याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.  जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला तेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला.  अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारीला अजित पवार गटाला  राष्ट्रवादीचा दर्जा देत घड्याळाचे चिन्ह दिले.  तर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ आणि निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असे नाव देण्यात आले.

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय Read More »

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी!

Ahmednagar News:  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा  व जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेत पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील व मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन बुधवारी मंत्रालयातील दालनात केले होते.  यावेळी महसूलमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यामुळे या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, जायकवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तानां शासनाने जमिनी देण्याचे सोपास्कार केले मात्र अद्यापही अनेक जमिनी या भोगवाटा २ मध्ये असून त्यात वन विभागांच्या जमिनींचा सुद्धा समावेश आहे.   यामुळे त्यांना घरकुल योजना आणि इतर शासकीय योजना राबविताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनी ह्या १९७३ पुर्वीच्या दिल्या गेल्याने त्यातील अनामत रकमा रखडल्यामुळे या जमीन शासन जमा केल्या जाणार आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठऊन अशा जमिनीवरील तत्कालीन धोरणातील १०० टक्के, ७५ टक्के अनामत रक्कम भरण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खासदारांनी केली.  वन अधिनियम १९८० अस्तितवात येण्यापुर्वी वाटप केलेल्या जमिनी भोगवाटा २ वर्गातील जमिनी सरकट वर्ग १ मध्ये करण्यात याव्यात. तसेच रहिवाशी प्रयोजनातील वाटप करण्यात आलेले भुखंड आणि पुनर्वसन गावठाणातील जमिनी नियमाकुल करण्याबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. या सर्व मागण्याच्या बाबतीत सखोल चर्चा होऊन दोन्ही मंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसलू, मदत व पुनर्वसन आणि वन विभागाला निर्देश दिले.  या बैठकीला मंत्रालयातील दालनात महसूल व मदत व पुनर्वसन विभागांच्या मंत्र्यांसह आमदार श्रीमती मोनिका राजळे आणि महसूल, मदत पुनर्वसन व वन विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.  तर दृकश्राव्य माध्यमातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिध्दिराम सालीमठ आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ahmednagar News: मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी! Read More »

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम

आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Rohit Pawar : जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळले. आंदोलनस्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रत्नदीपबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   रत्नदीप फौंडेशनच्या अध्यक्षाच्या शैक्षणिक, आर्थिक, माणसिक, शाररीक पिळवणूकमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवशी आ. रोहीत पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली.  चार मुद्दयावर विद्यापीठ प्रतिनिधीनी कुलगुरू समवेत होणाऱ्या मिटींग नंतर निर्णय घेतले जातील असे अश्वासन दिले परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉ. भास्कर मोरे याला 24 तासात अटक करण्याची मुदत संपली 100 घंटे झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.   महिला आयोगाकडून दखल रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे माणसिक, अर्थिक शाररीक, अत्याचारामुळे सुरू असलेल्या  अंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वता:हून दखल घेतली आहे.  आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरु असलेल्या या प्रकरणाबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ) (एक) व (2) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे व माहीती कळवण्यास सांगितले आहे.

Rohit Pawar: आंदोलनाचा सातवा दिवस, आ. रोहित पवार व तीन विद्यापीठ समितीसमोर पाच तासांच्या चर्चेनंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम Read More »

kitchen Tips :  चकचकीत स्वयंपाकघर हवे असल्यास ‘या’ 6 टिप्स अवलंबवा

Kitchen Tips : आपल्याला चकचकीत स्वयंपाकघर आवडतं पण याला चकचकीत करण्यासाठी लागणारी मेहनत आणि एनर्जीचा वैताग येतो.  त्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याला अवलंब करून आपण आपल्या स्वयंपाकघराला स्वच्छ आणि चकचकीत ठेवू शकता.  स्वयंपाकघराची स्वच्छता करणं म्हणजे अक्षरशः थकवा येतो. आपण तासंतास आपला वेळ स्वयंपाकघरात घालवतात. दररोज स्वच्छ करून देखील बघा तेव्हा किचन घाण आणि पसरलेलंच असत. हे बघून फार चिडचिड होते.  या लेखमध्ये आम्ही आपल्याला काही अश्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला किचन स्वच्छ करणं सहज आणि सोपं वाटेल.  किचनच्या टाइल्स  उष्णता आणि स्वयंपाक केल्यामुळे टाइल्स चिकट आणि घाण होतात. हे स्वच्छ करणं म्हणजे मोठा प्रश्न असतो. टाइल्स लहान असो किंवा मोठे ते घाण होतातच. आता ह्यांना स्वच्छ करणं सोपं आहे. काय करावं  एका स्प्रेच्या बाटलीत 1 कप व्हिनेगर सह 1 ¼ कप बेकिंग सोडा मिसळा. आता टाइल्सवर या लिक्विडचा स्प्रे करून टूथब्रशने घासून घ्या.  घाण निघत नसल्यास या घोळात ½ कप लिक्विड साबण मिसळा  आपल्या किचनच्या वेंटला नवे बनवा आपल्या किचनच्या वेंट मध्ये सर्वात जास्त तेल जमा होतं. हे गॅस च्या वर असल्यामुळे उष्णतेमुळे तेल लवकर एकत्र करते. काय करावं   एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पाणी तापत ठेवा आणि वेंट बाहेर काढा.  हळू हळू या मध्ये ¼ कप बेकिंग सोडा मिसळा थोड्याच प्रमाणात मिसळा. या मिश्रणाला 60 सेकंद पर्यंत उकळू द्या. आपल्याकडे लहान भांड असल्यास त्याला पालटी करा आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक बाजू 60 सेकंदासाठीच घोळात असावी.  चॉपिंग बोर्डाची स्वच्छता  लाकडाचे बोर्ड कापण्यासाठी आणि चॉप करण्यासाठी चांगले असतात. पण त्यांचा पृष्ठभाग सच्छिद्र असल्यामुळे त्याचा वर त्वरितच डाग पडतात आणि त्यामधून वास येऊ लागतो. काय करावं बोर्ड वर मीठ भुरभुरा. एक लिंबू घ्या त्याला अर्ध चिरून घ्या.  आता या लिंबाने बोर्डाला मागून पुढून पुसून घ्या डाग आणि वास नाहीसे होतील. जळालेले भांडे स्वच्छ करणं आपण गॅसवर दूध ठेवून विसरून गेला आहात किंवा आपण साखरेला केरॅमल बनविण्याचा प्रयत्न केला असाल आणि साखर भांड्याला चिटकली असल्यास, परिणाम भांडंं जळतंं. तर काही उपाय करून आपण जळालेल्या भांड्यांना स्वच्छ करू शकता. काय करावं   जळालेल्या भांड्यात 1 कप पाणी आणि 1 कप व्हिनेगर घाला. या घोळाला उकळू द्या. उकळल्यावर भांड सिंक मध्ये ठेवा आणि या मध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घाला.  आता मिश्रण जमणे बंद झाल्यास कंटेनर रिकामे करा आणि कडक स्पॉंजने स्वच्छ करा. जळालेले भांडे स्वच्छ झाले नसल्यास अतिरिक्त बेकिंग सोडा घाला.  स्वयंपाकघरातील स्पॉंज स्वच्छ करावं स्वयंपाकघर स्वच्छ करताना आपण स्पॉंज स्वच्छ करायला विसरतो, ज्यामुळे बॅक्टेरिया एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून दिवसातून एकदा तरी ह्याची स्वच्छता करावी. काय करावं   स्पॉंज मऊ करण्यासाठी आणि त्यामधून घाण आणि तेल काढण्यासाठी स्पॉंज एक ग्लास पाण्यासह काही मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.  जळालेले गॅस बर्नर स्वच्छ करणे  बऱ्याचदा जळालेले स्टोव्ह किंवा बर्नर गरम असल्यामुळे आपण स्वच्छ करतं नाही पण यासाठी सर्वात उत्तम उपाय अमोनिया आहे जे उत्तम ग्रीस रिमूव्हर आहे. म्हणून आपल्या गॅस बर्नरच्या सभोवताली ग्रीसचे डाग काढण्यासाठी याचा वापर करावा. काय करावं  एका झिपलॉक बॅगेत ¼ कप अमोनिया घाला. या पेक्षा जास्त टाकू नका. या मध्ये आपल्या गॅस बर्नरला टाकून ठेवा आणि बॅग लॉक करा. बर्नरला किमान 8 ते 9 तास असेच पडू द्या. स्पॉन्जच्या मदतीने पुसून घ्या.

kitchen Tips :  चकचकीत स्वयंपाकघर हवे असल्यास ‘या’ 6 टिप्स अवलंबवा Read More »

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.  महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील Read More »

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

Clove Tea : दिवसाची सुरुवात असो किंवा कोणतंही शारीरिक, मानसिक काम केल्यानंतर आलेला थकवा असो एक कप कडकडीत चहा प्यायला की सगळी मरळ दूर होते आणि  मस्त तरतरी येते. त्यामुळे चहा हे अनेकांच्या आवडतं पेय आहे.  पूर्वी चहा हा अत्यंत साध्या पद्धतीने केला जात होता. मात्र, आता या चहामध्ये सुद्धा नवनवीन फ्लेवर मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे गृहिणी साधाच चहा हटके पद्धतीने तयार करत त्याला एक नवीन चव देतात. त्यामुळेच साध्या चहापेक्षा मसाला चहा, आल्याचा चहा, गवतीचहा, ब्लॅक टी, लेमन टी असे अनेक चहा लोकप्रिय होत आहे.  परंतु यासोबतच लवंगांचा चहा सुद्धा सध्या लोकप्रिय होत असून तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे लवंगांचा चहा कसा करायाच आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात. 1. श्रमाची काम केल्यामुळे किंवा आजारपणामुळे अंग दुखत असल्यास लवंगांच्या चहामुळे थकवा दूर होतो व आराम मिळतो. 2. अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दूर होतो व अन्नपचन व्यवस्थित होते. 3. दातदुखी दूर होते. 4. किरकोळ ताप येत असेल तर लवंगांचा चहा प्यावा. 5. सर्दी-खोकला दूर होतो. 6.डोकेदुखीपासून आराम मिळतो.  लवंगांचा चहा कसा कराल? 4-5 लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा. त्यानंतर चहासाठी पाणी ठेवल्यावर त्यात 1 लहान चमचा तयार लवंगांची पूड टाका. लवंगांची पूड टाकलेलं पाणी 10 मिनीटं उकळवा व पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. अशा प्रकारे लवंगांचा चहा तयार. ( आवड असल्यास साखर घालावी.)

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे Read More »

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिब वसमतनगर येथील ऐतिहासिक तलाव परिसरामध्ये अतिक्रमण वाढले असून त्यांच्याकडून ड्रेनेजचे पाणी तलावामध्ये सोडल्याने घाणीचे साम्राज्य वाढले असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने त्याचा बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेने हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापीलवार यांना केली आहे.   नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली चालणारा हिंगोली जिल्ह्यातील वसमतनगर येथील गुरुद्वारा दमदमा साहिब येथील तलावाशेजारी मागील दहा ते बारा वर्षांपासून अतिक्रमण वाढले आहे.  अतिक्रमणधारकांनाकडून तलावामध्ये ड्रेनेजचे घाण पाणी सोडले जात असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दमदमा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. प्रदूषित तलावाच्या पाण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.         ऐतिहासिक तलावातील दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचा धोका निर्माण झाल्याने या परिसरातील अवैधरित्या करण्यात आलेले अतिक्रमण हटवून तलावाला प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करून तलावाची पावित्र्य कायम ठेवावे अशी मागणी हजूरी पाठी संघटनेचे अध्यक्ष दलजीतसिंघ बिशनसिंघ हजूरीपाठी, परदीपसिंघ जितसिंघ रागी, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ पैदल, हुकुमसिघ काराबिन यांनी हिंगोली जिल्हाधिकारी, वसमत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , सचखंड गुरद्वारा बोर्ड अधिक्षकांसह नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Nanded News : गुरुद्वारा दमदमा साहिबच्या ऐतिहासिक तलावाला प्रदूषण व अतिक्रमणाचा विळखा Read More »