DNA मराठी

ताज्या बातम्या

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले

Hezbollah Attack On Israel:  हिजबुल्लाने आपल्या कमांडरच्या मृत्यूनंतर बदला म्हणून इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक 70 रॉकेट डागले आहेत. हा हल्ला इस्रायलच्या पश्चिम गॅलीलीमध्ये झाला. या हल्ल्याबाबत हिजबुल्लाहने अधिकृत वक्तव्यही केले आहे. हिजबुल्लाहने सांगितले की, “चामाला लक्ष्य करून अनेक नागरिकांच्या हौतात्म्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली लष्करी लक्ष्यांवर रॉकेट हल्ले केले आहेत.” इस्रायलने 15 रॉकेट रोखले दरम्यान, लेबनीज लष्करी सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, लेबनीज सैन्याने दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये इस्रायलवर डागलेल्या सुमारे 70 रॉकेटचे निरीक्षण केले आणि त्यातील काही इस्रायली आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने रोखले. इस्रायलच्या सरकारी टीव्ही चॅनल कानने वृत्त दिले की, रॉकेट पश्चिम गॅलीलीच्या दिशेने डागण्यात आले, त्यापैकी 15 रोखण्यात आले आणि उर्वरित रिकाम्या भागात पडले. यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. हिजबुल्लाहचा टॉप कमांडर इस्रायलने मारला मंगळवारी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगर दहीह येथे इस्रायली हल्ल्यानंतर हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे, ज्यात हिजबुल्लाह लष्करी कमांडर फौद शोकोर ठार झाला आहे. इस्त्रायली हल्ल्याला योग्य वेळी आणि ठिकाणी प्रत्युत्तर देण्याची धमकी हिजबुल्लाचे नेते हसन नसरल्लाह यांनी दिली. दुसरीकडे, इस्रायली सैन्याने गाझा शहरातील एका अपार्टमेंट ब्लॉकवर बॉम्बफेक केली आहे, ज्यामध्ये किती लोक मारले गेले हे समोर आलेले नाही. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीच्या सूत्रांनी सांगितले की अपार्टमेंटच्या ढिगाऱ्यातून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले, जे अबू हाशेम कुटुंबाचे होते आणि गाझा शहरातील अल-जाला स्ट्रीटवर होते.

Hezbollah Attack On Israel : हिजबुल्लाहकडून इस्रायलवर मोठा हल्ला केला, 70 रॉकेट डागले Read More »

Rain Bath : बिन्धास्त करा ‘रेन बाथ’, पावसात भिजण्याचे फायदे जाणून व्हाल तुम्ही थक्क

Rain Bath : देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसात  मान्सूनच्या पावसात भिजल्यासारखं प्रत्येकाला वाटतं. पाऊस बालपणीच्या दिवसांची आठवण करून देतो. पावसात आंघोळ करायला खूप मजा येते. बरेच लोक पावसात भिजण्यास नकार देतात, तथापि, पावसात आंघोळ करण्याचे बरेच फायदे आहेत. पावसात भिजताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पावसात भिजण्याचे फायदे पुरळ बरे होतात उष्णतेमुळे आणि घामामुळे पुरळ उठते. ते दूर करण्यासाठी पावसाचे पाणी देखील फायदेशीर आहे. पावसात आंघोळ केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पुरळही बरे होतात.  हार्मोन्स बाहेर पडतात पावसात भिजण्याची मजा येते आणि आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. अशा स्थितीत मन आणि शरीराला खूप आराम वाटतो. पावसात आंघोळ केल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. व्हिटॅमिन बी 12 वाढवते पावसात 10 ते 15 मिनिटे अंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असते. यातून तुम्हाला व्हिटॅमिन बी12 मिळते. पण लक्षात ठेवा पावसात आंघोळ केल्यानंतर साबणाने आंघोळ करा. केसांसाठी फायदे पावसाच्या पाण्यात अल्कधर्मी पीएफ असतो. हे पाणी केसांसाठी फायदेशीर आहे. पावसात आंघोळ केल्याने केसांचा निस्तेजपणा दूर होतो. ते त्वचेसाठीही चांगले असते. लक्षात ठेवा पावसात भिजल्यानंतर शॅम्पू करणे आवश्यक आहे. पावसात भिजत असाल तर घ्या ही खबरदारी पावसात जास्त वेळ अंघोळ करू नये कारण आजारी पडण्याचा धोका असतो. 15-20 मिनिटे पावसात भिजायला हरकत नाही. यापेक्षा जास्त आंघोळ करू नका.  पावसात 15-20 मिनिटे आंघोळ केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ करावी.  शरीर आतून गरम करण्यासाठी पावसात भिजल्यावर गरम सूप किंवा चहा प्या. याशिवाय पहिल्या पावसात भिजणे टाळावे. या पाण्यात बॅक्टेरिया असतात.

Rain Bath : बिन्धास्त करा ‘रेन बाथ’, पावसात भिजण्याचे फायदे जाणून व्हाल तुम्ही थक्क Read More »

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

Sujay Vikhe:  येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. यातच आता अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मला जर संधी मिळाली तर मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी दिली त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातसह राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर किंवा संगमनेरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवल्याने सुजय विखे  बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये.  माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे असं माध्‍यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले.  तर शिर्डी विधानसभा मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आ.राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त  अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य यांनी केले.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत Read More »

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

Zika Virus: झिका, डेंग्यू यासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवून डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसहभाग तसेच महापालिका प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांतून विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी केले. झिका, डेंग्यू आदी विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी एक तास स्वच्छतेचा हा उपक्रम दर रविवारी राबवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी डॉ. बोरगे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. एडिस डासामुळे विषाणूजन्य आजार पसरतात. एडीस डास हा आपल्या परिसरात स्वच्छ पाण्यात वाढत असल्याने आपल्या जवळपास कोणत्याही प्रकारचे पाणी साचू देऊ नये. फ्रीजचे ट्रे, कुंड्या, पक्षांना पिण्यासाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर भंगार वस्तू इत्यादी ठिकाणी साचणारे पाणी वाहते करून ही डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट केल्यास विषाणूजन्य आजारांना रोखता येईल. त्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचे यावेळी डॉ बोरगे यांनी सांगितले.  महापालिका आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या या जनजागृती कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या परिसरातील डास उत्पत्ती निर्माण करणारी स्थाने नष्ट केली. आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनानुसार अहमदनगर शहरातील सर्व भागांमध्ये नागरिक स्वयंप्रेरणेने डेंग्यू विरोधी जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायोजना करीत आहेत. त्यामुळे विषाणूजन्य आजारांवर आपण सर्व निश्चितच नियंत्रण मिळवू असा विश्वास डॉ. अनिल बोरगे यांनी यावेळी व्यक्त केला.  नगर शहरात डेंग्यू मुक्त अभियानात आठवड्यातुन दर रविवारी एक तास नागरिकांना सहभागी करून कुंड्या,कूलर,जुन्या निरोपयोगी वस्तू ,टायर यामध्ये साचलेले पाणी रिकामे करण्यात यावी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच ताप- डोके- डोळे- सांधे दुखणे, मांसपेशी दुखणे तापा सोबत,अंगावर लालसर पुरळ येणे,उलट्या होणे पोट दुखणे उलटी लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सल्ला घ्यावा तसेच डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया हे आजार डासां मार्फत होतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये डेंग्यू आजारावर योग्य वेळेत औषध उपचार केल्यास रुग्ण खात्रीने बरा होतो डेंगू आजाराच्या निदानासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मोफत रक्ताची एलायझा चाचणी करून घ्यावी तपासाची लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.

Zika Virus : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा सरसावली…, नागरिकांना केले महत्वाचे आवाहन Read More »

Sagar Triple Murder: धक्कादायक, आई आणि दोन मुलींची निर्घृण हत्या,घरात सापडले मृतदेह

Sagar Triple Murder: मध्य प्रदेशातील सागर येथे 30 जुलैच्या रात्री एका महिलेची आणि तिच्या दोन मुलींची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  माहितीनुसार, तिन्ही मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.  महिलेचा पती रात्री घरी पोहोचला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मृताच्या पतीची चौकशी करत आहेत. मृताच्या भावाने कुटुंबीयांवर खुनाचा संशय व्यक्त केला असून, घरातील सदस्यांमध्ये वाद होत असल्याचे सांगितले. मात्र, पोलीस सर्व मुद्यांचा बारकाईने तपास करत आहेत. 200 मीटर अंतरावर पोलीस नियंत्रण कक्ष सागरच्या पोलीस नियंत्रण कक्षासमोर 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. मृत महिलेचा पती विशेष पटेल जिल्हा रुग्णालयात संगणक परिचालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री तो घरी पोहोचला तेव्हा त्याला घराचे दरवाजे उघडे दिसले. विशेष यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना पत्नी वंदना (32 वर्षे), मोठी मुलगी अवंती (8 वर्षे) आणि लहान मुलगी अन्विका (3 वर्षे) यांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले.  किचनमध्ये पत्नी आणि मोठ्या मुलीचे मृतदेह आढळून आले तर लहान मुलीचा मृतदेह खाली बेडरूममध्ये पडलेला होता. त्यानंतर रात्री उशिरा सासरच्या मंडळींना फोन करून या घटनेची माहिती दिली. स्वयंपाकघरात रक्त  घटनास्थळ पाहता त्यांचे डोके भिंतीवर आदळले असून डोक्यावर व शरीराच्या इतर भागावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत आहे. तिघांच्याही डोक्यातून रक्तस्त्राव होत असून रूम व स्वयंपाकघरात सर्वत्र रक्त पसरले होते. घटनेची माहिती मिळताच आयजी प्रमोद वर्मा, डीआयजी सुनील कुमार, एसपी प्रभारी डॉ संजीव उईके रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. पोलीस जवळपास लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत आहेत. आज तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Sagar Triple Murder: धक्कादायक, आई आणि दोन मुलींची निर्घृण हत्या,घरात सापडले मृतदेह Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक

Ahmednagar News: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अहमदनगर- संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे सायंकाळी एक विचित्र अपघात घडला आहे.  माहितीनुसार, अहमदनगरकडून संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने आठ वाहनांना मागिल बाजुने जोरदार धडक दिली. काही अंतरावर जाऊन कंटेनर चालक आपले ताब्यातील वाहन सोडून पळ काढला.  अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे अपघात, कंटेनरची आठ वाहनांना धडक Read More »

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा

Maratha Reservation: सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती. यावेळी डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. असं यावेळी गजेंद्र दांगट म्हणाले.  असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Maratha Reservation: लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार,  सरकारला मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर …

Ahmednagar News: अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. २ पी. आर. सित्रे यांनी अर्बन बैंक अपहार प्रकरणातील शंकर घनश्यामदास अंदानी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. सदरचा आदेश दि. २६/०७/२०२४ रोजी देण्यात आलेला आहे.    बँकेचे तांत्रिक संचालक शंकर अंदानी यांना अर्बन बैंक अपहार प्रकरणामध्ये फेब्रुवारी २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती व तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश एस. गुगळे यांनी अंदानी हे व्यवसायाने सनदी लेखापाल असून सध्या ऑडीटचे सर्व कामकाज ठप्प पडले असल्याने व आरोपी हे व्यवसायाने लेखापाल असल्याने त्यांचे व्यवसायाचे व पर्यायाने कुटूंबाचे आर्थिक नुकसान होत आहे असा युक्तीवाद करुन शंकर अंदानी यांना तात्पुरता जामीन देण्याची मागणी ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयास केली, त्यावर सरकार पक्षाने तीव्र विरोध दर्शविला, परंतू न्यायालयाने प्रकरणामध्ये असलेला त्यांचा सहभाग तसेच त्यांच व्यवसायीक अडचण व होणारे आर्थिक नुकसान या सर्व बाबींचा विचार करुन दि. २६/८/२०२४ पावेतो त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. सदर प्रकरणात मुळ जामीन अर्ज हा न्यायालयापुढे अद्यापही प्रलंबीत असून त्यावर नजीकचे भविष्य काळात सुनावणी होणे अपेक्षीत आहे.  या प्रकरणात  शंकर अंदानी यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: नगर अर्बन बँक अपहार प्रकरणी संचालकास जामीन मंजूर … Read More »

IND vs SL Live Streaming :  Hotstar-Jio Cinema वर दिसणार नाही IND vs SL सामना, ‘येथे’ येणार पाहता

IND vs SL Live Streaming : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर आजपासून (27 जुलै) भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे.   सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका खेळणार आहे. भारत-श्रीलंका मालिका खूपच रोमांचक होणार आहे.  त्यामुळे T20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे होईल आणि तुम्ही ते टीव्हीवर कुठे पाहू शकता ते जाणुन घ्या  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कधी होणार? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना 27 जुलै रोजी होणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना कुठे खेळला जाईल? भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता? भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार? भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रसारण सोनी लिव्हवर होणार आहे. दोन्ही संघ भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, रायन पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद. श्रीलंका- चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चामिंडू विक्रमसिंघे, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, कुसल परेरा, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, महेश थेकशाना फर्नांडो, महेश थेकशाना फेरनांदो, आणि दिलशान मधुशंका.

IND vs SL Live Streaming :  Hotstar-Jio Cinema वर दिसणार नाही IND vs SL सामना, ‘येथे’ येणार पाहता Read More »