DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Election: महायुती – मविआमध्ये ‘काटे की टक्कर’, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज

Maharashtra Election: राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पूर्ण झाली असून आता यावेळी राज्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहे. या एक्झिट पोल नुसार राज्यात पुन्हा महायुतीची सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदान पूर्ण झाले होते मात्र बहुतांश ठिकाणी 6 नंतर ही मतदाप्रक्रिया सुरू असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा फायदा कोणाला होणार हे देखील पहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरमध्ये झाला आहे. गडचिरोलीमध्ये 73.68 तर मुबई शहरमध्ये 52.07 टक्के मतदान झाला आहे. Maharashtra Exit Polls 2024 :इलेकोट्ल एज : महायुती – 121, मविआ- 150, अपक्ष – 20 पोल डायरी : महायुती- 122-176, मविआ – 69-121, इतर 12-19 चाणक्य स्ट्रॅटजीस : महायुती -152-160, मविआ – 130-138, इतर- 6-8 मॅट्रिझ : महायुती 150-170, मविआ -110-130, अन्य 8-10 पीपल्स पल्स : महायुती 175-195, मविआ-85-12, अपक्ष-7-12

Maharashtra Election: महायुती – मविआमध्ये ‘काटे की टक्कर’, जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज Read More »

Maharashtra Election: विधानसभेसाठी राज्यात 65.11 टक्के मतदान, कोण मारणार बाजी?

Maharashtra Election: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ६५.११ टक्के मतदान झाला असल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरमध्ये झाला आहे. गडचिरोलीमध्ये ७३.६८ तर मुबई शहरमध्ये ५२.०७ टक्के मतदान झाला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. २३ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारीअहमदनगर – ७१.७३ टक्के,अकोला – ६४.९८ टक्के,अमरावती – ६५.५७  टक्के,औरंगाबाद- ६८.८९ टक्के,बीड – ६७.७९ टक्के,भंडारा – ६९.४२ टक्के,बुलढाणा – ७०.३२ टक्के,चंद्रपूर- ७१.२७ टक्के,धुळे – ६४.७० टक्के,गडचिरोली – ७३.६८ टक्के,गोंदिया – ६९.५३  टक्के,हिंगोली – ७१.१० टक्के,जळगाव – ६४.४२ टक्के,जालना – ७२.३० टक्के,कोल्हापूर – ७६.२५ टक्के,लातूर – ६६.९२ टक्के,मुंबई शहर- ५२.०७ टक्के,मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,नागपूर – ६०.४९ टक्के,नांदेड –  ६४.९२ टक्के,नंदुरबार- ६९.१५  टक्के,नाशिक – ६७.५७  टक्के,उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,पालघर – ६५.९५ टक्के,परभणी – ७०.३८ टक्के,पुणे –  ६१.०५ टक्के,रायगड –  ६७.२३ टक्के,रत्नागिरी – ६४.५५ टक्के,सांगली – ७१.८९ टक्के,सातारा – ७१.७१ टक्के,सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,सोलापूर – ६७.३६ टक्के,ठाणे – ५६.०५ टक्के,वर्धा –  ६८.३० टक्के,वाशिम – ६६.०१  टक्के,यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे.

Maharashtra Election: विधानसभेसाठी राज्यात 65.11 टक्के मतदान, कोण मारणार बाजी? Read More »

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहे. तर आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले शरद पवारांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूर मध्ये हल्ला झालाअत्यंत निर्गुण हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिला असेल त्यांच्या डोक्यावर इतर भागात दगडफेकीमुळे ते रक्त बंबाळ झालेले आहे. काल ते अत्यावस्थत होते. असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, हल्ला करताना भारतीय जनता पक्षा कडून जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्री त्याच्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर माजी गृहमंत्री यांना ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था काढणारे हे ढिंडोरे आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहे. आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. जर ही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो सध्या हे भाजपच्या काळामध्ये. निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असतं आणि ते त्यांचीच माणसं असतात आणि काम करतात. देवेंद्र फडवणीस यांनी जवाबदारी स्वीकारली पाहिजे.असेही संजय राऊत म्हणाले. तर राज ठाकरे यांच्यावर टीका करत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार. राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्क्रिप्ट वाचतात. शिवसेनेच्या बाबतीत गांभिर्याने घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः पक्ष शिवसेना पक्ष सोडलेला आहे. आणि स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. ते नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्रातल्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशी भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेणार असं वाटत नाही. असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut: अनिल देशमुख सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर हल्ला, याला जवाबदार सरकार आणि देवेंद्र फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल Read More »

Stock Market Today: गुंतवणूकदारांना दिलासा, शेअर बाजारात पुन्हा तेजी, मीडिया शेअर्समध्ये मोठी वाढ

Stock Market Today : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत असल्याने अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले होते. मात्र आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन सिग्नलवर झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळी 10:36 च्या सुमारास, सेन्सेक्स 921.62 अंकांच्या (1.19%) वाढीसह 78,262.63 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी देखील 271.90 अंकांनी (1.18%) वाढून 23,725.90 वर होता. मीडिया आणि रियल्टी शेअर्समध्ये वाढआजच्या सुरुवातीच्या व्यवहारात मीडिया आणि रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. निफ्टी मीडिया आणि रियल्टी इंडेक्स 2% पेक्षा जास्त वाढले, ज्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळाला. इतर क्षेत्रांची कामगिरीसेन्सेक्स पॅकमध्ये, प्रामुख्याने एनटीपीसी, टाटा मोटर्स, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस आणि पॉवर ग्रिड या शेअर्सनी वेग घेतला. या कंपन्यांच्या शेअर्सनी बाजार वाढण्यास हातभार लावला. त्याच वेळी, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह सारख्या काही शेअर्समध्ये घसरण झाली. गुंतवणूकदारांसाठी बाजार कलमात्र, सध्या फारशी सुधारणा होण्याची आशा नसल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सप्टेंबरमध्ये बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला तेव्हा त्याची गती मंदावली आहे. FY2025 मध्ये FII विक्री आणि कमकुवत कमाई वाढीच्या अपेक्षांचा देखील बाजाराच्या पुनर्प्राप्तीवर परिणाम होऊ शकतो. तथापि, हे देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी एक सकारात्मक चिन्ह असू शकते, कारण DII (देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार) ने मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी केले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांची भूमिकापरदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 18 नोव्हेंबर रोजी 15,659 कोटी रुपयांचे शेअर विकले, तर त्याच दिवशी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 9,190 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. देशांतर्गत गुंतवणूकदारांचा विश्वास बाजारात कायम असल्याचे यावरून दिसून येते, तर विदेशी गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून येते. आशियाई बाजारांची स्थितीआशियाई बाजारातही सामान्य तेजीचे वातावरण होते. शांघाय वगळता, जकार्ता, टोकियो, सोल, बँकॉक आणि हाँगकाँग यांसारख्या प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये सकारात्मक कल दिसून आला. त्याच वेळी, शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अमेरिकन शेअर बाजार लाल रंगात बंद झाले.

Stock Market Today: गुंतवणूकदारांना दिलासा, शेअर बाजारात पुन्हा तेजी, मीडिया शेअर्समध्ये मोठी वाढ Read More »

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट

Anmol Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. तर आता त्याला भारतात आण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियातून ताब्यात घेतले होते. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एफबीआयच्या नवी दिल्लीतील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी अनमोल बिश्नोईचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. अनमोल बिश्नोई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी वॉन्टेड आहे. एनआयए आणि मुंबई पोलीस बऱ्याच दिवसांपासून अनमोल बिश्नोईचा शोध घेत होते. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीसही ठेवले आहे. एफबीआय आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठकइंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत एफबीआय आणि भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठक झाली. यामध्ये त्याच्यावरील खटले आणि पुराव्यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान अनमोलचा बाबा सिद्दीकी हत्याकांडातील कथित सहभाग आणि सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारावरही चर्चा झाली. अनमोलचे एक प्रवासी कागदपत्र बनावट असल्याचे यूएस इमिग्रेशन विभागाला आढळून आल्याचेही सूत्रांनी सांगितले. अनमोल 15 मे 2022 रोजी भानू नावाच्या व्यक्तीच्या नावाने बनावट पासपोर्ट मिळवून अमेरिकेत पळून गेला होता, परंतु अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाशी संलग्न असलेल्या एका कंपनीचे संदर्भ पत्र आढळून आल्याने त्याचा पर्दाफाश झाला. कागदपत्रे बनावट होती. अमनोल बिश्नोई कॅनडात राहतातअनमोल कॅनडामध्ये राहणारा असून तो नियमितपणे अमेरिकेत जात असल्याचे समजते. तो लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. तुरुंगात असूनही लॉरेन्सवर जागतिक गुन्हेगारी टोळी चालवल्याचा आरोप आहे. सूत्रांनी अनमोलच्या ताब्यात घेण्याबाबत अधिक माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले की, अनमोल अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना अनमोल बिश्नोईच्या त्यांच्या देशात उपस्थितीची माहिती दिल्यानंतर हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले होते.

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट Read More »

IND vs AUS 2024: ऑस्ट्रेलियाला धक्का, भारतीय संघात ‘या’ 2 खेळाडूंची होणार सरप्राईज एंट्री

IND vs AUS 2024: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीची सुरुवात 22 नोव्हेंबर पासून होणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज शुभमन गिल सराव सामन्यात जखमी झाल्याने तो पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे जवळपास फिक्स झाले आहे. तर दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा देखील पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत कोण ओपनिंग करणार? याचा उत्तर सर्वांना जाणून घ्याचे आहे. माहितीनुसार, बीसीसीआय दोन खेळाडूंची सप्राईज एन्ट्री करू शकतो. भारतीय संघात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांची सरप्राईज एंट्री होऊ शकते. हे दोन्ही फलंदाज भारत अ संघाचा भाग आहेत. जर गिल किंवा इतर कोणताही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला तर या दोघांपैकी एकाला भारतीय संघात प्रवेश मिळू शकतो. साई आणि देवदत्त यांनी ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना सध्या ऑस्ट्रेलियात राहण्यास सांगण्यात आले आहे. कारण ऑस्ट्रेलियात खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. शुभमन गिलची दुखापत किती गंभीर ?WACA येथे भारताच्या आंतर-संघ सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. गिलला इंट्रा-आर्टिक्युलर फ्रॅक्चर झाले असावे अशी माहिती समोर येत आहे. या प्रकारची दुखापत बरी होण्यासाठी साधारणतः दोन ते तीन आठवडे लागतात.

IND vs AUS 2024: ऑस्ट्रेलियाला धक्का, भारतीय संघात ‘या’ 2 खेळाडूंची होणार सरप्राईज एंट्री Read More »

Utter Pradesh Crime: अखेर ‘सायको किलर’ला अटक, काळे कपडे घालून महिलांची करायचा हत्या

Utter Pradesh Crime: आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिला सुरक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत एका साईको किलरला अटक केली आहे. याबाबत गोरखपूर एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी माहिती दिली आहे.आरोपी घरात चोरी करून महिलांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या करत होता. परिसरात गेल्या चार महिन्यांपासून आरोपीची दहशत पसरली होती. गोरखपूरच्या झांघा पोलीस स्टेशन हद्दीतील राजधानी गावातील मंगलपूर टोला येथील राहणारा 20 वर्षीय अजय निषाद असे या सायको किलरचे नाव आहे. चार महिन्यांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होती. माहितीनुसार आरोपी रात्री काळे कपडे घालून महिलांची हत्या करत होता. आरोपीने गेल्या चार महिन्यात पाच महिला व मुलींची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी रात्री 1 ते 4 च्या दरम्यान महिलांची आणि मुलींची हत्या करून चोरी करत होता. सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिसांनी अखेर आरोपीला अटक केली आहे. या सायको किलरने 4 महिन्यांत 5 महिलांना आपला बळी बनवला आहे. एवढेच नाही तर तो इतका हिंसक आहे की अगदी पोलिसांच्या प्रत्येक हालचालींवर त्याची नजर असते. रात्री 1 ते 4 च्या दरम्यान फिरून बाहेर पडणारा हा मारेकरी महिलांची हत्या आणि अत्याचार करण्यात मजा घेतो. चोरीच्या वेळी एका मुलीचा मृत्यू झाला की, पोलिसांनी तिच्या शोधात गस्त वाढवली, पण तीही त्यांच्यापासून दूर गेली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला अटक केली आहे. असा खुलासा पोलिसांनी केला. पोलिसांच्या चौकशीत त्याने सर्व घटनांची कबुली दिली. एवढेच नाही तर 2022 मध्ये तो एका बलात्कार प्रकरणात तुरुंगात गेल्याचेही त्याने सांगितले. यानंतर तो जामिनावर बाहेर असताना एकतर सुरतला गेला होता. येथून परतल्यानंतर त्याने किरकोळ चोरी करण्यास सुरुवात केली. तुरुंगात गेल्यामुळे तो महिलांचा तिरस्कार करू लागला, त्यामुळे तो सायको किलर बनला अशी देखील पोलिसांनी माहिती दिली.

Utter Pradesh Crime: अखेर ‘सायको किलर’ला अटक, काळे कपडे घालून महिलांची करायचा हत्या Read More »

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभेसाठी प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला. आज संध्याकाळी 6 ला प्रचाराच्या तोफा थंड देखील होणार आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबई आयोजित एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) विकासासाठी नीती आयोगाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) महत्त्व कमी करून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा दावा केला. यावेळी उद्धव म्हणाले की, सत्तेत आल्यास महाविकास आघाडी (MVA) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) आणि MMRDA यांच्यात झालेला सामंजस्य करार रद्द करेल, कारण BMC चे महत्त्व कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करत असेल तर ते एमएमआरडीए विसर्जित करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ते म्हणाले, “मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र केवळ चर्चा नाही तर एक गंभीर संकट आहे. हे षडयंत्र खरे आहे, परंतु आम्ही हे कधीही होऊ देणार नाही. ते म्हणाले की एमएमआरडीए आणि डब्ल्यूईएफ यांनी सप्टेंबरमध्ये एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी करार केला होता. एमएमआर विकासावरील NITI आयोगाच्या अहवालानंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील जमीन अदानी समुहाच्या ताब्यात देणाऱ्या महायुती सरकारची धोरणे संपुष्टात आणण्याचा एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला निर्णय असेल, असे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ते ‘विकासविरोधी नसून विनाशविरोधी’ आहेत. त्यांनी दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले गेले (जून 2022 मध्ये) आणि शिवसेनेत फूट पडली कारण त्यांनी महाराष्ट्राची लूट होऊ दिली नाही. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल Read More »

Maharashtra News: केदारेश्वरला ऊस घातलेल्या सर्व शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बँक खात्यावर वर्ग…..!

Maharashtra News: सन २०२३/२४ म्हणजे मागच्या गळीत हंगामात मार्च २०२४ मध्ये ऊस घातलेल्या शेवटच्या पंधरवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता. ज्यांचे पैसे देणे बाकी होते त्या सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, या आगोदर दिवाळीपुर्वी ५० टक्के रक्कम दिली होती. राहिलेले सर्व पैसे आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. आज रोजी ऊस बिलापोटी एक रुपया सुद्धा कारखान्याकडे देणे बाकी नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी काही अडचण आल्यास संघर्षयोद्धा श्री. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकाशी मो.बा. ८२७५४३८५७७ या नंबर वर संपर्क साधावा.

Maharashtra News: केदारेश्वरला ऊस घातलेल्या सर्व शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बँक खात्यावर वर्ग…..! Read More »

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी

Maharani Laxmi Bai Medical College : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. त्यामुळे 10 मुलांचा मृत्यू झाला. अन्य 16 मुले जखमी झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी रुग्ण इकडे तिकडे धावू लागले. कुटुंबातील सदस्य मुलांना हातात घेऊन धावताना दिसत होते. यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आगीच्या वेळी एनआयसीयूमध्ये 54 मुलांना दाखल करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातून 37 मुलांची सुटका करण्यात आली. आग लागली तेव्हा रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये 54 रुग्ण दाखल होते. डीएम अविनाश कुमार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 12 तासांत अहवाल मागवलाउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि डीआयजींकडून 12 तासांत अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन शर्मा मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी झाशीला पोहोचले आहेत. बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी डीएम, एसएसपी आणि डीआयजी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले. जखमी 16 मुलांची प्रकृती चिंताजनकएसएसपी सुधा सिंह यांनी सांगितले की, 16 जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. त्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व डॉक्टर आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर काही पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेल्याचीही माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांनी घोषणा केली – मृत मुलांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळणारझाशी मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी Read More »