DNA मराठी

ताज्या बातम्या

Health Tips: रात्री झोपताना मोजे घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे

Health Tips: सतत बदलणाऱ्या वातावरणाचा सामना करण्यासाठी स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते. अशा वातावरणात  प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी डायटवर भर दिला जातो. तर रात्री थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी अंगात स्वेटर आणि पायात मायमोजे घातले जातात. ज्यामुळे तुमचे पाय थंड पडत नाहीत आणि शांत झोप लागते. मात्र तुम्हाला रात्री झोपताना मोजे घालण्याची सवयच असेल तर त्याचे तुमच्या शरीरावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती. रात्री झोपताना मोजे घालण्याचे फायदेरात्री झोपताना मोजे घालण्याचे अनेक फायदे आहेत जसं की यामुळे तुम्हाला थंडी लागत नाही आणि शांत झोप लागते.  शरीराचे तापमान नियंत्रित राहतेहिवाळ्यात वातावरणात वाढत जाणाऱ्या थंडीमुळे घरातील तापमान हळू हळू कमी होत जाते. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि शरीरातील तापमान अनियंत्रित होते. ज्यामुळे सर्वात आधी तुमचे हात, पाय आणि नाक थंड होतं. शरीराचे कार्य सुरळीत राहण्यासाठी शरीराला ठराविक तापमानाची गरज असते. यासाठीच जर रात्री झोपताना तुम्ही पायमोजे घातलेले असतील तर रात्रभर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास  मदत होते. ज्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही. रक्तभिसरण सुरळीत होतेरात्री झोपताना पायात मोजे घालण्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. कारण मोज्यांमुळे पाय आणि शरीर उबदार राहतं. सहाजिकच यामुळे तुमच्या शरीराला योग्य रक्ताचा पूरवठा आणि ऑक्सिजन मिळते. शरीरातील रक्तपेशी, ह्रदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी हे फार आवश्यक आहे. शांत झोप येतेहिवाळ्यात कडाक्याची थंडी पडली की गारव्यामुळे शरीर थंड पडू लागतं आणि त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. या काळात नेहमी झोपमोड झाल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. मात्र जर तुम्ही रात्री झोपताना मोजे घातले असतील तर तुम्हाला रात्री शांत झोप लागते. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळते आणि सकाळी तुम्हाला फ्रेश वाटते.  पायाला मुंग्या येत नाहीहिवाळ्यात पाय गार पडल्यामुळे रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो. ज्यामुळे तुमच्या हातापायाला मुंग्या म्हणजेच झिणझिण्या येतात. ज्यामुळे रात्री पाय अचानक बधीर झाल्यासारखा वाटू लागतो. वास्तविक ही हिवाळ्यात सर्वांना जाणवणारी एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि निरोगी राहण्यासाठी चांगली झोप गरजेची आहे. रात्री झोपताना मोजे घालण्यामुळे तुमच्या पायांना मुंग्या येत नाहीत.  रात्री झोपताना मोजे घालण्याचे तोटेहिवाळ्यात रात्री पायात मोजे घालण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेदेखील आहेत. जे तुम्हाला  माहीत असायला हवे. इनफेक्शनचा धोकाझोपताना मोजे घालायचे असतील तर ते प्रत्येकवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. जुने अथवा सतत वापरलेले मोजे घालल्यामुळे तुमच्या शरीराला इनफेक्शनचा धोका वाढतो. कारण पायाला मोजे घातल्यामुळे घाम येतो आणि हा घाम मोज्यांमध्ये मुरतो. जर तुमचे मोजे सुती नसतील तर सतत घाम येण्यामुळे तुमच्या पायाचे आरोग्य बिघडू शकते.  रक्ताभिसरण बिघडण्याची शक्यतारात्री मोजे घातल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण सुधारत असले तरी कधी कधी याचा विपरित परिणामही जाणवू शकतो. कारण जर तुम्ही तुमच्या पायापेक्षा घट्ट, हवा खेळती राहणार नाही असे मोजे घातले तर त्यामुळे पायाच्या रक्तप्रवाहात अडथळा येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराच्या रक्ताभिसरणावर होण्याची शक्यता असते.  शरीराच्या तापमानात बदलहिवाळ्यात मोजे घालणं गरजेचं आहे कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. मात्र जर तुम्ही चुकीचे म्हणजेच हवा खेळती न राहणारे मोजे घातले तर यामुळे तुमच्या पायाचे तापमान अचानक वाढून तुम्हाला ओव्हर हिटिंगचा त्रास होऊ शकतो. कारण शांत झोप येण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान अती प्रमाणात कमी अथवा अती प्रमाणात जास्त वाढून चालणार नाही. यासाठीच नेहमी झोपताना सुती, हवेशीर मोजेच घालावे. 

Health Tips: रात्री झोपताना मोजे घालण्याचे ‘हे’ आहेत फायदे आणि तोटे Read More »

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात

Dhananjay Munde: बीड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचे ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. धनंजय मुंडे हे शंभर टक्के गुन्हेगार नाही मी त्यांच्या पाठीशी आहे असं ठाम मत यावेळी नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केले आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात असल्याचे देखील यावेळी बोलताना शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे यांनी रात्रीच भगवानगड येथे जात महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली यावेळी प्रदीर्घकाळ त्यांची चर्चा देखील झाली. एवढे बोलताना शास्त्री म्हणाले की खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत मुंडेंची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी नाही. आज मीडिया द्वारे जाते वाट पसरवला जात आहे. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही हे मी शंभर टक्के सांगू शकतो तसेच त्यांच्या पक्षाचे नेत्यांना देखील हे माहिती आहे मात्र हा विषय किती तानायचा हा ज्याने त्याने ठरवावा. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले. समोरासमोर येऊन राजकारण करा अशा पद्धतीने राजकारण करू नये कारण अशा मुद्द्यांचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही भविष्यात याचे देखील राजकीय मीडियाने देखील यामध्ये सहकार्य करून जातीय सलोखा निर्माण होईल असे सहकार्य करावे असे देखील यावेळी शास्त्री म्हणाले. संवेदनशील मुद्द्यावरून राजकारण करणे ही भित्री पद्धत असं शास्त्री म्हणाले.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे गुन्हेगार नाही…,नामदेव शास्त्री महाराज मुंडेंच्या बचावार्थ मैदानात Read More »

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे. नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Politics : नगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी महापौरसह 12 नगरसेवक शिंदे गटात Read More »

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

Reagan Airport: अमेरिकन एअरलाइन्सचे विमान रेगन विमानतळावर कोसळले, 60 जणांचा मृत्यू

Reagan Airport: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे असणाऱ्या रीगन विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विचिटा कॅन्ससहून येणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान 5342 हे रेगन राष्ट्रीय विमानतळावर उतरताना एका हेलिकॉप्टरशी धडकले. अपघातानंतर रेगन विमानतळावरील सर्व लँडिंग आणि टेकऑफ स्थगित करण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पोटोमॅकवर एका हेलिकॉप्टरची एका व्यावसायिक विमानाशी टक्कर झाल्याचा प्राथमिक अहवालात दावा करण्यात आला आहे. त्यानंतर हा अपघात झाला. अपघातात 60 जणांचा मृत्यू या अपघातानंतर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने रेगन राष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. रीगन नॅशनल एअरपोर्टने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की डीसीएमधील सर्व टेकऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले आहेत. आपत्कालीन कर्मचारी एअरफील्डवर झालेल्या विमान अपघाताची चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्सचे विमान ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी धडकल्यानंतर आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिस स्कॅनरनुसार, बळींचे मृतदेह अजूनही खाली आणण्याचे काम सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Reagan Airport: अमेरिकन एअरलाइन्सचे विमान रेगन विमानतळावर कोसळले, 60 जणांचा मृत्यू Read More »

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही…

Crime News: आईच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज झालेल्या दोन मुलांनी चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या केली आहे. हे धक्कादायक प्रकरण गुजरातमधील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील गांधीनगरमध्ये दोन भावांनी एका व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्याच्या आईसोबतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने पीडितेची आतडेही बाहेर काढली आणि बाहेर फेकून दिली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला. पीडितेचा मुलगा अजयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संजय (27) आणि जयेश ठाकोर (23) हे दोन भाऊ आहेत. आईच्या प्रियकरावर रागत्यांच्या विधवा आईसोबत 15 वर्षांहून अधिक काळ संबंध असलेले 45 वर्षीय रतनजी ठाकोर यांच्याविरुद्ध त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की आरोपींचा असा विश्वास होता की या नात्यामुळे त्यांच्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीचा अनादर झाला. आईपासून दूर राहण्याची ताकीदएफआयआरनुसार, संजय आणि जयेश ठाकोर यांचा रतनजी ठाकोर यांच्याशी आधीच वाद होता. तपास अधिकारी (आयओ) उन्नती पटेल म्हणाल्या, ‘त्यांनी वारंवार त्या माणसाला त्यांच्या आईपासून दूर राहण्याचा इशारा दिला आणि समाजातील वृद्धांनाही या प्रकरणात सहभागी करून घेतले. तथापि, हा प्रश्न शांततेने सोडवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. चाकू आणि रॉडने हल्लातपास अधिकारी पुढे म्हणाले, ‘रविवारी, चाकू आणि रॉडने सशस्त्र संजय आणि जयेश यांनी गावात घर बांधत असलेल्या रतनजी ठाकोर आणि त्यांचे सहकारी जिकुजी परमार यांच्यावर हल्ला केला.’ एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की आरोपींनी त्यांचे रक्त ओवाळले- काही कामगार आणि रतनजींच्या सहकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी शस्त्रे भिजवली आणि त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. अशा प्रकारे पोलिसांनी त्याला अटक केलीआयओने सांगितले की पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या मोबाईल फोन लोकेशनचा वापर करून ट्रॅक केले आणि नंतर त्यांना अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि भडकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: आईचा प्रेमसंबंध, नाराज मुलांनी केला चाकूने – रॉडने वार अन् घडलं असं काही… Read More »

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, लहान किंवा फाटलेले कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व भाविकांनी सभ्य आणि पारंपारिक कपडे घालून मंदिरात यावे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 30 जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा नवीन ड्रेस कोड नियम लागू होईल. या नवीन व्यवस्थेनुसार, स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील सनातनी आणि गणेश भक्तांसाठी एक प्रमुख श्रद्धेचे केंद्र आहे. लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु, जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात तेव्हा तेथे काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या ठिकाणाचे पावित्र्य राखले जाईल. आचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या काही भाविकांच्या पोशाखाबद्दल अनेक भाविकांनी चिंता व्यक्त केली होती, ज्यांचे कपडे योग्य नव्हते. हे लक्षात घेऊन, सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला की दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगले कपडे घालावे लागतील. हा राजकारणाचा विषय नाही. हा धार्मिक आणि श्रद्धेशी संबंधित विषय आहे. जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा ते सहसा स्नान करून आणि चांगले आणि सभ्य कपडे घालून जातात. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांनी याचे पालन करावे. अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागूआचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागू आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांना या नियमांची आधीच माहिती आहे. आम्हाला खात्री आहे की कालांतराने, सिद्धिविनायक मंदिरातही लोक हळूहळू या नियमांचे पालन करू लागतील. सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम Read More »

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू

Stampede In Mahakumbh: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानासाठी लाखो भाविक संगम घाटावर जमले होते मात्र अचानक चेंगराचेंगरीची घटना घडल्याने 17 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने आतापर्यंत 17 मृत्यूंची पुष्टी केली आहे. अपघातानंतर लगेचच डझनभर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि मृतांचे मृतदेह तेथून नेण्यात आले. जखमी भाविकांना मेळ्याच्या परिसरात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवकीनंदन ठाकूर काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल आध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर म्हणाले, “मी संगम घाटावर गेलो नाही कारण तिथे खूप गर्दी आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी फक्त संगम घाटावर स्नान करण्याचा आग्रह धरू नये. सध्या संपूर्ण गंगा आणि यमुना नद्या ‘अमृत’ आहेत, जर तुम्ही कुठेही स्नान केले तर तुम्हाला तेवढेच पुण्य मिळेल. स्वामी रामभद्राचार्य काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, “मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आज प्रयागराजमध्ये मोठी गर्दी आहे, म्हणून त्यांनी केवळ संगम घाटावर पवित्र स्नान करण्याचा आग्रह धरू नये. त्यांनी आता त्यांचा छावणी सोडून स्वतःची सुरक्षितता शोधू नये.” साध्वी निरंजन ज्योती काय म्हणाल्या?महाकुंभ परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीबद्दल साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, “ही एक दुःखद घटना आहे. जे काही झाले ते बरोबर नव्हते. जनहित लक्षात घेऊन, आखाडा परिषदेने त्यांचे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जमलेल्या भाविकांची संख्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मी लोकांना आवाहन करते की संपूर्ण जत्रा परिसर कुंभमेळा आहे, म्हणून ते केवळ त्रिवेणी घाटावरच नव्हे तर कोणत्याही घाटावर स्नान करू शकतात. आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीतअखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले, “घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्यासोबत हजारो भाविक होते… जनहितासाठी, आम्ही ठरवले की आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत. मी लोकांना आजच्याऐवजी वसंत पंचमीला स्नान करण्यासाठी येण्याचे आवाहन करतो.”

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »