DNA मराठी

ट्रेंडिंग

indigo airlines

IndiGo Airline वर संकट कायम; आज 400 उड्डाणे रद्द, जाणून घ्या ताजे अपडेट

IndiGo Airline : इंडिगो एअरलाइन्स वरील संकट दूर होताना दिसत नाही. आज देखील देशात 400 हून जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. देशात आज 400 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडिगो एअरलाइन्सची सलग चौथ्या दिवशीही विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे, शनिवारी देशभरातील अनेक प्रमुख विमानतळांवर मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द करण्यात आली. उड्डाणे अचानक रद्द केली जात आहेत, तर काही तास उशीर झाल्यामुळे प्रवाशांची स्थिती बिकट झाली आहे. अनेक विमानतळांवर परिस्थिती इतकी गर्दीची आहे की ती रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकासारखी आहे. अनेक विमानतळांवर शेकडो उड्डाणे रद्द दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, कोची आणि तिरुअनंतपुरमसह अनेक प्रमुख शहरांमधील विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणे रद्द करण्याचे काम सुरूच आहे. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे सकाळपासूनच विमानतळ टर्मिनल्स भरून गेले आहेत. 100 हून अधिक उड्डाणे रद्द शनिवारी, राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) येथे ५४ निर्गमन आणि ५२ आगमन, एकूण १०६ उड्डाणे रद्द करण्यात आली. विमानतळ प्रशासनाने सेवा हळूहळू सामान्य होत असल्याचा दावा केला असला तरी, रात्री उशिरापर्यंत टर्मिनल्सवर मोठी गर्दी दिसून आली. अनेक प्रवासी त्यांच्या फ्लाइट्सच्या अपडेट्सची वाट पाहत असल्याचे दिसून आले, तर काहींना शेवटच्या क्षणी रद्द झाल्याचे कळले. 109 फ्लाइट्स उशिरा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही प्रवाशांच्या अडचणी वाढल्या. शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत, १०९ इंडिगो फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये ५१ आगमन आणि ५८ निघणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश होता. विमानतळाबाहेरून आतपर्यंत लांब रांगा दिसून आल्या. अनेक प्रवाशांनी सांगितले की इंडिगोची ग्राहक सेवा प्रतिसाद देत नाही, ज्यामुळे तिकिटे रद्द करणे किंवा नवीन फ्लाइट्स बुक करणे कठीण झाले. हैदराबाद आणि पुण्यातही परिस्थिती गंभीर सकाळपर्यंत, हैदराबादच्या जीएमआर विमानतळावर इंडिगोची ६९ फ्लाइट्स रद्द करण्यात आली: २६ आगमन आणि ४३ प्रस्थान. दरम्यान, पुणे विमानतळावर एकूण ४२ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या, ज्यामध्ये १४ आगमन आणि २८ निघणाऱ्या फ्लाइट्सचा समावेश आहे. एअरलाइनला क्रूची तीव्र कमतरता भासत आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत आहे. कंपनीने अद्याप सामान्य स्थितीत परतण्यासाठी विशिष्ट वेळापत्रक दिलेले नाही. चार दिवसांत 2000 हून अधिक उड्डाणे रद्द गेल्या चार दिवसांत इंडिगोने २००० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. सतत बदलणारे वेळापत्रक, लांब रांगा आणि प्रतीक्षा वेळ यामुळे प्रवाशांचा संताप वाढत आहे. एअरलाइनने प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती ऑनलाइन तपासण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे इंडिगोच्या सततच्या उड्डाणे रद्द करणे आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील नरेंद्र मिश्रा यांनी मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून या संकटावर स्वतःहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

IndiGo Airline वर संकट कायम; आज 400 उड्डाणे रद्द, जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

img 20251206 wa0006

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा

Dancer Deepali Patil : नृत्यांगना दिपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे २०१६ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवारांसोबत होते. त्यानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. गायकवाड यांच्या पत्नीने नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली तरी संदिप गायकवाड यांचा भाजपात कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही. ते आजही राष्ट्रवादीतच आहेत. नगरपरिषद निवडणूकीत पराभव होणार हे स्पष्ट होताच रोहित पवारांनी भाजपला व आमच्या नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे, नृत्यांगणा दिपाली पाटील यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या आडून रोहित पवार हे घाणेरडे राजकारण करून जामखेडची बदनामी करू पाहत आहेत, ही बाब जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे. जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करणाऱ्या दिपाली पाटील या नृत्यांगनेने ४ डिसेंबर रोजी जामखेड येथील साई लाॅज येथे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली होती. ही घटना उजेडात येताच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेशी भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करताच भाजपने रोहित पवारांचीच पोलखोल केली आहे. जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले म्हणाले की, माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड यांनी २०१६ सालच्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग १० मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. जिंकली होती. त्यांच्या पत्नीही त्यावेळी प्रभाग ०७ मधून निवडून आल्या होत्या होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संदिप गायकवाड हे रोहित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदिप गायकवाड यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी गायकवाड यांनी रोहित पवारांचा जोरदार प्रचार केला होता. नुकत्याच पार पडलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत रोहित पवारांनी संदिप गायकवाड यांना उमेदवारी डावलल्याने गायकवाड यांच्या पत्नीने बंडखोरी करत ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र संदिप गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला नाही. एकाच कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या पक्षात सक्रीय असतात. एखाद्याने काही चुकीचं केलं तर त्याचा संबंध कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाशी जोडणे म्हणजे बालबुध्दी उपद्व्याप होय, हाच उद्योग सध्या रोहित पवारांकडून सुरू आहे असे म्हणत सभापती शरद कार्ले यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला. माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. रोहित पवार यांनीच शरद पवारांच्या उपस्थितीत गायकवाड यांचे पक्षात जोरदार स्वागत केले होते.भाजपवर टीका करण्यापूर्वी रोहित पवारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. संदीप गायकवाड प्रकरणी रोहित पवारांनी भाजपवर केलेले आरोप निरर्थक आणि बिनबुडाचे आहेत, या प्रकरणात रोहित पवार हे अडचणीत येणार असे दिसताच त्यांनी भाजपवर आरोप करून कांगावा करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक सत्य हेच आहे की, संदिप गायकवाड हेच त्यांच्या पक्षाचे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत दारूण पराभव होणार हे समजल्यामुळे रोहित पवारांनी भाजप व आमच्या नेत्याची बदनामी सुरू केली आहे, भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांनी हाती घेतलेले षडयंत्र जामखेडची जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद कार्ले यांनी दिला आहे. “नृत्यांगणा दिपाली पाटील मृत्युप्रकरणाची घटना अत्यंत दुर्दैवी असुन या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचाच अर्थात रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तो त्याच पक्षात सक्रीय आहे. त्याचा भाजपची कुठलाही संबंध नाही. नृत्यांगणा मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, या प्रकरणाच्या आडून भाजपला बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, जनता हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे.”

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिपादन

Chandrashekhar Bawankule : शेती, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महायुती सरकारने क्रांतीकारी निर्णय घेऊन विकासाची गती वाढवली आहे. महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, रघुनाथ पांडे, प्रतिक करपे आदी उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हीजन निश्चित करून त्या दिशेने पावले उचलली जात आहेत. सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना 32,000 कोटींचे पॅकेज, दुष्काळी उपाययोजना लागू तसेच पीककर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश देऊन शेतक-यांना दिलासा दिला. पीकविमा आणि भरपाई प्रक्रियेला गती देण्यात आली. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. सिंचनक्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. नदीजोड प्रकल्पांना मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. उपसा सिंचन प्रकल्पांना कोट्यवधींचे निधी मंजूर करण्यात आले. जलयुक्त शिवार 2.0 अंतर्गत वर्षभरात 37,166 कामे पूर्ण करण्यात आली. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याला प्राधान्य दिले. समृद्धी महामार्ग पूर्णत: खुला करण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग, वाढवण बंदर, ऑफशोअर विमानतळ यांचे नियोजन करण्यात आले. 100 गावांत सौरग्राम योजना, नागपूरमध्ये राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मेट्रो 11 ला मान्यता, मुंबईत 238 लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी 4826 कोटींचा निधी, रेल्वे सेवेच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असेही बावनकुळे यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध निर्णय आणि योजना महायुती सरकारने आखल्या आहेत. लाडकी बहिण योजना दमदारपणे सुरु आहे. तसेच राज्यातील 10 जिल्ह्यात महिला बचत गटांसाठी उमेद मॉल सुविधा देण्यात आली. उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी नवीन औद्योगिक धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अँड ज्वेलरी धोरण या आणि अशा अनेक नवीन धोरणांची घोषणा करण्यात आली. दावोसमध्ये विक्रमी 16 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून, 80 टक्के अंमलबजावणीसह महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये गेल्यावर्षीपेक्षा 34 टक्के अधिक म्हणजे 1,64,875 कोटींची परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जपण्यासाठी देखील अनेक निर्णायक पावले उचलण्यात आली. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पानिपतला मराठा शौर्य स्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीवर्षात तीर्थक्षेत्र विकासासाठी 5503 कोटींचा निधीही देण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करून जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा आदेश ‘एमईआरसी’ने दिला आहे. महावितरणने इतिहासात प्रथमच वीजदरात कपात करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला होता. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 2399 आजारांचा समावेश करण्यात आला. प्रधानमंत्री आवासमध्ये महाराष्ट्राला 30 लाख घरे मंजूर त्यातील 4,91,278 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय तसेच ग्रामीण कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या. डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कामही महायुती सरकारने केले. मागच्या एक वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड स्थापित केले जात आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule: महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिपादन Read More »

school close

School Closed: दहावीच्या परीक्षेपूर्वी राज्यात शिक्षक आक्रमक; 25 हजार शाळा बंद, नेमकं कारण काय?

School Closed : राज्यात आज जवळपास 25 हजार शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वी खाजगी, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी निषेध करत आहेत. आज मराठवाडा भागातील अनेक शाळा पूर्णपणे बंद होत्या. या बंदमुळे सुमारे 18000 शाळांमधील वर्गांवर परिणाम झाला. शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? शिक्षक संघटनेने शिक्षक समायोजनाचा पुनर्विचार, टीईटीची आवश्यकता रद्द करणे, ऑनलाइन आणि शैक्षणिक नसलेल्या कामाचा भार कमी करणे, जुन्या शिक्षण योजना लागू करणे आणि कंत्राटी पद्धत बंद करणे यासारख्या अनेक मागण्या मांडल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मागण्यांपासून मागे हटणार नाही असा इशारा संघटनेने दिला आहे. निषेधाबाबत सरकारचा कडक इशारा 5 डिसेंबर रोजी शैक्षणिक उपक्रम कोणत्याही प्रकारे विस्कळीत होऊ नयेत असे सरकारने स्पष्ट केले आहे. शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि आंदोलनात सहभागी असलेल्यांना एक दिवसाचा पगार कपातीचा सामना करावा लागेल. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व जिल्ह्यांतील शिक्षण अधिकाऱ्यांना आणि मुंबई महानगरपालिकेला शाळा पुन्हा सुरू करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. शिक्षकांमध्ये असंतोष सरकारने वेतन कपातीचा आदेश जारी केल्यानंतर शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे. महानगर शिक्षक संघटनेने म्हटले आहे की एक दिवसाचा पगार कपात हा त्यांच्या हक्कांवर हल्ला आहे आणि या निषेधाला पाठिंबा देईल. सरकार आणि शिक्षकांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निषेध सुरूच राहील. या परिस्थितीत, सरकार आणि शिक्षक संघटनांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

School Closed: दहावीच्या परीक्षेपूर्वी राज्यात शिक्षक आक्रमक; 25 हजार शाळा बंद, नेमकं कारण काय? Read More »

indigo airlines

IndiGo Airlines प्रकरणात केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; होणार उच्चस्तरीय चौकशी

IndiGo Airlines : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली इंडिगो एअरलाइन्स प्रकरणात आता केंद्र सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. देशभरातील इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांच्या मोठ्या प्रमाणात विस्कळीततेनंतर सरकार आता कारवाई करणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी घोषणा केली की या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इतक्या मोठ्या संख्येने उड्डाणांवर कसा परिणाम झाला आणि त्यामागील खरी कारणे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही चौकशी केली जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की इंडिगोच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या सर्व पैलूंचा तपास पथक सखोल आढावा घेईल. तांत्रिक कारणे, मानवी चूक किंवा सिस्टम बिघाड या व्यत्ययाला कारणीभूत आहेत का हे देखील ते तपासेल. आवश्यक असल्यास, जबाबदारी निश्चित केली जाईल आणि संबंधित अधिकारी किंवा विभागांवर आवश्यक कारवाई केली जाईल. सरकारचे उद्दिष्ट केवळ कारणे ओळखणे नाही तर भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना विकसित करणे देखील आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले की या तपासणीचा उद्देश एअरलाइनची जबाबदारी वाढवणे आणि तिचे कामकाज मजबूत करणे आहे जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा अडचणींचा सामना करावा लागू नये. मंत्रालयाने असे सूचित केले आहे की जर तपासणीत कोणत्याही संरचनात्मक किंवा व्यवस्थापन त्रुटी आढळून आल्या तर त्या दूर करण्यासाठी शिफारसी जारी केल्या जातील. इंडिगोच्या विमान उड्डाणे अचानक थांबल्याने देशभरातील अनेक विमानतळांवर प्रवाशांना दीर्घकाळ वाट पाहावी लागली, विलंब झाला आणि तिकिटांच्या समस्या निर्माण झाल्या. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आणि एअरलाइनकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. वाढत्या घटना लक्षात घेता, सरकारने वेळेवर चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मंत्रालयाने असे म्हटले आहे की ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि नवीन माहिती समोर येताच जनतेला अपडेट करेल. संपूर्ण प्रकरण अजूनही विकसित होत आहे आणि संबंधित एजन्सी गोळा केलेल्या प्राथमिक माहितीचे विश्लेषण करत आहेत.

IndiGo Airlines प्रकरणात केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये; होणार उच्चस्तरीय चौकशी Read More »

maharashtra election comission

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा

Maharashtra Election : महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले. महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार याद्यांसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून (व्हीसी) बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती. त्यानुसार दाखल हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. तत्पूर्वी सर्व हरकती व सूचनांवर योग्य ती कार्यवाही करून वेळेत निपटारा करावा. संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध  घेऊन योग्य ती दक्षात घ्यावी. संभाव्य दुबार मतदारांची यादी संबंधित महानगरपालिकेने आपल्या सूचना फलकावर आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी. मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर दोन स्टार (**) दर्शविण्यात आलेले आहेत. असा मतदार मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्या मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा. अशा मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास तो मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. हमीपत्राबरोबरच त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल, असेही वाघमारे यांनी सांगितले. काकाणी यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. कायद्यातील तरतुदीनुसार या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या तारखेला अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Election Comission: महानगरपालिकेच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोरपणे शोधा Read More »

ahilyanagar police

Ahilyanagar Police: पर्स चोरी प्रकरणात रिलस्टार कोमल काळेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेकडून बंटी- बबलीची जोडी जेरबंद

Ahilyanagar Police : बसमधील महिलांचे पर्स चोरी प्रकरणात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रिलस्टार कोमल काळेला अटक केली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका मुकुंद पालवे (वय – 39 वर्षे, रा. देवराई, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) 19 नोव्हेंबर रोजी बसमधून पाथर्डी येथुन प्रवास करीत असताना अनोळखी महिलेने सोन्याचे दागिणे व रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणात पाथर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथर्डी शहरातील नवीन बस स्टॅन्ड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपी महिलास अटक केली. या प्रकरणात कोमल नागनाथ काळे (वय 19) असं अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. तपासात चोरी केलेल्या मुद्देमाल तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगांव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) याचेकडे दिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन  पथकाने आरोपी सुजित राजेंद्र चौधर याचा शोध घेत त्याला शेवगाव येथून अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील महिला आरोपी कोमल नागनाथ काळे ही रिलस्टार असुन तिचे 50 हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

Ahilyanagar Police: पर्स चोरी प्रकरणात रिलस्टार कोमल काळेला अटक; स्थानिक गुन्हे शाखेकडून बंटी- बबलीची जोडी जेरबंद Read More »

bhaskar jadhav

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल

Bhaskar Jadhav : महाराष्ट्र विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे होणार मात्र यापूर्वीच सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अधिवेशनाच्या तारखेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. सत्ताधारी पक्ष कशाप्रकारे गृहीत धरून चालू शकतो याचा हे उदाहरण म्हणजे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आज कामकाजा सल्लागार समितीची मीटिंग झाली. यामध्ये हिवाळी अधिवेशना संदर्भात चर्चा झाली. 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर अशी तारीख दिली होती. दोन आठवड्याच्या ऐवजी तीन आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता. तिने नाही तर निदान ठरल्याप्रमाणे दोन आठवडे तरी घ्या  पण सरकारने मान्य केले नाही आणि अधिवेशन 14 तारखेला ठरलं. सत्ताधारी पक्ष संख्येने भरपूर आहे. परंतु विरोधकांच्या पक्षांना सामोर जाण्याचे त्यांच्या धाडस नाही. सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त असला तरी विरोधी पक्षाच्या भडीमरा पुढे आणि त्यांच्या प्रश्नांपुढे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाहीत म्हणून सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवत गेला तयार नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष जाहीर करावा असा आग्रह आम्ही त्यांना करत आहोत असं माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले. तसेच मी कोणावरही नाराज नाही मी कुठेही नाराज नाही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.   तर दुसरीकडे  मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणुका पुढे ढकलण्याचा घोषित करतात आणि काल दुपारी सांगतात मतमोजणी 21 तारखेला होणार आहे. या लोकशाहीची थट्टा उडवण्याचं काम सत्ताधारी पक्ष आणि स्वायत्त संस्था हे नावाला असलेले निवडणूक आयोग करत आहे. हे आयोग आयोग फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावर काम करणारे झालेले आहेत अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगावर केली.

Bhaskar Jadhav : सत्ताधारी पक्ष संख्येने जास्त पण धाडस नाही…, भास्कर जाधवांचा हल्लाबोल Read More »

yeola election

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप

Yeola Election : येवला येथे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले यानंतर परिसरात तुफान राडा पहायला मिळाला. शिवसेना शिंदे गटाच्या रुपेश दराडे यांचा कार्यकर्ता येवला येथील निवडणूक केंद्राच्या जवळच पैसे वाटप करत होता असा आरोप नागरिकांकडून करण्यात आले आहे. यानंतर नागरिकांनी कार्यकर्त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली असून आणखी रक्कम कुठे याचा तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने दखल घेत येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Yeola Election : येवला निवडणूक प्रकरण, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला नागरिकांनी दिला चोप Read More »

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »