DNA मराठी

ट्रेंडिंग

img 20250819 wa0001

Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल

Raghuji Bhosle Sword : 18व्या शतकातील प्रसिद्ध मराठा सेनानी रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर मुंबईत दाखल झाली आहे. तब्बल दोन शतकांनंतर या अमूल्य वारशाचा परतावा होत असून, मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेची ही तलवार पुन्हा एकदा लोकांसमोर येणार आहे. या तलवारीचे मुंबईत मोठ्या जल्लोषात व कलात्मक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी विविध कलासंस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तलवारीसोबतच भोसले घराण्याच्या वारशाशी संबंधित दुर्मीळ वस्तूंचा समावेश होता. इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या मते, रघूजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा प्रभाव विदर्भापासून मध्य भारतापर्यंत विस्तारला. त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ही तलवार आजही मराठ्यांच्या शौर्याचा दुर्मिळ पुरावा मानली जाते. या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक व्याख्याने आणि प्रदर्शन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते, मराठा इतिहास रसिकांसाठी हा उपक्रम एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

Raghuji Bhosle Sword : रघूजी भोसलेंची तलवार मुंबईत दाखल Read More »

team india

Asia Cup 2025 : शुभमन-यशस्वी आऊट; आशिया कपमध्ये ‘या’ 2 खेळाडूंना मिळणार संधी

Asia Cup 2025 : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा 19 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन गेल्या काही काळापासून सलामीवीरांची भूमिका उत्तम प्रकारे बजावत आहेत. त्यामुळे आशिया कपसाठी दोघांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना टी-20 संघात स्थान देऊ इच्छिते असा अंदाज वर्तवला जात होता. गिलला सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनवण्यासाठी त्याला टी-20 चा उपकर्णधार बनवले जाऊ शकते असेही वृत्त आहे. पण, ताज्या अहवालानुसार, या दोघांनाही आशिया कप 2025 मध्ये संधी मिळणार नाही. म्हणूनच गिल आणि जयस्वाल यांना संधी मिळणार नाही. स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, निवडकर्ते एक मोठा निर्णय घेणार आहेत आणि शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांना आशिया कप 2025 संघाबाहेर ठेवणार आहेत. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर त्याच कोअर ग्रुपला कायम ठेवण्याची योजना आखत आहेत, ज्यांनी अलीकडेच गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. हे दोन्ही खेळाडू परत येऊ शकतात अहवालात असेही म्हटले आहे की निवडकर्ते श्रेयस अय्यर आणि जितेश शर्मा यांना आशिया कप संघात समाविष्ट करू इच्छितात. जितेश शर्माने आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी खूप चांगली कामगिरी केली. त्याने मोठे शॉट्स खेळून सर्वांना प्रभावित केले आणि संघाला पहिले विजेतेपद जिंकून देण्यात योगदान दिले. त्याच वेळी, श्रेयस अय्यरने त्याच्या पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून, दोघांनाही आतापर्यंत एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. श्रेयस अय्यरने डिसेंबर 2023 मध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर जितेश शर्माने जानेवारी 2024 मध्ये शेवटचा सामना खेळला होता.

Asia Cup 2025 : शुभमन-यशस्वी आऊट; आशिया कपमध्ये ‘या’ 2 खेळाडूंना मिळणार संधी Read More »

chhagan bhujbal

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले

Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वाद पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहे तर नाशिकमध्ये तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. तर आता नाशिक जिल्ह्यात एकच पक्षाचे 7 आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना, आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे 7 आमदार असताना, पालकमंत्री पदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायला लावेल. असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच 7 आमदार एकच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळाले पाहिजे. अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. अजित पवार आणि सुनील तटकरेंशी मी बोलेन, एक आमदार असताना आपण पालकमंत्री पदासाठी आग्रह धरतो, तर 7 आमदारांसाठी पालकमंत्री पदासाठी शक्ती लावा. पालकमंत्री पद मिळाले, तर इच्छुक नाही तर नाही सर्व मंत्र्यांमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचे झेंडावंदन जास्तीत जास्त मी केल आहे. 1991 पासून मी झेंडावंदन करतो आहे. त्यामुळे मला त्याचे काही दुःख नाही. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

नाशिकमध्ये 7 आमदार, पालकमंत्री पद मिळालाच पाहिजे; छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले Read More »

navnath ban

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल

Navnath Ban : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे माध्यम प्रमुख नवनाथ बन म्हणाले की “उबाठा गटाच्या 52 पत्त्यांच्या गड्डीत सर्वच पत्ते जोकरचे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीवेळी म्हणाले होते ‘एकतर तू राहशील किंवा मी राहीन’. मात्र जनतेने उद्धव ठाकरे यांना महाजोकर करून घरी बसवले आणि देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले. ही वस्तुस्थिती माकडछाप संजय राऊत यांनी ध्यानात घ्यावी.” ते पुढे म्हणाले की “देवेंद्र फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत खरा महाजोकर तुम्ही आणि तुमचा गटच आहे, हे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.” मुंबईतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर नवनाथ बन म्हणाले की, “उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. मातोश्री-2 कुणाच्या कमिशनवर उभी राहिली, याचं उत्तर आधी द्या. मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे जर कोणी असतील तर ते स्वतः संजय राऊत आहेत.” राऊतांच्या 2029 च्या कोकणातील भविष्यवाणीस उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले “2024 च्याच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला शिमगा करायला भाग पाडले. तुमच्या गटाला दोन्ही हातांनी बोंबा माराव्या लागल्या आणि जनता तुम्हाला घरी बसवून आली. 2029 ची वाट पाहू नका, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतच मुंबईकर तुमच्या बडबडीला कंटाळून तुमच्या तोंडाला बुच लावतील.” नारायण राणे यांच्याबाबत राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नवनाथ बन म्हणाले की, “नारायण राणे हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरताना राऊत यांना थोडी लाज वाटली पाहिजे. नारायण राणे यांच्या कर्तृत्वामुळे शिवसेना उभी राहिली आणि आज तुम्ही अस्तित्वात आहात. त्यांच्यावर टीका करताना दहा वेळा विचार करावा.”

जनतेनं उद्धव ठाकरेंना महाजोकर करून घरी बसवलं; नवनाथ बन यांचा हल्लाबोल Read More »

ahul gandhi bharat yatra dna marathi

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ आजपासून सुरू | १ सप्टेंबरला पटण्यामध्ये महामेळावा

दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधून ‘वोटर अधिकार यात्रा’ ला सुरुवात केली आहे. या यात्रेचा उद्देश देशातील निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या ‘वोट चोरी’च्या आरोपांवरचे मुद्दे मांजाणते समोर मांडणे आणि मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. १३०० किमी, २० जिल्ह्यांतून प्रवास हि यात्रा सुमारे १३०० किलोमीटर लांबीची ही यात्रा बिहारमधील २० जिल्ह्यांतून जाणार आहे. राहुल गांधी विविध ठिकाणी पायपीट करणार असून, ग्रामीण भागातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या यात्रेसाठी जोरदार तयारी केली आहे. १ सप्टेंबरला पटण्यात महामेळावा यात्रेचा समारोप १ सप्टेंबर रोजी पटण्याच्या गांधी मैदानात होणार असून, तेथे मोठा जनसमुदाय जमण्याची अपेक्षा आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी या सभेतून थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल करत ‘वोट चोरी’ आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेच्या अभावावर कठोर भूमिका मांडणार आहेत. राजकीय पार्श्वभूमी विश्लेषकांचे मत आहे की, बिहारमधून सुरू झालेली ही यात्रा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरुण मतदार, शेतकरी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा हा प्रयत्न मानला जातो. काँग्रेसची भूमिका पक्षाचे म्हणणे आहे की, लोकशाही प्रक्रियेचे रक्षण आणि मतदार हक्कांचे संरक्षण हीच या यात्रेची खरी ताकद आहे. कोणत्याही प्रकारे मताधिकार हिरावला जाणार नाही, हा संदेश काँग्रेस या मोहिमेद्वारे देत आहे.

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ आजपासून सुरू | १ सप्टेंबरला पटण्यामध्ये महामेळावा Read More »

cancel trade talks with india

अमेरिकेने भारताबरोबरचे व्यापार चर्चा रद्द; भारताची तीव्र नाराजी

नवी दिल्ली : भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण करणारा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. नवी दिल्ली येथे २५ ते २९ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार चर्चांना अमेरिकेने अचानक रद्द केले. हा निर्णय २७ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या अमेरिकेच्या नवीन कस्टम शुल्कांशी थेट संबंधित आहे. या शुल्कांमुळे भारतीय वस्तूंवर २५ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. पोलाद, अॅल्युमिनियम, औषधे, कपडे आणि कृषी उत्पादनांवर याचा गंभीर परिणाम होईल. निर्यातदारांमध्ये चिंता असून अमेरिकेतील ग्राहकांनाही महागाईचा फटका बसेल. भारताने या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेचे हे पाऊल अन्यायकारक असून, याचा दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. भारताने हे प्रकरण जागतिक व्यापार संघटना (WTO) समोर नेण्याची तयारी दर्शवली आहे. व्यापार चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत डिजिटल व्यापार, सेवा क्षेत्रातील सहकार्य, औषधनिर्मिती उद्योगातील निर्यात, उच्च तंत्रज्ञान गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रातील व्यापार सवलतीवर चर्चा होणार होती. मात्र चर्चांचा रद्द केल्यामुळे तोडगा काढण्याची प्रक्रिया थांबली आहे. तज्ञांच्या मते, अमेरिकेच्या स्थानिक उद्योगांना संरक्षण देणे आणि निवडणूकपूर्व राजकारण हा या निर्णयामागचा प्रमुख हेतू आहे. तथापि, भारताने राजनैतिक मार्ग खुले ठेवत संवाद साधण्याचे संकेत दिले आहेत.अमेरिका आणि भारतामध्ये गेल्या काही वर्षांत व्यापारी मुद्द्यांवर मतभेद झाले आहेत. आता चर्चांचा रद्द आणि शुल्कवाढीमुळे हा तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या परिस्थितीवर दोन्ही देश कसा मार्ग काढतात, याकडे जागतिक बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेने भारताबरोबरचे व्यापार चर्चा रद्द; भारताची तीव्र नाराजी Read More »

new mathematical clues in maharashtra politics

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नवे गणिताचे संकेत

maharashtra politics – मुंबई – dna मराठी टिम – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातले समीकरण दिवसागणिक बदलत आहेत. एकीकडे महायुतीचे सरकार आहे. यात भाजपा, अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तिघांचा सत्तेत समावेश आहे. परंतु या तिघांचे नाते अजून स्थिर झालेले दिसत नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना असून विरोधक म्हणून ते एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्था आणि महानगर पालिका. यात सर्वधिक महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महानगर पलिक या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. “जनतेच्या मनात काय आहे तेच आम्ही करणार” या ठाकरे बंधूंच्या विधानांनी चर्चेला अधिकच उधाण आले आहे. मराठी अभिमान, महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न, तसेच ‘मराठी माणूस’ या मुद्द्यावर या दोन्ही ठाकरे एकत्र आले, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठे समीकरण ठरू शकते. दोन्ही ठाकरेंचे एकत्र येणे ही घटना केवळ विरोधकांसाठीच नव्हे तर सत्ताधाऱ्यांसाठीही चिंतेची बाब ठरेल. दरम्यान, महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही, हे अलीकडच्या घडामोडींवरून स्पष्ट दिसते. नाशिक येथील मेळाव्यात लागलेली काही पोस्टर आणि त्यातून उमटलेला संदेश, शिंदे गटातील अस्वस्थता, तसेच अजित पवार गट व भाजपामधील अदृश्य तणाव या गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या खरी ओळख ठरवण्यासाठीचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्या निकालावर महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय समीकरणांचा मोठा भाग अवलंबून आहे. जर न्यायालयाचा निकाल शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला, तर सध्याच्या सत्तासमीकरणाला मोठा धक्का बसेल. एकनाथ शिंदे यांची पुढची भूमिका काय असेल – ते भाजपात विलीन होतील की स्वतंत्र ओळख राखण्याचा प्रयत्न करतील, हा महत्त्वाचा प्रश्न ठरेल. तसेच अजित पवारांचा गट जर शरद पवारांकडे परत गेला, तर शरद पवार सत्तेत जाण्यास तयार होतील का, की ते पुन्हा आघाडीच्या राजकारणाला नवा आकार देतील, हे पाहणे रंजक ठरेल. याशिवाय अलीकडेच शिंदे गटातील काही नेत्यांवर ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. अशा चौकशा आणि दबावामुळे अंतर्गत नाराजी अधिक टोकदार होऊ शकते. एकंदरीत, महाराष्ट्राचे राजकारण सध्या अनिश्चिततेच्या टप्प्यात आहे. ठाकरेंची युती, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, शिंदे यांचा निर्णय आणि भाजपाची धोरणे — या सर्व घटकांचा भविष्यातील समीकरणांवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा नवे गणित उभे राहू शकते.

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नवे गणिताचे संकेत Read More »

controversial decision of ncp ajit pawar group to give suraj chavan a chance as state general secretary

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय

Ajit Pawar – Sunil Tatkare – Suraj Chavan मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) NCP मध्ये अलीकडेच युवक प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आलेल्या सूरज चव्हाण ( Suraj Chavan) यांना पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. अल्पावधीतच त्यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूरज चव्हाण यांना काही दिवसांपूर्वीच पक्षशिस्तभंगाच्या कारणास्तव पदावरून दूर करण्यात आले होते. परंतु, अचानक झालेल्या या नियुक्तीमुळे पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वातील निर्णयप्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात निष्ठा आणि संघटन कौशल्य याला महत्त्व देण्यात येते, असे सांगत समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, विरोधकांनी या संधीला “निलंबनाचे नाटक” असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युवकांमध्ये चव्हाण यांचा ठसा उमटलेला असला तरी त्यांच्या नेमणुकीवरून विरोधकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. “एका बाजूला शिस्तभंगाच्या नावाखाली शिक्षा आणि दुसऱ्याच बाजूला बढती, हा दुहेरी मापदंड” असा सूर व्यक्त होत आहे. काही कार्यकर्त्यांनीही आतल्या गोटात नाराजी दाखवली असल्याची माहिती मिळते. दरम्यान, अजित पवारांनी मात्र या नेमणुकीला संघटन मजबुतीसाठी आवश्यक पाऊल असे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे. महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात सूरज चव्हाण यांना अधिक सक्रीय भूमिका मिळणार असल्याचे संकेत या नियुक्तीतून मिळत आहेत. नेमकं काय घडलं होतं? तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता, त्या नंतर लातूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावर लातूरमध्ये होते. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पत्रकार परिषदेत पत्ते फेकत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तटकरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले, परंतु यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रचंड अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या घटनेनंतर सामाजिक व राजकीय स्तरावर तीव्र टीका झाली. परिणामी, अजित पवारांनी चव्हाण यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, काही महिन्यांतच सुरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. निलंबनानंतर मिळालेली ही बढती नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर झाली, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणात अजित पवार गटाचा हा निर्णय पक्षासाठी फायदेशीर ठरेल की नवे वाद निर्माण करेल, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सूरज चव्हाण यांना ‘प्रदेश सरचिटणीस’पदी संधी; एनसीपी (अजित पवार गट)चा वादग्रस्त निर्णय Read More »

landslide

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी

Mumbai Rain: शुक्रवार रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी 16 व 17 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai Rain: मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू; अनेक जखमी Read More »

rain alert

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी

Mumbai Rain Alert: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. 16 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर, पुणे, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज ( 16 ऑगस्ट) रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (on ground) कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत. पर्जन्‍य जलवाहिनी यंत्रणा, मलनि:सारण व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. तथापि,महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

Mumbai Rain Alert: अहिल्यानगर, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी Read More »