DNA मराठी

ट्रेंडिंग

court

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

Ahilyanagar Crime News : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणात आरोपी विनोद मोहन मुरकुटे (वय ३३, रा. मुरकुटे वस्ती) यास श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी शिक्षा सुनावली. भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम २७(१) अंतर्गत आणखी तीन वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. प्रकरणाची हकीगत अशी की, ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी प्रमोद आतार (वय १९, रा. आतारवस्ती, कर्जत) हा आपल्या चुलत चुलत्यासोबत उसाचे वाढे गोळा करत असताना, आरोपी विनोद मुरकुटे याने पिस्तुलातून गोळी झाडून फिर्यादीच्या पायावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कर्जत, त्यानंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वैज्ञानिक विश्लेषक महेश कदम तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे (गायके) यांनी केला. सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांचा स्वीकार करत न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी 5122 एमपीएससीद्वारे नियुक्तांनाही प्रमाणपत्र दिली जाणार असून, एकाचदिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा हा इतिहासातील एक अनोखा कार्यक्रम ठरेल. शासकीय नोकरीत असताना कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. पण, कधी तांत्रिक कारणाने तर कधी प्रशासकीय दिरंगाईने या नियुक्त्या रखडत होत्या. त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतिक्षा करावी लागते. अशात या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या. सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून अनुकंपा प्रतिक्षायादीतील 5187 अनुकंपा उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यामुळे अनुकंपाचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे. 4 ऑक्टोबरला मुख्य कार्यक्रम हा मुंबईत होईल आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील, तर पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्रे वितरित करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा होता. यासोबतच एमपीएससीतर्फे परीक्षा घेण्यात आलेल्या लिपीक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांना सुद्धा नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. एकूण 10,309 उमेदवारांपैकी सर्वाधिक 3078 उमेदवार हे कोकण विभागातील असून, 2597 हे विदर्भातील आहेत. पुणे विभागात 1674, नाशिक विभागात 1250, तर मराठवाड्यातील 1710 उमेदवार आहेत.

Devendra Fadnavis अनुकंपाचा अनुशेष संपणार; 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: खासदार ओवैसी अहिल्यानगर शहरात घेणार सभा; पोलिसांकडून ग्रीन सिग्नल

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अहिल्यानगर शहरात सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे. यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी काही अटी व शर्ती ठेवून ओवैसी यांना सभेसाठी परवानगी दिली आहे. सभेसाठीच्या अटी व शर्थी १) जाहिर सभा घेण्याकरीता आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घ्यावी. [स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पार्कीग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग इत्यादी। त्याबाबचे मंजुरी पत्र सादर करावे. २) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, ॲम्बुलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे. ३] आपले पक्षाचे खासदार बें अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. ४) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे. ५) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी. ६) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत. ७] जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. ८) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत. ९] जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही. १०) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. ११] जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. १२] सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी. वरील नियम व अटीचे पालन करुन याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र व सबंधिकत विभागाचे परवानगी पत्र असे संपुर्ण बाबीची पुर्तता करुन याबाबतचा पुर्तता आहवाल दि. २८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा शिवाजीनगर पोलीस ठाणेस सादर करावेत. आपण वरील बाबीची पुर्तता न केल्यास आपला परवानगी अर्ज नामंजूर करुन मा. वरिष्ठ कार्यालयात अहवाल सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Asaduddin Owais: खासदार ओवैसी अहिल्यानगर शहरात घेणार सभा; पोलिसांकडून ग्रीन सिग्नल Read More »

ahilyanagar

Ahilyanagar News : रंगोळीने धार्मिक भावना दुखावल्या; अहिल्यानगर शहरात तणाव

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील बारातोटी कारंजा परिसरात काढण्यात आलेल्या एका रंगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याने दोन गटांत वाद झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला असून अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन अहिल्यानगर पोलिसांकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पुणे – छत्रपती संभाजीनगर हायवे वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Ahilyanagar News : रंगोळीने धार्मिक भावना दुखावल्या; अहिल्यानगर शहरात तणाव Read More »

asaduddin owais

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा?

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची 30 सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात जाहीर सभा होणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि महाराष्ट्र युवक अध्यक्ष अंजर खान यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही कॉलनी ग्राउंड येथे संध्याकाळी 7.00 वाजता होणार असून या सभेतून खासदार ओवैसी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह 30 सप्टेंबर रोजी शहरात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेतून अहमदनगर शहरासाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा करण्यात येणार याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Asaduddin Owais: नगर शहरात 30 सप्टेंबरला ओवैसींची जाहीर सभा; करणार मोठी घोषणा? Read More »

rain

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर

Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भाग आधीच पूरसदृश परिस्थितीने त्रस्त आहेत, ज्यामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मदत आणि बचाव कार्य तीव्र केले जात आहे, तर स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मृत्यू राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, नाशिक जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू घर कोसळून झाला आहे. धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत, महाराष्ट्रात 11,800 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मराठवाड्याला सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले, ज्यामुळे पैठण परिसरातील सुमारे 7000 लोकांना बाहेर काढण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर हर्सूल सर्कलमध्ये विक्रमी 196 मिमी पावसाची नोंद झाली, तर बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी गावातील एका मंदिरात अडकलेल्या 12 जणांना वाचवले. नांदेडमधून सुमारे 970 लोकांना बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरात सोळा एनडीआरएफ पथके आधीच तैनात आहेत, तर पुण्यात दोन अतिरिक्त पथके सज्ज आहेत. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने, मुख्य लक्ष संवेदनशील भागातील लोकसंख्येला बाहेर काढण्यावर असले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मुसळधार पाऊस किती काळ सुरू राहील? आयएमडीने मंगळवारपर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानंतर, संपूर्ण आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रवाशांना पाणी साचलेले रस्ते टाळण्याचा, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा आणि गर्दीच्या वेळी ट्रेन अपडेट्स तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर Read More »

team india

Team India : Asia Cup नंतर भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा

Team India: भारताने दमदार कामगिरी करत आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे तिलक वर्मा, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने साध्य केले. बीसीसीआयकडून 21 कोटी रुपयांचे बक्षीस आशिया कप विजयानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी 21 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व भारताने आतापर्यंत 9 वेळा आशिया कप जिंकला आहे, ज्यामध्ये 7 एकदिवसीय आणि 2 टी-20 जेतेपदांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. श्रीलंकेने 6 वेळा आणि पाकिस्तानने 2 वेळा विजेतेपद जिंकले आहे. कुलदीप यादवची शानदार कामगिरी फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 146 धावा केल्या. साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी 84 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्यांची फलंदाजी कोसळली. कुलदीप यादवने चार बळी घेत पाकिस्तानला 146 धावांवर बाद केले. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तिलक आणि दुबे यांची स्फोटक फलंदाजी भारताकडून तिलक वर्माने शानदार खेळी केली, 53 चेंडूत 69 धावा (तीन चौकार आणि चार षटकार) केल्या. शिवम दुबेने 22 चेंडूत 33 धावा (दोन चौकार आणि दोन षटकार) केल्या, ज्यामुळे भारताला लक्ष्य सहज गाठता आले.

Team India : Asia Cup नंतर भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा Read More »

asia cup 2025

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या सामन्यानंतर एक अभूतपूर्व घटना घडली ज्याची चर्चा सध्या जोराने सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. सामना संपल्यानंतर जवळजवळ दोन तास स्टेजवर नाट्य सुरू राहिले. नक्वी ट्रॉफी हातात घेऊन उभे राहिले, परंतु भारतीय संघाने स्पष्ट केले की ते त्यांच्याकडून कप स्वीकारणार नाहीत. नक्वी यांच्या उपस्थितीला आक्षेप भारतीय खेळाडूंनी सांगितले की जोपर्यंत मोहसीन नक्वी स्टेजवर आहेत तोपर्यंत आम्ही ट्रॉफी घेणार नाही. यामुळे समारंभ अनिश्चित राहिला आणि शेवटी, टीम इंडियाने ट्रॉफी नाकारण्याचा त्यांचा निर्णय कायम ठेवला. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. पहिल्या सामन्यातील तणाव या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण होते. दोन्ही देशांमधील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी झाला होता, ज्यामध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांच्याशी हस्तांदोलन करणे टाळले. त्यानंतर, संपूर्ण भारतीय संघानेही पाकिस्तानी खेळाडूंपासून अंतर राखले. सामन्यानंतरही भारतीय खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी मैदानावर आले नाहीत. या घटनेने वाद निर्माण झाला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रारही केली. नक्वी यांचे विधान मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेदरम्यान अनेक भारतविरोधी विधाने केली. सूर्यकुमार यादव यांनी आपला विजय देशाच्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना समर्पित केल्यामुळे त्यांना अंतिम सामन्यातून बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. आयसीसीने नक्वी यांची मागणी फेटाळून लावली. या विधानांमुळे भारतीय खेळाडू आणखी संतप्त झाले. पाकिस्तानी संघाचा दृष्टिकोन स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी संघाने अनेक वेळा वादग्रस्त वृत्ती स्वीकारली. हस्तांदोलनाच्या मुद्द्याव्यतिरिक्त, खेळाडूंनी मैदानावर चिथावणीखोर उत्सव देखील केले. हरिस रौफच्या 6-0 च्या हावभावाची आणि बंदुकीच्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पंचांना काढून टाकण्याची आणि सूर्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करून वाद आणखी वाढवला. तथापि, त्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. तणावपूर्ण वातावरणात खेळला गेलेला अंतिम सामनाही अत्यंत आक्रमक होता. सामन्यापूर्वी किंवा नंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले नाही. भारतीय खेळाडूंनी मैदानावर त्यांच्या कामगिरीने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवून जेतेपद पटकावले.

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार Read More »

laxman hake

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरात हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सध्या या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात लक्ष्मण हाके सभा घेत मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे.

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला Read More »

nitesh rane attack on uddhav thackeray

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर आता या मागणीवर प्रतिक्रिया देत स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. पंतप्रधान मोदी आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव असं माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, सकारात्मक गोष्ट आहे. दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिनच सरकार आहे, याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील.

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल Read More »