DNA मराठी

आरोग्य

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar News : पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत; पुरवठा विस्कळीत ‘या’ दिवशी होणार पुरवठा

Ahilyanagar News : विज वितरण कंपनी कडून शहर पाणी पुरवठा योजने करिता होणाऱ्या विज पुरवठ्या मध्ये बिघाड निर्माण झाल्याने सोमवार दि.१२/०१/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजले पासुन आज पहाटे ४.३० वाजेपर्यंत विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सलग आठ तास पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत त्यामुळे मंगळवार दि.१३/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने म न पा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिके मार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणी पुरवठा हा बुधवार दि. १४/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच बुधवार दि.१४/०१/२०२६ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो गुरुवार दि.१५/०१/२०२६ रोजी करण्यात येईल. तसेच सर्व उपनगर भागामध्ये रोटेशन पेक्षा उशीराने पाणी पुरवठा होणार आहे . तरी नागरीकानी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत; पुरवठा विस्कळीत ‘या’ दिवशी होणार पुरवठा Read More »

gutkha ban

Pathardi News: पाथर्डीकरांनो, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आता थेट ‘गुन्हा’!

Pathardi News: पाथर्डी तालुक्यात आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे, धुम्रपान करणे किंवा थुंकणे तुम्हाला चांगलेच महागात पडणार आहे. प्रशासनाने आता ‘कोटपा कायदा 2023’ (COTPA Act) ची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार उद्धव नाईक यांचा कडक इशारा: नियम मोडणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर थेट गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आरोग्याचा गंभीर प्रश्न: तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनविकार जडतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे टीबी (क्षयरोग) सारख्या गंभीर आजारांचा प्रसार होतो, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही‌. कृती आराखडा: 🔹 शाळा, महाविद्यालये, बाजारपेठांमध्ये जनजागृती मोहीम. 🔹 सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरोधात फलक आणि स्वच्छता मोहीम. 🔹 नियमित तोंडाच्या कर्करोगाची तपासणी शिबिरे. 🔹 व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी.

Pathardi News: पाथर्डीकरांनो, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन आता थेट ‘गुन्हा’! Read More »

maharashtra news

Maharashtra News: दारू रोख, दूध उधारीवर : आपलीच प्राधान्ये…प्रगती की मूल्यांची माघार?

Maharashtra News : चपला आज झगमगत्या शोरूममध्ये शोभून दिसतात; मात्र पुस्तकांची जागा रस्त्यावर येऊन ठेपली आहे. ज्ञानाऐवजी उपभोगाला प्राधान्य दिलं जाणारं हे चित्र केवळ बाजारपेठेचं नाही, तर आपल्या सामाजिक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. दारू रोख पैशांत सहज उपलब्ध आहे, पण दूध मात्र उधारीवर घ्यावं लागतंही विसंगती आपल्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभं करते. कुत्रे वातानुकूलित घरांत सन्मानानं राहतात, तर शेतकऱ्याची गाय रस्त्यावर भटकताना दिसते. प्राण्यांप्रती प्रेम असणं गैर नाही मात्र उपयुक्ततेऐवजी दिखाव्याला महत्त्व दिलं जात असेल, तर तो विवेकाचा पराभव ठरतो. शहरांचा विस्तार झाला, उंच इमारती उभ्या राहिल्या, पण संवेदनशीलतेचं अधिष्ठान मात्र ढासळत गेलं. आजची तरुण पिढी परदेशात नोकरी करत आहे, करिअर घडवत आहे, ही बाब अभिमानास्पदच आहे. मात्र ज्यांनी त्यांच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, त्या आई-वडिलांचं आयुष्य वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजलं जात असेल, तर ही प्रगती एकांगी ठरते. आर्थिक स्वावलंबन मिळालं पण भावनिक नात्यांचं काय? समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, हा प्रश्न पुन्हा एकदा ठळकपणे उभा राहतो. विकास म्हणजे केवळ सोयी-सुविधांची वाढ नव्हे, तर मूल्यांची जपणूकही तितकीच महत्त्वाची आहे. अन्यथा ही वाटचाल प्रगतीकडे नसून, समाजाच्या अधःपतनाकडे नेणारी ठरेल.

Maharashtra News: दारू रोख, दूध उधारीवर : आपलीच प्राधान्ये…प्रगती की मूल्यांची माघार? Read More »

cold wave

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी पडत असून, अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याचे भारतीय हवामान खात्याच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला असून, जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ​नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना उबदार कपड्यांचा वापर : हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे तसेच शाल, चादर यांसारख्या उबदार कपड्यांचा पुरेसा वापर करावा. आहार व आरोग्य : शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी गरम पेय आणि पौष्टिक आहार घ्यावा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त फळे आणि ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. प्रवास व निवारा : थंडीची लाट असताना शक्यतो घरातच राहावे. थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. घर आणि परिसर उबदार राहील याची दक्षता घ्यावी. ​लहान मुले व वृद्धांची काळजी : घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. थंडीमुळे त्यांना त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. ​वैद्यकीय सल्ला : थंडीत दीर्घकाळ राहिल्याने त्वचा निस्तेज किंवा बधीर होत असल्यास, तसेच शरीराचा थरकाप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे (Hypothermia) लक्षण असू शकते पशुधनाची काळजी : नागरिकांनी स्वतःसोबतच आपल्या पाळीव प्राण्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि त्यांना थंड वाऱ्यापासून वाचविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. ​आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी नजीकचे आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा ‘108’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’; जाणून घ्या सर्वकाही Read More »

high cholesterol

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे

Cholesterol 5 Symptoms : कोलेस्टेरॉलच्या समस्या हृदयाशी जोडल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की त्याची सुरुवातीची लक्षणे पायांमध्ये दिसतात? WHO, WebMD आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनने उच्च कोलेस्टेरॉलची पाच लक्षणे सूचीबद्ध केली आहेत जी कधीही दुर्लक्षित करू नयेत. लोक सहसा असे गृहीत धरतात की उच्च कोलेस्टेरॉल हृदयाशी संबंधित आहे, आणि म्हणूनच, त्याची लक्षणे हृदयात किंवा छातीच्या भागात दिसून येतील. पण तुम्हाला माहित आहे का की उच्च कोलेस्टेरॉलची सुरुवातीची लक्षणे प्रथम पायांमध्ये दिसतात? आपले शरीर आपल्याला वारंवार हे संकेत देते, परंतु आपण त्यांना साधे थकवा किंवा अशक्तपणा म्हणून नाकारतो? अमेरिकन हार्ट असोसिएशन, WHO आणि WebMD नुसार, उच्च कोलेस्टेरॉलची ही पाच लक्षणे आहेत. चालताना पाय दुखणे जर तुम्हाला चालताना तुमच्या खालच्या पायांमध्ये, मांड्यांमध्ये किंवा कंबरेमध्ये वेदना किंवा पेटके येत असतील आणि थांबल्यानंतर वेदना कमी होत असतील, तर ते रक्त प्रवाह खराब होण्याचे लक्षण असू शकते. थोडे चालल्यानंतरही लवकर थकणे जर तुमचे शरीर ठीक असेल परंतु तुमचे पाय लवकर थकतात, तर हे खराब रक्ताभिसरणाचे लक्षण असू शकते. तुमच्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे तुमच्या स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे पायऱ्या चढणे किंवा लांब चालणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण वाटू शकते. एक पाय दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटू शकते जर एक पाय अनेकदा दुसऱ्या पायापेक्षा जास्त थंड वाटत असेल, विशेषतः चालल्यानंतर, तर हे रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्त शरीराला उष्णता प्रदान करते, त्यामुळे रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे पाय थंड वाटू शकतो. कधीकधी, त्वचा थोडीशी फिकट किंवा निळी होऊ शकते. बोटांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे पायांच्या बोटांमध्ये वारंवार मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे हे रक्तप्रवाह खराब झाल्यामुळे होऊ शकते. शिरांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचे कार्य बिघडते. जर हे बराच काळ चालू राहिले तर पायांच्या जखमा लवकर बऱ्या होणार नाहीत. पायांवर डाग आणि रंग बदलणे जर चालताना तुमच्या पायांची त्वचा फिकट, डाग असलेली किंवा हलकी निळी झाली तर ते रक्ताभिसरण खराब होण्याचे लक्षण आहे. गंभीर प्रकरणांमध्ये, त्वचा चमकदार दिसू शकते. पायांवर केसांची वाढ देखील मंद असते आणि जखमा बऱ्या होण्यास जास्त वेळ लागतो.

Cholesterol 5 Symptoms : पायात सूज येणे, किंवा जळजळ होणे… ‘ही’ आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची 5 लक्षणे Read More »

winter

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान

​Ahilyanagar Winter Alert: राज्यातील अनेक भागात आता थंडीची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी तापमान अचानक घसरल्याने नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिह्यात सध्या 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान नोंदवले जात असून येणाऱ्या काळात तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. ​या गोष्टी लक्षात ठेवा: ​पुरेसे उबदार कपडे वापरा (मफलर, कानटोपी, मोजे). ​ थंडीत शक्यतो घरातच थांबा आणि प्रवास टाळा. ​शरीर उबदार ठेवण्यासाठी गरम पेये आणि व्हिटॅमिन-सी युक्त आहार घ्या. वृद्ध, लहान मुले आणि पाळीव प्राणी यांची विशेष काळजी घ्या. त्वचेचा रंग बदलणे, बधीर होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा. ​आपत्कालीन परिस्थितीत: नजिकचे आरोग्यकेंद्र किंवा 108 या क्रमांकावर संपर्क करावा.

Ahilyanagar Winter Alert: नगरकरांनो, थंडीची लाट! 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान Read More »

hospital

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना; जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारची महत्वाची योजना आयुष्मान भारत योजना अहिल्यानगर जिल्ह्यात अनेकांसाठी वरदान ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र ठरले असून 18 लाख 23 हजार कार्डे तयार आहे. योजनांचे मुख्य फायदे प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार 1,356 शस्त्रक्रिया व उपचार मोफत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत वय वंदना कार्ड अतिरिक्त 5 लाख रुपये कव्हर जिल्ह्यात अंमलबजावणी होत असलेल्या योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दोन्हींचा एकत्रित लाभ नागरिकांना उपलब्ध आयुष्मान गोल्डन कार्ड कसे मिळेल? स्व: लाभार्थी आशा स्वयंसेविका आपले सरकार सेवा केंद्र स्वस्त धान्य (राशन) दुकान आयुष्मान App (Google Play Store) कार्ड घरबसल्या तयार करा भेट द्या: beneficiary.nha.gov.in किंवा Google Play Store → Ayushman App डाउनलोड आधार क्रमांक/रेशन कार्ड/नोंदणीकृत मोबाईल वरून OTP नोंदणी कुटुंबातील सदस्यांची माहिती + फोटो अपलोड कार्ड डाउनलोड करा आणि वापर सुरू करा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना; जिल्ह्यात 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्मान कार्डासाठी पात्र Read More »

coldrif syrup death case

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा

Coldrif Syrup Death Case: मध्यप्रदेशात रासायनिक अयोग्यता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून बनवलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 16 मुलांचा मृत्यू झाला असल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर, तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाने 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी श्रीसन फार्मास्युटिकल्स कारखान्यावर छापा टाकला. तपासणीत निकृष्ट दर्जाची परिस्थिती आणि बेकायदेशीर पद्धती आढळून आल्या. निरीक्षकांना प्लास्टिक पाईप्समधून गळणारे रासायनिक अवशेष, गंजलेली यंत्रसामग्री आणि संरक्षक उपकरणे नसलेले कामगार औद्योगिक रसायने हाताने मिसळत असल्याचे आढळले. कारखान्यात प्रशिक्षित केमिस्ट नव्हते आणि उत्पादनादरम्यान कोणतीही गुणवत्ता चाचणी घेण्यात आली नाही. औद्योगिक रसायनांपासून बनवलेले कोल्ड्रिफ कफ सिरप सूत्रांनुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रोपीलीन ग्लायकॉलसारखी औद्योगिक रसायने स्थानिक वितरकांकडून रोख रकमेत किंवा गुगल पे द्वारे खरेदी केली गेली. कागदपत्रे टाळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. तपासणी अहवालात असेही उघड झाले की कारखान्याने औद्योगिक दर्जाचे प्रोपीलीन ग्लायकॉल वापरले होते, ज्याची डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल सारख्या संभाव्य हानिकारक दूषित घटकांसाठी चाचणी केली गेली नव्हती. प्रिंटिंग इंक, अॅडेसिव्ह, ब्रेक फ्लुइड आणि ल्युब्रिकंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या डायथिलीन ग्लायकॉलमुळे मुलांच्या मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेचे गंभीर नुकसान झाले. तपासणीत असे आढळून आले की SR-13 बॅचमध्ये 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकॉल होते, जे परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जवळजवळ 500 पट जास्त आहे. तपासणीत असे आढळून आले की: कोणतीही औषधोपचार यंत्रणा नव्हती, म्हणजेच कोणीही दुष्परिणामांचे निरीक्षण केले नाही किंवा रिकॉल केले नाही. उत्पादनादरम्यान कोणतेही प्रशिक्षित केमिस्ट उपस्थित नव्हते. गुणवत्ता चाचणीशिवाय कच्चा माल वापरण्यात आला. अज्ञात स्त्रोतांकडून पाणी मिळवण्यात आले आणि शुद्धतेसाठी चाचणी केली गेली नाही. कारखान्यात एअर हँडलिंग युनिट्स, HEPA फिल्टर्स, वेंटिलेशन, कीटक नियंत्रण किंवा सुरक्षा नोंदींचा अभाव होता. तपासणीत 39 गंभीर आणि 325 प्रमुख उल्लंघने उघड झाली, ज्यात कीटकांचा प्रादुर्भाव, उघडे गटार, तुटलेली उपकरणे आणि एअर फिल्टरचा अभाव यांचा समावेश आहे. SR-13 बॅचचा विनाशकारी परिणाम मे 2025 मध्ये उत्पादित आणि एप्रिल 2027 पर्यंत वैध असलेली SR-13 बॅच अनेक महिने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बाजारात मुक्तपणे फिरत होती. या बॅचचे सेवन केल्यानंतर चिंदवाडा येथील अनेक मुलांना तीव्र मूत्रपिंड निकामी झाले. सोळा मुलांचा मृत्यू झाला, त्यापैकी बहुतेक पाच वर्षांखालील होते. रेस्पोलाइट डी, जीएल, एसटी आणि हेप्सँडिन सारख्या इतर सिरपची चाचणी घेण्यात आली आणि ते सामान्य दर्जाचे असल्याचे आढळले. देखरेख आणि जबाबदारीचा अभाव तपासात असे दिसून आले की हा अपघात केवळ निष्काळजीपणाचा परिणाम नव्हता तर एक पद्धतशीर बिघाड होता. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑथॉरिटीने स्रेसन फार्मास्युटिकल्सची उत्पादन प्रक्रिया थांबवली आणि सर्व साठा गोठवला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि तिचा परवाना निलंबित करण्यात आला. मध्य प्रदेश सरकारने दोन औषध निरीक्षक आणि एका उपसंचालकांना निलंबित केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली केली, तर चिंदवाडा येथील एका डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

गंजलेली उपकरणे अन् विषारी रसायने Coldrif Syrup Death प्रकरणात मोठा खुलासा Read More »

rain

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर

Maharashtra Rain Alert : राज्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरपर्यंत राज्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, ज्यामध्ये पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भाग आधीच पूरसदृश परिस्थितीने त्रस्त आहेत, ज्यामध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मदत आणि बचाव कार्य तीव्र केले जात आहे, तर स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मृत्यू राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मते, नाशिक जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू घर कोसळून झाला आहे. धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत, महाराष्ट्रात 11,800 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मराठवाड्याला सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडावे लागले, ज्यामुळे पैठण परिसरातील सुमारे 7000 लोकांना बाहेर काढण्यात आले. या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर हर्सूल सर्कलमध्ये विक्रमी 196 मिमी पावसाची नोंद झाली, तर बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाने बीड जिल्ह्यातील आष्टी गावातील एका मंदिरात अडकलेल्या 12 जणांना वाचवले. नांदेडमधून सुमारे 970 लोकांना बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरात सोळा एनडीआरएफ पथके आधीच तैनात आहेत, तर पुण्यात दोन अतिरिक्त पथके सज्ज आहेत. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने, मुख्य लक्ष संवेदनशील भागातील लोकसंख्येला बाहेर काढण्यावर असले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. मुसळधार पाऊस किती काळ सुरू राहील? आयएमडीने मंगळवारपर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानंतर, संपूर्ण आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रवाशांना पाणी साचलेले रस्ते टाळण्याचा, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ देण्याचा आणि गर्दीच्या वेळी ट्रेन अपडेट्स तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू , अनेक जण बेघर Read More »

rain

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका

Rain Alert: जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. बचावकार्याची ठळक माहिती अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले. मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका Read More »