DNA मराठी

ऑटोमोबाईल

“सावेडी जमीन घोटाळा : साक्षीदार म्हणतात ‘मी तो नव्हे’; प्रशासनाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह”

land Scam Sawedi : अहिल्यानगरच्या सावेडी भागातील सर्व्हे नंबर 245/ब 1 (0.72 हेक्टर आर) आणि 245/ब 2 (0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाच्या जमिनीची नोंदणी तब्बल 35 वर्षांनंतर अचानक होते आणि त्यानंतर उडते धूळधाण. या संशयास्पद नोंदणीमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. खरी धक्का देणारी बाब म्हणजे जमिनीच्या खरेदीखतावर असलेले साक्षीदार कारण ज्यांची नावं या दस्तावर आहेत, तेच पुढे येऊन सांगत आहेत की “आम्ही त्या व्यवहाराचे साक्षीदार नाहीच.” हा प्रकार केवळ खाजगी व्यक्तींमधील जमीन व्यवहाराचा प्रश्न राहिलेला नाही. ही बाब थेट प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर आणि यंत्रणेच्या पारदर्शकतेवर बोट ठेवणारी ठरते. एकीकडे डिजिटल सातबारा, ऑनलाईन फेरफार अशा गोंडस घोषणांचा गजर होत असताना, दुसरीकडे तब्बल तीन दशके झोपलेल्या नोंदी एकाएकी कोणाच्या वरदहस्ताने जाग्या होतात, हेच समजत नाही. या प्रकरणातील साक्षीदारांच्या नकारामुळे संपूर्ण दस्ताऐवजाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामध्ये केवळ नोंदणी कार्यालयच नव्हे, तर महसूल यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. कोणत्याही खरेदीखताची वैधता साक्षीदारांवरही ठरते. मग हे साक्षीदार न सांगता, न बोलता नोंदीत कसे सामील झाले? आज सावेडी प्रकरण हा एका मोठ्या व्यवस्थात्मक अपयशाचा आरसा बनला आहे. भूमाफियांना जमीन बळकावण्याचे असे प्रकार म्हणजे सामान्य जनतेच्या हक्कांवर थेट गदा आहे. प्रश्न असा आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग आणि महसूल प्रशासन आता तरी या प्रकरणात कठोर आणि पारदर्शक कारवाई करणार का? शहरातील नागरिक आणि मूळ हक्कधारक आज एकाच प्रश्नाने व्यथित आहेत “भूमाफियांचे हे जाळे कधी फाटेल?” आणि “अशा बनावट साक्षींवर आधारलेल्या नोंदी रद्द होतील का?” आता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आणि पुढील कृतीच यंत्रणेच्या निष्ठेची खरी कसोटी ठरणार आहे. अन्यथा सावेडी प्रकरण आणखी एका फाईलमध्ये धूळ खात पडून राहील आणि भूमाफियांचे बस्तान अधिकच घट्ट होईल.

“सावेडी जमीन घोटाळा : साक्षीदार म्हणतात ‘मी तो नव्हे’; प्रशासनाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह” Read More »

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात?

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? land Scam Sawedi :- अहिल्यानगर – सध्या राज्यात अहमदनगर मधील शहरी भागातील जमिनींचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यातच झटपट आणि कमी काळात श्रीमंत होण्याची स्पर्धा जोरात सुरू आहे जे नागरिक हयात नाहीत किंवा पूर्वी शहर सोडून निघून गेले अशा अशा नागरिकांच्या जमिनी आणि प्लॉट शोधून अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या जमिनीचे बनावट खरेदीखत करायचं आणि ती चढ्या भावाने विकायची हा धंद्या सध्या अहिल्यानगर मध्ये जोरात सुरू आहे, अहिल्यानगर (सावेडी) (land Scam Sawedi) येथील सर्वे नंबर 245/ब 1 (क्षेत्रफळ 0.72 हेक्टर आर) व 245/ब 2 (क्षेत्रफळ 0.63 हेक्टर आर), एकूण 1 हेक्टर 35 आर जमिनीचा 35 वर्षांपूर्वीचा खरेदी व्यवहार तब्बल तीन दशकांनंतर सावेडी तलाठी कार्यालयात नोंदवला गेल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. मूळ मालक अब्दुल अजीज डायाभाई (मूळ पत्ता झेंडीगेट, अहिल्यानगर; सध्या वास्तव्य – मुंबई) यांनी 15 ऑक्टोबर 1991 रोजी पारसमल मश्रीमल शहा यांना विकलेली जमीन एवढ्या दीर्घ काळानंतर शासकीय नोंदवहीत दाखल होणं संशयाचे धुके गडद करत आहे.या प्रकरणात भूमाफियांना शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा आणि राजकीय वरदहस्ताचा आधार मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. एवढ्या वर्षांनंतर नोंद घेताना मूळ मालकाला कोणतीही नोटीस न देता नोंद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, खरेदीखताची मूळ प्रत तपासण्यात आली नाही, यामुळे नोंदवह्यांची शुद्धता आणि शासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. *भूमाफियांचे संगनमताने?बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील जमिनीवर खोटे दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडप करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा आर्थिक फायदा, वरिष्ठांचे मूक समर्थन आणि काही राजकीय लोकांचा आशीर्वाद असल्याने हे घोटाळे बेधडक सुरू आहेत, असा आरोप केला जात आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीया संशयास्पद व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शासकीय यंत्रणेत पसरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. अहिल्यानगर परिसरात भूमाफियांचे वाढते धाडस आणि प्रशासनातील संदिग्ध भूमिका यामुळे जनतेत तीव्र संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे भूमी नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शासकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अहिल्यानगरमध्ये 35 वर्षांनंतर जमिनीचा संशयास्पद व्यवहार नोंद; भूमाफियांना प्रशासनाचा हात? Read More »

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump on India: भारतासोबत मोठी डील होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिका आता काही मोठे व्यापार करार करणार आहे आणि त्यात भारतासोबतचा करार देखील समाविष्ट आहे. असं ट्रम्प म्हणाले. “बिग ब्युटीफुल बिल” या त्यांच्या कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनसोबत करार केला आहे आणि आता पुढचा मोठा करार भारतासोबत होऊ शकतो.” ट्रम्प पुढे म्हणाले, “प्रत्येकजण अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा भाग होऊ इच्छितो. परंतु आम्ही सर्वांशी व्यवहार करणार नाही. आम्ही काही मोठे करार करणार आहोत. आम्ही भारतासाठी दरवाजे उघडणार आहोत.” भारतासाठी दरवाजे उघडतील अमेरिका आणि चीनमधील दीर्घ व्यापार युद्धानंतर करार झाला असताना हे विधान आले आहे. अमेरिका आता भारतासोबतही आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. चीनसोबत कोणता करार झाला? ट्रम्प यांनी चीनसोबतच्या कराराची संपूर्ण माहिती दिली नसली तरी, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की हा करार चीनमधून अमेरिकेत दुर्मिळ पृथ्वी घटकांची वाहतूक जलद करण्याबद्दल आहे. अमेरिका या दुर्मिळ धातूंसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे आणि आता त्यांचा पुरवठा सुरक्षित करू इच्छित आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराची पार्श्वभूमी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी आधीच सांगितले आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी म्हटले होते की, “आम्ही खूप जवळ आलो आहोत आणि लवकरच एक मजबूत व्यापार भागीदारीची घोषणा केली जाऊ शकते.” भारत आणि अमेरिका दोघेही आता एकमेकांसाठी धोरणात्मक भागीदार बनले आहेत, विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावामुळे. या कराराद्वारे, भारताला अमेरिकन बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळू शकतो आणि अमेरिकेला भारतासारख्या मोठ्या ग्राहक देशात आपला व्यापार वाढवण्याची संधी देखील मिळेल.

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा Read More »

आता शांततेची वेळ…, डोनाल्ड ट्रम्पकडून इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा

Iran Israel Conflict : गेल्या 12 दिवसांपासून सुरू असणाऱ्या इराण आणि इस्रायल युद्ध अखेर थांबले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये परस्पर संमतीने युद्धबंदीचा करार झाला आहे, जो पुढील काही तासांत लागू होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ वर पोस्ट करत ट्रम्प यांनी माहिती दिली की इराण आणि इस्रायल पुढील ६ तासांत त्यांच्या सध्याच्या लष्करी कारवाया संपवतील. यानंतर, इराण १२ तासांचा युद्धबंदी लागू करेल आणि पुढील १२ तासांनंतर इस्रायल देखील युद्धबंदीचे पालन करण्यास सुरुवात करेल. अशा प्रकारे, एकूण २४ तासांत, हे युद्ध अधिकृतपणे संपल्याचे मानले जाईल. “आता शांततेची वेळ आली आहे” – ट्रम्प ट्रम्प यांनी त्यांच्या संदेशात जगाला अभिनंदन केले आणि लिहिले, “अभिनंदन जग, शांततेची वेळ आली आहे!” त्यांनी या हालचालीला ऐतिहासिक म्हटले आणि म्हटले की जर हे युद्ध सुरू राहिले असते तर ते वर्षानुवर्षे चालू राहिले असते आणि संपूर्ण मध्य पूर्व विनाशाच्या विळख्यात सापडले असते. पण आता हा धोका टळला आहे. ट्रम्प यांच्या जागतिक प्रतिमेला एक नवीन आयाम मिळाला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधीही ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी कराराची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत, इराण आणि इस्रायलमधील या युद्धबंदी करारामुळे जागतिक शांतता प्रस्थापित म्हणून त्यांची प्रतिमा आणखी मजबूत होते. दोन्ही देशांचे अभिनंदन ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “हे संपवण्यासाठी धाडस, संयम आणि शहाणपण दाखवल्याबद्दल मी दोन्ही देशांचे अभिनंदन करतो.” ते पुढे म्हणाले, “देव इस्रायलला आशीर्वाद देवो, देव इराणला आशीर्वाद देवो, देव मध्य पूर्व, अमेरिका आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो.” आता पुढे काय? आता सर्वांचे लक्ष या युद्धबंदीची अंमलबजावणी किती जोरदारपणे होते आणि दोन्ही देश दीर्घकालीन शांततेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करतात का याकडे आहे. सध्या तरी, ही बातमी जगासाठी सुटकेचा नि:श्वास आहे – एक युद्ध, जे मोठे रूप घेऊ शकले असते, ते आता थांबले आहे.

आता शांततेची वेळ…, डोनाल्ड ट्रम्पकडून इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा Read More »

Maharashtra News: एसटी महामंडळ तोट्यात; आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला असल्याचे श्वेतपत्रिकेतून समोर आला आहे. हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC ची आर्थिक स्थिती पारदर्शकपणे समजावून देण्याच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात आगामी धोरण निर्णय, खर्चकपात योजना, तसेच महसूल वाढ व प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन नमूद करण्यात आले आहे. महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. महसूल वाढीच्या उपाययोजना श्वेतपत्रकानुसार, महसूल वाढवण्यासाठी MSRTC दरवर्षी ५,००० नवीन बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खाजगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून, त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत. तसेच, महामंडळाच्या मालमत्ता BOT (Build-Operate-Transfer) किंवा PPP (Public-Private Partnership) मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत. सी-कॅटेगरी मार्गांचे बी-कॅटेगरीत व बी-कॅटेगरीचे ए-कॅटेगरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गैर-परिचालन उत्पन्नात वाढ, प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे, आणि महसूल वाढीसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत. खर्चकपात व कार्यक्षमतेसाठी उपाय खर्च कमी करण्यासाठी ५,००० LNG आणि १,००० CNG बस ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आहे. व्यवस्थापन कार्यक्षमतेसाठी ERP (Enterprise Resource Planning) प्रणाली लागू केली जाणार असून खर्चकपात संदर्भातील निकष निश्चित केले जाणार आहेत. प्रवासी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्याची योजना श्वेतपत्रकात प्रवासी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी ५,३०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. NCMC (National Common Mobility Card) योजना सवलतीच्या प्रवाशांसाठी लागू केली जाणार आहे. डिजिटल तिकिट प्रणालीद्वारे ETIM आणि ORS प्रणालीचा वापर वाढवण्यात येणार आहे. प्रवासी व मालमत्तांच्या सुरक्षेसाठी CCTV प्रणाली बसवली जाणार आहे. अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. सध्या सवलत नसलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी भाड्यात सवलत देण्याचा विचार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी welfare schemes राबवण्याची योजना देखील आहे. कार्यक्षमता आणि सेवा वाढ MSRTC ची स्थापना १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर या एका बसमार्गावरून सुरू झाली होती. सुरुवातीच्या दशकांत steady growth पाहायला मिळाली. १९८१-८२ साली बसांची सरासरी संख्या १०,०२८ होती, जी २०११-१२ साली १८,२७५ झाली. मात्र २०२४-२५ पर्यंत ती घसरून १५,७६४ झाली आहे. कर्मचारी संख्या १९८१-८२ मध्ये ७९,४५८ होती, जी १९९१-९२ मध्ये १,१२,२०० इतकी झाली; मात्र अलीकडे ८६,३१७ इतकीच राहिली आहे. वार्षिक किलोमीटर ७९.९४ कोटीहून २०११-१२ मध्ये १९८.३८ कोटी झाली, मात्र २०२४-२५ मध्ये ती १८५.८० कोटी झाली. प्रवासी संख्येतही अशाच प्रकारे घसरण झाली आहे. बसस्थानकांची संख्या १९८१-८२ मध्ये ३९६ होती, जी आता २०२४-२५ मध्ये ५९८ झाली आहे. आर्थिक अडचणींची प्रमुख कारणे महामंडळाच्या आर्थिक अडचणींमागे प्रमुख कारण म्हणजे ताफ्यातील बसांची कमतरता आणि जुन्या बसमुळे होणारे वारंवार ब्रेकडाउन. तसेच अनेक तोट्यातील मार्गांवर सामाजिक बांधिलकीतून सेवा सुरू ठेवावी लागत आहे. भाड्याच्या संरचनेत वेळोवेळी योग्य ते बदल न झाल्यामुळे महसुलात वाढ झाली नाही. अवैध वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासी संख्या घटली आहे. एकूण तोटा आणि थकबाकी २०२३-२४ मध्ये MSRTC चा एकूण संचित तोटा १०,३२२.३२ कोटी इतका होता. त्याच वर्षी कर्मचारी वेतन ४,८६४.३४ कोटी, इंधन खर्च ३,६५६.७६ कोटी इतका होता. २०१८-१९ मध्ये वेतन ₹३,७८७.९२ कोटी व इंधन ३,०१३.६७ कोटी होता. दैनंदिन वाहन उपयोग दर ३४७.४४ किमी असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. इंधन कार्यक्षमता ४.४५ किमी प्रति लिटर आहे, जी सर्वात कमी आहे. मात्र उत्पन्न प्रति किमी ५५.०३ आहे, जे इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. मार्च २०२५ पर्यंत ३,५०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. यामध्ये PF थकबाकी १,२६२.७२ कोटी, ग्रॅच्युइटी ट्रस्ट १,११४.८९ कोटी, इंधन-सप्लायर बिल २१७.१९ कोटी, आणि प्रवासी कर थकबाकी ८२१.१३ कोटी समाविष्ट आहे. शासनाकडून मिळालेली मदत २००१ ते २०२४ दरम्यान शासनाकडून ६,३५३.८० कोटीची भांडवली मदत मिळाली. कोविड काळात आणि संपाच्या पार्श्वभूमीवर ४,७०८.७३ कोटी अनुदान दिले गेले. गेल्या चार वर्षांत ९,९२२.७८ कोटींचे अनुदान मिळाले आहे.

Maharashtra News: एसटी महामंडळ तोट्यात; आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर Read More »

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा

ABS System: जानेवारी 2026 पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याच बरोबर नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. ही ABS सिस्टिम नेमकी काय? याबद्दल जाणून घेऊया.. का घेण्यात आला निर्णय? जानेवारी 2026 पासून, देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये ABS अनिवार्य असेलरस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या एबीएस 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या देशातील अंदाजे 40 टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाही पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आलयं. एबीएस काय आहे? अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर असून जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते. ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते. घसरण्याचा धोका होतो कमी अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी एबीएस फायदेशीर ठरते. एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते ABS कसे काम करते? ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते. जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते आणि बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते. ABS चे किती प्रकार आहेत? सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते.

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा Read More »

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ

Chandrakant Patil:  राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये (पॉलीटेक्निक) प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1लाख 10हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेता, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवू नये म्हणून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या निर्णयानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 26 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील आणि अर्ज सादरीकरणासाठी आवश्यक माहिती https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकांना दिलासा, पॉलीटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू

Trump Steel Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली, त्यांनी परदेशातून येणाऱ्या स्टीलवरील आयात शुल्क सध्याच्या 25 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याची घोषणा केली. नवीन शुल्क दर 4 जूनपासून लागू होणार असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया येथील यूएस स्टीलच्या मोन व्हॅली वर्क्स-इर्विन प्लांटमध्ये ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की या निर्णयामुळे अमेरिकन स्टील उत्पादकांचे संरक्षण होईल आणि देशाच्या उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळेल. त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही ते 25 टक्क्यांनी वाढवत आहोत. आम्ही स्टीलवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवत आहोत, ज्यामुळे अमेरिकेच्या स्टील उद्योगाला अधिक संरक्षण मिळेल.” चीनवर थेट हल्ला ट्रम्प यांनी चीनवर टीका केली आणि म्हटले की अमेरिकेचे भविष्य “पिट्सबर्गच्या ताकदीने आणि अभिमानाने” बांधले पाहिजे, “शांघायच्या कनिष्ठ स्टीलवर” अवलंबून न राहता. हे विधान चीनसोबत सुरू असलेल्या व्यापार तणावाचे अधिक स्पष्ट प्रतिबिंबित करते. उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता पोलादावरील आयात शुल्क दुप्पट केल्याने गृहनिर्माण, ऑटोमोबाईल आणि बांधकाम क्षेत्रांसारख्या स्टीलवर अवलंबून असलेल्या उद्योगांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2018 पासून लागू केलेल्या स्टील टॅरिफनंतर आतापर्यंत स्टील उत्पादनांच्या किमती सुमारे 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ट्रम्प यांचे व्यापार संरक्षण धोरण सुरूच राष्ट्रपती ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्या सातत्यपूर्ण व्यापार संरक्षण धोरणाचा एक भाग आहे. जानेवारीमध्ये पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमवर 25 टक्के टॅरिफ लादला होता, जो मार्चपासून लागू झाला. त्यांनी कॅनेडियन स्टीलवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकीही दिली होती, परंतु नंतर ती मागे घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, स्टीलवरील शुल्क दुप्पट; 4 जूनपासून होणार लागू Read More »

iPhone16 Pro Max वर प्रचंड डिस्काउंट; होणार बंपर बचत; असा घ्या फायदा

iPhone 16 Pro Max : तुम्ही देखील iPhone 16 Pro Max खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात बंपर डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही आता अगदी कमी किमतीमध्ये iPhone 16 Pro Max घरी आणू शकतात. सध्या विजय सेल्समध्ये अँपल डेज सेल सुरू आहे ज्यामध्ये आयफोन 16 प्रो मॅक्सवर मोठी सूट देण्यात येत आहे. सध्या तुम्ही हे डिव्हाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 18,700 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत खरेदी करू शकता. गेल्या वर्षी अँपलने हा हँडसेट भारतात 1,44,900 रुपयांच्या किमतीत सादर केला होता. या फोनमध्ये उत्तम डिस्प्ले, हाय लेव्हल कॅमेरे देण्यात आले आहे. याच बरोबर या फोनमध्ये अँपल इंटेलिजेंसचा सपोर्ट देखील उपलब्ध देण्यात आला आहे. iPhone 16 Pro Max डिस्काउंट ऑफर Apple iPhone 16 Pro Max सध्या विजय सेल्स वेबसाइटवर फक्त 1,30,650 रुपयांना विकला जात आहे. या सेलमध्ये या फोनवर 14,250 रुपयांची फ्लॅट सूट मिळत आहे. याशिवाय, तुम्ही HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून या हाय-एंड डिव्हाइसवर 4,500 रुपयांची अतिरिक्त सूट किंवा ICICI आणि Axis बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे 3,00 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. याशिवाय, फोनवर 21 महिन्यांसाठी 6,250 रुपयांपासून सुरू होणारा EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. iPhone 16 Pro Max फीचर्स आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 2868 x 1320 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.9-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. नियमित आयफोन मॉडेलच्या तुलनेत, हे डिव्हाइस 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या प्रीमियम फ्लॅगशिप हँडसेटमध्ये Apple ची A18 Pro चिप आहे, जी 8GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये अँपल इंटेलिजेंस देखील दिसत आहे. iPhone 16 Pro Max कॅमेरा स्पेसिफिकेशन आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 48 एमपीचा प्राथमिक कॅमेरा आहे ज्यामध्ये 12 एमपीचा पेरिस्कोप टेलिफोटो आहे ज्यामध्ये 5x ऑप्टिकल झूम आहे आणि 48 एमपीचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये 4,685mAh ची मोठी बॅटरी देखील आहे जी 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग देते.

iPhone16 Pro Max वर प्रचंड डिस्काउंट; होणार बंपर बचत; असा घ्या फायदा Read More »

सीमेवर पाकिस्तानचा कट फसला, बीएसएफने 5 बंकर उद्ध्वस्त केले

BSF Action on Pakistan: बीएसएफने जम्मू सीमेवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या कारवाईत बीएसएफने पाच पाकिस्तानी चौक्या आणि एक दहशतवादी लॉन्चपॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईची माहिती बीएसएफ कमांडंट चंद्रेश सोना यांनी दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये भारतीय गावे आणि चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत मस्तपूर भागात असलेले पाकिस्तानचे एक सक्रिय लाँचपॅड उद्ध्वस्त करण्यात आल्याचे कमांडंट सोना यांनी सांगितले. याशिवाय पाकिस्तानच्या पाच चौक्या आणि अनेक बंकरनाही लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ते म्हणाले, “आम्ही त्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या अनेक संरचना उद्ध्वस्त केल्या. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का होता.” पाक सैन्य आणि रेंजर्सचे नुकसान बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 10 मे रोजी पाकिस्तानने भारतीय सीमेवर 61 मिमी आणि 82 मिमी मोर्टार डागले, ज्याचा वापर करून गावे, चौक्या आणि तैनाती स्थळांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. बीएसएफने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्सचे मोठे नुकसान केले. जखमींच्या हालचालींमुळे उघड झालेले नुकसान कमांडंट सोना म्हणाले की, कारवाईनंतर अनेक तासांपर्यंत पाकिस्तानी भागातून रुग्णवाहिकांची हालचाल दिसून आली, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे दिसून येते. महिला सैनिकांच्या शौर्याला सलाम ऑपरेशन सिंदूर दरम्यान महिला सैनिकांची भूमिका देखील कौतुकास्पद होती. कमांडंट म्हणाले की, प्रत्येक बीएसएफ बटालियनमध्ये महिला कॉन्स्टेबल तैनात आहेत आणि त्यांनी आघाडीवर राहण्याचा संकल्प केला आहे. त्याने मुख्यालयात परतण्याची विनंती केली नाही किंवा रजा घेतली नाही.

सीमेवर पाकिस्तानचा कट फसला, बीएसएफने 5 बंकर उद्ध्वस्त केले Read More »