DNA मराठी

ऑटोमोबाईल

ajit pawar

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar: राज्यातील उद्योग क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करून रोजगार निर्मितीला शासन प्राधान्य देत आहे. उद्योजकांना संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य असून, पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी प्रशासनाने उद्योजकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उद्योजकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आपले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार हे पारनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पारनेर – सुपा औद्योगिक वसाहतीमधील विविध विषयासंबंधी आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीस आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी अशोक बेनके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उद्योगासाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण राहिले आहे. पारनेर – सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. उद्योजकांना वेठीस धरून दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस विभागाने अधिक कार्यक्षम व दक्षतेने काम करावे. उद्योग टिकून राहावेत यासाठी उद्योजकांनीही कामगारांना उद्योगामध्ये सामावून घेण्याचे आवाहन केले. सुपा – पारनेर औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्यामुळे उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करून उद्योगक्षेत्राला अखंडित वीज पुरवठा तसेच पाणी पुरवठा सुनिश्चित केला जावा. औद्योगिक क्षेत्रात कामगार महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाने साध्या वेषातील पोलिसांमार्फत गस्त वाढवावी. उद्योगांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. तसेच, औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणमुक्त वातावरण राखले जावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी उद्योगांनी खबरदारी घेण्यास निर्देशही त्यांनी दिले. कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असून, कौशल्य विकास विभागामार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. सी ट्रिपल आय.टी. च्या माध्यमातून उद्योगासाठी उपयुक्त मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. जर्मन भाषा अवगत असलेल्या बेरोजगारांना सुमारे दहा लाख रोजगार उपलब्ध असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीत उपस्थित उद्योजकांनी त्यांच्या अडचणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व उद्योजक देखील उपस्थित होते.

Ajit Pawar: त्रास होणार नाही, पारनेर – सुपा MIDC च्या विकासासाठी सहकार्य करा; अजित पवार स्पष्टच बोलले Read More »

da hike

DA Hike : दिवाळी गिफ्ट, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीएमध्ये 3% वाढ जाहीर केली. ही घोषणा दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त करण्यात आली आहे. 1 जुलैपासून याचा फायदा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. केंद्र सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. एकदा होळीपूर्वी, जानेवारी-जून दरम्यान आणि दुसऱ्यांदा दिवाळीपूर्वी, जुलै-डिसेंबर दरम्यान. या वाढीचा फायदा देशभरातील 1.5 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल. डीए वाढ किती असेल? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए अंदाजे 3% ने वाढवण्यात आला आहे. यामुळे एकूण डीए त्यांच्या मूळ पगाराच्या 58% वर जाईल. या वर्षी जानेवारी-जूनमध्ये डीए 2% ने वाढवण्यात आला होता, जो गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी वाढ होता. पगार वाढ किती असेल? मूळ पगार 36,000 आहे असे गृहीत धरा. याचा अर्थ महागाई भत्ता दरमहा 1,080 ने वाढेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3% वाढ मोजली तर पेन्शनधारकांनाही प्रमाणानुसार लाभ मिळेल आणि महागाई सवलतीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या, महागाई भत्त्यात वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू केली जाते. या सातव्या वेतन आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल. आठवा वेतन आयोग पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत लागू होण्याची अपेक्षा आहे.

DA Hike : दिवाळी गिफ्ट, ‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ Read More »

palestine

Palestine News : पॅलेस्टाईन होणार नवीन देश? भारतासह 142 देशांनी दर्शवला पाठिंबा

Palestine News : गेल्या काही वर्षांपासून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या अशी मागणी होत आहे. तर आता लवकरच पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी न्यू यॉर्कमधील सदस्य राष्ट्रांना संबोधित करताना म्हटले की पॅलेस्टाईन्यांना राज्यत्व देणे हा बक्षीस नाही तर एक अधिकार आहे. त्यांनी इशारा दिला की जर पॅलेस्टाईनला ही मान्यता दिली गेली नाही तर ते अतिरेक्यांना एक भेट म्हणून सिद्ध होईल. गुटेरेस यांनी सांगितले की मध्य पूर्वेतील शाश्वत शांतता केवळ दोन-राज्य उपायाद्वारे शक्य आहे. दोन-राज्य उपायासाठी संयुक्त राष्ट्रांचे समर्थन गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या दीर्घकालीन धोरणाचा पुनरुच्चार केला की इस्रायल आणि पॅलेस्टाईनला त्यांच्या 1967 पूर्वीच्या सीमांवर आधारित सार्वभौम आणि स्वतंत्र लोकशाही राज्ये म्हणून मान्यता दिली पाहिजे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार जेरुसलेम ही दोन्ही देशांची सामायिक राजधानी असावी. फ्रान्सचे मोठे पाऊल कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियानंतर, फ्रान्सने आता पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून औपचारिक मान्यता देण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी न्यू यॉर्कमधील दोन-राज्य उपायावरील शिखर परिषदेत बोलताना म्हटले की पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची वेळ आली आहे. हा एकमेव उपाय आहे जो इस्रायलला शांततेत जगू देईल. मॅक्रॉन यांचे विधान राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की हा निर्णय हमासचा पराभव आणि शांततेच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे. गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावादरम्यान त्यांचे विधान आले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्रांना स्पष्ट केले की जर दोन-राज्य उपाय अवलंबला गेला नाही तर या प्रदेशात अस्थिरता वाढेल. पश्चिमी एकता रविवारी फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा करण्यापूर्वी. या घोषणांचे उद्दिष्ट तेल अवीववर युद्धबंदी लागू करण्यासाठी आणि वाटाघाटीचा मार्ग मोकळा करण्यासाठी दबाव वाढवणे आहे. ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या जी7 आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी केलेली ही भूमिका विशेष महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावर पॅलेस्टाईनची भूमिका 140 हून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे. अलीकडेच, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने इस्रायल-पॅलेस्टाईन द्वि-राज्य उपाय पुनरुज्जीवित करणारा ठराव प्रचंड मतांनी मंजूर केला. या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या 142 देशांमध्ये भारताचा समावेश होता. विशेष म्हणजे, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टाईन राज्य कधीही अस्तित्वात राहणार नाही असे सांगितल्यानंतर लगेचच हा निर्णय आला.

Palestine News : पॅलेस्टाईन होणार नवीन देश? भारतासह 142 देशांनी दर्शवला पाठिंबा Read More »

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे

Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेत अनेकांनी चुकीच्या मार्गाने फायदा घेतल्याने आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत शासकीय पोर्टलवर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे. याचबरोबर केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे Read More »

ajit pawar

Beed Railway : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटी निधी वितरीत

Beed Railway: बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आज नव्याने १५० कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला आहे. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच दि. १७ सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग ५० टक्के असून, आजवर शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता नव्याने १५० कोटींची भर घालण्यात आली आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी केला जाणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ हा रेल्वेमार्ग सुमारे २६१ किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च ४ हजार ८०५ कोटी रुपये इतका आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे २ हजार ४०२ कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. आजपर्यंत शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी २३ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यात आता आणखी १५० कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचे वितरण १५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवस आधी वितरीत करण्यात आलेल्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती येणार आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी होणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळ, रेल्वे व रस्ते विकासाला चालना देण्यासाठी विभागीय, जिल्हास्तरीय तसेच मंत्रालयीन पातळीवर विविध बैठका घेऊन त्यांनी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती मिळाली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वे धावणार असून त्याचा थेट फायदा बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. “अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Beed Railway : ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी 150 कोटी निधी वितरीत Read More »

fb img 1757067721711

Jaykumar Rawal : नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना ग्रीन सिग्नल

Jaykumar Rawal : केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली ‘भारत’ आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. परवडणाऱ्या किमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्नपदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘भारत’ ब्रँड उत्पादनांची विक्री केली जात आहे. याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. यावेळी नाफेडच्या वतीने राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही फिरती वाहने विक्रीकरीता रवाना करण्यात आली. तर, प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना या उत्पादनांचे वितरण करण्यात आले. मंत्री रावल म्हणाले, राज्यात सध्या सणांचा काळ आहे. या काळात दर्जेदार पीठ, तांदूळ आणि कांदा कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामुळे स्पर्धा वाढून या उत्पादनांचे बाजारभाव आणखी कमी होण्यास आणि पर्यायाने महागाई कमी होण्यास मदत होईल. राज्यात आणि देशात नाफेडचे जाळे पसरलेले आहे, त्यामाध्यमातून या उत्पादनांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी होत असल्याने कमी किंमतीत यांची विक्री शक्य होत असून ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. नाफेडने खरेदीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करुन टप्प्याटप्प्याने इतर उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्यास ग्राहकांना अधिक लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘भारत’ ब्रँडच्या या उपक्रमाचा भाग म्हणून आज विक्रीसाठी आलेल्या ‘भारत आटा’ चे दर प्रति किलो 31.50 रुपये, ‘भारत तांदूळ’ चे दर प्रति किलो 34 रुपये असे बाजारभावापेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत. कांदा ही विक्री साठी आहे. ग्राहकांसाठी व्यापक सुलभता आणि सोय सुनिश्चित करण्यासाठी ही उत्पादने रिलायन्स रिटेल, डी-मार्ट, विशाल मार्ट आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसारख्या प्रमुख संघटित किरकोळ साखळ्यांद्वारे वितरित केली जाणार आहेत. शिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी घरांपर्यंत थेट भारत ब्रँड उत्पादने पोहोचवण्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात केल्या गेल्या आहेत, अशी माहिती नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी यावेळी दिली.

Jaykumar Rawal : नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना ग्रीन सिग्नल Read More »

cabinet meeting

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणानुसार कारखाने अधिनियम १९४८ मध्ये विविध सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, त्रिपुरा यासारख्या राज्यांनी हे बदल आधीच केलेले आहेत. या सुधारणांमुळे जास्त मागणी असलेल्या वेळेस किंवा कामगारांच्या कमतरतेमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय उद्योगांचे कामकाज चालू राहू शकते. कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह कायदेशीररित्या अतिरिक्त उत्पन्न मिळेल. कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे याऐवजी ६ तासापर्यंत ३० मिनिटे असा करण्यात आला आहे. आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासावरुन १२ तास करण्यात आला आहे. अतिकालिक कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही यावरुन १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात येणार आहे. अर्थात अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल, अशी कठोर तरतूद सुद्धा त्यात आहे. याचबरोबर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील. या सुधारणांनुसार दैनंदिन कामाचे तास ९ वरुन १० करणे, त्यास अनुसरुन विश्रांतीच्या सुट्टीच्या कालावधीत बदल करणे, तातडीचे काम सोपविलेल्या कर्मचाऱ्यांचे कार्यकालयोजन साडेदहा तासांवरून १२ तास करणे, अतिकालिक कामाचा कालावधी १२५ तासांवरुन १४४ तास करणे इत्यादी सुधारणांस मान्यता देण्यात आली.

Maharashtra Cabinet Decision: कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तासांवरून 12 तासांपर्यंत होणार; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय Read More »

share market

Share Market Today : ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला, 4.14 लाख कोटी बुडाले

Share Market Today : गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर आज शेअर बाजारात पुन्हा एका मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेने २७ ऑगस्टपासून २५% अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारात परिणाम दिसून येत आहे. सकाळी ९.१५ वाजता बाजार उघडताच, ट्रम्प कर आकारणीचा परिणाम दिसून आला आणि सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू झाला, तर सकाळी ९.३७ वाजता बीएसई ६५० अंकांपेक्षा जास्त घसरणीसह ८०,१०८.४१ अंकांवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी ५० उघडताच १२४ अंकांनी घसरला आणि २४५७७ अंकांवर उघडला. निफ्टी बँक ५४००३ अंकांवर उघडला, ४४०.३० अंकांनी घसरला. या शेअर्सवर सर्वाधिक परिणाम सेन्सेक्सच्या शेअर्सवर आज सर्वाधिक दबाव एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, बीईएल, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसी यांच्यावर दिसून आला. दुसरीकडे, इटरनल, एचयूएल, एशियन पेंट्स, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि एल अँड टी यांचे शेअर्स वधारले. ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला अमेरिकेने बुधवारपासून भारतीय उत्पादनांवर २५% अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम कापड, रत्ने आणि दागिने, कार्पेट, फर्निचर आणि कोळंबी उद्योगावर होण्याची अपेक्षा आहे. ४.१४ लाख कोटी रुपयांचे शेअर्स बुडाले सत्रात बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरले. जोरदार विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.१४ लाख कोटी रुपयांची घट झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रात ४४९ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ४४५ लाख कोटी रुपयांवर आले.

Share Market Today : ट्रम्प टॅरिफमुळे बाजार कोसळला, 4.14 लाख कोटी बुडाले Read More »

vaishno devi landslide

Vaishno Devi Landslide : वैष्णो देवी भूस्खलनात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू, 58 गाड्या रद्द

Vaishno Devi Landslide : माता वैष्णो देवी येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर 22 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्याच वेळी, मोठ्या संख्येने भाविक दर्शनाशिवाय घरी परतू लागले आहेत, तर 4000 हून अधिक भाविक कटरा येथे यात्रा सुरू होण्याची वाट पाहत आहेत. भूस्खलनानंतर प्रवास मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला आहे आणि प्रवास मार्ग दुरुस्त करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे जम्मू आणि काश्मीरच्या इतर भागातही मुसळधार पाऊस आणि पूर आला आहे. मंगळवारपर्यंत, जम्मू आणि कटरा येथे सुमारे 20 हजार भाविक हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. मंगळवारी दुपारी अर्धकुंवरीजवळ भूस्खलन झाल्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात ढिगारा कोसळल्याने यात्रा मार्गाचा 200 फूट भाग खराब झाला. ढिगारा हटवण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे पण त्यासाठी वेळ लागू शकतो. पावसामुळे निर्माण झालेले संकट मंगळवार ते बुधवार सकाळपर्यंत उधमपूरमध्ये 629.4 मिमी आणि जम्मूमध्ये 296 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम हिमालयीन प्रदेशात एका दिवसात झालेल्या पावसाचा हा एक नवीन विक्रम आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामुळे आतापर्यंत 34 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. झेलम आणि इतर नद्यांची पाण्याची पातळी बुधवार दुपारनंतर जम्मूमध्ये हवामान सुधारले, परंतु काश्मीरमध्ये सततच्या पावसामुळे झेलम आणि इतर नद्यांची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. श्रीनगरच्या राजबाग भागात पाणी साचल्याने पोलिसांनी तिथून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पूरग्रस्त भागात मदतकार्य जम्मू विभागातील किश्तवाड आणि अनंतनागमध्येही पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. मंगळवारी रात्री किश्तवाडच्या वाधवान येथे ढगफुटीमुळे 10 घरे वाहून गेली. दुसरीकडे, अनंतनाग जिल्ह्यातील लिडर नदीत अडकलेल्या 22 जणांना एसडीआरएफच्या जवानांनी सुरक्षितपणे वाचवले. शेषनाग नाल्यात आलेल्या पुरामुळे पहलगाममधील चार इमारतींचे नुकसान झाले आहे. भरपाई जाहीर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक भाविकाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूमधील पूरग्रस्त भागांना भेट देताना प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना 6 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य पुरामुळे जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागातून 25000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याशिवाय, गुरुवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने पूरग्रस्त भागात वाहतूक पूर्ववत केली आहे, जरी काही ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते वाहून गेल्यामुळे वाहनांना बंदी आहे.

Vaishno Devi Landslide : वैष्णो देवी भूस्खलनात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू, 58 गाड्या रद्द Read More »