Dnamarathi.com

Delhi Election Results: नुकतंच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत 26 वर्षांनंतर सरकार स्थापन करणार आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की त्यांना आम आदमी पक्षाच्या 15 उमेदवारांचा फोन आला होता, त्यांनी भाजपच्या मतांचे विभाजन व्हावे म्हणून दिल्लीत शिवसेनेचा उमेदवार उभा करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला.

एकनाथ शिंदे यांनी का नकार दिला?
दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या 15 उमेदवारांनी त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मागितले होते, परंतु त्यांनी “युती धर्मा”मुळे नकार दिला, असा दावा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला.

शिंदे काय म्हणाले?
शिंदे म्हणाले, “आपच्या एकूण 15 उमेदवारांनी माझ्याशी संपर्क साधला होता. जर त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मिळाले तर मते भाजप आणि शिवसेनेत विभागली जातील, ज्यामुळे इतर पक्षांना फायदा होईल, असे मला वाटले. म्हणून मी नकार दिला. मी माझ्या खासदारांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी प्रचार करण्यास सांगितले होते.”

दिल्ली निवडणुकीत काय घडले?
दिल्लीतील 70 विधानसभा जागांपैकी भारतीय जनता पक्षाने (भाजप) 48 जागा जिंकल्या तर आम आदमी पक्षाला (आप) फक्त 22 जागा जिंकता आल्या. त्याच वेळी, काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही. 2020 च्या निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या होत्या आणि 2015 मध्ये 67 जागा जिंकल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *