DNA मराठी

Sujay Vikhe

img 20251120 wa0007

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी

Vikhe Patil – महाराष्ट्राच्या सहकार चळवळीची वाटचाल सांगताना काही नावे अनिवार्यपणे उच्चारावी लागतात. त्यांमध्ये सर्वात प्रखर ठसा उमटवलेले नाव म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. सहकार म्हणजे केवळ आर्थिक संघटना नव्हे, तो ग्रामीण समाजाचा विकासमार्ग आहे, ही भूमिका ज्या व्यक्तींनी आपल्या कामाने सिद्ध केली त्यापैकी अग्रगण्य व्यक्तिमत्त्व हेच. आज, जेव्हा त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या राष्ट्रपतींकडून गौरव मिळाला आहे, तेव्हा हा प्रवास केवळ एका घराण्याचा नाही. तर महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व, सहकार आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या सातत्याचा दस्तऐवज ठरतो. पहिली पायाभरणी- विठ्ठलराव विखे पाटील यांचे राष्ट्रपतींकडून झालेले पहिले गौरव 1950 च्या दशकात भारत स्वराज्याच्या पहिल्या श्वासांसोबत पुढे जात असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया अस्थिर होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मध्यस्थांची पकड होती, कर्जपुरवठ्याची व्यवस्था बळकट नव्हती. त्याच काळात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपच बदलले. हे केवळ एका उद्योगाची कथा नव्हती ही होती शेतकऱ्याला उद्योगाचा ‘हिस्सेदार’ बनवण्याची नवचेतना. त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना पद्मश्री देऊन गौरवताना सहकार चळवळीच्या मूलभूत मूल्यांना मान्यता दिली. आजही हा पुरस्कार केवळ सन्मान नसून भारतीय सहकाराच्या क्रांतिकारी युगाची सुरुवात मानला जातो. नवी वाटचाल बाळासाहेब विखे पाटील यांचे राष्ट्रीय योगदान सहकाराच्या घराण्यात जन्मलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारण, शिक्षण आणि सहकार या त्रिसूत्रीला वेगळा आयाम दिला. सहकार क्षेत्राचा विस्तार, शिक्षणसंस्थांची उभारणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांची प्रमुख कामगिरी. 2010 मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी दिलेला पद्मभूषण हा पुरस्कार राज्य आणि केंद्राच्या धोरणनिर्मितीत त्यांच्या प्रभावी योगदानाची दखल होता. हेही लक्षात घ्यावे लागेल की बाळासाहेब विखे यांचे कार्य केवळ सहकारपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रामीण समाजातील सामाजिक भान आणि प्रशासकीय दूरदृष्टीचा एक नमुना म्हणून ते राष्ट्रीय नेतृत्वात स्वीकारले गेले. समकालीन परंपरा – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जलव्यवस्थापन आजच्या महाराष्ट्रात सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. हवामानबदल, वाढती मागणी, सिंचनातील असमानता आणि जलसंपत्तीचे अव्यवस्थापन यांमधून मार्ग शोधताना परिणामकारक प्रशासन, वैज्ञानिक धोरणे आणि जलसाक्षरता हे तीन घटक महत्त्वाचे ठरतात. 2024 मध्ये केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून दिलेला “बेस्ट स्टेट कॅटेगरी” राष्ट्रीय पुरस्कार हा या व्यापक बदलांचा सरकारी शिक्का आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. या सन्मानाचा स्वीकार राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा पुरस्कार व्यक्तीगत कामगिरीचा नसून संपूर्ण विभागाच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पुरावा आहे, आणि विखे पाटील यांच्या नेतृत्वातील धोरणात्मक स्थिरतेचे प्रतीकही. एकाच कुटुंबाच्या तीन पिढ्या — महाराष्ट्राची सहकार परंपरा जगाच्या नकाशावर एका घराण्याच्या तीन पिढ्यांना राष्ट्रपतींकडून सन्मान मिळणे, हे अपवादात्मक आहे. पण या सन्मानांमागे घराणेशाही नसून सातत्यपूर्ण समाजकार्य, सहकार विचारांची परंपरा आणि ग्रामीण विकासाचे अधिष्ठान आहे. डॉ. विठ्ठलराव – सहकाराची क्रांती बाळासाहेब – सहकार + शिक्षण + राजकीय नेतृत्व राधाकृष्ण – आधुनिक प्रशासन, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित धोरण ही परंपरा एका घराण्यापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण समाजशास्त्राचा आराखडा ठरते. विखे पाटील कुटुंबाच्या तीन पिढ्या हे सिद्ध करतात की विकास हा योगायोग नसतो तो दृष्टिकोन, कष्ट आणि मूल्ये यांची सलग परंपरा असते. आज जेव्हा महाराष्ट्र जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान मिळवतो, तेव्हा या परंपरेची बाजू अजूनही मजबूत असल्याचे दिसते. राजकीय मतभेद असोत वा सहकारातील नवनवे आव्हान महाराष्ट्राची ग्रामीण परिवर्तनाची गाथा लिहिताना विखे पाटील कुटुंबाचा उल्लेख अपरिहार्य राहणार आहे. सन्मान ही केवळ मानाची पाऊलवाट नाही तर ग्रामीण भागाचा आत्मविश्वास वाढवणारी प्रेरणा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरावी, हीच आजच्या संपादकीयाची मुळ भूमिका.

सहकाराची परंपरा, नेतृत्वाचा वारसा : राष्ट्रपतींच्या गौरवात उमटलेली विखे घराण्याची तीन पिढी Read More »

MP Sujay Vikhe

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर

Sujay Vikhe: देशात 2034 साली नवीन संविधान लागू करण्याची हालचाल सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सपकाळ यांच्या या दाव्यावर भाजपसह अनेक पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर आता या प्रकरणात नगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा विलाज केला पाहिजे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या तळाला गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. मला वाटतं, त्यांना मानसिक आरोग्य केंद्रात काही दिवस पाठवायला हवे, म्हणजे ते बरे होतील आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील,” अशा शब्दांत डॉ. विखे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. डॉ. विखे पुढे म्हणाले, “संविधानाचा विषय आता फार जुना झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. ना कुठल्याही संविधानात बदल झाला आहे, ना संविधानाला कुठलाही धक्का लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तो संविधान पृथ्वीच्या अंतापर्यंत अबाधित राहील.” सपकाळ यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळामुळे विरोधी पक्षांनी देखील या विषयावर अधिक माहितीची मागणी करत, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, भाजपने सपकाळ यांच्या आरोपांना अफवा आणि दिशाभूल करणारे असल्याचे ठामपणे सांगितले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे नवीन संविधानाच्या चर्चेने पुन्हा एकदा रंग घेतला असला, तरी प्रत्यक्षात सरकारने यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे यापुढे या विषयावर काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर Read More »

Vikhe And Lanke

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी या मृत्यूंना ‘बालहट्ट’ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, काही जणांच्या हट्टापायी या भिक्षेकरूंना आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुजय विखे म्हणाले, “जर खासदार लंके यांना माझ्याविषयी राग असेल, तर त्यांनी सरळ कोर्टात जावं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. जे काही झाले, ते सर्व न्यायालयाच्या आदेशानुसारच झाले आहे.” तसेच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “समाज आणि महिलांचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहीन. मात्र, या गोष्टीचा सध्याच्या खासदारांशी कधीच संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कुठलीही अपेक्षा नाही.” या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंना न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe: शिर्डीत दिवसा व्हीआयपी दर्शन नको – माजी खासदार सुजय विखे

Sujay Vikhe: साई मंदिरातील दर्शन व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील साई मंदिरात दिवसा व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच व्हीआयपींना केवळ पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शन दिले पाहिजे. ही व्यवस्था तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आणली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सुजय विखे म्हणतात, “साई संस्थानाने तिरुपती बालाजी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा. आम्ही म्हणतो, व्हीआयपींना फक्त पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शन द्यावे. ही व्यवस्था अमलात आणल्यास सर्वसामान्य भक्तांना दिवसभरात सोप्या प्रकारे दर्शन घेता येईल.” शिर्डी मंदिरात अनेकदा व्हीआयपी दर्शनामुळे रांगा थांबवल्या जातात आणि सामान्य भक्तांना वाट पाहावी लागते, ही समस्या सुजय विखे यांनी प्रकाशात आणली. त्यांच्या मते, व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास ते सामान्य भक्तांचा प्रवास सोपा करणार आहे. शिर्डी मंदिरामध्ये दिवसा व्हीआयपी दर्शनाचा प्रकार बंद करण्याच्या मागणीमागे मुख्य कारण म्हणजे सामान्य भक्तांना होणारा त्रास. अनेकदा व्हीआयपींच्या दर्शनामुळे रांगा थांबवल्या जातात, ज्याचा परिणाम सामान्य भक्तांच्या दर्शनावर होतो. ही समस्या सोडवण्यासाठी सुजय विखे यांनी तिरुपतीच्या धर्तीवरील व्यवस्थेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे. ही मागणी साई संस्थानातून पुढे जाणार का यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहील. त्यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्य साईभक्तांवर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.

Sujay Vikhe: शिर्डीत दिवसा व्हीआयपी दर्शन नको – माजी खासदार सुजय विखे Read More »

MP Sujay Vikhe

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe: अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी या संदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यानंतर ते लगेच कोर्टाच्या बाहेर पडतात, ज्यामुळे कायद्यातील वयाची अट कमी करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास 50 टक्के आरोपी अल्पवयीन असतात. 16 किंवा 17 वर्षाचा मुलगा खूनासारखा गंभीर गुन्हा करूनही कायद्याच्या वयाच्या अटींमुळे सुटतो. या प्रकारच्या घटनांमुळे समाजातील सुरक्षिततेची भावना खालावत आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे कायद्यातील वयाची अट. सध्याच्या कायद्यानुसार, 18 वर्षाखालील मुलांना अल्पवयीन मानले जाते आणि त्यांच्यावर सामान्य कायद्याची कारवाई लागू होत नाही. यामुळे अनेकदा अल्पवयीन गुन्हेगारांना शिक्षा न मिळाल्याने ते पुन्हा गुन्हा करण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, अल्पवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण देऊन त्यांना गुन्ह्याकडे वळण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तसेच, कायद्यातील वयाची अट कमी करून अल्पवयीन गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळाली पाहिजे.

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

Sujay Vikhe And Thorat

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

Sujay Vikhe:  येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. यातच आता अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मला जर संधी मिळाली तर मी विधानसभा निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना माजी खासदार सुजय विखे यांनी दिली त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातसह राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर किंवा संगमनेरमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवल्याने सुजय विखे  बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये.  माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्‍न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्‍वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्‍यास मी निश्चित निवडणूक लढविण्‍यास तयार आहे असं माध्‍यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले.  तर शिर्डी विधानसभा मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवणार असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आ.राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  विधानसभा निवडणूक लढविण्‍याच्‍या प्रश्‍नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, उत्‍तर भागामध्‍ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप क्लिष्‍ट आहे. त्‍यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्‍यात अनेकजण इच्‍छुक आहेत. त्‍यांच्‍यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्‍त  अर्ज करण्‍याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्‍याचे सुचक वक्‍तव्‍य यांनी केले.

Maharashtra Vidhansabha Election 2024 : संगमनेरमध्ये विखे विरुद्ध थोरात? सुजय विखेंकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत Read More »

IMG 20240424 WA0003

Sujay Vikhe: मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe:  पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तिसऱ्या प्रर्वाची ही वाटचाल सुरू आहे.  याच धर्तीवर मला अनु. क्र. ३ मिळाला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अनु.  क्र. ३ चे बटन दाबा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते नगरमधील एका संवाद सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ मे रोजी नगर मध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी  ठिकठिकाणी संवाद सभांचा वेग वाढविला आहे. नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे अशाच संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या मागील दोन पर्वातील केलेल्या कामामुळे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा गाढा विश्वास आहे. यामुळे त्यांची तिसऱ्या पर्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. आणि हा नियतीचा योगायोग आहे की, त्यांच्या या वाटचालीत मला संधी देण्यासाठी तीन क्रमांकाचे बटन मिळाले आहे. यामुळे आता विजयांची चिंता उरली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाच्या रथावर जिल्ह्याचा विकास साधण्याचे ध्येय मी उराशी बांधले आहे. म्हणुन तुम्ही सुद्धा या तिसऱ्या पर्वाचे साक्षिदार होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश देण्यासाठी अनु क्रं ३ चे बटण दाबावे असे त्यांनी सांगितले. सदर संवाद सभेत जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह विविध स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Sujay Vikhe: मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझा अनुक्रमांक तीन : डॉ. सुजय विखे पाटील Read More »

IMG 20240421 WA0005

Ahmednagar News: माझे विकासाचे व्हिजन क्लिअर आहे… डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:  जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार, त्यासाठी माझा आरखडा तयार असून त्यात शेतकरी, गरीब- गरजू पासून शहरी भागासाठी विविध योजना आणि नियोजन केले आहे. यामुळे येत्या पाच वर्षात अहिल्यानगरचा विकास हा सर्वासाठी एक उदारण राहणार आहे. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. ते पाथर्डी येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याचा विकास आराखडा तयार असून देशात पुन्हा मोदींचे सरकार येणार असल्याने जिल्ह्याचा विकास कुणी रोखू शकणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.  पाथर्डी जिरेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, राज्याच्या उत्पनात अहिल्यानगरचा वाटा महत्वाचा आहे. जिल्ह्यात सर्विस सेक्टर बरोबर शेतीला सुद्धा मोठा वाव आहे. कृषी-संलग्न क्षेत्रांमध्ये रोजगाराची उच्च क्षमता जिल्ह्यात असल्याचे त्यांनी  सुजय विखे यांनी सांगितले. म्हणुन कृषी-प्रक्रिया, अन्न उत्पादन आणि कृषी-पर्यटन अशा कृषी-संबंधित उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पर्यटन क्षेत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास साधता येणार आहे. यामुळे जिल्ह्यात एमआयडीसीच्या माध्यमातून देशी परदेशी गुंतवणुक आणुन जिल्ह्याची उत्पादन क्षमता कशी वाढली जाईल यावर भर देणार. त्यासाठी रस्ते, वीज, पाणी आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे.   शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात कृषी प्रयोगशाळांची निर्मीती केली जाईल. तर पशु पालन व्यवसायाला चालणा दिली जाणार आहे. शेळी- मेंढी पालणातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जातील. त्याच बरोबर जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय जोर धरत आहे. त्यातून सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातील. तसेच ट्रेडींग,रिपेरिंग, हॉटेल, अशा व्यवसायांना अनुकुल वातारण निर्माण केले जाईल. असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.  यामुळे माझे विकासाचे व्हिजन क्लिअर असून केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार असल्याने आपल्या जिल्ह्याचा कुणीच विकास रोखू शकणार नाही. यामुळे देशाच्या विकासाबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मला मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी सभेला आम. मोनिका राजळे,  राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, तालुका अध्यक्ष मृत्यंजय गर्जे, बाळासाहेब गोल्हार, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, माणिकराव बटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ahmednagar News: माझे विकासाचे व्हिजन क्लिअर आहे… डॉ. सुजय विखे Read More »

MP Sujay Vikhe

Ahmednagar News:  सुजय विखे यांचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले माझ्याकडे…

Ahmednagar News: राहुरी येथिल एका सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुजय विखे यांनी विरोधकांवर टीका करत माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेले काम दाखवा अशा परखड शब्दांत टिका केली आहे.  नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे. प्रचारात आघाडीवर असेलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थात ठिक ठिकाणी रॅली, सभा भरविल्या जात आहेत. त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवर आपण चर्चा केली असून विरोधात कोण आहे? याचा विचार केला नसून कोणावरही टिका टिप्पणी केली नाही. केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मैदानात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणात आले असून, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे, रोजगार निर्मिती करणे, महिलांचे सक्षिमिकरण करणे, जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे, सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही, त्यांचे हात भष्ट्राचाराने बरबटले आहेत. त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाले आहेत. सामान्य जतना  वैतागली असताना केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू शकतात. त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचे खुले आवाहन त्यांनी विरोधकांना दिले.  मतदार संघात सुजय विखे यांच्या प्रचार सभां लोकांची गर्दी खेचत आहेत. केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणात आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगली पसंती मिळत आहे. तरूण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

Ahmednagar News:  सुजय विखे यांचा विरोधकांवर घणाघात, म्हणाले माझ्याकडे… Read More »

IMG 20240419 WA0002

Sujay Vikhe : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही: सुजय विखे

Sujay Vikhe :  जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्‍येमध्‍ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्‍या  अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्‍हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्‍वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.   पारनेर येथे आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या निमित्‍ताने त्‍यांनी देशामध्‍ये पुन्‍हा एकदा भाजपाची सत्‍ता येणार आहे. ज्‍यांनी राम मंदिराचे दिलेले आश्‍वासन पुर्ण केले त्‍यांनाच सत्‍तेवर बसविण्‍याचा निर्धार देशातील नागरीकांनी केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  पारनेर तालुक्‍यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्‍याचा प्रयत्न झाला. मागील साडेचार वर्षात ज्‍या गोष्‍टी तालुक्‍यात घडल्‍या त्‍यातून युवकांची हेळसांडच झाली. सर्वसामान्‍य लोकांमध्‍ये निर्माण झाली. खदखद आणि झालेला त्रास बाहेर येवू लागला आहे. विजय औटींसारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्‍यासाठी पुढे आला, याचा मोठा आधार पारनेरच्‍या जनतेला मिळाला असल्‍याचे खा.विखे पाटील म्‍हणाले.    तालुक्‍यात काय चालले आहे हे सर्वांना माहीती आहे, अन्‍याय करणा-या घटना सातत्‍याने घडत आहेत. पण एक गोष्‍ट लक्षात ठेवा या शहराच्‍या पाणी योजनेसाठी येणा-या काळात आपल्‍याला काम करायचे आहे. शहराची पाणी योजना पुर्ण करण्‍याचा शब्‍द मी देत असून, मी जो शब्‍द देतो तो पुर्णच करतो अशी ग्‍वाही त्‍यांनी देतानाच, सर्व युवकांनी संयमाने राजकारण करावे, युवकांचे भविष्‍य खुप महत्‍वाचे आहे. त्‍यांच्‍यासाठी आपल्‍याला आपल्‍याला काम करायचे आहे.   रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उदिष्‍ट असून, जिल्‍ह्याच्‍या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगारची निर्मिती करण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात आला असून, व्‍यक्तिगत टिका करण्‍यापेक्षा विकासाच्‍या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्‍याची आवश्‍यकता आहे. मतदार संघातील जनता सुज्ञ असून, विकासाच्‍या  आणि विचारांच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्‍याची परंपरा या निवडणूकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यकत केली.

Sujay Vikhe : जो रामाचा नाही तो कोणाच्‍याही कामाचा नाही: सुजय विखे Read More »