DNA मराठी

PM Modi

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. नाशिक येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. या सभेत बोलताना त्यांनी वीर सावरकर यांना काँग्रेसचे युवराज संपूर्ण देशात फिरून शिव्या देतात मात्र सावरकर यांचा वारसा जपण्याचा दावा करणारे आज काँग्रेससोबत आहे. असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आमची सरकार आली तर राज्यातील शेतकऱ्यांना 12 ऐवजी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याची घोषणा देखील मोदींनी नाशिकमधून केली. तर राज्यातील अनेक विकास कामे थांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सरकार आणा असा आवाहन देखील त्यांनी केला. पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली तर राज्यात सुरु असणारी लाडकी बहिण योजना बंद होणार असा दावा देखील त्यांनी केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

PM Modi : शेतकऱ्यांना 15 हजार रुपये मिळणार, नाशिकमधून नरेंद्र मोदींची मोठी घोषणा Read More »

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान

Parliament Winter Session 2024 : संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल आणि 20 डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. रिजिजू म्हणाले की, संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष सोहळा आयोजित केला जाईल, जो संविधान दिन म्हणून साजरा केला जाईल. रिजिजू म्हणाले, माननीय राष्ट्रपतींनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत हिवाळी अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त समितीने शेवटच्या अधिवेशनात दिलेल्या मुदतीवर टिकून राहिल्यास 29 नोव्हेंबर रोजी संसदेत अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकावर लक्षसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयकाकडे लागले आहे. या दोन मुद्द्यांवरून संसदेत बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे. वन नेशन-वन इलेक्शनच्या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाईल. विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत आणि देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने नाहीत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे. वक्फ विधेयकावरही गदारोळ होण्याची शक्यतायाशिवाय वक्फ विधेयक 2024 वर सुरू असलेला गतिरोध देखील संसदेच्या अधिवेशनात मुद्दा बनू शकतो. खरे तर वक्फ विधेयकावर गठित जेपीसी आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. यावरून विरोधी पक्ष सरकारला विरोध करत आहेत. जेपीसीच्या बैठकीत वक्फ विधेयकाबाबत अनेकदा गदारोळ झाला आहे.

Parliament Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 25 नोव्हेंबरपासून सुरुवात, ‘या’ मुद्यावर विरोधक सरकारला देणार आव्हान Read More »

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.   रविवारी टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आरएसएस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.   राहुल गांधी म्हणाले, ‘आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही मानतो की भारत हा अनेक विचारांचा देश आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रत्येकाला सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास याची पर्वा न करता त्यांना स्थान दिले पाहिजे. हा लढा आहे आणि हा लढा निवडणुकीत अधिक स्पष्ट झाला जेव्हा भारताच्या कोट्यवधी जनतेला स्पष्टपणे समजले की भारताचे पंतप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत काय म्हणाले? ते पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला जे काही सांगितले ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. निवडणुकीत लोकांना जे स्पष्टपणे समजले आणि मी पाहिले की मी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा लोकांना मी काय म्हणतो ते समजले. भाजप आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे, आमच्या भाषेवर हल्ला करत आहे, आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे, आमच्या इतिहासावर हल्ला करत आहे, असे ते सांगत होते. ‘भाजपला हे सहन होत नाही’ राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे समजले ते म्हणजे जो कोणी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे तो आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहे. म्हणूनच संसदेतील माझ्या पहिल्या भाषणात जेव्हा मी अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतीक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपला ते सहन होत नव्हते. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. ‘भाजपची भीती नाहीशी झाली’ भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिले. त्यामुळे हे मोठे यश आहे, राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नाही. लोकशाही समजून घेणाऱ्या भारतीय जनतेचे हे मोठे यश आहे, ज्यांना हे समजले आहे की आम्ही आमच्या संविधानावर हल्ला स्वीकारणार नाही. आमच्या धर्मावर, राज्यावर झालेला हल्ला आम्ही मान्य करणार नाही. भारत जोडो यात्रेवर काय म्हणाले? राहुल गांधी म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेने माझ्या कामाबद्दल विचार करण्याची पद्धतच बदलली. मी म्हणेन की राजकारणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, आमच्या लोकांकडे पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे ऐकण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या प्रवासात फक्त मीच नाही तर अनेकांचा सहभाग होता.

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल Read More »

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे

PM Modi: अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे,  असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी केले आहे. नागवडे ताई यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत, रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले, पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे Read More »

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले.जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील म्हणाले की,केलेले काम आपण जनतेत जावून सांगत आहोत.कारण वर्षानुर्षे समाजासाठी  काम करण्याची परंपरा विखे पाटील परीवाराची आहे.सुसंसकृत राजकारण आजपर्यत झाल्यामुळे जनतेचे पाठबळ सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला गेले की निवडणुकीची चर्चा होते.पण चर्चेत सहभागी होताना देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आणि नगर मधून सुजय विखे पाटील खासदार होणार एवढेच उतर देण्याचे आवाहन करून फार नकारात्मक वातावरणात जाण्याची गरज नाही.महायुतीला साथ देण्याची मतदारांची भूमिका ठाम असल्याने महायुती करीता ही निवडणूक फक्त मताधिक्यासाठी उरली असल्याचे विखे पाटील म्हणाले. समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आपण उतर शोधले आहे.दुधाचे अनुदान शेतकार्यांच्या खात्यात वर्ग झाले. अनुदानापासून कोणीही वंचित राहाणार नाही याची काळजी घेतली जाईल आशी ग्वाही देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निर्णयाची योजनांची माहीती गावात आणि आपल्या बुथवर देण्याचे आवाहन करून आपले गाव आणि बुथ याचाच विचार करा उगाच बाकीच्या  तालुक्यात काय चालले याचा  विचार  करू नका असे आवाहन खा.विखे यांनी केले. राहुरी तलुक्यातील जनता सूज्ञ आहे.विखे पाटील परीवाराला नेहमीच या तालुक्याने पाठबळ दिले.एक परीवार म्हणून या तालुक्याकडे आपण पाहातो.मागील पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा सर्वाच्या समोर आहे.निळवंडे धरणाचे पाणी देण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केला.अद्यापही काही काम बाकी आहेत ही काम महायुती सरकारच पूर्ण करणार असल्याचे विखे पाटील याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले यांनीही मार्गदर्शन केले. खा.विखे यांचे मोटार सायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले.अनेक मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या.सर्वच ठिकाणी कार्यकर्ते नागरीकांनी स्वागत केले.

PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्याची माहीती मतदारांपुढे कणखरपणे मांडा -खा.विखे पाटील Read More »

PM Modi: ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ! ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख रुपये

PM Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला अनेक योजनांची भेट आहे. त्यांनी तब्बल 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.  याच बरोबर त्यांनी ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ केला आणि काही लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पहिला हप्ता दिला. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या,  या योजनेंतर्गत राज्यातील मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.  एकनाथ शिंदे सरकारने ऑक्टोबर महिन्यात मुलींना मोठी भेट दिली होती. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लेक लाडकी योजना मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी योजने’च्या माध्यमातून  गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मानंतर ती 18 वर्षांची होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत दिली जाईल. मुलींना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लेख लाडकी योजना विशेषतः राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींसाठी आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्य सरकारकडून थेट खात्यात पैसे पाठवले जातील. पैसे कधी मिळणार? लेक लाडकी योजनेंतर्गत  सरकार मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देणार आहे. त्यानंतर जेव्हा मुलगी पहिली प्रवेश करेल तेव्हा तिला 6000 रुपये मिळतील. तिसरा हप्ता मुलगी सहाव्या इयत्तेत पोहोचल्यावर दिला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडून 7000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच, मुलगी अकरावीत पोहोचल्यावर 8000 रुपयांची मदत दिली जाईल. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर शेवटचा हप्ता मिळेल. मुलगी पूर्ण झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. योजनेचा लाभ कोणाला मिळणार? 1 एप्रिल 2023 नंतर एका कुटुंबात 1 किंवा 2 मुली किंवा 1 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. जर दुस-या प्रसूतीदरम्यान जुळी मुले जन्माला आली तर एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु ‘लेक लाडकी योजने’चा लाभ घेण्यासाठी आई किंवा वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल. 1 एप्रिल 2023 पूर्वी मुलगी किंवा मुलगा जन्माला आला असेल आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यासही या योजनेचा लाभ मिळेल. दोन्ही जुळ्या मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा लाभ दिला जाईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

PM Modi: ‘लेक लाडकी योजने’चा शुभारंभ! ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख रुपये Read More »