DNA मराठी

Manoj Jarange Patil

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले

Manoj Jarange Patil: केंद्र सरकारने आज संपूर्ण देशभरात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती, मात्र केंद्र सरकारने हा जर निर्णय घेतला असेल तर घेऊ द्या, कारण इंग्रजी जनगणना केली होती त्या नंतर जनगणना झाली नाहीच. या जनगणनेमुळे आमच्या समाजाला न्याय मिळेल, ओबीसीने जातीचे आरक्षण खाल्ले होते ते आता उघडे पडले आहे. कोणी किती खाल्ले ते समजेल. जनगणना करणे आवश्यक नाही, सरकारने बार्टी आयोगाचा शिफारसी जरी मंजूर केल्या, तरी भागते सरकारची इच्छा असेल तर नक्की करा. आमचा काही विरोध करण्याची गरज नाही, मात्र यात निष्पक्ष अधिकारी असले पाहिजे. बळजबरी नोंदी करणारे नसावे जाती वादी अधिकारी नसावे. जनगणना करतान कोणते ही जाती भेध करता कामा नाही, व आता आरक्षणाच कोठा सरकारने वाढवला पाहिजे. आयोग निवडतानी चांगले अधिकारी निवडा. असा सरकारला सल्ला देत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी करत होतो.

जनगणना करण्याची काही गरज नव्हती मात्र…, जरांगे पाटील सरकारवर भडकले Read More »

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश Read More »

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर शहरात दाखल होणार आहे.  अहमदनगर शहरात 12 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  यासाठी अखंड मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने साईमुरली लॉन येथे जिल्हास्तरीय बैठक आयोजन करण्यात आली होती.  सत्ताधारी आणि विरोधक गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. त्यांना लोकांचे भावना समजत नाही. समाजाला हे वारंवार आश्वासन देत आहे मात्र ते पाडले जात नाही. ज्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले आहे.  या रॅलीला मराठवाड्यात मोठा समर्थन मिळाला आहे तर आता आपल्या भागात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर शहरात होणाऱ्या या रॅलीत दहा लाख लोक येणार आहे. सध्या लोकांमध्ये सरकार आणि विरोधकांबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. 12 तारखेला लोकं घराला कुलूप लावून रस्त्यावर उतरणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही आरक्षण मिळवून राहणार. अशी प्रतिक्रिया डीएनए मराठीशी बोलताना गजेंद्र दांगट यांनी दिली. असा असणार रॅलीचा मार्ग  12 ऑगस्त रोजी मनोज जरांगे पाटील यांची रॅली दिल्लीगेट, कापड बाजारहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ संपणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Manoj Jarange Patil: 12 ऑगस्तला जरांगे पाटील अहमदनगर शहरात! ‘या’ मार्गाने निघणार शांतता रॅली Read More »

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाची सुरुवात केली होती मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा विचार करण्यासाठी राज्य सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. याच बरोबर त्यांनी 20 जुलैपासून सुरू असणारा उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज (24जुलै) माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. मी येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तो पर्यंत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अचानक स्थगित Read More »