DNA मराठी

Maharashtra Politics

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर

EVM Scam : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशात पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार मुंबई सायबर पोलिसांनी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने दावा केला होता की महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक होऊ शकतात. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही तक्रार खोटी आणि निराधार असल्याचे सांगून पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘शुजाने 2019 मध्येही असाच दावा केला होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येते. पार्श्वभूमी:– सय्यद शुजा हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएम हॅकिंगचे असंध्दावे करीत होता, ज्यामुळे दिल्लीत त्याविरुद्ध एफआयआर दाखल झाली होती. – यावेळी त्याच्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले होते की, ईव्हीएममधील मतदान डेटा बदलला जाऊ शकतो, परंतु निवडणूक आयोगाने (ECI) हे खंडन केले आहे. निवडणूक निकाल आणि विवाद:– **महायुती** (भाजप+शिवसेना-शिंदे+राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) यांना 288 पैकी **236 जागा** मिळाल्या आहेत. – **महाविकास आघाडी** (काँग्रेस+शिवसेना-उद्धव+राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) यांना **46 जागा** मिळाल्या आहेत. – विरोधी पक्षांच्या एका गटाकडून ईव्हीएममध्ये “घोळ” (मस्करी) होत असल्याचे आरोप केले जात आहेत, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया:ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचे ECI ने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मशीन्स वेगळ्या प्रणालीवर चालतात, त्यांना ब्ल्यूटूथ/इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते आणि प्रत्येक ईव्हीएमला VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) सोबत जोडले जाते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते. निष्कर्ष:सध्या सायबर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. निवडणूक आयोग आणि सरकार यांनी ईव्हीएम प्रणालीवरील विश्वास राखण्यासाठी पुरावे सादर केले आहेत. तथापि, विरोधकांच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर सतत चर्चा होत आहे.

EVM Scam: मोठी बातमी! ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्यावरून मुंबईत एफआयआर Read More »

Rahul Gandhi: गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान,महाराष्ट्राच्या पराभवावर CWC बैठकीत खर्गे संतापले

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का देणाऱ्या काँग्रेसने सहा महिन्यांतर्गतच हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारल्याने पुन्हा एकदा काँग्रेसच्या संघटनावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कमकुवत संघटना आणि गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचे विधान केले आहे. दोन दारुण पराभवांची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. गटबाजीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आता जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षांना कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षातील दुफळीकडे बोट दाखवत खर्गे म्हणाले की, शिस्तीचा अभाव खपवून घेतला जाऊ शकत नाही. सध्याच्या काळातील आव्हाने ओळखून जुन्या पद्धतीचा अवलंब करून निवडणूक जिंकता येणार नाही, असे ते म्हणाले. हरियाणात पक्षाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वरिष्ठ नेत्यांची एकमेकांविरोधातील भाषणबाजी आणि गटबाजी. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यातून धडा घेतला नाही आणि त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. नाव न घेता खर्गे म्हणाले की, काही नेते सतत इतर नेत्यांविरोधात वक्तव्य करतात. पक्षांतर्गत अशा गटबाजीमुळेही नुकसान होते. कार्यकर्त्यांमध्ये शिस्त लागावी यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनीही आपली जबाबदारी समजून घेणे गरजेचे आहे.

Rahul Gandhi: गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान,महाराष्ट्राच्या पराभवावर CWC बैठकीत खर्गे संतापले Read More »

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण

Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी त्यांचे मूळगावी गेल्याने महायुतीमध्ये होणाऱ्या पुढील बैठका दोन दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे जेव्हाही त्यांच्या गावी जातात तेव्हा मोठा निर्णय घेऊन परततात. संजय शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे येत्या 24 तासांत काही मोठा राजकीय निर्णय घेऊन परतणार आहेत. यावेळी त्यांनी दावा केला की शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतेही पद घेणार नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. संजय शिरसाट म्हणाले, कोणतीही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि एकनाथ शिंदे यांना विचार करण्याची वेळ आली की ते दर्यागावला प्राधान्य देतात. तिथे गेल्यावर ना त्याचा मोबाईल चालतो ना कोणी त्याच्याशी संपर्क साधू शकतो. शांतपणे विचार करून मोठा निर्णय घेऊन ते परतात. शनिवारी सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय जाहीर करू शकतात, असा दावा शिरसाट यांनी केला. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतलीयाआधी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर महायुतीचे तिन्ही नेते रात्री उशिरा मुंबईत परतले. ही बैठक सकारात्मक असल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड केली जाईल, असे सांगितले होते.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार…, शिवसेना नेत्याचा दावा, अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra CM : मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार देवेंद्र फडणवीस?

Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. मात्र सरकार स्थापन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे राजकीय चर्चानुसार महायुतीमध्ये मंत्रीपदाचा फार्मूला देखील ठरला आहे. या फॉर्मुलेनुसार भाजपला 20 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह गृहविभाग मिळावा यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप देखील गृह विभाग सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ विभाग जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे. जर शिवसेनेला गृह विभाग मिळाला नाही तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसल्याची चर्चा देखील होत आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या जागी खासदार श्रीकांत शिंदे किंवा गुलाबराव पाटील, उदय सामंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री पद देऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra CM : मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला, ‘या’ दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार देवेंद्र फडणवीस? Read More »

Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? दिल्लीत तिढा सुटला नाही, आता मुंबईत होणार निर्णय

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पाडली मात्र या बैठकीमध्ये देखील महायुतीमध्ये एक मत न झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सरकार स्थापन करण्याबाबत पुढील चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव मुंबईतच ठरवले जाईल, याबाबत बैठक होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही अडथळा नाही- शिंदेदिल्लीतील बैठक आटोपून मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट सकारात्मक होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबतची ही पहिलीच बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत आणखी एक बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होणार आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापनेत अडथळा बनणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करू, असे सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजपचा उमेदवार निवडण्याचा मार्ग मोकळा झाला. शिंदे म्हणाले, हा ‘लाडका भाऊ’ दिल्लीत आला आहे आणि ‘लाडका भाऊ’ या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे. फडणवीसांचा मार्ग मोकळा, पण भाजप जातीय समीकरणे सांभाळेलएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणांचा विचार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे भाजपमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मराठा समाजाच्या नेत्यांसाठी मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये जातीय समीकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, कारण सर्व पक्षांच्या 288 आमदारांपैकी बहुतांश मराठा समाजाचे आहेत. फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे असून ते 2014 मध्ये प्रथम मुख्यमंत्री झाले आणि नंतर 2019 मध्ये काही काळासाठी मुख्यमंत्री झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाचे पालन केल्यास फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? दिल्लीत तिढा सुटला नाही, आता मुंबईत होणार निर्णय Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, दिल्लीतून मिळाला ग्रीन सिग्नल?

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागले आहे. माहितीनुसार भाजप केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सहमती दर्शवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे आता देखील भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून सध्या ते काळजीवाहक मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्यामुळे बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याने भाजपकडून एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्री पद देण्याची तयारी आहे मात्र एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस पुढील एक-दोन दिवसात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने 131 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकले आहे.

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री, दिल्लीतून मिळाला ग्रीन सिग्नल? Read More »

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »

Maharashtra Politics: मोठी बातमी! पुन्हा एकदा रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताच पोलीस विभागातील मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काल रात्री उशिरा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत.काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागेवर संजयकुमार वर्मा यांची निवडणुक कालावधी पुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात अली होती. 30 जून 2024 रोजी शुक्ला या सेवा निवृत्त झाल्या होत्या परंतु महायुती सरकारने त्यांना पोलीस महासंचालक पदी बसवून दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! पुन्हा एकदा रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी Read More »

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार निवडणूक आयोग राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नाही. त्याच वेळी, पक्षाची मतांची टक्केवारीही खूप कमी होती, त्यामुळे निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला किमान एक विधानसभेची जागा किंवा 8 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125 जागांसाठी उमेदवार उभे केले होते, पण एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यास तो राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाईल. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मते मिळाली आहेत. पक्षाला एकूण 1,002,557 मते मिळाली. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची आत्मपरीक्षण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीतील खराब कामगिरी आणि पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते. भाजपने 132 जागा जिंकल्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश मिळवले. 149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने 132 जागा जिंकल्या. त्याचवेळी शिवसेनेने 57 तर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. त्या तुलनेत महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत भाजपची मते 26.77 टक्के होती. तर काँग्रेसला 12.4 टक्के मते मिळाली.

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण Read More »