DNA मराठी

Maharashtra Politics

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट

Maharashtra News : एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्यांबाबतची स्थिती चिंताजनक आहे. अनेक वर्षांपासून उद्योजकांनी जागेची मागणी केली असतानाही त्यांना प्लॉट मिळत नाहीत. यामध्ये अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट होत आहे. अधिकारी आणि भूखंड माफियांच्या संगनमतामुळे काही निवडक लोकांना प्लॉट मिळत आहेत, तर इतरांना आर्थिक तडजोडीच्या आधारावरच जागा मिळवावी लागते. प्लॉट शिल्लक नसल्याच्या कारणाने वेबसाईट बंद ठेवली जाते, परंतु अचानक प्लॉटचा लिलाव होणे हे अनेक प्रश्न उपस्थित करते. उद्योग मंत्री लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर उद्योजकांच्या विकासाला मोठा धक्का बसू शकतो. एमआयडीसीमध्ये अधिकाऱ्यांचे वर्चस्व आणि भूखंड माफियांची कारस्थाने थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. उद्योजकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा या गोंधळामुळे उद्योग क्षेत्रात मोठा अडथळा येऊ शकतो. अहिल्यानगर एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्नअहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांच्या मुख्य समस्यांचा सारांश खालीलप्रमाणे आहे: उद्योग मंत्र्यांनी लक्ष द्यावेउद्योग मंत्र्यांनी अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून उद्योगांचा विकास होईल. समाधान काय?

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट Read More »

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेली नाही. अशी टीका माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी राज्य सरकारवर केली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की,बीडमध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मी संसदेमध्ये सुद्धा प्रश्न आण्याचा प्रयत्न केला.आज स्वतः शरद पवार त्यांना भेटायला जाणार आहे. आरोपीचा प्रत्यक्ष रित्या सबंध आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशी प्रतिक्रया खासदार लंके यांनी केली. तसेच याला राजकीय रंग ना देता ज्याचा प्रत्यक्ष सबंध आहे त्यांच्यावर करवाई झाली पाहिजे आणि प्रत्येकाची हीच मागणी आहे. अशी मागणी देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी एक की दोन?आमचे नेते जी भूमिका घेतील ती आमची भूमिका असेलसुप्रिया सुळे ज्यांच्या बाजूने असतील त्यांच्या बाजूने आम्ही असू. निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्या तेव्हा सोडून द्यायच्या असतात. असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळतर राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळाला पाहिजे होता असं देखील ते म्हणाले. धडाडीचे नेते आहेत भुजबळ. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे होती. भुजबळ यांना चांगल खात मिळायला पाहिजे होत. ते एक ताकदीचे नेते आहेत. स्पष्ट वक्ता आहेत भुजबळ जे पोटात ते ओठात. असेही निलेश लंके म्हणाले. तसेच भुजबळ आमच्या पक्षात आलेच तर स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी दिली.

Nilesh Lanke: बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी… खासदार लंकेंची सरकारवर टीका Read More »

Shrigonda Police: सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

Shrigonda Police: श्रीगोंदा पोलिसांनी मोठी कारवाई करत मांडवगण येथील सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत अटक केली आहे. माहितीनुसार, मांडवगण गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या आतील गाभा-यात असणारी दानपेटी चोरी झाल्याची तक्रार मंदीराचे पुजारी पोपट गणपत खराडे यांनी 16 डिसेंबर रोजी दाखल केली होती. या गुन्हेचा तपास करत असताना बाळु वसंत घोडके याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांस 05 दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावले आहे. दान पेटीमधील 17,600 रुपये किमतीची रोख रक्कम देखील आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.

Shrigonda Police: सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद Read More »

Maharashtra Politics: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या!

Maharashtra Politics: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संगमनेरकरांमध्ये प्रचंड नाराजी असून आमदार सत्यजीत तांबे यांनी याच असंतोषाचा वाचा हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात फोडली आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणं अपेक्षित असताना रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करता तो संगमनेरमधूनच नेण्यात यावा, अशी आग्रही मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे. राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यात भूसंपादनही केले आहे. असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आ. तांबे म्हणाले. पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या रेल्वेमार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. या निर्णयामुळे संगमनेरकरांचं मोठं नुकसान होणार असून जनतेत प्रचंड रोषाचं वातावरण तयार झाले आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या याआधीच धावत आहेत. नाशिक-शिर्डी एकमेकांशी जोडलेले आहेत. मात्र संगमनेर अद्याप रेल्वेच्या नकाशावर नाही. त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग आहे. परिणामी राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आ. तांबे यांनी केली आहे. आ. तांबेंनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घेतली होती भेटनाशिक-पुणे सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला विलंब होत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी कोणी करायची मागणी भेटीत केली होती. 25 ते 30 टक्के भूसंपादन प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. अशा वेळी प्रकल्पात बदल करणे घातक आहे. त्यामुळे महारेलसोबत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ठेवून पूर्वी ठरल्याप्रमाणे मूळ मार्ग कायम ठेवा. ट्रेनचा मार्ग बदलून प्रकल्पाला वळसा न घालता सरळ दिशेने नेण्याची मागणी आ. तांबेंनी केली होती. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसारच अस्तित्वात यावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत या विरोधात लढा दिला पाहिजे. तरच या पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकेल. संगमनेर मधील सर्व जनतेने पुणे-नाशिक रेल्वे मार्गात बदल न करता हा मार्ग संगमनेरवरूनच न्यावा यासाठी संघर्ष करावा.

Maharashtra Politics: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातूनच न्या! Read More »

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra IMD Alert : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे त्या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तापमानात कमालीची घट झाली असून, राज्यात नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. गुरुवारपर्यंत  थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी शेकोटीच्या आधार घेतला आहे, थंडीमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये सामान्य सर्दी, फ्लू, न्यूमोनिया, हृदयाच्या आजारांचे विकार, हायपरटेंशन, हायपोथर्मिया आणि इतर श्वसन संक्रमण यांचा समावेश होतो.थंडीमुळे उद्भवू शकणार्‍या काही प्रमुख समस्या: श्वसन संक्रमण: थंडीमुळे श्वासनलिका आणि फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढते. यामुळे खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया होऊ शकतो. हृदयाच्या आजारांचे विकार: थंडीमुळे हृदयाचे ठोके वेगवान होतात आणि रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयाच्या आजारांच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हायपरटेंशन: थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये संकुचन होते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हायपोथर्मिया: शरीर तापमानात खूप कमी झाल्यास हायपोथर्मिया होऊ शकतो. हे एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. इतर समस्या: थंडीमुळे त्वचेची समस्या, स्नायूंचे दुखणे, सांध्यांची दुखणे आणि मनोवैज्ञानिक समस्या देखील उद्भवू शकतात. थंडीपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी: उबदार कपडे घाला: थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी उबदार कपडे घाला. शरीर उबदार ठेवा: गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि उबदार खाद्यपदार्थ खा. घरात उबदार वातावरण ठेवा: घरात उबदार वातावरण ठेवा. बाहेर जाण्याचे टाळा: शक्यतो थंडीत बाहेर जाण्याचे टाळा. नियमित व्यायाम करा: व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. पर्याप्त झोप घ्या: झोप पुरेशी घेणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर तुम्हाला थंडीमुळे कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या Read More »

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्या, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Politics: मुंबई | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. कापूस, सोयाबीन आणि तुरीला हमीभाव मिळावा, तसेच धानाला बोनस जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आमदारांनी शेतकऱ्यांच्या वेशात आंदोलन केले. “कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदारांनी हातात सोयाबीन व तुरीची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारच्या शेतमाल आयात-निर्यात धोरणावर टीका करताना म्हटले की, “हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे. त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही. हे अन्यायकारक आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही.” शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तत्काळ धोरणात बदल करावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारला जाग येईपर्यंत आंदोलने सुरूच राहतील, असा इशाराही दिला. या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आता सरकार या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्या, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन Read More »

Amit Shah On UCC : प्रत्येक राज्यात UCC लागू करणार, अमित शहांची मोठी घोषणा

Amit Shah On UCC : राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील प्रत्येक राज्यात समान नागरी कायदा लागू करणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शहा म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने देखील अनेक वेळा समान नागरी कायदा लागू करण्यास सांगितले आहे परंतु काँग्रेसने मुस्लिम वैयक्तिक कायद्यासह हिंदू कोड बिल आणले आहे परंतु समान नागरी कायदा आणू इच्छित नाही. यूसीसीबाबत शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाराज्यसभेत अमित शहा यांनी मुस्लिम वैयक्तिक कायद्यावरून काँग्रेसला धारेवर धरले. देशात कायदा असावा की नाही हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारत काँग्रेसने मुस्लिम वैयक्तिक कायद्यासोबत हिंदू कोड बिलही आणले. हिंदू कोड बिलामध्ये कोणताही जुना नियम नाही. त्यांनी समान कायद्याला हिंदू कोड बिल असे नाव दिले. असं अमित शहा म्हणाले. उत्तराखंडमध्ये यूसीसी आणण्याचे काम आम्हीच केले आहे. आम्ही ते इतर राज्यांमध्येही आणू. समाजात परिवर्तनासाठी कायदा आणू आणि चर्चा करून त्याची अंमलबजावणीही करू. बदलाच्या सूचनांचा विचार करून भाजप सरकार प्रत्येक राज्यात आणणार आहे. शहा म्हणाले की, आम्ही तीन फौजदारी न्याय कायदे आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे आणून फौजदारी न्याय व्यवस्थेचे भारतीयीकरण केले. देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्यासाठी कोणी काम केले असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. राज्यसभेत अमित शहा म्हणाले की, काँग्रेसने 77 वेळा, तर भाजपने केवळ 22 वेळा घटनादुरुस्ती केली. 18 जून 1951 रोजी प्रथमच संविधानात दुरुस्ती करण्यात आली. काँग्रेस पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांची वाट पहायची नसल्यामुळे घटना समितीने ही दुरुस्ती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यासाठी संविधानात कलम 19A जोडण्यात आले. असं देखील अमित शहा म्हणाले.

Amit Shah On UCC : प्रत्येक राज्यात UCC लागू करणार, अमित शहांची मोठी घोषणा Read More »

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज?

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने राज्यात सरकार स्थापन केली आहे तर 15 डिसेंबर रोजी महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र अद्याप खातेवाटप न झाल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील दोन – तीन दिवसात खातेवाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. या माहितीनुसार, खातेवाटप लांबणीवर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे खातेवाटपवर एकमत अजूनही नाही झालेले नाही त्यामुळे खातेवाटप लांबणीवर आहे. अर्थखात पाहिजे आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजप व शिवसेनाचे खातेवाटप तयार आहे. 15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 09 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Ajit Pawar : खातेवाटप लांबणीवर पडणार, अजितदादा नाराज? Read More »

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले आहे. यात 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 16 राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुढील 1-2 दिवसात खाते वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर मागच्या सरकारमध्ये असणाऱ्या उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. या नेत्यांनी घेतली शपथशिवसेना मंत्री1 गुलाबराव पाटील2 दादा भुसे3 संजय राठोड4 उदय सामंत5 शंभुराजे देसाई6 संजय शिरसाट7 प्रताप सरनाईक8 भरतशेठ गोगावले9 प्रकाश अबिटकर राज्यमंत्री10 आशिष जैस्वाल11 योगेश कदम भाजप मंत्री 1 चंद्रशेखर बावनकुळे2 राधाकृष्ण विखे पाटील3 चंद्रकांत पाटील4 गिरीश महाजन5 गणेश नाईक6 मंगलप्रभात लोढा7 जयकुमार रावल8 पंकजा मुंडे9 अतुल सावे10 अशोक उईके11 आशिष शेलार12 शिवेंद्रराजे भोसले13 जयकुमार गोरे14 संजय सावकारे15 नितेश राणे16 आकाश फुंडकर राज्यमंत्री 317 माधुरी मिसाळ18 पंकज भोयर19 मेघना बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री 1 हसन मुश्रीफ2 धनंजय मुंडे3 दत्ता भरणे4 आदिती तटकरे5 माणिकराव कोकाटे6 नरहरी झिरवाळ7 मकरंद पाटील8 बाबासाहेब पाटील राज्यमंत्री9 इंद्रणिल नाईक

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ Read More »

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करा अन्यथा…, अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Beed News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून जर आरोपींना शिक्षा झाली नाहीतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मस्साजोग ता. केज, जि. बीडचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून अतिशय निर्दयीपणे त्यांचे डोळे काढून खून करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आलेला आहे. याप्रकरणाबाबत आम्ही मागण्या करतो की, संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी. तसेच आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना व केजच्या पोलीस निरीक्षकांचे निलबंन करून त्यांना सहआरोपी करावे. हे प्रकरण सीआयडीकडे हस्तातरीत करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार श्री. शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देवून पुर्नवसन करावे. आमच्या या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाई करा अन्यथा…, अखंड मराठा समाजाचा सरकारला इशारा Read More »