DNA मराठी

Maharashtra Politics

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Birthright Citizenship: डोनाल्ड ट्रम्पला धक्का, लाखो भारतीयांना दिलासा, अमेरिकन न्यायालयाने ट्रम्पचा आदेश का रद्द केला?

Birthright Citizenship: लाखो भारतीयांसह अमेरिकेतील हजारो स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या एका संघीय न्यायालयाने गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या स्वयंचलित अधिकारावर मर्यादा घालण्याच्या कार्यकारी आदेशाला स्थगिती दिली. एका संघीय न्यायाधीशाने हा आदेश स्पष्टपणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते या निर्णयाला आव्हान देतील. चार राज्यांना आदेश दिलेरिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी नियुक्त केलेले सिएटल येथील यूएस जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी चार डेमोक्रॅटिक-नेतृत्वाखालील राज्ये – वॉशिंग्टन, अ‍ॅरिझोना, इलिनॉय आणि ओरेगॉन यांच्या विनंतीवरून तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. न्यायाधीशांनी काय युक्तिवाद केला?एचटीच्या वृत्तानुसार, बारचा एक सदस्य हा आदेश संवैधानिक आहे असे स्पष्टपणे कसे म्हणू शकतो हे मला समजत नाही. हे मला गोंधळात टाकते. तो म्हणाला, मी चार दशकांपासून बेंचवर आहे. मला असे दुसरे कोणतेही प्रकरण आठवत नाही जिथे विचारलेला प्रश्न यासारखा स्पष्ट होता. हा स्पष्टपणे असंवैधानिक आदेश आहे. 1981 मध्ये रोनाल्ड रेगन यांनी संघीय खंडपीठात नियुक्त केलेले 84 वर्षीय कफेनर यांनी डीओजेचे वकील ब्रेट शुमेट यांना विचारले की, शुमेट वैयक्तिकरित्या हा आदेश संवैधानिक मानतात का? कफेनर म्हणाले की त्यांनी तात्पुरत्या प्रतिबंधात्मक आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांचा आदेश काय आहे?डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार अमेरिकन संस्थांना अमेरिकेत जन्मलेल्या मुलांचे नागरिकत्व मान्य करण्यास नकार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जर त्यांची आई किंवा वडील दोघेही अमेरिकन नागरिक किंवा कायदेशीर स्थायी रहिवासी नसतील. ट्रम्प यांच्या आदेशानुसार, 19 फेब्रुवारीनंतर अमेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही मुलाला, ज्याचे आई आणि वडील अमेरिकन नागरिक किंवा कायदेशीर स्थायी रहिवासी नाहीत, त्यांना हद्दपार केले जाईल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा क्रमांक आणि सरकारी लाभ मिळण्यापासून बंदी घातली जाईल.

Birthright Citizenship: डोनाल्ड ट्रम्पला धक्का, लाखो भारतीयांना दिलासा, अमेरिकन न्यायालयाने ट्रम्पचा आदेश का रद्द केला? Read More »

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Siddharam Salimath : ‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत 100 दिवसांमध्ये सर्व विभागांनी मिळून किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या 7 कलमी कार्यक्रमांची ‘मिशन 100 दिवस’ उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमबजावणी करण्यात यावी. महसूल विभागामार्फत विद्यार्थी-विद्यार्थींनींना विविध प्रकारचे एक लाख दाखले देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे इतर शासकीय विभागांनीही त्यांच्या सेवा देण्याचे नियोजन करावे. प्रत्येक कार्यालय, कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. कार्यालयातील दस्तऐवज सहागठ्ठे पद्धतीनूसार ठेवण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा. भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या विकासामध्ये विभागाचे योगदान असलेल्या ब्लॉगची निर्मिती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम तयार करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गतची कामे प्राधान्याने करत नागरिकांना विहित मुदतीमध्ये सेवा देण्यात याव्यात. डॅशबोर्डवर एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जिल्ह्यात विविध विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची माहिती अभिनव पहल या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Siddharam Salimath : ‘मिशन 100 दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान 5 लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी

Walmik Karad : खंडणी प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी विष्णू चाटे च्या माध्यमातून मागितली असल्यास आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. कंपनी या प्रकरणाची तक्रार 11 डिसेंबर रोजी दिली होती. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडची एसआयटी कोठडी संपणार असल्याने बीड सत्र न्यायालयात या प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. काल 21 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. याच दिवशी वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाठेला भेटायला त्याच्या कार्यालयामध्ये गेला होता तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेझ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी देखील दिसत आहे.त्यामुळे आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मिळणार दिलासा? आज जामीन अर्जावर होणार सुनावणी Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराड येणार अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार मुलावर गुन्हा?

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विजय ठरलेल्या वाल्मिक कराडला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकते. सोलापूर न्यायालयात सुशील कराडविरुद्ध मॅनेजरच्या घरात घुसून मॅनेजर आणि मुलीला मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असून जिल्हा-सत्र न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. त्यामुळे आज या प्रकरणात न्यायालय निकाल देऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी फिर्याद दाखल करावी का? याबाबत न्यायालय आदेश देणार आहे. या आदेशाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. या प्रकरणात जर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर आधीच अडचणीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या आणखी अडचणी वाढू शकतात. तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी वाल्मिक कराडची संपत्ती सापडल्याने त्याच्यावर ईडी कारवाई करणार का? याबाबत देखील आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड येणार अडचणीत, ‘त्या’ प्रकरणात दाखल होणार मुलावर गुन्हा? Read More »

Mahayuti Government: पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद? ‘या’ जिल्ह्यांबबत सरकारने घेतला मोठा निर्णय

Mahayuti Government: शनिवारी रात्री महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज झाले आहे. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षाचे मंत्री भरत गोगावले आणि ज्येष्ठ नेते मंत्री दादा भुसे नाराज असल्याने राज्य सरकारकडून परिपत्रक काढून रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आली होती मात्र आता दोन्ही जिल्ह्याची नियुक्ती पुढील आदेशापर्यंत सरकारने स्थगित केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची आणि जालना जिल्ह्याची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

Mahayuti Government: पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद? ‘या’ जिल्ह्यांबबत सरकारने घेतला मोठा निर्णय Read More »

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले…..

Suresh Dhas: काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी एका पोलीस अधिकाऱ्याने करुणा शर्मा यांच्या गाडीत साडी नेसून पिस्तुल ठेवल्याचा दावा केला होता. पण त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्याचं नाव घेतलं नव्हतं. पण आता त्यांनी थेट अधिकाऱ्याचं नाव सांगितलं आहे. “बीडमध्ये हक्काची दहशत मोडून काढतील चुकीच्या व्यक्तीला मदत करणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. ते कधीही चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही. एलसीबीच्या 107 च्या टेबलवर प्रति आरोपी पाच हजार ते वीस हजार असा रेट सुरू असून करुणा शर्मांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचे बक्षीस म्हणजे सचिन सानप यांची एलसीबीला झालेली बदली. कोल्हापूरवरून गणेश हंगे बदलून आणला तो 107 चा टेबल आहे, सचिन आंधळे याला ही बदलून आले,” असे सुरेश धस म्हणाले. दरम्यान, सुरेश धस यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील सातत्याने करत आहे.

Suresh Dhas : करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल कोणी ठेवली? पहिल्यांदाच सुरेश धसांनी थेट नावचं घेतलं, म्हणाले….. Read More »

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..!

BJP News: शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे  दिला आहे. तुषार वैद्य यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मला शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली होती. दिलेल्या पदाचा मी पक्ष वाढीसाठी माझ्यापरीने प्रयत्न केला दरम्यानच्या काळात लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे सांगून लोकांपर्यंत पोहचवण्याच काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही. कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. नंतर मी देखील माझ्या परीने अगदी प्रामाणीकपणे पक्षनीष्टा जोपासून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले.  २०१४ विधानसभेसाठी आ. मोनिकाताईना पक्षाने संधी दिली, २०१९ ला दिली आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सौख्य राहीले नाही. आम्ही पटले नाही तरी पक्षाचा उमेदवार म्हणून काम केले परंतु स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जी.प., पं. स. तसेच ग्रामपंचायत मध्ये राजळे गटाने जुन्या भाजपाला कायम विरोध केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा या वेळी २०२४ ला विधानसभेच्या पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला म्हणजे अरुण भाऊ मुंढे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा आग्रह आम्ही म्हणजे जवळपास ८० % जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु त्याला यश आले नाही. पक्षाने मोनिकाताईंना उमेदवारी दिल्याने मागील १० वर्षाचा अनुभव पाहता आम्हाला मीळालेली वागणूक पाहता यावेळी आमच्या विचारांच्या लोकांनी मोनिकाताईचे काम करण्याची मानसीकता राहीली नव्हती. म्हणून मी व आमच्या विचारांच्या लोकांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथून मागे प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. आम्ही जरी पक्षाचा उमेदवार या नात्याने काम केले असते तरी त्यांनी ते मान्य केले नसते म्हणून शांत बसलो विधानसभेला पक्षासाठी काम केले नाही.  मी पदावर असून देखील मी या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे.  असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्षवादीसाठी यांना देखील करावे लागले संघर्ष…..!स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. त्यांना सहकार्य लाभलेल्यांमध्ये स्व. भाऊसाहेब कोल्हे, पांडुरंग लांडे, भीमराज सागडे, तानाजी मालुसरे, डॉ. सोनाजी लांडे, स्व. विष्णुपंत देहडराय, काशीनाथ चौधरी, पांडुरंग मिसाळ, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, कचरू चोथे, अरून मुंढे, विक्रम देशमुख, स्व. अंकुश केसभट, अशोकशेठ आहुजा, बंडूशेठ रासने, विजय देवळालीकर, राजाभाऊ लड्डा, छोटूशेठ लड्डा. शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोंढे, बापूसाहेब पाटेकर, नितीन काकडे, विनायक खेडकर, परशुराम गरड, स्व. सखाराम निर्मळ, गोपाळशेठ शर्मा, हरिभाऊ झुंबड, शब्बीरभाई राक्षीवाले, मारुतराव नागरे, स्व. गहीनीनाथ ढाकणे, बबनराव ढाकणे, आविनाश मगरे, पंडीतराव नेमाने, गोविंदराव बर्डे, रवी तानवडे, संजय टाकळकर, उद्धव काजळे, डॉ. मंत्री तसेच बालमटाकळी मधील अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..! Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराड अडचणीत, पुणेनंतर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती?

Walmik Karad : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड चर्चेत असून आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुणे येथे करोडो रुपयांची संपत्ती आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती तर आता दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्येही संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी X वर पोस्ट करुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव असल्याचे काही माध्यमांनी दाखवले आहे. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत क ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगल जाधव कोण आहेत? ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे. अशी मागणी या पोस्टमध्ये त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज वाल्मिक कराड जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडावर मकोका लावला आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड अडचणीत, पुणेनंतर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती? Read More »