DNA मराठी

latest update

IMG 20240930 WA0010

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »

Rain 1

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

IMD Alert Maharashtra: पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने  मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे आज मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. पोलिसांनी सर्व नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा बायपासवर 25 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता दरड कोसळल्याने परिसरात 3 तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काही विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. पावसामुळे अनेक गाड्याही थांबवाव्या लागल्याने मोठा विस्कळीत झाला. मुंबईच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे नोकरदारांचे हाल होत आहेत. पावसामुळे रुळावरून घसरलेल्या ट्रॅफिकमध्ये घरी परतणारे लोक अडकले.

IMD Alert Maharashtra: सावधान, पावसाचा रेड अलर्ट, वीज पडून 3 जणांचा मृत्यू Read More »

IPhone 15 Pro

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा

iPhone 15 Pro Discount: काही दिवसापूर्वी iPhone 16 सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही iPhone 15 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, Flipkart बिग बिलियन डेज सेलमध्ये फक्त 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आला आहे.  Apple इंटेलिजेंस फीचर्ससह सर्व नवीनतम Apple अपग्रेडसाठी डिव्हाइस तयार आहे. Flipkart Big Billion Days Sale सह, तुम्ही कमी किमतीत या फिचर्सचा फायदा घेऊ शकता. ई-कॉमर्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या सेलमध्ये 89,999 रुपयांमध्ये iPhone 15 Pro विकला जाणार आहे.   फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीझरनुसार, सेल दरम्यान फ्लिपकार्ट आयफोन 15 सीरीजच्या प्रत्येक मॉडेलवर प्रचंड सूट देईल. प्रो सोबतच, आयफोन 15 प्रो मॅक्स वर देखील सवलत जाहीर केली आहे. फ्लॅगशिप मॉडेलची किंमत 1,39,999 रुपयांवरून 1,09,900 रुपयांपर्यंत कमी झाली आहे. Flipkart ने सांगितले की iPhone 15 Pro ची किंमत 1,19,999 रुपयांवरून 99,999 रुपये करण्यात आली आहे. याचा अर्थ 10,000 रुपयांची सूट प्रत्येकासाठी लागू आहे. तथापि, पुढील 10,000 रुपयांची सूट बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरमध्ये विभागली गेली आहे. Flipkart VIP ग्राहकांना 2,000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफ मिळेल.

iPhone 15 Pro वर 20,000 रुपयांची सूट, असा घ्या फायदा Read More »

Akshay Shinde

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Akshay Shinde Encounter Case :  पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर घटनेचा मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. तर आता त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आली आहे.  रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्याचे आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूचे मुख्य कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.   रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक   अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. मंगळवारी अक्षय शिंदेचे पोस्टमॉर्टम झाला, जे सुमारे सात तास चालले आणि त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, असे डॉक्टरांनी सांगितले.  5 डॉक्टरांच्या समितीने अक्षय शिंदेचे शवविच्छेदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह अद्याप ताब्यात घेण्यात आलेला नाही. अक्षय शिंदे यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणार आहे. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबत महाराष्ट्र सरकारच्या विधानात विसंगती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ते म्हणाल्या की, ज्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला आणि हातात हातकड्या असलेला आरोपी चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्याकडून पिस्तुल कसा हिसकावू शकतो. बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, खटला संपल्यानंतर आरोपींना जाहीर फाशी द्यावी, जेणेकरून समाजात मजबूत संदेश जाईल, अशी मी मागणी केली होती.  दुसरीकडे, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर कोणालाही सोडणार नसल्याचे सांगितले होते, असा दावा एका पोलिस अधिकाऱ्याने केला. आरोपीवर गोळीबार करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले की, अक्षयच्या वागण्यावरून तो सगळ्यांना मारेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

Akshay Shinde Encounter Case : … म्हणून अक्षय शिंदेचा मृत्यू, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा Read More »

IMG 20240924 WA0004

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….! Read More »

IMG 20240924 WA0002

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत. त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.   गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर   बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या  दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्… Read More »

Akshay Shinde

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही…

Akshay Shinde :  बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झालाय. हा एन्काउंटर कसा झाला याचा माहिती आता समोर येत आहे.  सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेते होते. त्याचे पत्नीने केलेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणात हे रिमांड होते. याप्रकरणात चौकशीसाठी नेण्यात येत होते. तळोजा जेलमधून त्याला बदलापूरकडे नेण्यात येत होते. साधारण साडेसहाच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास जवळ आली. तेव्हा आरोपीने एका कॉन्स्टेबलच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये शिंदे हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरनी शिंद याला मृत घोषित केलंय. तर जखमी एपीआय निलेश मोरेंवर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून, थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरणावरून राजकारण तापणार हे नक्की.

Akshay Shinde : अक्षय शिंदेचे एन्काउंटर कसे झाले? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व काही… Read More »

Manoj Jarange Patil Photo

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद

Ahmednagar News: मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटी येथे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देखील त्यांच्या समर्थनार्थ 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत अखंड मराठा समाजाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले आहे. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून त्याचे कामकाज जोमाने सुरु ठेवावे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर अखंड मराठा समाजाकडून देण्यात आली आहे.

Ahmednagar News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा समर्थनार्थ ‘या’ दिवशी अहमदनगर जिल्हा बंद Read More »

One Nation One Election

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या

One Nation One Election :  केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता वन नेशन, वन इलेक्शनची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. वन नेशन, वन इलेक्शन लागू झाल्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? वन नेशन, वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असेल, पण प्रत्यक्षात येण्याआधी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यामध्ये आपल्या शिफारशी दिल्या आहेत.   त्रिशंकू सभागृहाच्या बाबतीत काय? वन नेशन, वन इलेक्शन लागू केले तर त्यानंतरच्या निवडणुका घेतल्या जातात. अशा परिस्थितीत लोकसभा किंवा राज्यसभेत त्रिशंकू सभागृहाची स्थिती निर्माण झाली तर काय होईल? हा प्रश्न अतिशय समर्पक आहे आणि आपण अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात तो वारंवार पाहिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशी शिफारस केली आहे की अशा परिस्थितीत त्या विधानसभा किंवा लोकसभेसाठी पुन्हा निवडणुका घेता येतील. मात्र लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक होणार आहे. अविश्वास प्रस्ताव  राज्य किंवा केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला किंवा सरकार पडले. इतर कोणताही पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकली नाही, तर तेथे पुन्हा निवडणुका घेता येतील, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.  अशा परिस्थितीत, नवीन राज्य विधानसभा किंवा लोकसभेचा कार्यकाळ हा फक्त मागील लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी असेल. उदाहरणार्थ, एखादे सरकार साडेतीन वर्षांत पडले आणि पुन्हा निवडणुकांची गरज भासली, तर पुन्हा निवडणुका नक्कीच होतील, पण नव्या सरकारचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा असेल. पंचायत निवडणुकांचे काय? त्याच्या नावाप्रमाणेच, वन नेशन, वन इलेक्शन, संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका होतील का? लोकसभा आणि विधानसभा व्यतिरिक्त यात नगरपालिका, पंचायत इत्यादींचाही समावेश असेल का? यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरुवातीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, असा प्रस्ताव दिला आहे.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांशी अशा प्रकारे जोडल्या जाव्यात की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 100 दिवसांत नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका पूर्ण होतील. मार्चमध्ये अहवाल सादर करण्यात आला होता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस अगोदर या वर्षी मार्चमध्ये वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल सरकारला सादर केला होता.

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या Read More »

Dhangar Reservation

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार

Ahmednagar News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण आरक्षण लागू व्हावे यासाठी आज  बुधवारपासून (दिनांक 18 सप्टेंबर) सात जण नेवासा फाटा येथे उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास हे सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा सकल धनगर जमातने दिला आहे.  दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत घेतलेली बैठक आम्हाला मान्य नाही व तिथे त्या बैठकीत सहभागी झालेल्या समाजाच्या शिष्टमंडळाला आमची मान्यता नाही, असे स्पष्टीकरणही सकल धनगर समाजाने दिले आहे.  धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा येथे संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केले जाणार आहे.  यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत. उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात शासनाने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही व प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी स्पष्ट केले.  या सात जणांपैकी राजू मामा तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (तालुका पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी तेरा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पन्नास दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग तागड यांनी व्यक्त केला.  दहा वर्षांपासून तेच ऐकतोय  या संदर्भात सोरमारे यांनी सांगितले की, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर वा राहुरी येथे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले व आताही आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील दहा वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय, अशी खंत व्यक्त करून सोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केले आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.  शिष्टमंडळच मान्य नाही  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई व अन्य उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होते. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही, असा दावाही सोरमारे यांनी केला.

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार Read More »