DNA मराठी

latest news

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती. या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.  ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे

PNB Bank: जर तुमचे ही पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  माहितीनुसार, PNB त्यांच्या काही ग्राहकांना नोटीस पाठवत आहे ज्यांनी बर्याच काळापासून खाते वापरले नाही. अशा परिस्थितीत पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बचत खात्याची सुरक्षितता लक्षात घेऊन पंजाब नॅशनल बँकेने हा निर्णय घेतला आहे. पीएनबीने आपल्या बचत खात्याच्या ग्राहकांना अनेक वेळा माहिती दिली आहे. PNB ही खाती बंद करू शकते तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असल्यास प्रथम त्याची स्थिती तपासा. पंजाब नॅशनल बँक या महिन्याच्या अखेरीस 30 जून 2024 पर्यंत अशी खाती बंद करणार आहे. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच, ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये शिल्लक आहेत. तो बंद करणार आहे.  अशा ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस पाठवल्यानंतर एक महिन्याने ती खाती बंद केली जातील. तुम्हाला ती खाती ॲक्टिव्ह ठेवायची असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या. अन्यथा, ही बँक खाती 1 जुलै 2024 रोजी बंद केली जातील.  PNB ने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अशा खात्यांचे KYC मिळावे असे कळवले होते. तथापि, बँकेने 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यानंतर 1 जुलैपासून ही खाती बंद करण्यात येणार आहेत. अनेक स्कॅमर अशा खात्यांचा गैरवापर करतात जे ग्राहक बर्याच काळापासून वापरत नाहीत. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी बँकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 30 एप्रिल 2024 रोजी खात्याची गणना केली जाईल. अशा ग्राहकांना बँकेने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. या खात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही तथापि, बँकेने म्हटले आहे की 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांच्या खात्यांव्यतिरिक्त PMJJBY, PMSBY, SSY, APY, DBT सारख्या विशिष्ट योजनांसाठी उघडलेली अनेक प्रकारची खाती या अंतर्गत बंद केली जाणार नाहीत. केवायसीद्वारे बँक खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकतात बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खाते निष्क्रिय झाले आणि ग्राहकांना खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर अशा ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यानंतर त्यांचे खाते सक्रिय होईल. अधिक माहितीसाठी ग्राहक बँकेला भेट देऊ शकतात.

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे Read More »

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यां‌द्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.   शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident  News: जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात रविवारी रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत.  मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार झाले तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, पंकज सुरेश तांबे, मयूर संतोष कोळी, अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते,  अमोल बबन डोंगरे,हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे.   सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Ahmednagar Accident News: एसटी बस व कारचा भिषण अपघात, तीन तरुणाचा मृत्यू Read More »

Israel Air strike on Syria: इस्रायलचा पुन्हा सीरियावर हवाई हल्ला,  12 जणांचा मृत्यू

Israel Air strike on Syria: पुन्हा एकदा इस्रायलने पहाटे सीरियावर हवाई हल्ला केला. सीरियातील अलेप्पो शहरात झालेल्या या हवाई हल्ल्यात एका लहान मुलासह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, आत्तापर्यंत ज्यांचे मृतदेह सापडले आहेत त्यांची ही आकडेवारी आहे. संख्या आणखी वाढू शकते. वृत्तानुसार, इस्रायलने या हल्ल्यात उत्तर सीरियातील अलेप्पोमधील हैयान शहरातील एका तांब्याच्या कारखान्याला लक्ष्य केले आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटनच्या विरोधी युद्ध निरीक्षण सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सने दावा केला आहे की हल्ल्यात इराण समर्थक मिलिशियाचे किमान 12 सैनिक मारले गेले. इस्रायलने या हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही वेधशाळेच्या म्हणण्यानुसार, हयान शहर सीरियन आणि परदेशी लोकांच्या बनलेल्या इराणी समर्थक गटांचे नियंत्रण आहे. तथापि, इस्रायलने या हल्ल्याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. त्याच वेळी, या अहवालात असे म्हटले आहे की सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सीरियामध्ये शेकडो हल्ले केले आहेत. ज्यामध्ये इराण समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी संघटना, इराणी प्रॉक्सी आणि इराणी लढवय्यांना शस्त्रे पुरवणारी संघटना इस्रायलचे लक्ष्य आहे.  अलेप्पो हे राज्य इस्रायलच्या सीरियाच्या विरुद्ध बाजूस आहे आणि ते इस्रायलच्या मागील हल्ल्यांपेक्षा वाईट आहे.

Israel Air strike on Syria: इस्रायलचा पुन्हा सीरियावर हवाई हल्ला,  12 जणांचा मृत्यू Read More »

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले

Maharashtra News: राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्याने राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही, पुण्याच्या अपघात प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फतच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते, यावेळी त्याच्यासोबत एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण हे समजले पाहिजे. पुण्यातील घटनेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या वकीलीचा वापर आरोपींना वाचवण्यासाठी केला. पुण्यात ड्रग्जचा अवैध धंदा जोरात सुरु आहे. पुणे व नागपूर शहरातही अवैध पबने थैमान घातले आहे. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ अवैध पब पाडावे लागले.  गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरूण पिढीला बरबाद करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी खुलासा करावा व या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांचा राजीनामा घ्यावा. नागपूर या गृहमंत्र्यांच्या शहरातही दोन मुलींनी दोन युवकांना गाडीखाली चिरडून मारले तरीही त्यांना १० तासात जामीन मिळाला. जळगावातही गाडीखाली चिरडण्यात आले व त्यातही आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न झाला. पुण्याच्या ससून हॉस्पिटमधील डॉ. तावडेने आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. ससूनमध्ये ड्रग माफिया ललित पाटीलला सर्व सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, येथून ललित पाटील पळूनही गेला होता. ससूनचे डॉक्टर तावडे यांना अधिक्षक पदासाठी नियुक्त करावे यासाठी एक मंत्री व आमदार यांनी शिफारस केली होती. तो मंत्री व आमदार कोण हे जनतेला समजले पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप सर्व क्षेत्रात वाढला असून गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. इंदापूरमध्ये तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांची अशी हिम्मत होतेच कशी, राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याला बदनाम करण्याचे पाप भाजपाने केले आहे असेही नाना पटोले म्हणाले.  अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्यास काँग्रेसचा विरोध.. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा डाव भाजपाने रचला असून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस हे होऊ देणार नाही. मनुस्मृतीत महिलांना काहीच स्थान नाही. संविधान हटवून त्या जागी मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न आहे तो कदापी यशस्वी होणार नाही. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश खपवून घेणार नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार वजाहत मिर्झा, माजी खासदार हुसेन दलवाई, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

Maharashtra News: पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न : नाना पटोले Read More »

Vastu Tips: महिला मंडळ, ‘या’ गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर येणार आर्थिक अडचण

Vastu Tips:  तुम्हाला हे माहितीच असेल की वास्तुशास्त्रात दिशांना किती महत्व देण्यात आले आहे. यामुळेच त्याचे नियम देखील स्पष्ट करण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित दिशा असते, जर ती योग्य दिशेने ठेवली तर घरात समृद्धी येते. स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हीही स्वयंपाकघरात या चुका करत असाल तर काळजी घ्या कारण त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.  स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुटलेली भांडी ठेवू नका वास्तूनुसार तुटलेली किंवा रिकामी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच तुटलेल्या भांड्यांचा ग्रहांच्या स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे तुटलेली भांडी घरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा घर असो किंवा स्वयंपाकघर, ते नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवले पाहिजे. लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात कधीही डस्टबिन ठेवू नका. स्वयंपाकघरातील कचरा दररोज फेकून द्या आणि स्वच्छ ठेवा. घरात किंवा स्वयंपाकघरात धुळीमुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मी कोपते. तुटलेले नळ दुरुस्त करा नळातून टपकणारे पाणी वास्तूमध्ये अशुभ मानले जाते. तुमच्या स्वयंपाकघरातील नळातून पाणी टपकत राहिल्यास ते त्वरित दुरुस्त करा. वास्तविक, नळातून टपकणारे पाणी हे पैशाच्या अपव्ययाचे प्रतीक आहे. यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकटही येऊ शकते. अन्न कचरा अन्नाची नासाडी करणे हे अशुभ लक्षण मानले जाते. शास्त्रानुसार अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. यामुळे घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे जेवढे अन्न लागेल तेवढेच शिजवावे आणि अन्नाची विनाकारण वाया घालवू नये.

Vastu Tips: महिला मंडळ, ‘या’ गोष्टी चुकूनही स्वयंपाकघरात ठेवू नका, नाहीतर येणार आर्थिक अडचण Read More »

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती

Vikhe Patil News:  प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या  तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहूल गोपीचंद पावरा, वैभव सुनिल वाघ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेन प्रशासन हादरले, ग्रामस्थांच्या मदतीने या तीन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार यांना पुढील उपचकरा करीता स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्‍त समजल्या नंतर पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनास सूचना देवून, मृत जवानांच्या कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी स्वत: पालकमंत्री विखे पाटील, मा.आ.वैभव पिचड, राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले. यासर्व मृत जवानांच्या पार्थिवावर मंत्री विखे पाटील आणि वरीष्ठ अधिका-यांनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. पोलीस पथकाने शोकधून आणि बंदूकीची सलामी देवून मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्‍यात आले. याप्रसंगी जवानाचे नातेबाईक आणि त्याच्या सहका-यांना भावना आवरणे अवघड झाले होते. यासर्वांना मंत्री विखे पाटील यांनी दिलासा दिला. यासर्व जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत करण्‍यात येणार असल्‍याची माहीती ना.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. घडलेली घटना अत्‍यंत दुर्दैवी असून, सर्व मृतदेह नातेवाईकांकडे रवाना करण्‍यात आले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. पाण्‍यामध्‍ये बुडालेल्‍या  अन्‍य दोन व्‍यक्तिंचा तपास करण्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येत असून, धरणातून पाण्‍याचा प्रवाहही आता बंद करण्‍यात आला आहे. याच कारणासाठी युवकांनी केलेल्‍या रस्‍ता रोको आंदोलनासही मंत्री ना.विखे पाटील यांनी भेट दिली. घटना घडल्‍यानंतर पाण्‍याचा प्रवाह कमी करण्‍याच्‍या सुचना आपण यापुर्वीच दिल्‍या होत्‍या परंतू आंदोलकांच्‍या  भावना लक्षात घेवून संपूर्ण प्रवाहच बंद करण्‍याच्‍या सुचना जलसंपदा विभागाला त्‍यांनी दिल्‍या.

Vikhe Patil News: मृत झालेल्या SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत मिळणार: राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती Read More »