DNA मराठी

latest news

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या 6 वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमींची संख्या 49 वर पोचली आहे. यापूर्वी 4 मृत्यू आणि 25 जखमी झाल्याची बातमी होती. बेस्ट बसची धडकमुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा ‘बेस्ट’च्या बसने सोमवारी रात्री पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडक दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की असा संशय आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) एल. बसच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने वार्डाजवळ हा अपघात झाला. बस चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मार्ग क्रमांक 332 वर बेस्ट बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना धडकली. ते म्हणाले की, यानंतर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाची बस बुद्ध कॉलनी नावाच्या निवासी सोसायटीत घुसली आणि नंतर थांबली. बस तीन महिन्यांची होतीमिळालेल्या माहितीनुसार, बसचा नोंदणी क्रमांक MH01-EM-8228 असा आहे. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना हा अपघात झाला. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12 मीटर लांबीची ही इलेक्ट्रिक बस हैदराबादस्थित ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ने बनवली आहे आणि ती बेस्टने भाडेतत्त्वावर घेतली आहे. अशा बसेसचे चालक खासगी चालक पुरवतात, अशी माहिती त्यांनी दिली. तारदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने सांगितले की, “बस फक्त तीन महिन्यांची आहे. यावर्षी 20 ऑगस्ट रोजी EVEY Trans नावाच्या कंपनीच्या नावावर नोंदणी करण्यात आली आहे.

Kurla Bus Accident: मोठी बातमी, कुर्ला बस अपघातात मृतांचा आकडा वाढला, 6 ठार, 49 जखमी Read More »

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून

Beed News : बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून हत्या करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला. संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय. सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तर मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली.

Beed News: बीड जिल्ह्यात खळबळ, अपहरण करून सरपंच पतीचा खून Read More »

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला !

Sai Tamhankar : बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी सुपरस्टार सई ताम्हणकर सध्या बॉलिवूड गजवताना दिसतेय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “अग्नी” मधून हे पुन्हा एकदा सई ने तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे. 2024 हे वर्ष सई साठी अनेक गोष्टींसाठी खास ठरलं आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हानं पेलत तिने बॉलिवुड मध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात. अग्नी मधली रुख्मिणी प्रेक्षकांना भावली तर खरंच पण बॉलिवूड मधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूड सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केलं आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाज उद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठी मधल्या अनेक कलाकारांनी अग्नी ला वाहवा दिली आहे. येणाऱ्या काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून ग्राउंड झीरो, डब्बा कार्टेल हे तिचे आगामी प्रोजेक्ट आहेत.

Sai Tamhankar : रुख्मिणीने जिंकल प्रेक्षकांचं मन, बॉलिवुडमध्ये सईच्या अभिनयाचा बोलबाला ! Read More »

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या

Maharashtra News: पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे केल्याने शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला असून फळबागांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. करंजी हे बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभरात दहा ते पंधरा हजार प्रवासी गावात ये-जा करतात. त्यामुळे गावकऱ्यांसोबत या प्रवाशांसाठीदेखील पिण्याचे पाणी आवश्यक असते. गावात फळबागांचे प्रमाणही अधिक अर्थात एकूण पिकांच्या 75 टक्के आहे. या फळबागांसाठीदेखील मुबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासोबत पाणीसाठ्यात वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेवून गावाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योनजेअंतर्गत जलसंवर्धनाची विविध कामे हाती घेतली. जलस्रोतांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आणि आवश्यक तिथे दुरूस्तीची कामे करण्यात आली. गाळ काढून परिसरातील शेतात टाकण्यात आल्याने शेतीसाठी त्याचा फायदा झाला. गावात पाणलोट विकास समितीमार्फत 4 ठिकाणी सिमेंट नाला बांध दुरुस्ती आणि 19 सामुहीक शेततलावाची कामे घेण्यात आली. याशिवाय 3 मातीनाला बांध, 8 चेक डॅम, समतल चर, संयुक्त गॅबियन, सलग समतल चर अशी 39 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर 1 कोटी 34 लाख रुपये खर्च करण्यात आले. या सर्व कामांमुळे गावातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. गावाला आता पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. एवढ्यावर समाधान न मानता जलसंधारणाची आणखी कामे घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. एकूणच गावात जलसंवर्धनाचे नवे पर्व सुरू झाले आहे. रफिक शेख, सरपंच-एरवी पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. यावर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने फळबागांना पुरेसे पाणी मिळते आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे घ्यायची आहेत.

Maharashtra News: जलसंधारण कामांमुळे करंजीतील फळबागा बहरल्या Read More »

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ

Maharashtra Cabinet: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र इतर कोणत्याही आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली नसल्याने कोणत्या पक्षाकडे किती मंत्रिपदे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 20 मंत्री केले जातील, 13 मंत्री शिवसेनेच्या शिंदे गटातून आणि 10 मंत्री राष्ट्रवादीच्या कोट्यातून केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पदाची शपथ घेतल्यानंतर येथील राज्य सचिवालय ‘मंत्रालय’ येथे आपली नवीन अधिकृत जबाबदारी स्वीकारली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘महायुती’ आघाडीच्या तीन नेत्यांनी आझाद मैदानावर एका भव्य समारंभात शपथ घेतली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योगपती आणि चित्रपट कलाकार उपस्थित होते. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्याने फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते. ‘महायुती’चे घटक पक्ष – भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून विधानसभेच्या 236 जागा आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर लगेचच ‘महायुती’च्या शिष्टमंडळाने बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक ‘मंत्रालय’ येथे पोहोचल्यावर तिन्ही नेत्यांचे कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यानंतर फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, बी.आर.आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Maharashtra Cabinet : भाजपकडून 20, शिंदे गटातून 13 तर राष्ट्रवादीकडून ‘इतके’ आमदार घेणार मंत्री पदाची शपथ Read More »

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra News: नगर शहरातील कॅफे कोर्ट गल्लीत कोतवाली पोलिसांनी अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालक व मालक यांचेवर कारवाई केली आहे. कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. द परफेक्ट कॅफे, कोर्ट गल्ली, कर्डीले डायग्नोस्टीक समोर प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधारकरुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी पंचा समक्ष पथकाने छापा टाकला. तेव्हा सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली अश्लील चाळे करताना मिळुन आले. या कारवाईत पोलिसांनी शिवप्रसाद कुमार (वय 20 वर्ष), कॅफे मॅनेजरला ताब्यात घेतला आहे. तसेच सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव, गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले. तर दुसरीकडे सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/ सतिष शिंदे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129.131 (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News: अश्लील चाळे अन् कोतवाली पोलिसांची एन्ट्री, कोर्ट गल्लीत नेमकं घडलं तरी काय? Read More »

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Bollywood News: झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात ‘सैराट फेम’ रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अपूर्वा शाळीग्राम या चित्रपटाच्या डीओपी आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. आता या जोडीने पुन्हा एकदा ‘जिजाई’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचा निर्धार केला असून हा नवीन चित्रपट लवकरच प्रकारांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदितकलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ असते. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. ‘जिजाई’ हा त्याच परंपरेचा भाग आहे.’’

Bollywood News : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू पुन्हा एकत्र, ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू : २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कडक पावले उचलली असून, मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश २९ नोव्हेंबर २०२४ पासून ते १२ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती शस्त्र, दारूगोळा, धारदार शस्त्रे, काठ्या, किंवा इतर घातक साधने बाळगू शकणार नाही. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच कोणतीही सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तथापि, धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावावर या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. याशिवाय, पोलिस अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच पूर्वपरवानगी घेतलेल्या सभा किंवा मिरवणुकांवरही बंदी लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Hit And Run : शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात 25 नोव्हेंबर संध्याकाळी सातच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 ते 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. रविंद्र रमेश कानडे (वय 32, राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर) असं मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

Hit And Run : नगर शहरात हिट अँड रन, एकाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल Read More »

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं

Prakash Ambedkar : राज्यात विधानसभेसाठी मतदाप्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये ‘काटे की टक्कर’ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सस्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आम्ही आम्हाला जर युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महायुती की महाविकास आघाडी कोणाला समर्थन देण्यात याकडे आता सर्वांचे लक्ष लागू नये. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजप विरोधात प्रचार केला होता त्यामुळे निकालानंतर वंचित बहुजन आघाडी महायुतीमध्ये प्रवेश करणार का? याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर उद्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्याच्या सोबत राहणे पसंद करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Prakash Ambedkar : महायुती की मविआ, वंचित कोणाबरोबर जाणार? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं Read More »