DNA मराठी

latest news

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द

Iran Israel War : पुन्हा एकदा मध्य आशियावर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलने शनिवारी पहाटे इराणवर हवाई हल्ले केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने इराणवर डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या लष्करी कारवाई केली असं इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पश्चिम आशियातील इराण-समर्थित अतिरेकी गट – गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह – इस्त्रायलशी आधीच युद्धात असताना या हल्ल्यांमुळे दोन कट्टर शत्रूंमधील सर्वांगीण युद्धाचा धोका वाढतो. इराणमधील लष्करी टार्गेटवर अचूक हल्ले करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराने शनिवारी सांगितले. मात्र, त्यांनी यावेळी हल्ल्यांबाबत सविस्तर माहिती दिली नाही. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी एका पूर्व रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, इराणची सत्ता आणि त्याचे समर्थक 7 ऑक्टोबरपासून इस्रायलवर वारंवार हल्ले करत आहेत. त्यात इराणच्या जमिनीवरून थेट हल्ले समाविष्ट आहेत. ते म्हणाले की, जगातील इतर सार्वभौम देशांप्रमाणे इस्रायललाही हा अधिकार आहे आणि उत्तर देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दरम्यान, इराणच्या लष्कराने शनिवारी सकाळी सांगितले की, इस्रायलने त्यांच्या इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी टार्गेटवर टार्गेट करून हल्ले केले, त्यामुळे मर्यादित नुकसान झाले. इराणच्या सशस्त्र दलाचे हे विधान सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवर वाचण्यात आले, परंतु यादरम्यान हल्ल्यात झालेल्या नुकसानीशी संबंधित कोणतीही फोटो दाखवण्यात आली नाहीत. इराणच्या सैन्याने दावा केला की त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यांमुळे होणारे नुकसान मर्यादित केले आहे.

Iran Israel War : मोठी बातमी! तणाव वाढला, इस्रायलचा इराणवर हल्ला,सर्व उड्डाणे रद्द Read More »

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. भोसरीतील सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील काही कामगार राहत होते. बिल्डरने तकलादू पद्धतीने ही पाण्याची टाकी उभारली होती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. आज सकाळी सुमारे 7 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे.मात्र या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.

Pune News : पुण्यात धक्कादायक घटना, पाण्याची टाकी कोसळूली, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू Read More »

Salman Khan : चाहत्यांना धक्का, Singham Again मध्ये दिसणार नाही भाईजान, ‘हे’ आहे कारण

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. तर आता एका वेगळ्या कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान आता सिंघम अगेनमध्ये दिसणार नाही. सलमान खान सिंघम अगेनमध्ये कॅमिओ करणार आहे. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु होती मात्र आता माहितीनुसार सिंघम अगेनमध्ये सलमान दिसणार नाही. निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर लोकांसमोर सादर केला होता. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलरही लोकांना खूप आवडला. या ट्रेलरमध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक पाहायला मिळाली. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, मुंबईतील गोल्डन टोबॅकोमध्ये एक दिवस शूटिंग होणार होते पण बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर ते लगेच रद्द करण्यात आले. रोहित शेट्टी आणि एजे देवगण यांनी एकमेकांशी बोलून निर्णय घेतला की या सर्व वादांमध्ये सलमान खानला शूट करण्यास सांगणे योग्य होणार नाही. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी देखील सलमान खानच्या कॅमिओशिवाय चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीनुसार, आता तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात कॅमिओ करणार नाही. रोहित शेट्टी आणि चित्रपटाच्या निर्मात्याने आता सलमान खानच्या गोपनीयतेचा आदर करत हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करीना कपूर आणि अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक आर्यन आणि विद्या बालनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ 1 नोव्हेंबरला या चित्रपटाची टक्कर होणार आहे.

Salman Khan : चाहत्यांना धक्का, Singham Again मध्ये दिसणार नाही भाईजान, ‘हे’ आहे कारण Read More »

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रविवारी नेवासा येथील स्ट्राँगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी  स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली. नेवासा तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सुरक्षेच्या आढावा घेऊन कामकाजाची पाहणी केली तसेच निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने सूचना दिल्या. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नेवासा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, अपर तहसीलदार पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली ‌म्हात्रे आदी उपस्थित होते.

Ahmednagar Election: जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून नेवासा स्ट्राँगरूमची पाहणी Read More »

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

Maharashtra Election: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता उमेदवार घोषणा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. नुकतंच भाजपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने पुन्हा एकदा शेवंगाव-पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना संधी दिली आहे. पक्षाने सलग तिसऱ्यांदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र दुसरीकडे या मतदारसंघातून आता गोकुळ दौंड अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा आमदार मोनिका राजळे यांना निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा नगरच्या राजकारणात वर्तवण्यात येत आहे. शेवंगाव-पाथर्डी मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट घराण्याची मक्तेदारी सत्तास्थानात असल्याचा आरोप पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी केला आहे. काही दिवसापूर्वी दौंड तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवंगाव आणि पाथर्डीत घेतलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून गोकुळ दौंड यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असे अश्वाशीत केले आहे. या अनुषंगाने दौंड यांनी भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाकडे पक्षाकडून उमेदवारी मागितलेली होती. आ. मोनिक राजळे या 2014 आणि 2019 ला सलगपणे निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे रखडल्याचा विरोधकांचा आरोप असून जनतेत असलेल्या नाराजीचा फटका त्यांना यंदा बसू शकतो अशी चर्चा केवळ नागरिकांतच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यां अंतर्गत सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारसंघात दौंड यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असतानाच दौंड यांनीही आता कोणत्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धारच केला आहे. मतदार संघ समस्यांनी ग्रासलाशेतकऱ्यांचे पाटपाण्याचे प्रश्न, विविध गावांच्या पाणी योजना, युवा वर्गाला एमआयडीसी अभावी रोजगाराचा अभाव, खराब रस्ते, विद्युत पुरवठ्यात सातत्याने अडचणी यामुळे जनता मेटाकुटीला आली असून जनतेला आता बदल हवा असून याच मुद्द्यावर आपण लक्ष केंद्रीत करत असल्याचे देखील दौंड म्हणाले.

Maharashtra Election: आमदार राजळे यांना उमेदवारी जाहीर पण अडचणी वाढणार, अपक्ष म्हणून दौंड विधानसभेच्या रिंगणात उतरणार? Read More »

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा

Maharashtra News: काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड संघटनेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी मराठा समाजातील 11 हून अधिक लोकांवर वेगवेगळ्या प्रसंगी खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा खुलासा केला होता. यानंतर प्रविणा मोरजकरांनी दाखल केलेले खोटे ॲट्रॉसिटीचे पुरावे देखील समोर आले होते. कुर्ल्यातील नेहरू नगर पोलीस स्टेशन मध्ये दोन मराठा समाजातील लोकांवर टाकलेल्या खोट्या ॲट्रॉसिटीचे गुन्हे एफ.आय.आर. स्वरूपात समोर आल्यानंतर मोरजकरांचे मराठा समाजाला दिलेले आव्हान संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रविणा मोरजकरांच्या विरोधात स्थानिक मराठा समाजाने आणि अनेक मराठा संघटनांनी एकत्र येत कुर्ल्यातील मोक्याच्या परिसरात मोरजकर मराठा विरोधी असल्याचे बॅनर झळकवले. ज्यामुळे मोरजकरांच्या विरोधात असलेला प्रचंड रोष आणि माध्यमांतून जाहीर करण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर मराठा समाज धगधगताना दिसला.   संभाजी ब्रिगेड संघटना ही ठाकरेंच्या शिवसेनेसह युतीत आहे, परंतु मराठा समाजाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा आणि माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांच्या विरोधात काम करण्याचा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे. स्थानिक मराठा समाजासह इतर मराठा संघटनांनी बॅनरबाजीकरून आपला विरोध या आधीचं मोठ्या प्रमाणात दर्शवला आहे, मात्र जर मोरजकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर या सर्व मराठा संघटना आणि संपूर्ण मराठा समाज मोरजकर विरोधात आंदोलनात शामिल होतील आणि यावेळी बॅनरबाजीतूनच नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर निषेध करतील. असे कुर्ल्यातील वातावरण आहे.  ठाकरेंची शिवसेना ही कुर्ल्यामध्ये अत्यंत प्रभावशाली दिसून येत आहे परंतु कुर्ल्यातील स्थानिक मराठा समाज, संभाजी ब्रिगेड व इतर मराठा संघटनेने माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर विरोधात दिलेली हाक ही ठाकरेंच्या शिवसेनेला बॅक फूटला टाकणारी आहे. मराठा समाजाने प्रविणा मोरजकर विरोधात दिलेला आंदोलनाचा इशारा हा आगामी कुर्ल्यातील निवडणुकीचे वारे बदलू शकतो.

Maharashtra News: प्रविणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात मराठा संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा Read More »

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी

Manoj jarange Patil :  मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अजय बारस्कर यांनी अपशब्दचा वापर केल्याने तसेच जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवत असल्याने अजय बारस्करवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.  या निवेदनात म्हटले आहे की,  अजय बारस्करने ए. बी. पी माझा या प्रसार माध्यमाशी बोलताना  मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अर्वाच्य भाषा वापरली तसेच ज्या घटनेशी मनोज जरांगे पाटील साहेबांचा कुठलाही संबंध नसताना खोटा संबंध जोडुन बदनामी व अपमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे सकल मराठा बांधवांच्या भावना दुःखावत आहे. त्यामुळे अजय बारस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाही करावी. त्याला योग्य ती समज अथवा कार्यवाही करून आम्हाला न्याय निवुन देणेस नम्र विनंती. यावेळी गोरख दळवी, राम सातपुते, गणेका भोसले, सखाराम गुंजाळसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj jarange Patil : अजय बारस्करवर कारवाई करा.., ‘त्या’ प्रकरणात सकल मराठा समाजाची मागणी Read More »

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा

Maharashtra Nominated MLC : राज्यात आज विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणाऱ्या मात्र त्यापूर्वी आज सात आमदार शपथ घेणार आहे. ज्याचा फायदा महायुतीसह भाजपला होणार आहे.   सात नामांकित एमएलसीची नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यपाल आज या सात जणांना शपथ देणार आहे.  या सात एमएलसीमध्ये भाजपला मोठा फायदा झाला असून त्यांच्या वाट्याला जास्त जागा मिळाल्या आहेत. कोण होणार MLC? मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोटा निश्चित झाला आहे. भाजपला 3, शिवसेना शिंदे यांना 2 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांना 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील हे आमदार म्हणून शपथ घेणार आहेत, तर भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंह महाराज शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. उद्धव सरकारचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित 2020 च्या सुरुवातीला, तत्कालीन उद्धव सरकारने 12 एमएलसीचे नामनिर्देशन करण्याची फाइल राज्यपालांकडे पाठवली होती, ही फाईल तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी परत केली होती. त्यावर उद्धव गटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, त्यावर सुनावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने 14 ऑक्टोबर रोजी 7 आमदारांच्या फायली राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे पाठवल्या होत्या. ज्याला राज्यपालांनी मान्यता दिली. शपथ कधी होईल राज्यपालांनी नियुक्त केलेल्या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा आज दुपारी विधानभवनात होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शपथ देतील.

Maharashtra Nominated MLC: विधानसभेपूर्वीच 07 आमदार घेणार शपथ, भाजपला होणार बंपर फायदा Read More »

Mohan Bhagwat : … नाहीतर बांगलादेशसारखी अवस्था होणार, हिंदूंनी संघटित राहावे, विजयादशमीच्या निमित्ताने भागवतांचा संदेश

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विजयादशमी सणानिमित्त आरएसएस मुख्यालयमध्ये शस्त्रपूजन करून हिंदूंना संघटित व्हायचे आवाहन केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  मोहन भागवत यांनी संदेशात बांगलादेशपासून पाकिस्तानपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता हिंदूंना संघटित व्हावे लागेल. इस्रायल-हमास युद्धालाही त्यांनी चिंतेचे कारण म्हटले आहे. भागवत म्हणाले, लोकांच्या राष्ट्रीय चारित्र्यामुळेच देश महान बनतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने हे वर्ष महत्त्वाचे आहे. इस्रायल-हमास युद्ध चिंतेचे कारण आहे. गेल्या काही वर्षांत भारताची विश्वासार्हता वाढल्याने जगात भारत अधिक मजबूत आणि आदरणीय बनला आहे, असे प्रत्येकाला वाटते.  संघप्रमुख म्हणाले की, बांगलादेशमध्ये भारताला धोका असल्याचा संदेश पसरवला जात आहे. भारताकडून धोका असेल तर पाकिस्तानला सोबत घ्यावे, अशी चर्चा बांगलादेशात सुरू आहे. कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत, ती भारताला रोखू शकते. तर भारताने बांगलादेशच्या स्थापनेसाठी सर्व काही केले. ही चर्चा कोण आयोजित करत आहे? बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार बांगलादेशातील दंगलींमुळे हिंदू समाजावर जे अत्याचार होत होते, ते पुन्हा पुन्हा एकत्र आले आणि ते वाचले. हिंदू समाजाने संघटित राहिले पाहिजे हे समजून घेतले पाहिजे. अत्याचार सहन करणे ही दुर्बलता आहे. आपली अवस्था बांगलादेशसारखी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं देखील यावेळी ते म्हणाले.  तसेच कोलकाता येथील डॉक्टरांसोबत झालेल्या क्रूरतेचा उल्लेख करताना भागवत म्हणाले की, कोलकाता आरजी कार हॉस्पिटलमध्ये जे घडले ती लाजीरवाणी  घटना आहे.

Mohan Bhagwat : … नाहीतर बांगलादेशसारखी अवस्था होणार, हिंदूंनी संघटित राहावे, विजयादशमीच्या निमित्ताने भागवतांचा संदेश Read More »