DNA मराठी

latest news

mangalprabhat lodha

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश

Mangalprabhat Lodha : मुंबई मधील परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. यावेळी केईएम रुग्णालय आणि सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली. या वक्तव्यामुळे केईएमच्या नावाबाबत राजकीय वादाला तोंड फुटले आहे. लोढा म्हणाले, “हे नाव ब्रिटिश राजवटीचे आणि गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही इंग्रजांच्या पाऊलखुणा कायम आहेत. मुंबई महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार करावा.” कार्यक्रमात त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठीही महत्त्वाच्या सूचना केल्या. नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा केंद्र, आरोग्य स्वयंसेवकांसाठी बैठक व्यवस्था, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या माध्यमातून देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करणारे कम्युनिकेशन सेंटर उभारावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेत सक्रिय सहभागी करून घेणे, एनएसएस व एनसीसीच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांना मदत करणे, डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावर भर द्यावा. शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मरणिका तयार करावी आणि कोविडसारख्या संकटातील केईएमच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी रुग्णसेवेच्या पुढील नियोजनाची माहिती दिली. दरम्यान मंत्री लोढा यांच्या सूचनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र टीका केली. “नाव बदलल्याने संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. औषधांची कमतरता, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांची गरज किंवा रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलणे अपेक्षित होते. मात्र, यांचा व्यवसाय केवळ धर्माच्या मुद्द्यांपुरताच मर्यादित आहे. अशी भूमिका देशाला मागे घेऊन जाणारी आहे. अहमदाबादचे नाव आधी बदला,” असा उपरोधिक टोला सावंत यांनी लगावला.केईएमच्या काही डॉक्टर, माजी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही या प्रस्तावाला विरोध होत असून, नाव बदलण्यापेक्षा रुग्णालयातील सुविधा, उपकरणे आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली जात आहे. शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही चर्चा पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Mangalprabhat Lodha : KEM च्या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ उल्लेख काढा; मंत्री लोढांचे आदेश Read More »

delhi high court on abortion

Delhi High Court on Abortion : गर्भपातसाठी पत्नीची घेणार निर्णय; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Delhi High Court on Abortion : दिल्ली उच्च न्यायालयाने महिलांना गर्भपातासाठी पतीची संमती घेणे अनिवार्य नाही असल्याचा मोठा निर्णय दिला आहे. हा निर्णय एका महिलेच्या बाबतीत आला जो तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि 14 आठवड्यांची गर्भधारणा गर्भपात करू इच्छित होती. न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी दबाव आणता येत नाही. असे करणे तिच्या शरीरावरील आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन आहे. न्यायालयाने मान्य केले की यामुळे महिलेचा मानसिक त्रास वाढतो. विशेषतः जेव्हा वैवाहिक संबंधात संघर्ष असतो तेव्हा महिलेचा स्वतःचा निर्णय सर्वोपरि असतो. उच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 312 लागू होत नाही कारण महिलेने तिचा अधिकार वापरला आहे. कायदा काय म्हणतो? न्यायालयाने गर्भपात कायदा (MTP Law) चा उल्लेख केला. या कायद्यात कुठेही पतीची संमती आवश्यक नाही. गर्भपात केल्याबद्दल खटल्याला सामोरे जाण्यापासून रोखणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला महिलेने आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर केली, ज्यामध्ये असे म्हटले होते की गर्भपातासाठी निर्णय घेण्यात महिलेचा स्वावलंबन सर्वात महत्त्वाचा आहे. हा निर्णय महिलांच्या वैयक्तिक हक्कांना बळकटी देतो. पोटगी प्रकरणात दिलासा तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने पोटगीशी संबंधित दुसऱ्या एका प्रकरणातही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की ठोस पुराव्याशिवाय पत्नी कमावते किंवा स्वतःचे पालनपोषण करण्यास सक्षम आहे असे गृहीत धरणे चुकीचे आहे. केवळ पतीच्या दाव्यावर पत्नीला स्वावलंबी मानले जाऊ शकत नाही. या प्रकरणात, महिलेने फक्त 11 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. अंतरिम पोटगी ठरवताना गृहीतके नव्हे तर पुराव्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Delhi High Court on Abortion : गर्भपातसाठी पत्नीची घेणार निर्णय; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय Read More »

img 20260107 wa0041

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन

Pune Crime : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉज मध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज मराठे असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली पोलिस दलात तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या 25 वर्षाचे असताना मराठे यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील देहू याठिकाणी त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सांगली पोलिस दलात कार्यरत असल्याने त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने सुट्टी टाकली होती. त्यांना गुडघ्याच्या त्रास असल्याने ते पुणे शहरात उपचारासाठी येत असत. यंदा सुद्धा पुण्यात उपचारासाठी आलेल्या मराठे यांनी सुट्टी टाकली होती. पुण्यात आल्यावर उपचारासाठी गेल्यावर ते पुन्हा लॉजवर आले आणि त्यांनी त्यांच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळून आलेली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime: पुण्यात पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; एका लॉजमध्ये विष पिऊन संपवले जीवन Read More »

agniveer

Agniveer New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! तोपर्यंत लग्न करता येणार नाही

Agniveer New Rules : अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात पर्मनंट होण्याचा स्वप्न पाहणाऱ्या अग्नीवीरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता अग्निवीरसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार आता अग्निवीरांना लग्नासाठी अट घालण्यात आली आहे. पर्मनंट सैनिक बनण्याची इच्छा असलेले अग्निवीराला सैन्यात पर्मनंट नियुक्ती मिळेपर्यंत लग्न करू शकत नाहीत. जर अग्निवीर या प्रक्रियेदरम्यान किंवा पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेसाठी अपात्र ठरवले जाईल. तसेच असे अग्निवीर पर्मनंट सेवेसाठी अर्ज करू शकणार नाहीत किंवा निवड प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीत असा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, अग्निवीर भारतीय सैन्यात पर्मनंट सैनिक म्हणून नियुक्त झाल्यानंतरच लग्न करू शकतात. चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर, अग्निवीरांना संपूर्ण पुष्टीकरण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे चार ते सहा महिने वाट पहावी लागेल. अग्निवीर योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत भरती झालेली पहिली तुकडी आता त्यांची चार वर्षांची सेवा पूर्ण करत आहे. अग्निवीरांच्या 2022 च्या तुकडीतील सेवा कालावधी जून आणि जुलै 2026 च्या सुमारास संपेल असा अंदाज आहे. पहिल्या तुकडीमध्ये अंदाजे 20,000 तरुण होते, जे आता निवृत्त होत आहेत. या अग्निवीरांपैकी सुमारे 25 टक्के लोकांना भारतीय सैन्यात कायमस्वरूपी सैनिक होण्याची संधी मिळेल. निवड शारीरिक तंदुरुस्ती, लेखी परीक्षा आणि इतर निकषांवर आधारित असेल. निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि कामगिरीवर आधारित असेल. यशस्वी अग्निवीरांना सैन्यात पर्मनंट सेवा दिली जाईल. वृत्तांनुसार, लष्कराने असे म्हटले आहे की जर अग्निवीर या कालावधीत लग्न करत असेल तर त्यांना पर्मनंट सेवेच्या शर्यतीतून अपात्र ठरवले जाईल. अशा उमेदवाराचा अर्ज त्यांच्या पात्रतेकडे दुर्लक्ष करून स्वीकारला जाणार नाही. म्हणून, अग्निवीरांना हा नियम गांभीर्याने समजून घेण्याचा आणि त्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Agniveer New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! तोपर्यंत लग्न करता येणार नाही Read More »

suresh kalmadi

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Suresh Kalmadi  passed away  : माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं वयाच्या 82 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. त्यांनी अगदी कमी वेळेत पुण्यातील राजकारणा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरेश कलमाडी काही काळापासून ते आजाराशी झुंज देत होते. कोण होते सुरेश कलमाडी ? सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. त्यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर 1964 मध्ये हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी ते जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये दाखल झाले. 1964 ते 1972 या कालावधीत त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. राजकीय कारकिर्दीची सुरुवात करत 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या 38 व्या वर्षी, 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकत खासदार म्हणून प्रवेश केला. त्यानंतर जवळपास तीन दशके त्यांनी संसदेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2010 नंतर मात्र त्यांच्या राजकीय वाटचालीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणामुळे त्यांना मोठ्या राजकीय विरोधाला सामोरे जावे लागले तसेच सुमारे नऊ महिने कारावासही भोगावा लागला.

Suresh Kalmadi passed away : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन Read More »

mns

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर महाविकास आघाडी म्हणून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिले आहे. त्यामुळे तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता अहिल्यानगर शहरातील राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार प्रभाग क्रमांक 17 मधील मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहे. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहे.केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही उमेदवारांचा गेल्या चोवीस तासांपासून कुटुंबाशी संपर्क नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली आहे. दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भाजप आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीला उभा होता. तसेच निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ; मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब Read More »

ahilyanagar municipal corporation election

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादी शरद पवार गट 32, शिवसेना ठाकरे गट 24 आणि काँग्रेस 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असून ज्या ठिकाणी डबल एबी फॉर्म दिले गेले ते विथड्रवाल करणार येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये युतीची घोषणा झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीमधून बाहेर होण्याची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरू होती मात्र जागावाटपावरून मतभेद झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे एमआयएम आणि मनसे देखील अहिल्यानगर महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ahilyanagar Municipal Corporation Elections: अहिल्यानगर महापालिकेत महापौर कुणाचा; भाजप – राष्ट्रवादी युती तर शिवसेना स्वबळावर Read More »

gmail

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा

Gmail Update: अनेकांना दिलासा देण्यासाठी आता गुगल एक मोठा नियम बदलण्याची तयारी करत आहे.कंपनी एक नवीन फीचर आणत आहे जे वापरकर्त्यांना त्यांचा @gmail.com ईमेल ॲड्रेस बदलण्याची परवानगी देईल. पहिल्यांदाच जीमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय आतापर्यंत, गुगलने फक्त थर्ड-पार्टी ईमेल ॲड्रेसने तयार केलेल्या खात्यांसाठी ईमेल बदलण्याची परवानगी दिली होती. जीमेल ॲड्रेस असलेल्या खात्यांमध्ये हे फीचर नव्हते, परंतु गुगल सपोर्ट पेज सूचित करते की कंपनी आता जीमेल वापरकर्त्यांना त्यांचा ईमेल ॲड्रेस बदलण्याचा पर्याय देत आहे. जुने जीमेल एक उपनाम बनेल नवीन फीचर अंतर्गत, जेव्हा वापरकर्ता नवीन जीमेल ॲड्रेस निवडतो तेव्हा जुना पत्ता हटवला जाणार नाही. गुगल जुना जीमेल ॲड्रेस उपनाम म्हणून वापरेल. याचा अर्थ असा की वापरकर्ते जुन्या आणि नवीन दोन्ही ईमेल ॲड्रेससह गुगल सेवांमध्ये लॉग इन करू शकतील. इतकेच नाही तर जुन्या जीमेल ॲड्रेसवरील ईमेल पूर्वीप्रमाणेच प्राप्त होत राहतील. गुगलने स्पष्ट केले आहे की या बदलाचा फोटो, मेसेज, ईमेल आणि इतर डेटावर परिणाम होणार नाही. काही निर्बंध लागू होतील तर दुसरीकडे या वैशिष्ट्यासह काही मर्यादा देखील असणार आहे. गुगलच्या मते, ईमेल पत्ता बदलल्यानंतर, वापरकर्ते एका वर्षासाठी नवीन गुगल खाते तयार करू शकणार नाहीत. शिवाय, वापरकर्ता त्यांचा जीमेल पत्ता एकूण तीन वेळाच बदलू शकतो. सर्वांसाठी उपलब्ध नाही गुगलने असेही म्हटले आहे की हे वैशिष्ट्य अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी लाइव्ह नाही. ते हळूहळू आणले जात आहे, म्हणून काही वापरकर्त्यांना थोडा जास्त वेळ वाट पहावी लागू शकते. सुरुवातीला, हा पर्याय मर्यादित संख्येच्या खात्यांवरच दिसेल. हा बदल का महत्त्वाचा? बऱ्याच वापरकर्त्यांनी वर्षांपूर्वी घाईघाईत किंवा तरुण वयात जीमेल आयडी तयार केले होते, जे आता व्यावसायिक किंवा वैयक्तिक गरजांसाठी योग्य वाटत नाही. म्हणूनच, गुगलच्या या हालचालीमुळे वापरकर्त्यांना नवीन खाते तयार न करता त्यांची डिजिटल ओळख सुधारण्याची संधी मिळेल.

Gmail च्या इतिहासात ‘हे’ पहिल्यांदाच होणार; मिळणार अनेकांना दिलासा Read More »

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Rahuri By election : भारत निवडणूक आयोगाने २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार ३ जानेवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी करणे व दोषरहित मतदार यादी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत २९ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येईल. यात कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. प्रारूप मतदार यादी ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ०१/०१/२०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व भारताचा नागरिक असलेल्या पात्र व्यक्तीस नाव नोंदणी करता येईल. नवीन नाव नोंदणीसाठी ‘नमुना नं. ६’ भरावा लागेल. याशिवाय मतदार यादीतील मयत अथवा दुबार नावे वगळण्यासाठी ‘नमुना नं. ७’, तर एका भागातून दुसऱ्या भागात नाव समाविष्ट करणे किंवा तपशीलात (नाव, वय, लिंग, फोटो इ.) दुरुस्ती करण्यासाठी ‘नमुना नं. ८’ भरता येईल. यासाठी https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ व ‘Voter Helpline App’ या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

Rahuri By election : राहुरीत होणार पोटनिवडणूक; विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी

Prajakt Tanpure : बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे शेतकऱ्यांचे प्राण धोक्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीसाठी किमान १२ तास दिवसा वीज द्यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात व विशेषतः राहुरी तालुक्यात, शहरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर सुरु झाल्याने शेतकरी, नागरिक, स्त्री शाळकरी मुले, यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात महावितरण कडून शेतकऱ्यांना दिवस व रात्री अशा दोन्ही वेळेस कधी रात्री तर कधी दिवसा अश्या शिफ्टमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. सद्या शेतीमध्ये गहू, हरभरा,ऊस तसेच इतर पिकांची लागवड सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत आहे. मात्र सर्वत्र बिबट्यांचा वाढता संचार लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने किमान १२ तास तरी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. ऊर्जा राज्यमंत्री असताना मा. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातच नव्हे तर राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी १२ तास दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करून या प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. व अडीच वर्ष राज्यमंत्री असताना त्यांनी आणि दूरदृष्टी समोर ठेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. सौर ऊर्जा प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलण्यात आली.राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघात प्रतिनिधिक स्वरूपात काही गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले त्यात तालुक्यात बाभुळगाव, आरडगाव, वांबोरी या गावात हे प्रकल्प कार्यान्वितही झाल्याने त्याभागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली त्याचबरोबर मतदारसंघात वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या, ज्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्याचा लाभ होत आहे. रात्रीच्या अंधारात शेतीकाम करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला धोका असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राण, पिके आणि शेती उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने दिवसा वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

Prajakt Tanpure : बिबट्याची दहशत…; शेतकऱ्यांसाठी तनपूरे यांची शासनाकडे महत्त्वाची मागणी Read More »