DNA मराठी

jantar mantar

raj thackeray

Raj Thackeray: सरकार मानसिक रुग्ण, रुग्णालयात भरती करण्याची गरज; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी करण्यासाठी दिलीतील जंतरमंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आंदोलन करत असून २० जुलै रोजी या मागणीसाठी त्यांच्याकडे संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्चात मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलिसांकडून लाटी चार्ज करण्यात आल्याने विरोधक आता मोदी सरकारवर जोरदार लागून करताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी देखील केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे . मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, ‘लेम डक’ प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला ! माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा. लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे ! या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !

Raj Thackeray: सरकार मानसिक रुग्ण, रुग्णालयात भरती करण्याची गरज; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi: जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; राहुल गांधी, शरद पवारांचा पाठिंबा

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी परीक्षेतील गैरव्यवहार हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषय असल्याचे सांगितले. शरद पवार म्हणाले की, देशातील स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. पेपरफुटी किंवा गैरप्रकारांमुळे मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी त्यांनी मागणी केली. आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यांनी सरकारवर टीका करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या करिअरवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. जंतरमंतरवरील आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे देशभरातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Rahul Gandhi: जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; राहुल गांधी, शरद पवारांचा पाठिंबा Read More »

cjp protest

CJP Protest : जंतर मंतरवर लाठीचार्ज; कॉक्रोज पार्टीच्या मोर्च्यात नेमकं काय घडलं?

CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतर येथे संसद मार्चसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर सोमवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी निष्पक्ष चौकशी, जबाबदारांवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागण्यांसाठी विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलन करत होते. आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून काहींना ताब्यात घेण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, वारंवार होणाऱ्या परीक्षा गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हस्तक्षेप करावा लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यार्थी संघटनांनी सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा देशभर आंदोलनाचा विस्तार केला जाईल, असा इशारा दिला आहे.

CJP Protest : जंतर मंतरवर लाठीचार्ज; कॉक्रोज पार्टीच्या मोर्च्यात नेमकं काय घडलं? Read More »

kunal kamra

Kunal Kamra : कुणाल कामराच्या “सीता के पती का नाम लेकर……” वक्तव्यारुन वाद पेटला, अडचण वाढली!

Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा हा सरकारवर टिका करण्यामुळे चर्चेत असतो. आता नीट पेपरफुटी प्रकरणामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला त्याने पाठींबा दिला आहे. या आंदोलनात सोनम वांगचुक हे उपोषनाला बसलेले असून त्यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे. कुणाल कामराने बुधवारी (15 जुलै) आंदोलनात सहभागी होऊन एक विधान केले होते, त्यामुळे तो अडचणीत आला आहे. तुम्हाला जर कोणी मोदी समर्थक भेटला किंवा भाजपचा मतदार भेटला आणि तो मोदींनी केलं ते योग्य केलं असं म्हणत असेल तर त्याच्याशी वाद घालत बसू नका, कारण तुमचा वेळ वाया जाईल. सोनम वांगचुक यांच्या रुपाने आपल्या देशातील आणखी एक गांधी येथे उपोषणाला बसले आहेत. गोडसेवादी लोकांना काही फरक पडत नाही. मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच या आंदोलनाची पहिली वीट रचली गेली असं कुणाल कामरा म्हणाला. तसेच याच भाषणात त्याने एक विधान केले, त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. “ये सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर रहे है” (भगवान रामाचे नाव घेऊन ते मुकेश अंबानींचं काम करत आहेत) असे त्याने सरकारला उद्देशून म्हटले आहे. याच वाक्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे वकिल अमिता सचदेव यांनी कुणाल कामराला नोटीस पाठवली आहे. कुणाल कामराने या भाषणाचा व्हिडिओ डिलीट करावा आणि तातडीने माफी मागावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. वकिल अमिता सचदेव यांच्यामते, कुणाल कामराने सरकारवर खुशाल टिका करावी, पण देवाचे नाव बदनाम करु नये. देवाचा अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे कुणालने जाहीरपणे माफी मागावी असे अमिता सचदेव यांनी म्हटले आहे.

Kunal Kamra : कुणाल कामराच्या “सीता के पती का नाम लेकर……” वक्तव्यारुन वाद पेटला, अडचण वाढली! Read More »