DNA मराठी

Jamkhed

sagar moholkar death

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लावणाऱ्या सागर मोहोळकराचा गोळीबारानंतर 13 दिवसांनी मृत्यू

Sagar Moholkar Death : जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. सागरला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. घटनेचा तपास पोलीस पथकाने सुरू केला व तातडीने तपासाचे चक्र फिरवले. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोहोळकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लावणाऱ्या सागर मोहोळकराचा गोळीबारानंतर 13 दिवसांनी मृत्यू Read More »

rain

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका

Rain Alert: जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर या तालुक्यांतील ओढे – नाले, नदीकाठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांतील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, महानगरपालिका अग्निशमन विभाग, तसेच नागरिकांच्या मदतीने २२७ व्यक्तींची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अहिल्यानगर (कापुरवाडी, केडगांव, भिंगार, चिचोंडी, चास), श्रीगोंदा (मांडवगण, कोळेगांव), कर्जत (मिरजगाव), जामखेड (जामखेड, खर्डा, नान्नज, नायगांव, साकत), शेवगांव (बोधेगांव, चापडगांव, मुंगी), पाथर्डी (पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, कोरडगांव, करंजी, तिसगांव, खरवंडी, अकोला) अशा मंडळांच्या गावांमध्ये ७० मिमी ते १५५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. बचावकार्याची ठळक माहिती अहिल्यानगर महानगरपालिका व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक यांनी सारोळा बद्दी, जामखेड – पाथर्डी बायपासवर पाण्यात अडकलेल्या दोन बसेसमधील ७० जणांची सुटका केली. यामध्ये तीन महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ३ जण , पिंपळगव्हाण – १, खरमाटवाडी – २५, कोरडगाव – ४५ व कोळसांगवी – १२ व्यक्तींची महसूल प्रशासन व स्थानिक नागरिकांनी सुरक्षित सुटका केली. जामखेड तालुक्यातील धनेगाव – ४ व्यक्ती, वंजारवाडी – ३०, शेवगांव तालुक्यातील खरडगांव – १२ व आखेगाव – २५ नागरिकांना पुरामधून वाचविण्यात आले. मदत, पुनवर्सन व पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक यंत्रणा लक्ष ठेवून आहे. एनडीआरएफच्या पथकास पाथर्डीतून शेवगांव तालुक्यातील वरुर येथे रवाना करण्यात आले आहे. प्रशासनाकडून पुरग्रस्त गावांत सतत संपर्क ठेवून आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

Rain Alert: पाथर्डी, शेवगांव, जामखेड व अहिल्यानगर तालुक्यात पूरपरिस्थिती; जिल्ह्यातील 227 पूरग्रस्तांची सुटका Read More »

ram shinde

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी

Ram Shinde: अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. ग्रामस्थांना संवाद साधताना शिंदे म्हणाले, “ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.” “ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Ram Shinde: तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या; राम शिंदेंनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी Read More »

चहा विक्रेत्याचा मुलगा बनला डॉक्टर – मेहनतीचे यश, जिद्दीचा विजय!

Jamkhed News : जामखेड शहरात तीस वर्षांपासून चहाचा व्यवसाय करणाऱ्या प्रकाश उर्फ बंडु ढवळे यांच्या कष्टाला आणि त्यांच्या मुलांच्या मेहनतीला आता फळ लाभले आहे. थोरल्या मुलाने एमबीबीएस पूर्ण करून डॉक्टरची पदवी मिळवली आहे, तर धाकटा मुलगा सध्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. ही यशोगाथा केवळ ढवळे कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. कष्टाळू वडिलांची कहाणीबंडु ढवळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण सोडावे लागले. पण त्यांनी कधीही हार न खाता, सहा वर्षे चहाच्या हॉटेलवर नोकरी केली. नंतर त्यांनी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. जामखेड नगर रस्त्यावरील एका वडाच्या झाडाखाली दोन बाकडे आणि काही खुर्च्या ठेवून त्यांनी चहाचे दुकान सुरू केले. त्यांच्या चहाची चव आणि प्रामाणिकपणामुळे हे दुकान लोकप्रिय झाले. ग्राहकांच्या मनात त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला आणि हे दुकान “पुढारी वड” म्हणून ओळखले जाऊ लागले. पत्नीचा साथ आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीबंडु ढवळे यांच्या पत्नी राधिका यांनी शेतीची काळजी घेतली आणि घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सतत परिश्रम केले. पण त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा प्रदीप लहानपणापासूनच होतकरू होता. त्याने शाळा-कॉलेजमध्ये उत्तम गुण मिळवले आणि नेट (NEET) परीक्षेत यश मिळवून मुंबईतील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटलमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. साडेपाच वर्षांच्या कठोर अभ्यासानंतर प्रदीपने आता डॉक्टर पदवी मिळवली आहे. धाकटा मुलगा रोहित हा सध्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मेहनत आणि संघर्षाचा विजयढवळे कुटुंबाची ही कथा सांगते की, जर माणसात इच्छाशक्ती असेल आणि तो निष्ठेने मेहनत करत असेल, तर कोणत्याही परिस्थितीत यश मिळू शकते. बंडु ढवळे यांनी चहाच्या दुकानातून मिळणाऱ्या मध्यमवर्गीय उत्पन्नातून आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या मुलांनीही वडिलांच्या संघर्षाची किंमत ओळखली आणि अभ्यासात उत्तम यश मिळवले. समाजासाठी प्रेरणाया कुटुंबाची यशोगाथा समाजातील प्रत्येक तरुणासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. ही कथा सांगते की, आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इच्छाशक्ती आणि कष्टाची आवश्यकता असते. बंडु ढवळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे की, मेहनत आणि जिद्द यांच्यामुळे कोणीही आपले स्वप्न साकार करू शकते.

चहा विक्रेत्याचा मुलगा बनला डॉक्टर – मेहनतीचे यश, जिद्दीचा विजय! Read More »

Jamkhed News : मोठी बातमी! 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अटक

Jamkhed News: 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगरने अटक केली आहे. मुजीब अब्दुलरब शेख, तलाठी, तत्कालीन नेमणूक सजा हाळगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, सध्या नेमणूक तलाठी सजा सावरगावतळ, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. माहितीनुसार, तक्रारदार यांचे वडिलांनी मौजे हाळगाव, ता. जामखेड येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर नोंद लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी 3000 रुपये रक्कमेची लाच मागणी केले. याबाबतची तक्रार 30 मे 2024 रोजी ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली. त्यानुसार 30 मे 2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचे नमूद खरेदी खताची नोंद 7/12 उताऱ्यावर लावण्याचा मोबदल्यात 10 हजार लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ हारून शेख यांनी वरील कारवाई केली आहे.

Jamkhed News : मोठी बातमी! 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठीला अटक Read More »