DNA मराठी

DNA Marathi News

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार

DGMO Rajiv Ghaiv : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा वाढत असून दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहे. 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान सैन्याचे 35 – 40 सैनिक मारले असून तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असल्याची माहिती लष्कराचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, म्हणाले की या काळात भारताने 5 शूर सैनिकही गमावले, परंतु या मोहिमेचे यश धोरणात्मक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला डीजीएमओ म्हणाले की, पाकिस्तानकडून काही एअरफील्ड आणि गोदामांवर वारंवार हवाई हल्ले होत होते, जे भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडले. 7 ते 10 मे दरम्यान, नियंत्रण रेषेवर तोफखाना आणि लहान शस्त्रांच्या गोळीबारात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांचा अंत ठरला लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर 7 आणि 8 मार्चच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. या अचूक आणि गुप्त कारवाईत, 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात अनेक उच्च दर्जाच्या लक्ष्यांचा समावेश होता. डीजीएमओ म्हणाले की, आम्ही युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारख्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे जे आयसी-814 अपहरण आणि पुलवामा बॉम्बस्फोट यासारख्या हल्ल्यांमध्ये सहभागी होते.

भारताने दिला पाकिस्तानला धक्का, 40 सैनिक मारले तर 100 हून अधिक दहशतवादी ठार Read More »

‘त्या’ हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा, नाहीतर…, विजय वडेट्टीवारांचा इशारा

Vijay Wadettiwar: तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलेवर वाघीणीने प्राण घातक हल्ला चढविला व यात तीनही महिलांचा दुर्दैवी अंत झाला. सदर घटना काल दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपवनक्षेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक 252 येथे घडली. मृतकांमध्ये कांता बुधाजी चौधरी (65) शुभांगी मनोज चौधरी (28 ) रेखा शालिक शेंडे (50) यांचा समावेश असून तीनही मृतक महिला या सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी आहेत. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेंढा माल गावात शोककळा पसरली. सदर घटनेची माहिती मिळतात क्षेत्र दौरावर असलेले विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाघ हल्यात मृत पावलेल्या तीनही महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन केले. अंत्यसंस्कार आटोपताच उपस्थित वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड तसेच उपस्थित गावकरी व वन विभाग कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून मृतकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या. व मृताच्या कुटुंबीयांना विभागाकडून देय असलेला मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश यावेळी विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. सोबतच अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये याकरिता विशेष उपाययोजना करण्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार , सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मेंडामाल कांग्रेस कमिटी शाखाध्यक्ष वामनराव कोकोडे, गुरुदासजी बोरकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार, नथूजी सोनुले प्रामुख्याने उपस्थित होते.

‘त्या’ हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा, नाहीतर…, विजय वडेट्टीवारांचा इशारा Read More »

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट

India Pakistan War: नांदेड मधील देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल. त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून अजित पवार यांनी करतानाच शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे स्पष्ट केले.

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांत्वनपर भेट Read More »

जैसलमेर-बाडमेर सीमेवर रेड अलर्ट, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले

India vs Pakistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे पाकिस्तानकडून भारताच्या सीमेलगतच्या शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात येत आहे तर दुसरीकडे भारत देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. तर आता ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटनांनंतर जैसलमेर, बारमेर, श्रीगंगानगर आणि हनुमानगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. बाडमेरच्या उत्तरलाई भागातील स्थानिकांनी सकाळी आकाशातून जळत्या वस्तू पडताना पाहिल्या. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या वस्तू मोठ्या स्फोटाने जमिनीवर पडल्या आणि त्यांचे तुकडे काही भागात आढळले. लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परिसर सुरक्षित केला आणि तपास सुरू केला. जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरमध्ये क्षेपणास्त्रे डागली जैसलमेर, बारमेर आणि बिकानेरमध्येही क्षेपणास्त्रासारख्या वस्तू पडल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, पाकिस्तानने सलग दुसऱ्या रात्री जैसलमेर आणि बारमेरमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले, परंतु भारतीय सैन्याने हवेत हे हल्ले उधळून लावले. एमबीबीएस आणि नर्सिंगच्या परीक्षा रद्द या तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पंचायत राज पोटनिवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यासोबतच, राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएस आणि नर्सिंग परीक्षाही पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राजस्थानमधील 5 विमानतळ 14 मेपर्यंत बंद हवाई क्षेत्राची सुरक्षितता लक्षात घेऊन, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, किशनगड आणि उत्तरलाई विमानतळ 14 मे पर्यंत बंद करण्यात आले आहेत. सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे, परंतु सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे.

जैसलमेर-बाडमेर सीमेवर रेड अलर्ट, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले Read More »

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय?

Virat Kohli: काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्याने याबाबत बीसीसीआयला देखील माहिती दिली आहे. भारताचा इंग्लड दौरा 20 जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोहलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयला त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे आणि आता इंग्लंड दौऱ्यात खेळण्याची त्याची शक्यता खूप कमी आहे. कोहलीच्या या निर्णयावरून बीसीसीआयमध्ये बराच गोंधळ सुरू आहे. बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या विषयावर विराट कोहलीशी बोलले आहे आणि त्याला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. मात्र कोहलीने आपले हेतू स्पष्ट केले आहेत आणि इंग्लंड दौऱ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्तीची बातमी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. यापूर्वी, दोन्ही दिग्गज फलंदाजांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, जी भारताच्या विश्वचषक विजयानंतर झाली. जर कोहलीनेही कसोटीतून निवृत्ती घेतली तर भारतीय कसोटी संघाला फलंदाजीच्या क्रमात अनुभवाची मोठी कमतरता भासेल. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि शुभमन गिल सारख्या तरुण खेळाडूंवर मोठी जबाबदारी येईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहली अपयशी ठरला 2024-25 च्या कसोटी मालिकेत कोहलीची कामगिरी निराशाजनक होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत त्याने फक्त 190 धावा केल्या. पर्थ कसोटीत शानदार शतक केल्यानंतर, उर्वरित चार सामन्यांमध्ये तो फक्त 85 धावा करू शकला. हा दौरा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. कोहलीची कसोटी कारकीर्द विराट कोहलीने आतापर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 9,230 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 30 शतके आहेत.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला धक्का, रोहित शर्मानंतर विराट कोहलीही करणार कसोटी क्रिकेटला टाटा- बाय? Read More »

चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, 5 भाविकांचा मृत्यू

Chaar Dham Yatra : उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री धामजवळ खासगी हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. भागीरथी नदीच्या काठावरील नाग मंदिराखाली हेलिकॉप्टर अचानक खाली पडल्याने हा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चारधाम यात्रा 30 एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि लाखो भाविक उत्तराखंडच्या चार धामकडे जात आहेत. हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते, ज्यात एक पायलट आणि सहा प्रवासी होते. त्या वैमानिकाचे नाव कॅप्टन रॉबिन सिंग असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित प्रवाशांची ओळख खालीलप्रमाणे झाली आहे: विनीत गुप्ता अरविंद अग्रवाल विपिन अग्रवाल पिंकी अगरवाल रश्मी किशोर जाधव त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व भाविक चारधाम यात्रेसाठी आले होते. अपघाताचे कारण काय? गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये हवामान खराब आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस, गारपीट आणि गडगडाट होत आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच अलर्ट जारी केला होता. या अपघातामागे खराब हवामान हे एक मोठे कारण असू शकते असे मानले जात आहे. बचाव कार्य सुरू अपघाताची माहिती मिळताच पोलिस, लष्कर, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी टीम, रुग्णवाहिका आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच वेळी, उर्वरित लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे चार धाम यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंना धक्का बसला आहे. जिथे एकीकडे श्रद्धा आणि श्रद्धेने प्रवास सुरू होता, तिथे आता भीती आणि दुःखाचे वातावरण आहे. हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आणि सुरक्षित मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे.

चारधाम यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, 5 भाविकांचा मृत्यू Read More »

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गळ्यात सातारी कंदी पेढाची माळ घालून वेगळ्या पद्धतीने सत्कार

Pratap Sarnaik : गेली अनेक वर्षे आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीच्या आर्थिक स्थितीवर श्वेत पत्रिका काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्या बद्दल एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सातारी कंदी पेढ्याचा हार व शिवनेरीची प्रतिकृती भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात आज “महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या”वतीने सत्कार करण्यात आला. एसटी आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून दहा हजार कोटी रुपयांचा संचित तोटा व सात हजार कोटी रुपयांची देणी थकली असून त्यातून निश्चित मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित होती. या मागणीला यश मिळाले असून एसटीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत चांगला असून गोर गरिबांची व सामान्यांची एसटी सक्षम करायची असेल तर त्यावर मार्ग काढण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचा निर्णय हा महत्वपूर्ण असून यातून अपेक्षित यश मिळून एसटीचे प्रवासी व कर्मचारी या दोघांचे प्रश्न सुटतील असा विश्वास एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला असून एसटीत सर्वात यशस्वी ठरलेल्या “शिवनेरीची” प्रतिकृती व एसटीच्या दृष्टींने पुढे सर्व काही गोड व्हावे यासाठी सातारी कंदी पेढ्याचा हार देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने मंत्री सरनाईक यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्काराला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला सात टक्के महागाई भत्ता तत्काळ देण्यात येणार असून त्या साठी अपेक्षित उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाला देण्यात येणार आहे .येत्या पाच वर्षात 25 हजार नव्या स्व मालकीच्या बसेस खरेदी करण्यात येतील. या शिवाय या पुढे भाडे तत्वावरील एकही बस घेतली जाणार नसून पाच वर्षात एसटीला चांगले दिवस येतील असा विश्वासही त्यांनी या वेळी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला. या वेळी भारतीय कर्मचारी कामगार महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, कार्याध्यक्ष विजय बोरगमवार, कोशाध्यक्ष संतोष गायकवाड,उपाध्यक्ष वसंत बोराडे, संजीव चिकुर्डेकर, दीपक जगदाळे, प्रादेशिक सचिव बालाजी ढेपे,राजेश गोपनवार, समीर डांगे, मनीष बत्तुलवार, पदाधिकारी सर्वश्री सचिन जगताप,राजेश सोलापान,मनीषा कालेशवार, संतोष भराड, संतोष भिसाडे, राजेंद्र वहाटूळे, बालाजी जाधव, अनिता वळवी, अरविंद निकम, सुधाकर कांबळे, संदीप गोसावी, सुमन ढेंबरे, धनंजय पाटील, सुगंधा हिले, विनोद दातार, जहीर खान, किशोर पाटील, सुनील घोरपडे, नवनाथ गुंड, हरीश बन्नगरे, जयंत मुळे, प्रवीण चरपे, संदीप मुळे,विष्णू म्हस्के, कमलाकर जोशी, जयश्री कंचकटले, विधी पवार, सोमनाथ पांढरे, किशोर सावंत, गजानन पूकळे,तुकाराम पुंगळे, प्रताप शेळके,आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा गळ्यात सातारी कंदी पेढाची माळ घालून वेगळ्या पद्धतीने सत्कार Read More »

बदला घेतला, पाकिस्तानला घरात घुसून दाखवली ‘लायकी’, 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला

Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी आल्यानंतर भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत होते. तर आता भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओके (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर मोठा प्रत्युत्तर हल्ला सुरू केला. या ऑपरेशनला नाव देण्यात आले – ऑपरेशन सिंदूर. भारताकडून ही कारवाई फक्त 23 मिनिटे चालली पण त्याचा परिणाम इतका झाला की दहशतवाद्यांच्या पाठीचा कणा थरथर कापू लागला. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे हा अचूक हल्ला केला आणि अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. जैश आणि लष्करच्या बालेकिल्ल्यावर थेट हल्ला या हल्ल्याचा मुख्य उद्देश भारतात दहशत पसरवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या शीर्ष दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे हा होता. भारतीय सैन्याने अचूकतेने हल्ला केलेल्या ठिकाणांमध्ये हे समाविष्ट आहे: मुरिडके भावलपूर (जिथे जैशचा प्रमुख मसूद अझहर राहतो) गुलपूर, भिंबर, चकमारू, कोटली आणि सियालकोट जवळ दहशतवादी तळ मुजफ्फराबादमध्ये दोन प्रमुख दहशतवाद्यांचे अड्डेही लक्ष्य करण्यात आले. या सर्व भागांचा वापर दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे आणि रसद तळ म्हणून केला जात होता. ‘ऑपरेशन सिंदूर’ ची खास गोष्ट म्हणजे तिन्ही दलांमध्ये प्रचंड समन्वय होता आणि ही कारवाई अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे करण्यात आली. या काळात, कोणत्याही सामान्य नागरिकाला किंवा पाकिस्तानी सैन्याला नाही तर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. दहशतवादाला त्याच्याच भाषेत उत्तर संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की ही कारवाई पूर्णपणे “केंद्रित, संतुलित आणि उत्तेजक नसलेली” होती. हे प्रकरण आणखी वाढू नये म्हणून भारताने कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला होणार नाही याची खात्री केली. त्याचा एकमेव उद्देश दहशतवाद्यांचा खात्मा करणे हा होता.

बदला घेतला, पाकिस्तानला घरात घुसून दाखवली ‘लायकी’, 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला Read More »

अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर राहुरीत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरी

Maharashtra Government: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास तसेच राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयल स्थापन करण्यास व त्यासाठीच्या आवश्यक पदांना मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्च यासाठी सुमारे 485 कोटी 8 लाख रुपयांच्या अपेक्षित खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार या महाविद्यालयाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा पुढील सात वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच महाविद्यालय व रुग्णालयाकरिता आवश्यक व सुयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर या जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थलांतरीत करण्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयल स्थापन करण्यास व त्यासाठीच्या आवश्यक पदांना देखील मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. सध्या, राहुरी येथे 4 दिवाणी न्यायालये कनिष्ठ स्तर कार्यरत आहेत. त्यापुढील स्तरावरील येथील प्रकरणे अहिल्यानगर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय येथे चालविली जातात. या न्यायालयातील चालू दिवाणी व फौजदारी प्रकरणाची संख्या अनुक्रमे 9 हजार 235 व 21 हजार 842 इतकी आहेत. राहुरी ते अहिल्यानगर न्यायालयामधील अंतर 45 किलोमीटर इतके आहे. राहुरी तालुक्याची सीमा संगमनेर तालुक्यापर्यंत लांब आहे. त्यामुळे पक्षकारांना दूर अंतरावर जावे लागते. या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित प्रकरणे, अहिल्यानगर न्यायालयापासूनचे अंतर, न्यायदान कक्षाची उपलब्धता या बाबींचा विचार करून, उच्च न्यायालयाच्या “न्यायालय स्थापना समितीने” राहुरी जि. अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक न्यायीक अधिकाऱ्याचे 1 पद, कर्मचाऱ्यांची 20 पदे व चार मनुष्यबळांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मंत्रिपरिषदेने मंजुरी दिली.

अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर राहुरीत वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाला मंजुरी Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Punyashlok Ahilyadevi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते. सूतगिरणीमुळे परिसरात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून नवीन रस्त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी 91 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू दरम्यानचा 2.700 किलोमीटर लांबीचा रस्ता साकारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने 3 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणी याच रस्त्यावर असल्याने 5.50 मीटर रुंद डांबरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती खर्चासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन Read More »