DNA मराठी

Congress

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »

mallikarjun kharge

Mallikarjun Kharge : काँग्रेस घेणार मोठा निर्णय, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे होणार ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री?

Mallikarjun Kharge : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीत डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोणत्याही किंमतीत आपले पद सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी वारंवार सांगितले आहे की ते त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेस नेत्यांचा एक गट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मागे एकत्र येत आहे आणि त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहे. खरगे हे कर्नाटकातील एक प्रमुख दलित व्यक्ती आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोक कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी दलित व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी करत आहेत. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अनेक पत्रे पोहोचली आहेत ज्यात खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटक काँग्रेसचे अधिकारी, माजी आमदार, पत्रकार, बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसह प्रभावशाली आवाजांनी खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन केले आहे. 22 नोव्हेंबर रोजी लिहिलेले पत्र 22 नोव्हेंबर रोजी लिहिलेले आणि दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या या पत्रात म्हटले आहे की नेतृत्वात दलितांचे दशकांपासून असलेले कमी प्रतिनिधित्व दुरुस्त करण्याची ही एक ऐतिहासिक संधी आहे. 1956 मध्ये कर्नाटकच्या स्थापनेपासून दलित मुख्यमंत्री नसल्याबद्दल या पत्रात दुःख व्यक्त केले आहे. त्यात म्हटले आहे की या समुदायाची काँग्रेसशी दृढ निष्ठा आहे. नेत्यांनी सांगितले की खरगे हे मुख्यमंत्रीपदासाठी एक सक्षम नेते आहेत. त्यांचा प्रचंड अनुभव, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकातील लोकांशी असलेले सखोल संबंध त्यांना यावेळी राज्याचे मार्गदर्शन करण्यासाठी योग्य उमेदवार बनवतात. दोन नेत्यांमधील मुख्य लढाई मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य लढाई सध्या शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात आहे. शिवकुमार हे राज्यात काँग्रेसला सत्तेत आणण्याचे श्रेय दिले जाणारे एक प्रसिद्ध वोक्कालिगा नेते आहेत. नागा साधूंच्या एका गटाने शनिवारी शिवकुमार यांची त्यांच्या घरी भेट घेतली, त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाची जागा घेण्याची विनंती केली. अडीच वर्षांचा फॉर्म्युला काय होता? कर्नाटक काँग्रेसमधील दीर्घकाळापासून चर्चेत असलेला “अडीच वर्षांचा फॉर्म्युला” पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, 2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सिद्धरामय्या हे पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री राहतील असे ठरले होते. आता, सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहू इच्छितात असे वृत्त आहे. या वादाबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कधीही असे म्हटले नव्हते की ते फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील. कार्यकाळात बदल होईल की नाही हे पूर्णपणे हायकमांडवर सोडले आहे. आम्ही स्वतः कोणतेही बदल करू शकत नाही. जर अशी परिस्थिती उद्भवली तर काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल.”

Mallikarjun Kharge : काँग्रेस घेणार मोठा निर्णय, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे होणार ‘या’ राज्याचे मुख्यमंत्री? Read More »

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी

Vijay Wadettiwar on Pune land Case :   पुणे मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खाजगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आला असून, शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा हा सुनियोजित कट होता.या  गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी व लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून वडेट्टीवर यांनी मागणी केली. या प्रकरणातील गंभीर बाबी म्हणजे २४ ऑक्टोबर १९७३ रोजी ही जमीन ‘वनस्पती सर्वेक्षण विभाग’ यांना वार्षिक रु. १/- भाड्याने १५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. नंतर ३१ मार्च २०३८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ३० डिसेंबर २०२४ रोजी  शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही, व्याजासह फक्त रु. ११ हजार ही रक्कम ‘जमीन धारकत्व मूल्य’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही रक्कम स्वीकारली. २० मे २०२५ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यात जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला बाजार मूल्य, स्टॅम्प ड्युटी याचा कोणताही उल्लेख नाही. सिटीसर्वे मिळकत पत्रिका उपलब्ध असतानाही, केवळ जुन्या ७/१२ उताऱ्यावर आधारित दस्त नोंदविण्यात आला. नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने शासकीय जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याचे गैरकृत्य केले. ०९ जून २०२५ रोजी तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी कोणताही तपास न करता अमेडिया कंपनीच्या मागणीनुसार BSI ला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. याच अधिकाऱ्यावर याआधी बोपोडी येथील प्रकरणात गुन्हा दाखल आहे, अस वडेट्टीवर यांनी पत्रात नमूद केले  आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा ताबा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुकूल अशी भूमिका तहसीलदाराने घेतली. वतनाच्या जमिनी हस्तांतरित करण्यासंबंधीच्या २०२१ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची पूर्वपरवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमीन धारकत्व मूल्य स्वीकारले. इलीजिबीलिटी प्रमाणपत्र न घेता, स्टॅम्प ड्युटी व मूल्यांकन नियम मोडून आणि केवळ लेटर ऑफ इन्टेन्टवर सवलत देऊन बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली. लाभार्थी  शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने खोटे कागदपत्रे आणि चुकीची ओळख वापरून शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची बाब, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली,त्यातील काही अधिकारी हेच आधीच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे नेमलेली चौकशी निष्पक्ष चौकशी करणार नाही, समिती रद्द करणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून, शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचा नियोजनबद्ध अपहार आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणमधील सर्व बेकायदेशीर व्यवहार, आदेश व विक्रीपत्रे तात्काळ रद्द करावीत. सर्व संबंधित अधिकारी आणि लाभार्थी, अमेडिया कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात केली. या प्रकरणी वडेट्टीवर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्य सचिवाना देखील पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करावी. गैरव्यवहार झालेली जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी. याच अधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या सरकारी व खाजगी जमिनी बळकावल्या आहेत, याची स्वतंत्र सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारा यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar on Pune land Case : मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवारांची मागणी Read More »

asaduddin owais

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का

Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सरकार स्थापन करणार आहे. या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपने शानदार कामगिरी करत काँग्रेस आणि आरजेडीला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सीमांचलमध्ये ओवैसी फॅक्टर पुन्हा एकदा दिसून आला आहे. 2020 मध्ये सीमांचलमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने 5 जागांवर बाजी मारली होती. तर आता या निवडणुकीत पुन्हा एकदा एमआयएमने 5 जागा जिंकले असून एका जागेवर सध्या आघाडी घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एमआयएमकडून आरजेडीकडे 6 जागांची मागणी करण्यात आली होती मात्र आरजेडी एमआयएमला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर एमआयएमकडून 24 जागांवर उमेदवार देण्यात आले होते तर या 24 पैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे तर एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने या निवडणुकी 60 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवली होती मात्र पक्षाला काही खास करता आले नाही. काँग्रेस ताज्या अपडेटनुसार 5 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे फक्त सीमांचलमधेच नाहीतर संपूर्ण बिहारमध्ये आरजेडीला मोठा फटका बसला आहे.

Bihar Election Result: सीमांचलमध्ये ‘ओवैसी फॅक्टर’ सुपरहिट; RJD ला मोठा धक्का Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतांची चोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकामध्ये मत चोरीचा आरोप केला होता. तर आता त्यांनी हरियाणामध्ये तब्बल 25 लाख मतांची चोरी झाली असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत या तरुणीने 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप Read More »

election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल

Maharashtra Local Body Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान याद्या जाहीर होणार असल्याची माहिती देखील राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तर 31 ऑक्टोबरच्या मतदान यादीनुसार मतदान होणार असं देखील आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच बरोबर 2 डिसेंबरला मतदान होणार आणि 3 डिसेंबरला निकाल येणार असल्याची माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय खर्च मर्यादा अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्ष पदासाठी- 15 लाख सदस्य-5 लाख ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 11 लाख 25 हजार ब वर्ग नगर परिषद सदस्य -3 लाख 50 हजार क वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 7 लाख 50 हजार क वर्ग नगर परिषद सदस्य – 2 लाख 50 हजार नगर पंचायत अध्यक्ष- 6 लाख नगर पंचायत सदस्य – 2 लाख 25 हजार असा असणार नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुक कार्यक्रम अधिसूचना प्रसिद्धी उमेदवारी अर्ज दाखल करणे – 10 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस – 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार – 21 नोव्हेंबर मतदान – 2 डिसेंबर मतमोजणी – 3 डिसेंबर

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल Read More »

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही

Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही. पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. १० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही Read More »

rahul gandhi on election comission

Rahul Gandhi on Election Comission : ब्लॉक, ब्लॉक, ब्लॉक … ‘मतदार चोरी’ वरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक

Rahul Gandhi on Election Comission : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतदारांचे नाव ऑनलाईन पद्धतीने डिलीट करण्याच्या आरोप केले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या अलांड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे वगळण्याच्या चौकशीला जाणीवपूर्वक थांबवले जात असल्याचा देखील आरोप केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पारदर्शकता टाळत आहे आणि विरोधी मतदारांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की अ‍ॅक्समधील काँग्रेस उमेदवाराने फसवणूक उघड केल्यानंतर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सीआयडी तपास थांबवला. ते म्हणाले की कर्नाटक सीआयडीने गेल्या 18 महिन्यांत आवश्यक पुरावे मागण्यासाठी 18 पत्रे पाठवली, परंतु प्रत्येक वेळी सीईसीने तपास रोखला. 6,018 मते वगळण्याचा आरोप राहुल गांधी म्हणाले की जर ही कथित “मतचोरी” वेळेत उघड झाली नसती तर या मतदारसंघातील त्यांचा उमेदवार हरला असता. त्यांनी सांगितले की एकूण 6,018 मते हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारला आणि आरोप केला की डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस, डिव्हाइस पोर्ट आणि ओटीपी ट्रेल्स यासारखी महत्त्वाची तांत्रिक माहिती जाणूनबुजून रोखण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व पुरावे कर्नाटक सीआयडीकडे तात्काळ सोपवावेत. निवडणूक आयोगाचा प्रतिहल्ला निवडणूक आयोगानेही राहुल गांधींच्या आरोपांना तात्काळ उत्तर दिले. #ECIFactCheck या टॅगसह त्यांच्या अधिकृत खात्यावरून एका पोस्टमध्ये, आयोगाने गांधींचे दावे “खोटे आणि निराधार” असल्याचे फेटाळून लावले. आयोगाने म्हटले आहे की मतदारांची नावे कोणत्याही खाजगी नागरिकाद्वारे ऑनलाइन हटवता येत नाहीत आणि अशी कोणतीही तरतूद नाही. आयोगाच्या मते, 2023 मध्ये अलांड विधानसभा मतदारसंघात नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, त्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्याने एफआयआर दाखल केला होता. अलांड मतदारसंघाचे निवडणूक निकाल आयोगाने स्पष्ट केले की अलांड मतदारसंघ 2018 मध्ये भाजपचे सुभध गुट्टेदार यांनी जिंकला होता, तर बी.आर. 2023 मध्ये काँग्रेसचे पाटील विजयी झाले. आयोगाने सांगितले की या प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे 6 सप्टेंबर 2023 रोजी कलबुर्गी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आली. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निवेदन कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाने म्हटले आहे की या प्रकरणात मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे संबंधित तपास संस्थांना आधीच पाठवण्यात आली आहेत. त्यांनी म्हटले आहे की मतदार यादीतून नावे वगळण्याच्या कथित कटाबद्दलचा एफआयआर निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (ईआरओ) दाखल केला आहे. सीईओ कार्यालयाने म्हटले आहे की ते तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कोणतीही माहिती रोखण्यात आलेली नाही. राहुल गांधी आक्रमक भूमिकेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकशाही संस्था कमकुवत करण्याचा आणि विरोधी मतदारांना लक्ष्य करण्याचा आरोप केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा असा दावा आहे की संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती आणि कोणतीही अनियमितता झाली नाही. या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi on Election Comission : ब्लॉक, ब्लॉक, ब्लॉक … ‘मतदार चोरी’ वरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक Read More »

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ

Harshwardhan Sapkal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. स्वतःच्या चमकोगिरीमुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अपमान होत आहे,असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले आहे की, देवेंद्र फडणवीस, तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापायी महाराजांचा असा अवमान का केला जात आहे? जिथे लोक थुंकतात, कचरा टाकतात, तिथे पोस्टर लावून महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे मुद्दाम केले गेले आहे का? असा प्रश्न विचारून रा. स्व. संघ व भाजपच्या नेत्यांनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक अपमान केला ते पाहता हे मुद्दाम केले गेले असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. सपकाळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या प्रतिमेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ लावणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र व शिवप्रेमी जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान: हर्षवर्धन सपकाळ Read More »

atul londhe

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…, अतुल लोंढेंचा इशारा

Atul Londhe : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही. अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…, अतुल लोंढेंचा इशारा Read More »