DNA मराठी

BJP

varsha gaikwad

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका जनतेला बसत आहे. नरेंद्र मोदींच्या चुकांचे ओझे जनतेने का सहन करायचे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नरेंद्र मोदी स्वतः ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात आणि पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोने वर्षभर खरेदी करू नका, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असे सल्ले जनतेला देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी व त्यांच्या मंत्र्यांनीच आधीच काटकसर करण्याची सवय लावावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला प्रमाण मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मुंबई, पुणे, नागपूर शहरात मेट्रो, सीटी बस व राज्यभरात लालपरीने प्रवास करून इंधन बचतीची सवय लावावी. देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे. नरेंद्र मोदींचा सल्ला म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण’, असा आहे. संध्याकाळी जनतेला इंधन बचतीचा उपदेश देऊन दोन तासाने स्वतः मोदीच गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरत होते, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. सलग १२ वर्षांपासून सत्तेत असतानाही नरेंद्र मोदी यांना देशावर येणाऱ्या संकटासाठी नियोजन करता आले नाही, हे मोदी यांचे मोठे अपयश आहे. जनता आधीच महागाईने पिचलेली आहे, त्यात गॅस, इंधनाच्या संकटाने भर घातली आहे. पेट्रोल-डिझेल हे चैन किंवा उधळपट्टी नाही तर दररोजची गरज झालेली आहे. राहुल गांधी यांनी इराण युद्धाच्यावेळीच संकटाचा इशारा दिला होता पण मोदींच्या हुकुमशाही कारभारामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Varsha Gaikwad : पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैमध्ये लागू होणार; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येत्या जुलै महिन्यात राज्यात लागू होणार असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यामुळे राज्यातील १४ कोटी जनतेची मालमत्ता ही निश्चित प्रॉपर्टी म्हणून गणली जाणार असून जगातील कुठल्याही देशात ती कॅश करता येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. बावनकुळे म्हणाले, स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेले कार्य हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ‘गल्लीतली शाळा’ ते भारती विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला आणि तो पूर्ण करून दाखवला. त्यांच्या विचारांचा प्रकाश आज देश-विदेशात पोहोचत आहे. ते म्हणाले, शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण राबवून दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसेच दीड लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए. आय)तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात विद्यापीठांनी तंत्रज्ञान आणि ए.आय. स्वीकारणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहिलेली नसून विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असल्याचे सांगत सरकारने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले. नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आवश्यक जागा व शासनस्तरीय सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच ‘टिटबिट पॉलिसी’च्या माध्यमातून अडचणीत असलेल्या भूखंडांचा मार्ग काढण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडली.

Chandrashekhar Bawankule : ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैमध्ये लागू होणार; महाराष्ट्र ठरणार देशातील पहिले राज्य Read More »

Gold

Gold Price Today: फक्त एका वर्षात भारताने आयात केले तब्बल 6 लाख कोटींचे सोने

Gold Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत बोलताना पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळा असे आवाहन केल्यानंतर देशातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भारतातील सोन्याच्या आयातीबाबतची ताजी आकडेवारी अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाची आहे. वाणिज्य मंत्रालयाने (Commerce Ministry) प्रसिद्ध केलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार माहिती खालीलप्रमाणे आहे. आयात मूल्य (Value in USD) २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने ७१.९८ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹६ लाख कोटी) किमतीचे सोने आयात केले आहे. ही आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांकी (Record High) वाढ आहे. २०२४-२५ मध्ये ही आयात ५८ अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच एका वर्षात यात २४% वाढ झाली आहे. आयातीचे प्रमाण (Quantity in Tonnes) विशेष म्हणजे, सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे मूल्याच्या बाबतीत आयात वाढली असली, तरी सोन्याच्या वजनात (टक्केवारीनुसार) थोडी घट झाली आहे. २०२५-२६: ७२१.०३ टन तर २०२४-२५ : ७५७.०९ टन (प्रमाण सुमारे ४.७६% ने घटले आहे, पण किमती वाढल्याने देशाला जास्त पैसे मोजावे लागले आहेत.) आयात करणारे प्रमुख देश भारताला सोन्याचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये हे देश आघाडीवर आहेत: स्वित्झर्लंड: सुमारे ४०% वाटा (सर्वात मोठा पुरवठादार). संयुक्त अरब अमिराती (UAE): सुमारे १६% वाटा. दक्षिण आफ्रिका: सुमारे १०% वाटा. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व्यापार तूट (Trade Deficit): एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने आयात केल्यामुळे भारताची व्यापार तूट ३३३.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. परकीय चलन: भारताला हे सोने खरेदी करण्यासाठी डॉलर्समध्ये पेमेंट करावे लागते, ज्यामुळे आपल्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. याच कारणामुळे सरकारने नागरिकांना सोन्याची खरेदी काही काळ टाळण्याचे किंवा कमी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून देशाचे परकीय चलन वाचवता येईल.

Gold Price Today: फक्त एका वर्षात भारताने आयात केले तब्बल 6 लाख कोटींचे सोने Read More »

img 20260511 wa0035

Nilesh Lanke: खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…, रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी

Nilesh Lanke : विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात असताना आता उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. रविवारी दिवसभर विविध राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी रूबी हॉल क्लिनिक येथे जाऊन खा. लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह नगर जिल्हा आणि राज्यातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या गुरुवारी खा. लंके यांना प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सततचे दौरे, सामाजिक मोहिमा, लग्नसराईतील कार्यक्रम, अपुरी विश्रांती आणि शारीरिक थकवा यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तामीळनाडूतील जिंजी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर ते कोल्हापूर, नाशिक, संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवले. याच धावपळीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचे बोलले जात आहे. बी. रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांना विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे स्पष्ट केले होते. अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nilesh Lanke: खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…, रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र

Harshwardhan Sapkal: देशात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सपकाळ म्हणाले. मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Harshwardhan Sapkal: 2002 च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र Read More »

raam shinde

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे

Ram Shinde : कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत – जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेड परिसरात वारंवार वीज खंडित होणे, अनियमित लोडशेडिंग तसेच तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा थेट परिणाम शेतकरी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, वीज पुरवठा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या कालावधीत वीज पुरवठा अखंडित राहावा, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करणे तसेच तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करून सेवा अधिक पारदर्शक व परिणामकारक करावी, असेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असल्याने संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही प्रा. शिंदे यांनी दिले.

Ram Shinde: कर्जत – जामखेड तालुक्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात – सभापती प्रा. राम शिंदे Read More »

BJP

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Maharashtra BJP :  आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या नियुक्त्यांमागची मुख्य भूमिका आहे. या नव्या निवडीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मुंबई भाजप समन्वयक म्हणून काम पाहतीलच, शिवाय त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असेल. ठाणे-कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून कार्यभार सांभाळतील.पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना विक्रम पावसकर (संयोजक) आणि विक्रम देशमुख (सहसंयोजक) यांची साथ लाभणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या जबाबदारीत प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला विजय चौधरी संयोजक म्हणून आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम पाहतील. मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पथकात अ‍ॅड. नितीन काळे संयोजक, तर राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील. विदर्भासाठी आमदार संजय कुटे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील. या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय Read More »

img 20260506 wa0003

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात 3000 हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

NCMC Card:  एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार Read More »

aditi tatkare

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Aditi Tatkare : बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मंत्रिमंडळ बैठकीत केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक कायदेशीर तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले आरोपी पॅरोलवर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.ही बाब अत्यंत गंभीर असून या पार्श्वभूमीवर, अशा गुन्ह्यांतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देण्यात येवू नये, अशी कायद्यात तरतूद करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून समाजात सकारात्मक संदेश जाऊन व्यवस्थेबाबत विश्वास निर्माण होईल.महिलांच्या सुरक्षेबाबत कडक धोरणात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Aditi Tatkare : बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देऊ नका; मंत्री आदिती तटकरेंची मागणी Read More »

congress

Rahul Gandhi: काँग्रेसचे हिंदू उमेदवार मतदार नाकारतात? आसाम, केरळ आणि बंगालच्या निकालांनी उडवली झोप!

Rahul Gandhi: २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल केवळ काँग्रेसच्या पराभवाचे पुरावे नसून, पक्षाच्या सामाजिक ढासळत्या पायाचे सर्वात भीषण चित्र समोर आणणारे ठरले आहेत. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमधील आकडेवारी पाहिली तर एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या राज्यांत हिंदू मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहेच, पण काँग्रेसने उभे केलेले हिंदू उमेदवारही सपशेल नाकारले गेले आहेत. जिथे काँग्रेसचे हिंदू उमेदवार निवडून आले आहेत, तिथेही त्यांच्या विजयाची दोरी ही ‘अल्पसंख्याक’ मतदारांच्या हातात असल्याचे दिसून येते. गौरव गोगोईंचा पराभव आसाममध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या, पण त्यातील १८ आमदार मुस्लिम आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे आसाम काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचा मुख्य चेहरा गौरव गोगोई यांचा स्वतःच्या हिंदू बहुल मतदारसंघातून झालेला पराभव. एकमेव हिंदू आमदार काँग्रेसचे एकमेव हिंदू आमदार प्रदीप सरकार हे अभयपुरी दक्षिण (Abhayapuri South) मतदारसंघातून निवडून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा मतदारसंघ बोंगाईगाव जिल्ह्यात येत असून येथे मुस्लिम मतदारांची संख्या ६०% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, काँग्रेसच्या एकमेव हिंदू आमदारालाही निवडून आणण्यासाठी मुस्लिम मतदारांच्या कौलाची गरज भासली. तर दुसरीकडे जनेइया, धुब्री, जलेश्वर आणि गौरिपूर यांसारख्या पूर्णतः मुस्लिम बहुल (८०% हून अधिक लोकसंख्या) पट्ट्यातूनच काँग्रेसचे उर्वरित १८ उमेदवार विधानसभेत पोहोचले आहेत. केरळ: ‘ख्रिश्चन-मुस्लिम’ जोरावर विजय केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ (UDF) ला ६३ जागा मिळाल्या असल्या तरी, विजयाचा चेहरा हिंदू उमेदवारांसाठी चिंतेचा आहे. ६३ पैकी ४६ ख्रिश्चन आणि १२ मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत. तर ९२ पैकी तब्बल ८७ हिंदू मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे हिंदू उमेदवार सपशेल फेल ठरले आहेत. पक्षाचे केवळ ५ हिंदू आमदार विधानसभेत पोहोचू शकले. हिंदू मतदारांनी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांना डावलून एकतर डाव्या आघाडीला (LDF) किंवा भाजपच्या वाढत्या प्रभावाकडे कल दिला आहे. पश्चिम बंगाल: काँग्रेसचे अस्तित्व ‘मुर्शिदाबाद’पुरते मर्यादित बंगालमध्ये भाजपने २०६ जागांसह सत्ता मिळवली असताना, काँग्रेसच्या वाटेला आलेल्या २ जागांचे वास्तव अधिक दाहक आहे. राणीनगर (Raninagar) येथून काँग्रेसचे झुल्फिकर अली विजयी झाले आहेत. हा मतदारसंघ मुर्शिदाबाद जिल्ह्यात असून येथे मुस्लिम लोकसंख्या ८०% च्या आसपास आहे. फराक्का (Farakka) येथून काँग्रेसचे मोताब शेख विजयी झाले आहेत. येथेही मुस्लिम मतदारांचे प्रमाण ६८% हून अधिक आहे. हिंदू मतदारांचा ‘शून्य’ कौल: बंगालच्या हिंदू मतदारांनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले असून, पक्षाचा एकही हिंदू उमेदवार विधानसभेत पाय ठेवू शकलेला नाही.

Rahul Gandhi: काँग्रेसचे हिंदू उमेदवार मतदार नाकारतात? आसाम, केरळ आणि बंगालच्या निकालांनी उडवली झोप! Read More »