DNA मराठी

Ahilyanagar Politics

maharashtra politics

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया

Maharashtra Politics : आज राज्यात एक विचित्र चित्र दिसत आहे. तरुणांच्या आयुष्याशी संबंधित खरे प्रश्न बाजूला पडत चालले आहेत आणि जात-धर्माच्या नावावर वातावरण तापवण्याचे प्रकार वाढत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट, भाषणांमध्ये आक्रमक शब्द आणि रस्त्यावरचे वाद यात सर्वात जास्त वापर होत आहे तो युवकांच्या भावनांचा. खरं पाहिलं तर आजच्या तरुणासमोरचे प्रश्न वेगळे आहेत. कॉलेजची वाढती फी, शिक्षणासाठी घेतलेली कर्जे, नोकरीची अनिश्चितता, शेतीतून मिळत नसलेले उत्पन्न आणि वाढती महागाई हेच वास्तव आहे. अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांच्या भविष्यासाठी जीव तोडून मेहनत करत आहेत. पण या प्रश्नांवर मोठं आंदोलन किंवा ठाम चर्चा क्वचितच दिसते. कारण तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते. जात आणि धर्माच्या नावावर भडकवणे हे आज काही लोकांसाठी राजकीय साधन बनले आहे. भावना पेटल्या की प्रश्न विचारले जात नाहीत आणि हाच काही राजकारण्यांचा फायदा असतो. वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण केली जाते. तरुणांना पुढे करून संघर्ष उभा केला जातो, पण त्या संघर्षात भडकावणाऱ्यांची स्वतःची मुलं किंवा कुटुंबीय कधीच दिसत नाहीत. दंगली, भांडणं किंवा आक्रमक आंदोलनांत अडकणारा तरुण मात्र सामान्य घरातून आलेला असतो. एका चुकीच्या क्षणी झालेला गुन्हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. पोलिस केस, कोर्टकचेऱ्या, नोकरीच्या संधी संपणे याचा फटका फक्त त्या मुलाला नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो. भडकावणाऱ्यांचे काहीच बिघडत नाही; नुकसान होते ते सर्वसामान्यांच्या भविष्याचे. जात आणि धर्माचा अभिमान ठेवणे चुकीचे नाही. पण त्या नावाखाली स्वतःचे आयुष्य धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, तुम्ही सुरक्षित आणि सक्षम असाल तरच तुमची ओळख टिकते. तुम्हीच नसाल तर जात-धर्माचा अर्थ उरत नाही. आज युवकांनी स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा, आपण कोणासाठी रागावतो आहोत? आपल्या भविष्याकरिता की कोणाच्या राजकीय फायद्यासाठी? जे लोक सतत भडकवतात, त्यांच्या भूतकाळाकडे पाहा; अनेकदा वैयक्तिक स्वार्थातून सुरू झालेल्या गोष्टींना नंतर सामाजिक रंग दिला जातो. हे ओळखण्याची जबाबदारी युवकांचीच आहे. आज गरज आहे ती दिशा बदलण्याची. शिक्षण परवडणारे व्हावे, रोजगार वाढावा, शेतीला योग्य भाव मिळावा, महागाई कमी व्हावी या मुद्द्यांवर तरुणांनी आवाज उठवला तरच खरा बदल घडेल. रागाने नव्हे, तर विचाराने समाज बदलतो. आई-वडील तुमच्यासाठी आयुष्य झिजवत असतात. तुमच्या एका चुकीच्या पावलाने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे निर्णय घेताना घोषणांपेक्षा घरातील परिस्थिती आठवा. तरुणांनो, भावना ठेवा पण विवेकही ठेवा. राजकारण तुमच्यासाठी असावे; तुम्ही राजकारणासाठी नाही. आधी स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य घडा… बाकीच्या लढाया नंतरही लढता येतात.

Maharashtra Politics: आधी स्वतःचं आयुष्य घडा…, मगच जात-धर्माच्या लढाया Read More »

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल

Sujay Vikhe: अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याला मंगळवारी अटक झाली. पुणे जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेटच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी शामसुंदर गुजर या पोलिसाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुजर हा सध्या अहिल्यानगर एलसीबीत कार्यरत आहे. तो पूर्वी पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. पारनेरच्या बाँण्ड्रीवरील पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये ड्रग्जच रॅकेट सापडलं. त्याचे धागेदोरे थेट पारनेर व नगरपर्यंत पोहोचले. पारनेर आणि ड्रग्ज हे समीकरण उघड झालं. अहिल्यानगरच्या पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाच्या तपासातील सगळं सत्य पत्रकारांना सांगावं, अशी अपेक्षा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. विखेंनी या प्रकरणावर काही गंभीर शंकाही उपस्थित केल्या. ड्रग्ज सारख्या गंभीर प्रकरणात, नगरमधील पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पत्रकारांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रकरणात आपली भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी विखेंना विचारला. त्यावर डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेल्या उत्तराने, अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुजय विखे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलेला पोलिस कर्मचारी हा पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्यावेळी तेथील अवैध व्यावसायिकांसोबत त्यांचे संबंध होते. इतरही अनेक गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्याविरोधात पोलिस अधिक्षकांकडे तक्रारी करुन त्याची बदली करण्याची मागणीही त्यावेळी झाली होती. वादग्रस्त असलेल्या या पोलिसाची बदली थेट नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत झाली. म्हणजेच त्याच्या डोक्यावर कोणत्यातरी मोठ्या नेत्याचा हात होता. एकीकडे एसपी स्थानिक गुन्हे शाखेत इमानदार पोलिस घेतल्याचे सांगतात. मग त्या वादग्रस्त पोलिसाला थेट एलसीबीत कुणाच्या सांगण्यावरुन घेतलं गेलं, हे पोलिस अधिक्षकांनी सांगावं. आत्ताच्या ड्रग्ज प्रकरणात 10 किलो ड्रग्ज हे पारनेरमधील दोघांच्या घरी ठेवले गेले होते. मग ते कुणाच्या घरात होते? त्यांची नावं पोलिस का सांगत नाहीत. ज्यांच्या घरात हे 10 किलो ड्रग्ज होते, ते कुणाचे कार्यकर्ते होते? त्यांची नावं गुन्ह्यात येऊ नये म्हणून पोलिस ठाण्यात कोण अर्धा तास बसून होतं? हे सगळं मला माहित आहे. परंतु पोलिसांनी हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगावं, असंही विखेंनी स्पष्ट केलं. सुजय विखेंनी ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणावर आपली भुमिकाही स्पष्ट केली. ते म्हणाले, पोलिसांवर या प्रकरणात कुणाचा दबाव आहे, हे त्यांनी स्वतः सांगावं. मी जे प्रश्न उपस्थित करतोय, त्याचीही उत्तरे द्यावीत. अन्यथा पुढच्या आठ दिवसांत आपण स्वतः पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सगळ्यांची नावे उघड करु. गंभीर गुन्हा करणारे कुणाचेही कार्यकर्ते असो, त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलायच हवी, असंही विखेंनी स्पष्ट केलं. विखेंनी कोणत्याही लोकप्रतिनीधींचं नाव घेतलं नसलं तरी, दक्षिणेचे खा. निलेश लंके यांच्याकडे संशयाची सुई असल्याच्या चर्चा आहेत. ज्यांच्या घरात ड्रग्ज ठेवले होते, ते खा. लंके यांचे कार्यकर्ते होते का? हा प्रश्नही विचारला जात आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेमध्ये लोकसभा निकालानंतर झालेल्या राड्याबाबतही आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, मी काल आजारी असल्याने हे प्रकरण संपूर्ण पाहिलं नाही. परंतु त्यावेळी एका गर्भवती महिलेला मारहाण झाली होती. लोकप्रतिनीधींच्या कुटुंबातील व्यक्तीने असं करणं, हे गंभीर आहे. आपला न्यायालयावर विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sujay Vikhe:  पारनेरमध्ये 10 किलो ड्रग्ज कुणाच्या घरात होते..? सुजय विखेंचा नाव न घेता लंकेंवर हल्लाबोल Read More »

police

Ahilyanagar Politics: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश; कारण काय?

Ahilyanagar Politics: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, मिरवणुका आणि प्रेतयात्रांतील जमावावर हा आदेश लागू होणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि सभा किंवा मिरवणूक काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Ahilyanagar Politics: मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश; कारण काय? Read More »

election

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली?

Ahilyanagar Politics : महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे राजकारणाच्या आरशात पाहण्याचा योगच जणू. दिवसभर शहरातील प्रभागांमधून फिरताना परिचित चेहरेच अधिक दिसत होते. ओळखीची माणसे, ओळखीचे चेहरे, काहींची पक्षनिष्ठाही माहीत होती. मात्र, संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोण कुठल्या पक्षाचा आहे, हेच समजत नव्हते. चहाच्या टपरीवर बसलेला एकजण आत्मविश्वासाने सांगत होता, मी अमुक पक्षाचा आहे. तेवढ्यात त्याला फोन आला, तो उठून गेला. चहा संपवून आम्ही निवडणूक कार्यालयाकडे येताना पुन्हा तोच भेटला आणि सहजपणे म्हणाला, “मी दुसऱ्याच पक्षातून फॉर्म भरला आहे.” ही एखादी अपवादात्मक घटना नव्हती. मागील पाच-सहा दिवसांत अशा अनेक कथा ऐकायला मिळाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी—महायुती असो वा महाविकास आघाडी—सर्वच ठिकाणी चेहरे तेच, फक्त झेंडे बदललेले. या पक्षांतरांच्या खेळात एक वाक्य मात्र सर्वत्र समानपणे ऐकू येत होते… “जनतेच्या कल्याणासाठी, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी मी पक्ष बदलत आहे…. विरोधक असो वा सत्ताधारी, मोठा नेता असो वा स्थानिक इच्छुक हे वाक्य इतक्या गोडपणे, इतक्या सहजपणे उच्चारले जात होते की तेच जणू निवडणूक घोषवाक्य बनले होते. मात्र या घोषणांच्या आड एक कटू सत्य दडलेले होते….. जनतेच्या प्रश्नांचा उल्लेख कुठेच नव्हता. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण—अहिल्यानगरच्या नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकही ठोस चर्चा ऐकू आली नाही. सत्तेत असलेले अचानक विरोधक झाले, विरोधक सत्तेच्या जवळ गेले. निवडून आल्यावर आपण कोणत्या पक्षात असू, हे सांगण्याचीही तयारी अनेकांची नव्हती. आजचा विरोध उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो, हीच जणू राजकीय हमी बनली आहे. या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ठळकपणे दिसली निवडणूक म्हणजे सार्वजनिक सेवेचा नव्हे, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनाचा प्रकल्प बनला आहे. कधी स्वतःसाठी, कधी पत्नीकरिता, कधी मुला-मुलीसाठी, कधी सुनेसाठी, तर कधी नातवासाठी जागा सुरक्षित करण्याची धडपड सुरू आहे. राजकारणाचा वारसा जपताना शहराचा वारसा मात्र दुर्लक्षित राहतो आहे. लोकशाहीत निवडणूक ही जनतेसाठी असते, हे तत्वज्ञान कागदावरच उरले आहे का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या नावाने उमेदवारी मागितली जाते, ती जनता या सगळ्या प्रक्रियेत अदृश्य आहे. राजकीय गणिते जुळवताना सामाजिक वास्तव विसरले गेले आहे. अहिल्यानगरच्या या निवडणुकीत पक्षांतरांचा गोंधळ जितका वाढतो आहे, तितकीच जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे. शेवटी प्रश्न एवढाच उरतो. या निवडणुकीत जिंकणार कोण? पक्ष, उमेदवार की राजकीय घराणी? आणि हरलेली कोण? तर ती जनता, जिने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पिशवी खांद्यावर घेतली आहे. लोकसत्तेच्या परंपरेतून पाहिले तर ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची कसोटी आहे.

Ahilyanagar Politics : पक्ष बदलले, चेहरे तेच; पण जनता कुठे हरवली? Read More »

kotwali police

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Police: नगर शहरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गुटखा बाळगणारे एका इसमास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी गायकवाड 2 ऑक्टोबर पहाटे 5 च्या सुमारास काळया रंगाच्या गाडीमधे एक इसम गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीवरून दिपक पोपटराव लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बी एन एस कलम 123.223.274.275 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई Read More »

img 20250917 wa0004

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Ahilyanagar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील कत्तलखाने बंद करा आणि कोठला परिसरात गोमांस फेकणाऱ्या आरोपीला अटक करा या मागणीसाठी रस्तारोको आंदोलन 16 सप्टेंबर रोजी केला होता. तर दुसरीकडे आता या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. तरबेज आबीद कुरेशी, वय 24 वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार किंमतीची मोपेड गाडी देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Ahilyanagar Politics: गोमांस प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक Read More »

img 20250830 wa0020

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ओडीसा राज्यातुन विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण 80,83,464 रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवुन अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोनि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांचे दोन विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे. 29 ऑगस्ट 2025 रोजी पोनि. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे रा. श्रीगोंदा व नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांचेकडील ट्रक क्रमांक एम.एच. 14 जी. यु. 2111 हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन वरील पथक, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. जाणारे रोडवर वडगांव गुप्ता गावचे शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचुन थांबले असता बातमीतील ट्रक येतांना दिसल्याने नवनाथ अंबादास मेटे (वय 38 वर्षे, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय 31 वर्षे, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे ताब्यातील ट्रकची पंच, फॉरेन्सिक टिम यांचे मदतीने झडती घेतली असता ट्रकचे केबीनवरील टपावर 6 गोण्यामध्ये 30,22,625-रुपये किमतीचा 120 किलो 905 ग्रॅम गांजासह एकुण 80,83,464 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 120 किलो गांजा जप्त Read More »

img 20250830 wa0006

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!”

Sawedi Land Scam : ” सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले चौकशी करा, जिल्हाधिकारी यांच्याकडेही चौकशी सुरू असताना अप्पर तहसीलदार यांनी मात्र निबंधकार्यालयाला पत्र देऊन टाकले, याचा अर्थ पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही मोठे पद अप्पर तहसीलदारांचे आहे का? अहिल्यानगर – शहरातील सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या वादग्रस्त प्रकरणाने महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुनावणी प्रलंबित असताना व्यवहार थांबवण्याचे आदेश सह निबंधकांनी दिले होते. मात्र, आश्चर्यकारक घडामोडीत याच प्रकरणात अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात उलट पत्र काढत व्यवहार सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनाही जे जमले नाही, ते अप्पर तहसीलदारांनी करून दाखवल्याने या प्रकरणामागे ” ₹” प्रभाव आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहेत. मौजे सावेडी येथील स.नं. 245/2ब मधील फेरफार क्रमांक 73107 या प्रकरणाने जिल्हा प्रशासन आणि महसूल खात्याच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तक्रारदार रमाकांत सोनवणे यांनी प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले. कायद्याने सुनावणी सुरू असताना संबंधित जमिनीवर कुठलेही व्यवहार होऊ नयेत, असा नियम असतानाही व्यवहार रोखण्याऐवजी वेगळ्याच दिशेने हालचाली झाल्याने प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांविषयी संशय गडद होत आहे. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सुरुवातीला याबाबतचा अहवाल अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांच्याकडे मागवला. त्यांनी तो सावेडी सर्कल अधिकाऱ्यांकडे पाठवून, वारस व इतर भागधारकांना नोटिसा बजावल्या. यानंतर सह दुय्यम निबंधक, अहिल्यानगर यांनी सुनावणी संपेपर्यंत कोणताही खरेदी-विक्री व्यवहार नोंदवू नये, असे स्पष्ट पत्र जारी केले. कायद्याच्या दृष्टीने ही भूमिका योग्य ठरत होती. मात्र, या पत्रामुळे नाराज झालेल्या पारसमल मश्रीमल शहा यांच्या वतीने गणेश शिवराम पाचर्णे यांनी उलट मागणी पुढे केली. अप्पर तहसीलदारांनीच अहवाल तयार करावा, असा आग्रह धरला. यानंतर प्रांत अधिकारी स्तरावर हा अहवाल पोहोचण्यास जाणीवपूर्वक 15 ते 20 दिवस उशीर लावण्यात आला, त्यानंतर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी तो अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. याच दरम्यान पाचर्णे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली. पालकमंत्र्यांनी खुलासा मागवला, मात्र त्यावर कुठलीही सुनावणी झाली नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे, 14 ऑगस्ट रोजी पाचर्णे यांनी अप्पर तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांनी उपनिबंधकांना पत्र पाठवले. या पत्रात महसूल विभागाला खरेदी-विक्री थांबविण्याचा अधिकार नाही, तो फक्त दिवाणी न्यायालयाचा आहे, असे नमूद करण्यात आले. त्यामुळे या पत्राचा अर्थ असा निघतो की यावर खरेदी विक्री करण्यास कुठलाही अडचण महसूल ची नाही असे स्पष्ट होते, यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली की, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना जे जमले नाही ते अप्पर तहसीलदारांनी एका दिवसात कसे केले? सामान्य माणसाला साध्या पत्रासाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागतात, पण सावेडीच्या या वादग्रस्त जमिनीवर मात्र एका दिवसात अर्ज, त्यावर निर्णय आणि आदेशही निघाला. हा वेग “…₹….” (गाळलेली जागा तुम्ही भरा) च्या जोरावर आला की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. सावेडी सर्कल अधिकाऱ्यांनी दिलेले पहिले पत्र कायदेशीरदृष्ट्या अधिक भक्कम होते. कारण सुनावणी सुरू असताना कोणताही व्यवहार न होणे, हा कायद्याचा गाभा आहे. मात्र, अप्पर तहसीलदारांच्या तातडीच्या हालचालींनी संबंधित आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शंका लोकांमध्ये वाढली आहे. प्रश्न असे की पालकमंत्री यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी किंवा निर्णय नाही? जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी प्रलंबित असताना अप्पर तहसीलदारांनी एवढ्या घाईने आदेश का दिला? एखाद्या सामान्य अर्जदाराला महिनोनिमहिनो दार ठोठावावे लागते, मग या प्रकरणात एका दिवसात आदेश का? सुनावणी असतानाही व्यवहार मोकळे ठेवण्याचा निर्णय कसल्या आधारे घेतला गेला? या घडामोडीमुळे महसूल विभागाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लक्ष्मीचा प्रभाव अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेवर मात करतोय का, असा संशय नागरिकांमध्ये बळावतो आहे. एकंदरीत, सावेडीतील जमीन वाद हा केवळ मालकीचा प्रश्न नसून ‘लक्ष्मी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत’ या गंभीर शंकेने ग्रासलेला आहे.

Sawedi Land Scam : “पालकमंत्रीही थांबले, जिल्हाधिकारीही थांबले… पण अप्पर तहसीलदार धावले!” Read More »

imtiaz jaleel

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.  माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ Read More »

bhandardara dam

Ahilyanagar News : पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो…

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी भंडारदरा धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. दरम्यान भंडारदरा धरणातुन २० हजार ७६३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक होत असुन धरणातील पाणी पातळी नियत्रीत ठेवण्यासाठी निळवडे धरणातुन ८ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली. गेल्या आठवड्यात भंडारदरा धरण पाणलोट परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे १५ आँगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम मोडला होता. परंतु सोमवार पासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावासाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे. डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे जोमाने वाहत असून छोट्या नद्या, नाले खळखळून धरणात विसावत आहेत. बुधवारी भंडारदरा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.तर निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे निळवंडे धरणातून एकूण ८ हजार ६०० क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावत आहे. त्यामुळे प्रवरा नदी वाहती बनली आहे. आणि नवीन पाण्याची आवक निळंवडे धरणात वाढत असल्याने निळंवडे धरण लवकरच भरणार असल्याचे वर्तविले जात आहे.

Ahilyanagar News : पावसाचा जोर वाढला; भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो… Read More »