IMD Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून जवळ्पास संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. अनेक तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता पुढील काही दिवस अवकाळी पाऊस सुरूच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचे क्षेत्र कोकणाजवळ सक्रिय असल्याने 23 मे रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिह्यांमध्ये अनेक ठिकाणी संततधार पावसासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुणे, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर मधील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. याच बरोबर शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे.