Dnamarathi.com

Health Tips : किडनी या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. जर किडनीचे आरोग्य बिघडले तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा किडनीचे आजार जीवघेणे ठरतात. त्यामुळे किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार जर जास्त प्रमाणात पाणी प्यायले तर ते किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शरीराला आवश्यक तितकेच पाणी प्यावे. जास्त पाणी पिणे रक्तातील सोडियमची पातळी कमी करते. याच कारणामुळे हायपोनाट्रेमियाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हृदयरोग असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हायड्रेशनची पूर्ण काळजी घ्यावी.

किती पाणी प्यावे?
प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, परंतु सामान्यत: प्रौढांनी दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. दिवसभर पाण्याचे सेवन करत राहा. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. आपण सकाळी प्रथम एक ग्लास पाणी प्या, त्यानंतर हळूहळू दिवसभर पाण्याचे सेवन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *