DNA मराठी

स्पोर्ट्स

Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह

Champions Trophy 2025: बीसीसीआयने मोठा निर्णय घेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल वगळण्यात आले आहे. तर तर वरुण चक्रवर्तीला आणि हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा गोलंदाज हर्षित राणाला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय यशस्वी जयस्वालच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम संघबीसीसीआयने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये जगातील अव्वल आठ एकदिवसीय संघ सहभागी होतील. भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने, आयसीसीने हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यामुळे, भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. भारताच्या गट-टप्प्यात बांगलादेश (20 फेब्रुवारी), पाकिस्तान (23 फेब्रुवारी) आणि न्यूझीलंड (2 मार्च) विरुद्धचे सामने आहेत. जर भारताने आगेकूच केली तर उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील, तर अंतिम सामना 9 मार्च रोजी होईल.

Champions Trophy 2025: भारतीय संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार नाही जसप्रीत बुमराह Read More »

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी?

ICC Champions Trophy 2025 : क्रिकेटच्या चाहतांचे लक्ष लागून असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी आयसीसीने अंतिम संघ सादर करण्याची अंतिम तारीख निश्चित केली होती. तथापि, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल सस्पेन्स कायम आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला आजच त्यांचा अंतिम संघ सादर करावा लागेल. पण आतापर्यंत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी मोहम्मद सिराज टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. या स्पर्धेसाठी सिराजची निवड झाली नाही. त्यामुळे आता तो संघात येऊ शकतो. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहने नुकतेच बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या कंबरचे स्कॅनिंग केले. बुमराहबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय कर्मचारी निवडकर्त्यांना आणि संघ व्यवस्थापनाला भेटतील. बीसीसीआय आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी बुमराहबाबत निर्णय घेईल. आता बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. जर तो तंदुरुस्त नसेल तर टीम इंडियाला त्याची उणीव नक्कीच जाणवेल. बुमराहबाबतचा निर्णय आज येईल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी सर्व संघांनी त्यांचे संघ जाहीर केले होते. परंतु आयसीसीने सर्व संघांना अंतिम संघ सादर करण्यासाठी 11 फेब्रुवारीची अंतिम मुदत दिली होती. आज, सर्व संघ त्यांच्या जखमी खेळाडूंच्या बदलीची घोषणा करणार आहेत. बीसीसीआय आज जसप्रीत बुमराहबाबतचा निर्णय जाहीर करेल. बुमराहबाबत लवकरात लवकर निर्णय होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मोहम्मद सिराजला संधी मिळणार?जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी टीम इंडियाची घोषणा केली तेव्हा मोहम्मद सिराज त्या संघात नव्हते. जेव्हा कर्णधाराला विचारण्यात आले की सिराज तिथे का नाही, तेव्हा त्याने सांगितले की सिराज नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो. पण जुन्या चेंडूवर तो कमी प्रभावी आहे. या कारणास्तव, त्याला घेतले गेले नाही. पण जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर मोहम्मद सिराजचा टीम इंडियामध्ये समावेश निश्चित मानला जात आहे. कारण सिराजने बुमराह आणि शमीच्या उपस्थितीत अनेकदा गोलंदाजीची जबाबदारी घेतली आहे.

ICC Champions Trophy 2025 : BCCI घेणार मोठा निर्णय, मोहम्मद सिराजला मिळणार संधी? Read More »

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन

Maharashtra Keshari 2025 : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने मोठी कारवाई करत महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन करण्याचे निर्णय घेतला आहे. पंचांच्या निर्णय अमान्य असल्याने शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडने महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घातला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे मोठा निर्णय घेत दोघांना तीन वर्षांसाठी निलंबन केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या 67 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देतांना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला. यावेळी माजी आमदार अरुणकाका जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.

Maharashtra Keshari 2025: महाराष्ट्र केसरीमध्ये वाद घालणारे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडचे 3 वर्षासाठी निलंबन Read More »

Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चीटिंग केली? हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याबद्दल वाद चिघळला

Concussion Substitute Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 15 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.4 षटकांत 166 धावांवर आटोपला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक 3 बळी घेणाऱ्या हर्षित राणाने, जो कन्कशन पर्याय म्हणून आला होता, तो बाद झाला. त्याने मधल्या षटकांमध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने सामना बदलून टाकला. पण आता त्याला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जेव्हा इंग्लंडच्या कर्णधाराला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा बटलरने ही लाईक टू लाईक रिप्लेसमेंट नव्हती. असं उत्तर दिले. आम्ही याच्याशी सहमत नाही. असं देखील बटलर म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, शिवम दुबेचा चेंडूचा वेग ताशी 25 मैलांनी वाढला आहे किंवा हर्षित राणाने त्याची फलंदाजी खूप सुधारली आहे. शेवटी बटलर म्हणाला, हे सगळं सामन्याचाच एक भाग आहे. शेवटी आपण सामना जिंकायला हवा होता, जे होऊ शकले नाही. भारताकडून शिवम दुबेने 34 चेंडूत 53 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि संघाला 181 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजी करताना, 20 व्या षटकातील पाचवा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. कन्कशन टेस्ट न घेता, तो सामन्याचा शेवटचा चेंडू खेळला आणि धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तो मैदानावर आलाच नाही. त्याच्या जागी राणाने क्षेत्ररक्षण केले आणि नंतर गोलंदाजी करून सामना बदलला. त्याने 4 षटकांत 33 धावा देत 3 बळी घेतले. राणाने लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन यांच्या विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात परत आणले. आंतरराष्ट्रीय टी20 इतिहासात हर्षित राणा हा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरला. सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर राणा म्हणाला की, इंग्लंडच्या डावाच्या दुसऱ्या षटकात गौतम गंभीरने त्याला सांगितले होते की तो कन्कशन पर्याय म्हणून मैदानात उतरणार आहे. तथापि, 11 व्या षटकानंतर याची अधिकृत पुष्टी झाली आणि हर्षित गोलंदाजी करायला आला आणि दुसऱ्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर, सामन्यादरम्यान या मुद्द्यावर सतत चर्चा होत राहिली.

Concussion Substitute Controversy : टीम इंडियाने चीटिंग केली? हर्षित राणाला कन्कशन सबस्टिट्यूट बनवल्याबद्दल वाद चिघळला Read More »

Champions Trophy साठी पाकिस्तानात जाणार नाही Rohit Sharma ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

Rohit Sharma: 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उद्घाटन समारंभाला भारतीय कर्णधार रोहित शर्मा जाणार नसल्याची बातमी समोर येत आहे. रोहीत शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास बीसीसीआय तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पीसीबी देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे यापूर्वी ही संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु बीसीसीआयने नकार दिल्यानंतर ती हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जात आहे. रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये कर्णधारांच्या पारंपारिक फोटोशूट आणि कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा होती. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, ज्यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. बीसीसीआयने रोहितला पाकिस्तानला पाठवण्याच्या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिलेला नाही. पण भारतीय संघ जर्सीवर पाकिस्तानचे नाव न छापण्याचा विचार करत असल्याबद्दल पीसीबीच्या अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आयएएनएसला सांगितले की, ‘बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे, जे खेळासाठी अजिबात चांगले नाही. आधी त्याने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिला, नंतर आता तो कर्णधाराला उद्घाटन समारंभाला पाठवत नाही. आणि आता बातम्या येत आहेत की त्यांना जर्सीवर यजमान देशाचे (पाकिस्तान) नाव नको आहे. आम्हाला आशा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देईल. या स्पर्धेसाठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माला कर्णधार आणि शुभमन गिलला उपकर्णधार बनवण्यात आले आहे, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांचाही संघात समावेश आहे. भारत आपला पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल. भारताचा गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध असेल.

Champions Trophy साठी पाकिस्तानात जाणार नाही Rohit Sharma ? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय Read More »

Muralidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा संपन्न

Muralidhar Mohol : केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मातीपूजन करण्यात आले. कुस्तीला नवे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले. कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी आमदार अरुणकाका जगताप, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव दगडे, सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे इथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे. स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला आहे, असेही ते म्हणाले. आमदार कर्डिले म्हणाले, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध रहाते, जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करतांना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धेच्या निमित्ताने पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्व आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे, हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगीरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांना राजाश्रय देण्याचे, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे कार्य केले. कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उप महाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Muralidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचा मातीपूजन सोहळा संपन्न Read More »

IPL 2025 ‘या’ तारखेपासून सुरू होणार, BCCI ने केली घोषणा

IPL 2025 : बीसीसीआयने क्रिकेटच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत. IPL 2025 च्या तारखा जाहीर केल्या आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 मार्चमध्ये सुरू होणार आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या तारखांची माहिती दिली. त्यांनी माहिती दिली की आयपीएल 2025 23 मार्चपासून आयोजित केली जाईल. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर माध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी रविवारी स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख जाहीर केली. 12 जानेवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल सुरू होण्याच्या तारखेच्या घोषणेव्यतिरिक्त, भारतीय क्रिकेटच्या प्रशासनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शुक्ला म्हणाले की, देवजीत सैकिया हे जय शाह यांची जागा घेतील आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची बीसीसीआयचे कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाची घोषणा 18-19 जानेवारी दरम्यान होणार आणि 2025 च्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या ठिकाणांचीही लवकरच घोषणा केली जाईल. काही काळापूर्वी आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मेगा लिलावात 182 खेळाडू खरेदी करण्यात आले. ज्यावर 639.15 कोटी रुपये खर्च झाले. आयपीएलच्या मेगा लिलावानंतर सर्व संघांमध्ये खूप बदल झाले आहेत. मेगा लिलावात ऋषभ पंतवर भरपूर पैशांचा वर्षाव झाला. लिलावात पंतला सर्वाधिक 27 कोटी रुपयांना विकण्यात आले. पंतला लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केले.

IPL 2025 ‘या’ तारखेपासून सुरू होणार, BCCI ने केली घोषणा Read More »

Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारीला होणार भारतीय संघाची घोषणा, कोणाला मिळणार संधी?

Team India: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआय हंगामी संघाची निवड करणार आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे, जी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांचा हंगामी संघ निवडावा लागेल आणि बोर्ड 13 फेब्रुवारीपर्यंत या संघात बदल करू शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सर्व संघांना 12 जानेवारीपर्यंत त्यांची तात्पुरती टीम निवडून पाठवावी लागेल, परंतु त्यांना हवे असल्यास ते 13 फेब्रुवारीपर्यंत त्यात बदल करू शकतात. आयसीसी 13 फेब्रुवारीलाच या संघांची यादी जाहीर करेल की नाही हे आता संघांवर अवलंबून आहे. यावेळी ऑस्ट्रेलियात आपल्या चेंडूने चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहलाही व्हाईट बॉलच्या फॉरमॅटमध्ये प्रमोशन मिळू शकते आणि त्याला या संघाचा नवा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. असे झाल्यास निवडकर्ते हार्दिक पंड्या आणि केएल राहुलकडे दुर्लक्ष करतील कारण हे दोन्ही खेळाडू 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे उपकर्णधार होते. यापूर्वी हार्दिक पंड्या 2023 च्या वनडे विश्वचषकाचा उपकर्णधार होता, पण दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर होता, तेव्हा ही जबाबदारी केएल राहुलकडे देण्यात आली होती. पंड्या हा नुकताच टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा उपकर्णधार होता. या स्पर्धेसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि नितीश कुमार रेड्डी यांसारख्या युवा फलंदाजांच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीमुळे त्यांनी वनडे संघात निवड होण्याचा दावाही केला आहे.

Team India: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारीला होणार भारतीय संघाची घोषणा, कोणाला मिळणार संधी? Read More »

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय?

Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये बॅट आतापर्यंत खूप फ्लॉप ठरली आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात केवळ 22 धावा केल्या आहेत. रोहितच्या या खराब फॉर्ममध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. सातत्याने धावा न केल्याने निराश झालेल्या रोहितने आता कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतोमीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत सिडनीतील शेवटचा सामना हिटमॅनच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी खेळाडू अजित आगरकर मेलबर्नमध्ये असून तो रोहित शर्माशी त्याच्या भविष्याबद्दल बोलू शकतो. रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला नाही, तर रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅट सोडू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत रोहितचे कसोटी भवितव्य त्याच्या फॉर्मवर आणि भारताच्या विजयावर अवलंबून आहे. रोहितला कारकीर्द वाचवायची असेल तर त्याला मेलबर्न आणि सिडनीमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे. रोहित टी-20आधीच निवृत्त झाला आहेरोहित शर्माने पहिल्यांदाच T20I ला अलविदा केला आहे. भारताने यावर्षी ऐतिहासिक T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर चाहते खूपच निराश झाले होते. आता हा रिपोर्ट जाणून हिटमॅनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता रोहितने आगामी डावात फलंदाजीने खळबळ माजवावी आणि भारतासाठी महत्त्वाची खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले पाहिजे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. हिटमॅन रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळला नव्हता. यानंतर त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला आणि मधल्या फळीत फलंदाजी केली. मात्र, रोहितच्या खराब फॉर्मने त्याची साथ सोडली नाही आणि तो आतापर्यंत बॅटने मोठी खेळी खेळू शकला नाही.

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय? Read More »

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम

IND VS AUS 4th Test : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्सने कसोटीत डेब्यू केला आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्समध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याच्या 11व्या षटकात विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे पंच आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी प्रकरण शांत केले. 19 वर्षीय सलामीवीराच्या खांद्याला धक्का दिल्याने आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील 11 वे षटक टाकत होता. ज्यावर नवोदित सॅम कॉन्स्टासने चौकार आणि षटकार ठोकले. त्यानंतर 11व्या षटकाच्या मध्यावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या दिशेने जाताना दिसतो. याच व्हिडिओमध्ये विराट बॉल घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याची सॅम कॉन्स्टासशी टक्कर झाली. आयसीसीचे नियम काय सांगतात ते जाणून घ्याजर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) चे नियम पाहिले तर कलम 2.1 नुसार क्रिकेटपटू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला धक्का दिल्यास आयसीसी कारवाई करू शकते. या घटनेपूर्वीही क्रिकेटच्या इतिहासात अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आधीच्या घटना पाहिल्या तर कळेल की अशा प्रकरणांमध्ये सामन्यावर बंदी किंवा निलंबनासारखी शिक्षा दिली जात नाही. केवळ सामनाधिकारीच शिक्षा म्हणून सामना फी किंवा डिमेरिट पॉइंट देऊ शकतात.

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम Read More »