DNA मराठी

राजकीय

Maharashtra Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ शहरात एकही उमेदवार देणार नाही?

Maharashtra Election: राज्यात आता विधानसभेचे वारे वाहत आहे. येत्या काही दिवसात निवडणुकांची घोषणा देखील होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आता आपापल्या तयारीला लागला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना पुणे शहरातील एकही विधानसभा जागेवर उमेदवार देणार नाही.  माहितीनुसार जागा वाटपामध्ये पुण्यातील विधानसभा लढवण्याचा शिवसेनेने दावा सोडला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सेनेचा एकही इच्छुक उमेदवार नसल्याने शिवसेनेने दावा सोडला असल्याची माहिती समोर येत आहे.  तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील 2 जागांवर शिवसेना निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. माहितीनुसार पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता आहे.  तर दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महादेव बाबर मधून पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांचा नावाची जोरदार चर्चा आहे.

Maharashtra Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ शहरात एकही उमेदवार देणार नाही? Read More »

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं

Sanjay Raut:  कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. इथे जसा मराठी माणूस लढवायला आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच हरियाणामध्ये काँग्रेसची सरकार येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  तर महाराष्ट्रात राहुल गांधी, किंवा प्रियंका गांधीला मुख्यमंत्री व्हायचं नाही येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार ,उद्धव ठाकरे आम्हाला माहित आहे जागावाटप कसा व्हायला पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमचं जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.  दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो असेही ते म्हणाले.

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं Read More »

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट

Haryana Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. सध्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष 47 जागांवर पुढे असून काँग्रेस 36 जागांवर पुढे आहे. त्यामूळे भाजपने ताज्या आकडेवारीनुसार बहुमताचा आकडा पार केला आहे मात्र हे कल असल्याने हरियाणामध्ये पुन्हा एकदा सामना फिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला होता मात्र आता कल बदलत असल्याने पुढील 1-2 तासात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जबरदस्त फाईट पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस आघाडीने बहुमतचा आकडा पार केला आहे तर भाजप 28 जागांवर पुढे आहे.  एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष 55 ते 60 जागांवर विजय मिळवणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तर भाजपला 20 ते 30 दरम्यान जागा मिळणार असं देखील अनेक एक्झिट पोलचं म्हणणं होतं. मात्र प्रत्यक्षात भाजप सध्या हरियाणामध्ये तिसऱ्यांदास सरकार स्थापन करण्याच्या जवळ दिसत आहे.

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट Read More »

NIA Raid In Maharashtra: मोठी बातमी! NIA ची महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये छापेमारी, ‘हे’ आहे कारण

NIA Raid In Maharashtra: महाराष्ट्रासह देशातील पाच मोठ्या राज्यात NIA ने 22 ठिकाणी छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार दहशतवाद्यांना निधी देण्याबाबत एनआयएने ही छापेमारी केली आहे.  जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने एकाच वेळी सुमारे 22 ठिकाणी छापे टाकले, एनआयए दहशतवाद्यांच्या निधीबाबत मोठी कारवाई करत आहे, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणात सर्च ऑपरेशन सुरू आहे. तर NIA ने महाराष्ट्रात छापे टाकले असून,  जालना येथून दोन जणांना ताब्यात घेतले आहे, एक औरंगाबाद, एक मालेगाव, हे सर्वजण जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. संभाजीनगर, जालना आणि मालेगावजवळ छापे टाकून काही जणांना ताब्यातही घेतले आहे. शनिवारी पहाटे एनआयएच्या वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथकाने पहाटे चार वाजल्यापासून जालन्यात कारवाई सुरू केली होती, संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, जालना व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर, मालेगाव येथेही एनआयए आणि एटीएसची कारवाई सुरू आहे.

NIA Raid In Maharashtra: मोठी बातमी! NIA ची महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये छापेमारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…!

Maharashtra Election:  शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा निर्धार मेळावा  पाथर्डी येथील विजय लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला.  भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे तसेच ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या नेतत्वाखाली आमदार मोनिका राजळे यांना डावलुन हा निर्धार मेळावा घेऊन अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगांव-पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोपटले असुन मेळाव्यात अरुण मुंढे किंवा गोकुळ दौंड या दोघांपैकी कोणी एकाला पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशा मागणीने जोर धरला आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामुहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य यावेळी अनेकांनी बोलताना केले. यावेळी भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसारवाडे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार, पंचायत समितीच्या सभापती सुनीता डौंड, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शितल केदार, आत्माराम कुंडकर, भाऊ वाघमारे, बाळासाहेब सोनवने, बाळासाहेब डोंगरे, आत्माराम कुंडकर, बाळासाहेब कोळगे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Election: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाथर्डीत भव्य निर्धार मेळावा…! Read More »

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा?

Rahul Gandhi:  लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर आहे. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये असणार आहे.  ते कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते आज सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी राहुल संविधान वाचवा परिषदेत सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. खालच्या जातींना 50 टक्के आरक्षण देण्याचे पहिले काम शाहूजी महाराजांनी 1902 साली कोल्हापुरात केले. आरक्षण देणाऱ्या भूमीवरून राहुल गांधी आपल्या प्रचाराची सुरुवात करत आहेत, त्यामुळे मोठा राजकीय संदेश जाईल, असे म्हणता येईल. घोषणा होण्यापूर्वीच तिकीट मागणाऱ्यांचा महापूर काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसकडे तिकिटांसाठी हजारो अर्ज येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे राज्यभरातून 1830 हून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक तिकीट अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून प्राप्त होत आहेत. या भागात दलित, मुस्लिम आणि मराठा काँग्रेस आणि आघाडीला पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 288 पैकी 100 ते 110 जागांवर निवडणूक लढवू शकते. अर्जाचा आकडा हरियाणापेक्षा जास्त अर्जांचा हा आकडा हरियाणाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हरियाणाच्या विधानसभेच्या 19 जागांसाठी सुमारे अडीच हजार अर्ज आले होते. तर महाराष्ट्रात हा आकडा घोषणेपूर्वीच 2000 च्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रात तिकिटासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीलाही नोंदणी शुल्क भरावे लागते. SC/ST उमेदवारांना 10,000 रुपये आणि सामान्य उमेदवारांना 20,000 रुपये भरावे लागतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी चांगली होती. काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. तर 65 टक्के विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर होती. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी आणि अर्जदारांची वाढलेली संख्या पाहता महाराष्ट्रात काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याचवेळी हरियाणातील प्रचार संपताच राहुल गांधींची महाराष्ट्रात सक्रियता काँग्रेसला येथेही विजयाचा वास येऊ लागल्याचा स्पष्ट संदेश आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा? Read More »

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर

Ahmednagar News: जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवषच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजाळणार आहे.  सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती. तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्या शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे. नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी औत्सुक्याची बाब. एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वषच पावसाची कृपा असते. नेहमी अवर्षणच असते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो.  पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली.  आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सांगितले. या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे गरजेचे आहे. सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते. त्यावरून किनारी रस्ता (कोस्टल रोड) तयार करता येऊ शकतो. त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो ही लक्षात येईल. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील 10 किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते.  तशी शहराभोवतालची नदीची लांबी 14 किलोमीटर आहे. या भागात तिची प्रस्तावित रुंदी 20 ते 30 मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे. पूव 09.70 किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरीत पुरे करावयाचे आहे. नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे. नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती. परंतु, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला. या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे. सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलेे. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Ahmednagar News: सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार, खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर Read More »

Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा

Iran-Israel Conflict :  इराणने इस्रायलला मोठा धक्का देत 400 मिसाईलने इस्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा नुकसान झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलला आपला पाठिंबा देत इराणला इशारा दिला आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की आज, माझ्या निर्देशानुसार, युनायटेड स्टेट्स सैन्याने इस्रायलच्या संरक्षणास सक्रियपणे पाठिंबा दिला आणि आम्ही अजूनही परिणामांचे मूल्यांकन करत आहोत. हा इस्रायलच्या लष्करी क्षमतेचा आणि अमेरिकन लष्कराचा दाखला आहे.   अमेरिकेचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा आहे. मी सकाळ आणि दुपारचा काही भाग माझ्या संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षा दलासह आणि इस्रायली लोकांशी सल्लामसलत करण्यासाठी सिच्युएशन रूममध्ये घालवला. राष्ट्रीय सुरक्षा दल इस्रायली अधिकारी आणि त्यांच्या समकक्षांच्या सतत संपर्कात आहे. मध्यपूर्वेतील घडामोडींवर अमेरिका लक्ष ठेवून आहे – बिडेन दरम्यान, इराणने इस्रायलवर केलेल्या बॅलेस्टिक मिसाईल हल्ल्यानंतर जो बिडेन म्हणाले की, अमेरिका मध्यपूर्वेत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे आणि इस्रायलच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. बिडेन म्हणाले की, उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि मी आमच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमशी बोललो आहोत की अमेरिका या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास आणि तेथील अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यास अमेरिका मदत करण्यास तयार आहे का. बिडेन यांनी आपल्या मुद्याचा पुनरुच्चार करत आम्ही पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी असल्याचे सांगितले. इराणी हल्ल्यादरम्यान, बिडेन यांनी अमेरिकन सैन्याला इराणी मिसाईल पाडण्याचे आदेश दिले. अमेरिकेने या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. त्याच वेळी, वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र मंत्रालयात भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीपूर्वी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, इराणने 5 महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्यांदा इस्रायलवर थेट हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हे अस्वीकार्य आहे आणि संपूर्ण जगाने त्याचा निषेध केला पाहिजे.

Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा Read More »

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Govind Helath Update: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा याच्या पायाला बंदुकीची गोळी असल्याची माहिती समोर आली आहे.  माहितीनुसार, स्वतःकडील बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबले गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि गोविंदा याच्या पायाला लागली.  यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून तो आता सुखरूप असल्याची देखील माहिती समोर आली आहे.  तर दुसरीकडे याप्रकरणी जुहू पोलीसने पुढील तपास सुरू केला आहे.

Govinda Health Update: मोठी बातमी, अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल Read More »

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध

Gondia News :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याला आदिवासींनी विरोध दर्शवला आहे.  त्यातच सोमवार 30 सप्टेंबर रोजी आदिवासी बहुल गोंदिया जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत विशाल आक्रोश मोर्चा काढून विरोध दर्शवला. तर आदिवासी समाजाच्या आरक्षणात घुसखोरी खपवून घेतली जाणारा नाही असा इशारा शासनाला दिला. त्यामुळे राज्य शासनापुढे आता मोठे पेच निर्माण झाले आहे. सकल धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती नेमण्याची घोषणा केली होती. तसेच धनगड व धनगर हा शब्द एकच असल्याचा जीआर काढण्याचीही तयारी दर्शवली होती. पण त्यांच्या या घोषणेला आदिवासी आमदारांकडून कडाडून विरोध केला जात आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी देखील धनगरांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिल्यास आपण मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देणार, असा इशारा दिला आहे.  असे असतानाच आता आदिवासी समाजकडूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे.  या अनुषंगाने सोमवारी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आदिवासी हक्क कृती समितीच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चा काढत विरोध दर्शवला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी आदिवासी हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेला मार्गदर्शन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Gondia News :  हजारो आदिवासी बांधव उतरले रस्त्यावर, सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा केला विरोध Read More »