DNA मराठी

राजकीय

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी….

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून सुरू राज्यात मराठा आरक्षणासाठी मागणी होत होती. आज या मागणीला पुर्ण करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण केली.  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले, मी…. Read More »

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण!

Talathi Bharti :  काही महिन्यापूर्वी झालेल्या तलाठी भरतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसने या भरतीमध्ये मोठी हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे.  या परीक्षेत बसलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने तलाठी भरती परीक्षेला मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसने नोकरभरती परीक्षेचा निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तलाठी नियुक्तीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावर सुमारे 20 ते 25 युवक काँग्रेस कार्यकर्ते जमले आणि त्यांनी दुपारी 3.15 वाजता बोरिवलीकडे जाणारी ट्रेन थांबवली.

Talathi Bharti : तलाठी भरतीत घोटाळा? उमेदवाराला चक्क 200 पैकी 214 गुण! Read More »

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Congress News : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  तर दुसरीकडे ममता आणि भगवंत मान यांनी बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.  जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि राजीव चंद्रशेखर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 7 महिन्यात काँग्रेसचा भ्रमनिरास वास्तविक, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न दिल्याच्या रागातून जगदीश शेट्टर यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गुरुवारी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेट्टर म्हणाले की, काही मुद्द्यांमुळे आपण काँग्रेसमध्ये गेलो होतो. पण, भाजपचे कार्यकर्ते त्यांना पक्षात परत येण्यासाठी सतत आग्रह करत होते, बीएस येडियुरप्पा, विजयेंद्र येडियुरप्पा आणि कर्नाटकचे भाजप नेतेही त्यांना भाजपमध्ये येण्यास सांगत होते. त्यामुळे काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याबाबत बोलताना शेट्टर म्हणाले की, पक्षाने (भाजप) त्यांना यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.  याआधी बीएस येडियुरप्पा आणि कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा केली.

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश Read More »

Loksabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार? उद्या होणार मोठा निर्णय

Loksabha Election 2024 : देशात येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सत्ताधारी पक्ष भाजपसह इतर पक्ष देखील जागावाटपाबाबत चर्चा करत आहे.  यातच राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा येत्या काही दिवसात सुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्या राज्याची राजधानी मुंबईमध्ये जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार गट), शिवसेना( ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. याच बरोबर बैठकीसाठी डाव्या पक्षांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत उद्या मतदारसंघनिहाय चर्चा होणार असून जर काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल.  तर चर्चांवर विश्वास ठेवला तर महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत 30 जागांचं वाटप झालं आहे. तर उद्या राहिलेल्या 18 जागांवर चर्चा होणार आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दिली जाणार आहे. तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे.

Loksabha Election 2024 : MVA मध्ये जागावाटपाचा तिढा सुटणार? उद्या होणार मोठा निर्णय Read More »

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत्या काही दिवसात पायी दाखल होणार आहे. यासाठी पाटील यांनी 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात केली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल झाली होती. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम झाला तर आता पाटील अहमदनगर शहरातून पुण्याकडे रवाना झाले आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येत नागरिक पनवेलसाठी रवाना होणार आहे. यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातून 100 पेक्षा जास्त बसेस बूक झाले असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. याच बरोबर येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार असल्याची देखील महिती संघटनेने दिली.

Maratha Reservation: अहमदनगर जिल्ह्यातून मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार ‘इतक्या’ बसेस Read More »

Ram Mandir: राम मंदिर तयार करण्यासाठी वापरले नाही लोखंड आणि स्टील, ‘हे’ आहे कारण

Ram Mandir : संपूर्ण देश प्रभू रामाच्या स्वागतासाठी तयारी करत आहे. हे जाणुन घ्या, 22 जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहेत. देशभरातील लोकांना सोमवारी राम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने 22 जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रमध्ये एक दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  अद्वितीय डिझाइन देशातील प्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रकांत बी सोमपुरा यांनी भव्य राम मंदिराची रचना केली आहे. चंद्रकांत यांची मुले निखिल आणि आशिष सोमपुरा यांनीही या उज्ज्वल योजनेत हातभार लावला आहे. श्रद्धेच्या या निर्णायक क्षणी चंद्रकांत बी सोमपुरा यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या कौशल्यामुळे या मंदिराचे वेगळेपण प्राप्त झाले आहे. चंद्रकांत बी सोमपुरा यांचे पुत्र आशिष सोमपुरा यांच्या म्हणण्यानुसार, राम मंदिराची रचना एका नवीन दृष्टिकोनाने करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रथमच 3D संरचनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. या कौशल्यामुळे या मंदिराला स्थैर्य आणि नावीन्यपूर्णता सोबतच धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  राम मंदिराच्या बांधकाम नियोजनात गेलेल्या 3D संरचनात्मक विश्लेषणाने हे सुनिश्चित केले आहे की मंदिर 25,000 वर्षे त्याची स्थिरता टिकवून ठेवेल. या बांधकामात उच्च दर्जाबरोबरच देशी-विदेशी कारागिरांचेही महत्त्वाचे योगदान आहे. समृद्धीकडे वाटचाल करताना, राम मंदिराचे बांधकाम हे समर्थन आणि एकतेचे प्रतीक आहे, जे भारतीय समाजाला भक्कम भविष्याकडे नेणारे आहे. चंद्रकांत सोमपुरा यांनी केली अनोखी रचना! राम मंदिराच्या मूळ रचनेत तज्ज्ञ चंद्रकांत सोमपुरा यांनी बदल करून ते आणखी भव्य बनवले आहे. त्यांचा मुलगा आशिष यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात सुरुवातीला दोन मंडप ठेवण्याची योजना होती, मात्र आता त्यात पाच मंडपांचा समावेश करण्यात आला आहे. रामललाचा भव्य महाल! 12 फूट उंच व्यासपीठावर रामललाचा महाल अभिमानाने उभा आहे. पाच मंडपांची सुंदर रचना आणि 161 फूट उंचीवर असलेल्या गरबा गृहाचे शिखर मंदिराला अनोखे रूप देते. आशिषच्या मते, राम मंदिराचे बांधकाम तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी अचूक असून बाह्य तापमानाचा प्रभाव कमी करण्यासाठी फाउंडेशनमध्ये सेल्फ-कॉम्पॅक्ट कॉंक्रिटचा वापर केला जातो. मंदिराच्या रचनेने हे सुनिश्चित केले आहे की ते 6.5 तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकते, ज्यामुळे ते विशेष आणि अत्यंत सुरक्षित आहे

Ram Mandir: राम मंदिर तयार करण्यासाठी वापरले नाही लोखंड आणि स्टील, ‘हे’ आहे कारण Read More »

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी करिता आमरण उपोषणसाठी लवकरच मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल होणार आहे. आरक्षणासाठी पाटील पायी मुंबईला जाणार आहे. या वारीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे. पाटील 20 जानेवारी 2024 ला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या वारीची सुरुवात करणार आहे.  तर अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी रोजी ही वारी दाखल होणार आहे. अहमदनगर शहराच्या नजीक असणाऱ्या बारा बाभळी मदरसा परिसरात पाटील यांचा रात्री मुकाम असणार आहे.  तर याच ठिकाणी पाटिल एक सभा देखील घेणार असून या सभेमध्ये तब्बल 20 ते 25 लाख लोक सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. पाटील यांच्यासोबत असणाऱ्या नागरिकांच्या चहा पाण्याची , नाश्त्याची तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  पाटील यांच्या होणाऱ्या सभामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा आवाहन संघटनेकडून करण्यात आला आहे.

Maratha Reservation: बारा बाभळी मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा! जाणुन घ्या संपूर्ण कार्यक्रम Read More »

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.  संपूर्ण वेळापत्रक मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.  दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा) 21 जानेवारी मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.   तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. 22 जानेवारी बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 23 जानेवारी रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 24 जानेवारी चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा) 25 जानेवारी  लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)  26 जानेवारी वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक Read More »

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट

Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.  त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.  किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली. या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला  समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.  तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी  काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: जय श्रीराम म्हणत अण्णांनी स्वीकारली खा.सुजय विखे यांनी दिलेली साखर भेट Read More »

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील

Ahmednagar News:  22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा व राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. त्या घारगाव ता. श्रीगोंदा येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन आणि साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रतापसिंह पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. अयोध्यातील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घारगाव येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता देखील करण्यात आली. यावेळी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते व ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला होता.  22 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना आपल्या गावातील मंदिराची स्वच्छता तसेच सुशोभीकरण करून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने सर्वांनी ठिकठिकाणी मंदिरांची स्वच्छता केली जात आहे.  आपणही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध उपक्रम राबवावे असे त्यांनी जनतेला संबोधताना स्पष्ट केले. तसेच आज श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याबद्दल त्यांनी नागरिकांचे मनस्वी आभार मानले व असेच प्रेम आमच्या विखे पाटील परिवारावर कायमस्वरूपी असू देत असे मत व्यक्त केले.

Ahmednagar News:  अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा: धनश्री विखे पाटील Read More »