DNA मराठी

ताज्या बातम्या

धक्कादायक, प्रसूती रुग्णालयात महिलांचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवणाऱ्या 3 जणांना अटक

Gujarat Crime: गुजरातमधील एका रुग्णालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून महिला रुग्णांचे खाजगी व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्रातील दोघांना आणि उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने महिला रुग्णांच्या क्लिप्स मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय हॅकरची मदत घेतली होती. रुग्णालयातील प्रसूती कक्षात डॉक्टर महिला रुग्णांची तपासणी करत असल्याचे व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी 17 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये, महिला रुग्णांना महिला डॉक्टर तपासणी करताना किंवा रुग्णालयाच्या बंद खोलीत परिचारिका इंजेक्शन देताना दिसत आहे. अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचने सांगितले की, तपासात असे दिसून आले आहे की व्हायरल व्हिडिओ राजकोट येथील ‘पायल मॅटर्निटी होम’ रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजचा भाग आहेत. त्यात म्हटले आहे की काही हॅकर्सनी रुग्णालयातील सीसीटीव्ही सिस्टीम तोडली आणि फुटेज मिळवले. नंतर हे व्हिडिओ क्लिप यूट्यूब आणि टेलिग्रामवर शेअर करण्यात आले. टेलिग्रामवर एक ग्रुप तयार करण्यात आला जिथे हे व्हिडिओ शेअर केले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रत्येक व्हिडिओसाठी 2000 रुपये मागितले जात होते. सायबर पोलिसांनी ही टोळी चालवणाऱ्या तीन जणांना ओळखले आणि त्यांना अटक केली. आरोपींची ओळख पटली आहे टी. प्रज्वल तेली, रा. लातूर, महाराष्ट्र, प्राज पाटील, रा. सांगली आणि चंद्र प्रकाश, रा. उत्तर प्रदेश अशी आहे. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी व्हिडिओ मिळवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय हॅकरची मदत घेतली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे क्लिप विकण्याचा प्रयत्न केला. सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू असून अनेक धोकादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

धक्कादायक, प्रसूती रुग्णालयात महिलांचे प्रायव्हेट व्हिडिओ बनवणाऱ्या 3 जणांना अटक Read More »

Sangram Jagtap: महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज; आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap: 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पवित्र सोहळ्याचा एक भाग म्हणून अहिल्यानगरमध्ये पारंपारिक पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका, शिवजन्म सोहळा आणि महाराजांना मानवंदना देण्याचे कार्यक्रम समाविष्ट होते. अहिल्यानगरमधील शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी या संदर्भात बोलताना असे म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आणि देशाचे महापुरुष आहेत. त्यांच्या विरोधात बोलणे हे निश्चितपणे अनुचित आहे. अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा असणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात असे प्रकार टाळता येतील.” या कार्यक्रमादरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही उपस्थिती लावली आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी… हर हर महादेव” अशा घोषांनी वातावरण गुंजून गेले. वाहतूक व्यवस्था आणि सुविधाशिवनेरी किल्ल्यावर होणार्‍या शिवजयंती उत्सवासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी विशेष वाहतूक व्यवस्था करण्याचे आदेश जारी केले होते. नारायणगावहून जुन्नरकडे येणारी वाहतूक घोडेगाव फाटा-खानापूर कॉलेज-धामणखेल मार्गे ताठेड पार्किंग लॉटकडून शिवनेरी किल्ल्यावर जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेशखिंड-बंकाफाटा-ओतूर मार्गे येणारी वाहने मुंढे माध्यमिक शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये पार्क करतील, असे निर्देश होते. सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुविधाशिवजयंती निमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायगडावरही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावली होती. निर्मिती आणि स्वच्छतासोलापूरच्या कलाकारांनी 21000 बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली होती. याव्यतिरिक्त, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी शिवनेरी, राजगड आणि पुरंदर सारख्या किल्ल्यांची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

Sangram Jagtap: महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज; आमदार संग्राम जगताप Read More »

Eknath Shinde: सकाळ – संध्याकाळ तुम्ही शिव्या देताय; ‘त्या’ प्रकरणात शिंदेंचा उबाठाला टोला

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उंच भरारी घेण्यासाठी गरुड (बाज) बनावे लागेल, धोकेबाज बनून चालणार नाही, आताच समुद्र पार केलाय, अजून अवकाश बाकी आहे अशा पंक्तींमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये आयोजित मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सरकारने मुंबई आणि राज्यात केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जा. प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथे शिवसैनिक झाला पाहिजे. विधानसभेत एक झटका दिलाय आणि मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्याना केले. शिवसेना वाढवायची आहे. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वॉर्डात मतदार यादीतील 123 नावे सदस्य म्हणून नोंदवायची तसेच प्रत्येक वॉर्डात 10 हजारांहून अधिक सदस्यांची नोंदणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी उबाठा गटाचे विलेपार्ले उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे, युवती सेनेच्या अजिता जनावळे, उपविभागप्रमुख अनिल खांडेकर, हनी सबलो, शरद पवार गटाचे मुंबई सचिव सतीश नायर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते पुढे म्हणाले की, निवडणुका आल्या की मुंबई तोडणार अशी भाषा काहीजण करतात पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर कोणीही मुंबई आपल्यापासून तोडू शकत नाही. सरकार रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देणार आहे आणि बाहेर फेकलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणणार असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रीत, एमआयडीसी अशा सर्व विभागांना एकत्र करुन ठाण्याप्रमाणेच मुंबईतही क्लस्टरच्या माध्यमातून विकास सुरु केला आहे. आपल्या सरकारने मुंबईत 7 एसटीपी केले. येत्या तीन चार वर्षात समुद्रात जाणारे काळे पाणी प्रक्रिया करुन सोडले जाईल आणि मुंबईच्या समुद्राचे पाणी निळेशार होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्ते दोन टप्प्यात काँक्रीटचे होणार आहेत. मात्र मुंबईच्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली काहीजणांनी आतापर्यंत 3500 कोटी खाल्ले, अशी टीका शिंदे यांनी उबाठावर केली. सरकारने राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरु केले आहेत. मुंबईत 300 एकरचे सेंट्रल पार्क होणार आहे. मात्र काहींनी साट्यालोट्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घेण्याची हिंमत दाखवली नव्हती पण आपण रेसकोर्सची 120 एकर जागा मिळवली, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री असताना मी मुंबईचे रस्ते धुतले आणि प्रदूषण कमी केले पण तुम्ही मात्र इतकी वर्ष तिजोरीची सफाई केली अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली विधानसभेत पहिल्याच भाषणा घोषणा केली होती महायुतीच्या 200 हून अधिक जागा निवडून आणू नाहीतर गावी शेती करायला जाईन. पण राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या जेष्ठांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोण हे निवडणुकीत दाखवून दिले. खोके खोके आरोप करणाऱ्यांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीत खोक्यांमध्ये बंद करुन टाकले. एकनाथ शिंदेवर विश्वास टाकला तर जीवाची बाजी लावतो. आम्ही खुर्चीसाठी नाही तर माणसे शोधतो. पदासाठी कधीही मागणी नाही केली किंवा कुठलीही तडजोड केली नाही, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा उठाव केला. धर्मवीर आनंद दिघेंची शिकवण पाठिशी आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्यांना बाळासाहेबांचे विचार नकोत तर प्रापर्टी पाहिजे, असा टोला शिंदे यांनी उबाठाला लगावला. ते पुढे म्हणाले की, या देशाला हिंदुत्वाचे विचार देणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपल. ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. तुम्ही सहकाऱ्यांना नोकर समजायला लागलात. मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. दिल्लीत राज्यप्रमुखांची बैठक घेतली तेव्हा त्यांनी एका राज्यप्रमुखाला फोन केला आणि म्हणाले मालकासोबत राहणार की नोकराबरोबर जाणार अशी तुम्ही तुलना केली. अशाने पक्ष कधीच वाढणार नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. शिवसेना बाळासाहेबांनी जीवापाड जपली. शिवसैनिकांना जपले म्हणून आपण बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे विचार जपले. राज्यात सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आणले. उठावानंतर झालेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत येत आहे मात्र तुमच्याकडून का जात आहेत याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्ला शिंदे यांनी दिला. घटनाबाह्य किती बोलणार, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो पण या महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी जन्माला आलोय, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठणकावून सांगितले. महापराक्रमी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मला मिळाला. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाचा सत्कार केला. पण मला शिव्या देताना त्यांनी महादजी शिंदे यांच्या वशजांचा अपमान. साहित्यिकांचा अपमान आणि ज्यांच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांचाही अपमान केला. गरज सरो वैद्य मरो अशी तुमची वागणूक आहे, असे ते म्हणाले. महायुतीत तिनही पक्ष काम करत आहेत. कोणतेही कोल्ड वॉर नाही तर विकास विरोधी काम करणाऱ्यांच्या विरोधात आमचे युद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अयोध्येत भव्य राममंदीर आणि काश्मिरमधील कलम 370 हटवायचे असे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले पण सकाळ संध्याकाळ त्यांनाही तुम्ही शिव्या देताय. उठता बसता तुम्ही शिव्या देताय तुमची शिव्यासेना झालीय का असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

Eknath Shinde: सकाळ – संध्याकाळ तुम्ही शिव्या देताय; ‘त्या’ प्रकरणात शिंदेंचा उबाठाला टोला Read More »

Maharashtra Government: राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; 364 पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी

Maharashtra Government: राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या 364 पदांना व त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत. नियमित पदे पुढीलप्रमाणे (पदनाम आणि संख्या) – विशेष पोलीस महानिरीक्षक- एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक-तीन, अपर पोलीस अधीक्षक-तीन, पोलीस अधीक्षक- 10, पोलीस निरीक्षक 15, सहाय्यक पोलीस निरीक्षक – 15, पोलीस उपनिरीक्षक – 20, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – 35, पोलीस हवालदार – 48, पोलीस शिपाई – 83, चालक पोलीस हवालदार -18, चालक पोलीस शिपाई -32, कार्यालय अधीक्षक – एक, प्रमुख लिपीक – दोन , वरिष्ठ श्रेणी लिपीक -11, कनिष्ठ श्रेणी लिपीक – सात, उच्च श्रेणी लघुलेखक – दोन, निम्न श्रेणी लघुलेखक – तीन.बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने) वैज्ञानिक सहाय्यक-तीन, विधी अधिकारी – तीन, कार्यालयीन शिपाई -18, सफाईगार – 12 एकूण – 36. यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्च रुपये 19, 24, 18,380 रुपये (एकोणीस कोटी चोवीस लाख अठरा हजार तीनशे ऐंशी रुपये) तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास 3,12,98,000 ( तीन कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये) मान्यता देण्यात आली. सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापनातर याच बरोबर सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत असेल. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. आयोगाच्या सदस्य सचिव पदावर भारतीय प्रशासन सेवेतील कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीच्या अधिकारीच्या श्रेणी पेक्षा कमी नसेल किंवा समतुल्य दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. आयोगाच्या कालावधीत आवश्यक पद निर्मिती करण्यास, आयोगाचे कामकाज अधिक परिणामकारकरीत्या चालण्यासाठी आवश्यक कार्यालय आणि आवर्ती अनावर्ती खर्चाकरिता पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली.सहावा राज्य वित्त आयोग पंचायती व नगरपालिका यांच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करून पुढील बाबींच्या संबंधात शिफारशी करील. राज्याकडून वसूल करण्यात यावयाच्या कर, शुल्क, पथकर व फी यांच्यापासून मिळणाऱ्या संविधानाच्या भाग नऊ व नऊ-अ अन्वये, पंचायती व नगरपालिका यांच्यात विभागून द्यावयाच् निष्वळ उत्पन्नाचे राज्य, पंचायती व नगरपालिका यांच्यात विभागणी करणे व अशा उत्पन्नाती पंचायती व नगरपालिका यांच्या सर्व स्तरांवरील त्यांच्या त्यांच्या हिश्श्यांचे वाटप करणे. पंचायती किंवा यथास्थिती, नगरपालिका यांच्याकडे अभिहस्तांकित करण्यात येतील, किंवा यथास्थिती, पंचायती किंवा नगरपालिका यांच्याकडून ज्यांचे विनियोजन करण्यात येईल असे कर, शुल्क, पथकर व फी निर्धारित करणे. पंचायती किंवा यथास्थिती, नगरपालिका यांना राज्याच्या एकत्रित निधीमधून देण्यात यावयाच्या सहाय्यक अनुदान यांचे नियमन करणारी तत्त्वे ठरविणे. पंचायती व नगरपालिका यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना. आयोगाला पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निधी व्यवस्थापनासाठी चांगल्या कार्यपद्धती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी इतर काही संबंधित बाबीसंदर्भात शिफारशी करता येतील. आयोगास केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन त्यांच्या शिफारशी करता येतील.या निरनिराळ्या बाबींवरील शिफारशी करतेवेळी करातील हिस्सा, शुल्क व सहाय्यक अनुदान निर्धारित करताना लोकसंख्या आधारभूत घटक असेल. त्याकरिता आयोग सन 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येची आकडेवारी विचारात घेईल.

Maharashtra Government: राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; 364 पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी Read More »

Ambadas Danve : खरपुडी प्रकल्प व्यावसायिक, दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

Ambadas Danve : जालना जिल्ह्यात खरपुडी येथे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असतानाही संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही व्यावसायिक व दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा, गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने जालना जिल्ह्यात खरपुडी येथे नवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मागील काही वर्षांत विविध प्रशासकीय आणि आर्थिक टप्प्यांवर निर्णय घेतले गेले. तथापि, या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सदर प्रकल्पाची संकल्पना 2018 साली सिडकोने मांडली होती. त्यानंतर प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी Ernst & Young या आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. त्या संस्थेने दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी सादर केलेल्या अहवालात हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे शासनाने दिनांक 9 जुलै 2020 रोजी हा प्रकल्प निरधिसूचित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सन 2022 आणि सन 2023 मध्ये सिडको व शासनाकडून या प्रकल्पाच्या पुनरावलोकनास सुरुवात झाली. सन 2023 मध्ये KPMG या संस्थेच्या नव्या अहवालाच्या आधारे सन 2024 मध्ये प्रकल्पास अंतिम मान्यता देण्यात आली. ही बाब लक्षात घेता एखादा प्रकल्प पूर्वी व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही वर्षांत तो अचानक व्यवहार्य कसा ठरतो ? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. नवीन अहवाल आणि पूर्वीच्या अहवालातील तफावत काय आहे, हे शासनाने पारदर्शकपणे स्पष्ट करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच हा प्रकल्प सुरु होण्याच्या आधीच काही व्यवसायकांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध असल्यामुळे सदरहू प्रकल्पाचा आराखडा त्यांना उपलब्ध करुन दिला. त्यामुळे त्या व्यावसायिकांनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी स्थानिकांकडून कमी दराने विकत घेतलेल्या आहेत. त्याच जमिनींना आता मोठ्याप्रमाणात दर मिळत आहेत. परिणामी, दलाल आणि मोठ्या हितसंबंधी गटांना आर्थिक फायदा होणार आहे, त्यामुळे मूळ भूधारक आणि शेतकरी वर्ग आर्थिक लाभापासून वंचित राहणार आहेत. ज्या पद्धतीने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे, ती प्रक्रियाही संशयास्पद असल्याचे दानवे यांनी म्हटले. आधीच अव्यवहार्य ठरलेल्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी निधी खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे सदर निधी अन्य पायाभूत सुविधांसाठी वापरणे अधिक हिताचे ठरेल. सदर प्रकल्प राबविण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या प्रक्रियेची उच्च स्तरीय समिती कडून चौकशी करुन अपारदर्शक प्रक्रिया टाळण्यासाठी सदरहू प्रकल्प तात्काळ रद्द करावा. हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी लेखी पत्राद्‍वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Ambadas Danve : खरपुडी प्रकल्प व्यावसायिक, दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप Read More »

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले ” बसपोर्ट ” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी दळणवळणचा सुंदर मिलाफ असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेताना बोलत होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) दिनेश महाजन (महाव्यवस्थापक बांधकाम) हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक झाली . या बैठकीत दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नागार्जन यांनी शिष्टमंडळाला त्यांच्या परिवहन सेवेची माहिती दिली. त्यामध्ये गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली अत्यंत चांगली असुन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये देखील अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे. असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. यावेळी गुजरात मधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी मंत्री सरनाईक व त्यांच्या शिष्ठमंडाळाने केली. यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळात दिली. विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर थोडेशा विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना ” प्रवासी विश्रांतीगृह ” कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत, त्याचे कौतुक मंत्री सरनाईक यांनी केले .तसेच गुजरात परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक बसेसची पाहणी देखील त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा, जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती. इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का? याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली आहे.

Pratap Sarnaik : व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात बसपोर्ट; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक Read More »

Delta Plane Crash : कॅनडामध्ये विमान अपघात, 80 प्रवाशांसह विमान लँडिंग दरम्यान उलटले

Delta Plane Crash : कॅनडामध्ये मंगळवारी सकाळी एक मोठा विमान अपघात झाला. माहितीनुसार, टोरंटो विमानतळावर डेल्टा विमान कोसळले आणि पलटी झाले. 19 जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. हे विमान अमेरिकेतील मिनियापोलिसहून टोरंटोला जात होते. विमानामध्ये 80 लोक होते. यूएस सननुसार, 19 जणांवर जखमींवर उपचार करण्यात आले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तो ट्रॉमा सेंटरमध्ये आहे. आपत्कालीन पथके त्यांचे काम करत आहेत. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा शोध घेण्यात आला आहे. अपघातानंतर एका मुलाला बाल रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत कोणीही मृत्युमुखी पडलेले नाही. सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका भयानक व्हिडिओमध्ये, विमान बर्फाळ धावपट्टीवर पूर्णपणे उलटे पडलेले दिसत आहे. या भयानक दृश्यानंतर, विमानात धुराचे लोट पसरले. जॉन नेल्सन नावाच्या एका प्रवाशाने फेसबुकवर या भयानक दृश्याचा व्हिडिओ शेअर केला. आम्ही नुकतेच उतरलो, असे त्यांनी विमान उलटे दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले. आमचे विमान कोसळले, ते उलटे आहे. अग्निशमन विभाग घटनास्थळी आहे. बहुतेक लोक ठीक वाटतात. आपण सर्वजण खाली उतरत आहोत, धूर निघत आहे. विमानात 76 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते असं त्याने सांगितले.

Delta Plane Crash : कॅनडामध्ये विमान अपघात, 80 प्रवाशांसह विमान लँडिंग दरम्यान उलटले Read More »

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार

Gyanesh Kumar : देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहे. मात्र त्यांच्या नियुक्तीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असहमती व्यक्त केली आहे आणि यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा हवाला दिला आहे. त्याचबरोबर या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. ते 19 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. त्यांच्या जागी डॉ. विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवड समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. ज्ञानेश कुमार कोण आहेत?ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली. याआधी त्यांनी गृह मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांची गणना एक अनुभवी आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून केली जाते. राहुल गांधींनी व्यक्त केली असहमतीराहुल गांधी यांनी या नियुक्तीबाबत असहमती व्यक्त करत सरकारवर घाईघाईने निर्णय घेतल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालय 19 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, त्यामुळे सरकारने ही बैठक पुढे ढकलायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज पडू नये म्हणून सरकारने जाणीवपूर्वक ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस नेते अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी आणि गुरदीप सप्पल यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, 2023 ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन?काँग्रेसचा आरोप आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले होते की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती असावी. परंतु, नवीन कायद्यात सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले, ज्यामुळे सरकारला बहुमत मिळाले. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “जर नियुक्तीची प्रक्रिया केवळ कार्यकारी मंडळ (सरकार) द्वारे असेल, तर त्यामुळे आयोग पक्षपाती होईल आणि निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.” निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात ?विरोधकांचा दावा आहे की सरकारने असा निवडणूक आयुक्त नियुक्त केला आहे जो कधीही सरकारच्या विरोधात जाणार नाही. ते म्हणतात की जर ही निवड प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर त्याचा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर आणि निष्पक्षतेवर दीर्घकालीन परिणाम होईल.

Gyanesh Kumar : मोठी बातमी, ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त, ‘या’ दिवशी पदभार स्वीकारणार Read More »

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

IPL 2025 : बीसीसीआयने IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर केले. 22 मार्चपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आयपीएल 2024 विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे. यावेळी हंगामात एकूण 74 सामने खेळवले जातील, जे देशातील 13 वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. यावेळी 12 डबल हेडर सामने आयोजित केले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे 2025 रोजी होईल. कोलकाताने शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला हरवून विजेतेपद जिंकले होते. यावेळी संघ 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर 5 वेळा विजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 23 मार्च रोजी दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. नेहमीप्रमाणे, लीगचे संध्याकाळचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील, तर डबल-हेडरच्या दिवशी, दिवसाचा पहिला सामना दुपारी 3. 30 वाजता सुरू होईल. स्पर्धेत 70 लीग सामन्यांनंतर एक दिवस विश्रांती असेल आणि त्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचलेले 4 संघ क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 सामने खेळतील आणि दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. 22 मार्च ते 25 मे दरम्यान फक्त 3 दिवस असे असतील जेव्हा स्पर्धेचा कोणताही सामना खेळवला जाणार नाही. तीन दिवसांच्या लीग टप्प्यानंतरचा हा दिवस आहे. त्यानंतर एलिमिनेटर नंतर, क्वालिफायर 2 च्या आधीचा दिवस आणि शेवटी अंतिम सामन्याच्या आधीचा दिवस असा असेल जेव्हा खेळ होणार नाही. https://twitter.com/IPL/status/1891108307756015779?t=sP7AKzjjV1gsvJY0NoZV8A&s=19 लीगच्या इतिहासात 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच लीगचा अंतिम सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. येथे शेवटचा अंतिम सामना 2015 मध्ये खेळला गेला होता, जेव्हा मुंबईने चेन्नईचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले होते.

IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात Read More »

Delhi NCR Earthquake: राजधानी दिल्ली हादरली, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट

Delhi NCR Earthquake: सोमवारी सकाळी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. भूकंप इतका तीव्र होता की अनेक लोक भूकंपाच्या धक्क्याने जागे झाले. काही सेकंद पृथ्वी हादरत राहिली. लोक घाबरून घराबाहेर पडले. 4.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाने दिल्ली-एनसीआर हादरले भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती आणि त्याचे केंद्र दिल्लीजवळ होते, त्यामुळे भूकंपाचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपांसोबतच एक विचित्र आवाजही ऐकू आला, जणू काही काहीतरी तुटत आहे, ज्यामुळे त्यांच्यातील भीती आणखी वाढली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, सोमवारी पहाटे 5.36 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 होती आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 5 किलोमीटर खोलीवर होता. आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झालेले नसले तरी, भूकंपामुळे लोक घाबरले आहेत. दिल्ली, नोएडा, गुडगाव, गाझियाबाद, फरीदाबाद येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Delhi NCR Earthquake: राजधानी दिल्ली हादरली, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट Read More »