DNA मराठी

ताज्या बातम्या

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो

KKR vs SRH: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे कोलकाताने चांगली धावसंख्या उभारली. 29 चेंडूत 60 धावा अय्यरने 29 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावा केल्या तर रिंकू सिंगने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने 32 चेंडूत 50 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने 78 धावा जोडल्या. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांना पराभूत केले होते. हैदराबादला विजयासाठी 201 धावांची आवश्यकता होती, पण कोलकाताच्या गोलंदाजी समोर त्यांचा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यामुळे संपूर्ण संघ 120 धावांवर ऑल आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरलेहैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लवकर बाद झाले. पहिल्या षटकात हेडने चौकार मारला पण पुढच्या षटकात हर्षित राणाने त्याला झेलबाद केले. दुसऱ्याच षटकात राणाने अभिषेकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी देखील लवकर बाद झाले. हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 33 धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो Read More »

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत 128 मतांनी मंजूर, विरोधात किती मते?

Waqf Amendment Bill In Rajya Sabha: गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला वक्फ (सुधारणा) विधेयक, 2025 मंजूर लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाला आहे. राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली तर 95 खासदारांनी विरोधात मतदान केले. दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याने आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर हे विधेयक कायद्याचे रूप घेईल. गुरुवारी लोकसभेतही या विधेयकावर चर्चा झाली. लोकसभेत 288 खासदारांनी पाठिंबा दिला तर 232 जणांनी विरोध केला. किरण रिजिजू यांनी सरकारची बाजू मांडलीराज्यसभेत चर्चेदरम्यान, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले की हे विधेयक विविध भागधारकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आले आहे. ते म्हणाले, “वक्फ बोर्ड ही एक वैधानिक संस्था आहे आणि प्रत्येक सरकारी संस्था धर्मनिरपेक्ष असली पाहिजे.” वक्फ बोर्डात बिगर-मुस्लिमांच्या सहभागावर भर देताना रिजिजू म्हणाले की, 22 सदस्यांपैकी फक्त 4 सदस्य गैर-मुस्लिम असतील. विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “भाजप नाही तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मुस्लिमांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.” मुस्लिमांच्या स्थितीवर काँग्रेस कोंडीत सापडलीकिरण रिजिजू म्हणाले, “तुम्ही (विरोधी पक्ष) मुस्लिमांना मुख्य प्रवाहापासून वेगळे करत आहात. 60 वर्षे काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशावर राज्य केले, परंतु मुस्लिमांसाठी काहीही विशेष केले नाही. आजही हा समुदाय गरिबीत जगत आहे.” ते म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांच्या उन्नतीसाठी काम करत आहे. विधेयकातील प्रमुख तरतुदीवक्फ न्यायाधिकरणांना अधिकार दिले जातील आणि त्यांचा कार्यकाळ स्पष्टपणे परिभाषित केला जाईल.वक्फ बोर्डांना अनिवार्य योगदान 7% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आले आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे ऑडिट राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ऑडिटर्सकडून केले जाईल. वक्फ घोषणेपूर्वी महिलांना त्यांचा वारसा मिळू शकेल अशी तरतूद या विधेयकात आहे. तसेच, विधवा, घटस्फोटित महिला आणि अनाथ मुलांसाठी विशेष तरतुदी जोडण्यात आल्या आहेत. सरकारी मालमत्तेवरील वक्फ दाव्याच्या चौकशीची तरतूदसरकारी मालमत्तेवर केलेल्या वक्फ दाव्यांची चौकशी जिल्हाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्याकडून केली जाईल. तसेच, सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय आणि राज्य वक्फ बोर्डांमध्ये गैर-मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत 128 मतांनी मंजूर, विरोधात किती मते? Read More »

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत, अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली Read More »

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला

Trump Tariffs Rules : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपासून नवीन टॅरिफ नियम लागू केले आहे. त्यामुळे आता याचा जगाच्या अर्थव्यस्थेवर काय परिणाम होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26% कर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाचे वर्णन अमेरिकेच्या “आर्थिक स्वातंत्र्या”कडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले आहे.या नवीन धोरणांतर्गत, चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांवर कठोर आयात कर लादण्यात आले आहेत. चीनवर 34%, बांगलादेशवर 37% आणि पाकिस्तानवर 29% कर लादण्यात आला आहे. तर युरोपियन युनियन, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांवर वेगवेगळ्या दराने शुल्क लादण्यात आले आहे. भारतावर 26% कर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेला बऱ्याच काळापासून व्यापार पातळीवर तोटा सहन करावा लागत आहे. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन वस्तूंवर 52% कर लादतो, म्हणून अमेरिकेने भारतावर 26% कर लादून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या देशांवर किती शुल्क आकारले गेले? ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या चार्टनुसार, हे नवीन शुल्क वेगवेगळ्या देशांवर लादण्यात आले आहे. चीन: 34% युरोपियन युनियन: 20% दक्षिण कोरिया: 25% भारत: 26% व्हिएतनाम: 46% तैवान: 32% जपान: 24% थायलंड: 26% स्वित्झर्लंड: 31% इंडोनेशिया: 32% मलेशिया: 24% कंबोडिया: 49% युनायटेड किंग्डम: 10% दक्षिण आफ्रिका: 30% ब्राझील: 10% बांगलादेश: 37% सिंगापूर: 10% इस्रायल: 17% फिलीपिन्स: 17% चिली: 10% ऑस्ट्रेलिया: 10% पाकिस्तान: 29% तुर्की: 10% श्रीलंका: 44% कोलंबिया: 10% कॅनडा आणि मेक्सिकोसाठी विशेष सूट या नवीन टॅरिफ धोरणात कॅनडा आणि मेक्सिकोला विशेष सूट देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की हे दोन्ही देश आधीच USMCA करारांतर्गत येतात, ज्यामुळे त्यांना या नवीन शुल्कातून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले, “आपण अनेक देशांना सबसिडी देतो, पण आता आपल्याला आपल्याच देशाचा विचार करावा लागेल.”

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला Read More »

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.बैठकीत बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या समुच्चयकांकडून (Aggregators) इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. हा पर्याय पर्यावरणपूरक व रोजगार उपलब्ध करून देणारा हा पर्याय आहे. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे. या धोरणांतर्गत सेवा देणाऱ्या अँग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवाशी या दोन्हींकरिता विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबातच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ९४३ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा निधी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. सध्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १ हजार ८८६ कोटी ५ लाख रुपये इतका असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने २८८ कोटी ८५ लाख रुपये वितरित केले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्हा रेल्वे मार्गाने जोडला जाईल, ज्यामुळे येथील विकास प्रक्रियेला गती मिळेल आणि वाहतूक सुलभ होईल.

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय Read More »

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप

Sanjay Raut on PM Modi: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आडवाणी यांची तुलना मुघल सम्राट शहाजहान यांच्याशी केली असून, त्यांना जिवंत असताना सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप केला. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले – राऊतांचा आरोपसंजय राऊत म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना त्यांना शहाजहानाप्रमाणे कोंडून ठेवण्यात आले आणि नरेंद्र मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. मुघली संस्कृतीप्रमाणे त्यांना सत्तेपासून बेदखल करण्यात आले. तेव्हा आम्ही विचारले होते की, मुघली संस्कृतीप्रमाणे का वागले? आडवाणी यांचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदावर हक्क होता. तो त्यांना का दिला नाही?” राऊत यांनी हा सवाल उपस्थित करत भाजपच्या अंतर्गत धोरणांवर टीका केली. मोदींची निवृत्ती आणि फडणवीसांचे मतराऊत यांनी पुढे नरेंद्र मोदी यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “17 सप्टेंबर 2025 रोजी नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटत असले तरी त्यांना निवृत्त व्हावे लागेल.” राऊत यांचे हे वक्तव्य फडणवीस यांच्या त्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यात त्यांनी मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील, असे म्हटले होते. राऊत यांनी यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दावा केला. भाजप-संघ संबंधांवर मौनभाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यातील संबंधांबाबत राऊत यांनी भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले, “भाजप आणि संघ यांच्यातील संबंध कसे असावे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाने बोलण्याची गरज नाही.” राऊत यांनी यावर तटस्थ भूमिका घेतली असली तरी त्यांच्या इतर वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा तापली आहे. राजकीय वादाला तोंडराऊत यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होण्याची शक्यता आहे. आडवाणी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा मुद्दा आणि मोदी यांच्या निवृत्तीचा प्रश्न यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, या विधानांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे.

आडवाणींना सत्तेपासून दूर ठेवले अन्…, राऊतांचा PM मोदींवर गंभीर आरोप Read More »

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) Ashwini Kumar – मुंबई, 31 मार्च 2025: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये त्यांची पहिली विजयाची नोंद केली आहे, वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सवर आठ विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा सामना मुंबईच्या पदार्पणवीर गोलंदाज अश्वनी कुमारच्या शानदार कामगिरीची आठवण करून देणारा आहे. त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करतानाच 24 धावांत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेत केकेआरला व्यवस्थित बांधले. अश्वनी कुमार (Ashwini Kumar)च्या इम्प्रेसिव्ह कामगिरीनंतर मुंबईच्या फलंदाजांनी 116 धावांचे साधे लक्ष्य 12.5 षटकांत पूर्ण करून सीजनची पहिली विजयाची लय तयार केली. रायन रिकल्टनने त्याच्या अर्धशतकी खेळीने संघाला मजबूत आधार दिला, तर सूर्यकुमार यादवने वेगवान फटकेबाजी करून विजयाचा षटकार लगावला. मुंबईच्या कप्तान हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अगदी योग्य ठरला. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या गोलंदाजी जोडीने केकेआरच्या सलामीवीरांना लवकरच खेळातून बाद केले. केकेआरने 16.2 षटकांत उर्वरित फलंदाजांची विकेट घेत संघ 116 धावांत गुंडाळला. मुंबईने आयपीएल २०२५ मधील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर या विजयाने संघाच्या मनोधैर्याला चांगला उंचावला आहे. या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आणि ते आता सहाव्या स्थानावर आहेत. १. केकेआरचा धोकादायक डाव कोसळला, अश्वनीचा जादुई स्पेल २. बोल्ट-चहरची सुरुवातीची मदत ३. केकेआरचा धीरगंभीर प्रयत्न, पण अपुरा ४. एमआयचा सहज पाठलाग, रिकेल्टन-स्कायचा धमाका

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी Read More »

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही…

April Rules Change: आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. देशात त्यामुळे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मोठे बदल दिसून येणार आहे आणि या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसणार आहे. या महिन्यापासून लागू झालेल्या 10 प्रमुख बदलांबद्दल जाणून घ्या व्यावसायिक सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्तनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 44.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 44.50 रुपयांनी स्वस्त झाल्याने दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1762 झाली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्तनवीन कर प्रणालीनुसार आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून देशात 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बंदमहिलांसाठी चालवली जाणारी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) योजना आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यात 7.5% व्याजदर होता आणि कोणीही किमान 1000 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकत होता. कारच्या किमती वाढल्याआजपासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 4% पर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना महागाईचा सामना करावा लागेल. UPI वापरला जाणार नाहीजर तुमचा मोबाईल नंबर बराच काळ डि ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असे क्रमांक UPI सिस्टममधून काढून टाकले जातील. ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर दुप्पट सूट ज्येष्ठ नागरिकांना आता बँका आणि पोस्ट ऑफिसमधील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळेल. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS पेन्शन योजना सुरूआता केंद्र सरकारी कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा भाग बनू शकतात, ज्यामध्ये 25 वर्षांच्या सेवेनंतर, कर्मचाऱ्यांना गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% इतके पेन्शन मिळेल. या योजनेत सरकार 18.5% योगदान देईल. युलिपवरील भांडवली नफा करजर तुमचा युलिप प्रीमियम दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो भांडवली मालमत्ता मानला जाईल. आता यावर मिळणाऱ्या नफ्यावर भांडवली लाभ कर आकारला जाईल. बँकेतील किमान शिल्लक नियमात बदलएसबीआय, पीएनबी, कॅनरा बँकेसह अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियम बदलले आहेत. आता, तुमच्या खात्यातील किमान शिल्लक तुमच्या क्षेत्रानुसार ठरवली जाईल आणि ती राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड होऊ शकतो. विमान प्रवास स्वस्त झालाएव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे विमान प्रवास खर्चात दिलासा मिळू शकतो. चेन्नईमध्ये एटीएफची किंमत 06,064.10ने स्वस्त झाली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही… Read More »

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Sangram Jagtap on Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भाषणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. “कबर ठेवली पाहिजे” असे विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. संग्राम जगताप यांची परखड प्रतिक्रिया – अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कबर ही नसलीच पाहिजे, असे तमाम हिंदूंचे मत आहे. त्यामुळे कोण काय सांगत आहे, त्यापेक्षा सत्य परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे आहे.” त्यांनी असा दावाही केला की, “या संदर्भात अपूर्ण माहिती दिली जात असून, आम्ही येणाऱ्या काळात थडगे ठेवणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. शिवसेनेवर हल्लाबोल – संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, तोपर्यंत हिंदुत्व हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. मात्र, शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आता त्यांना हिंदुत्व महत्त्वाचे वाटेनासे झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला. “त्यामुळे संजय राऊत यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही,” असेही ते म्हणाले. राजकीय वातावरणात तणाव राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यात हिंदुत्व आणि धार्मिक विषयांवर नवी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हे वक्तव्य राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पुढील राजकीय घडामोडींची शक्यता राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून मनसे अधिक आक्रमक होत असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, भाजप आणि मनसे यांच्यातील वाढते संबंधही यामुळे चर्चेत आले आहेत. संग्राम जगताप यांची भूमिका ही हिंदुत्ववादी राजकारणाला पूरक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः, शिवसेनेला या टीकेला कसे प्रत्युत्तर देता येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या वादात भूमिका घेत विरोधी गटाच्या रणनीतीवर टीका करू शकतात. निष्कर्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादंग निर्माण झाला आहे. संग्राम जगताप यांच्या प्रतिक्रियेमुळे हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता असून, आगामी काळात याचा परिणाम निवडणूक रणनीतींवर होऊ शकतो. हिंदुत्वाचा मुद्दा आगामी राजकीय समीकरणांसाठी कसा महत्त्वाचा ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कबर नसलीच पाहिजे…, संग्राम जगतापांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल Read More »

Sujay Vikhe: शिर्डीत दिवसा व्हीआयपी दर्शन नको – माजी खासदार सुजय विखे

Sujay Vikhe: साई मंदिरातील दर्शन व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील साई मंदिरात दिवसा व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच व्हीआयपींना केवळ पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शन दिले पाहिजे. ही व्यवस्था तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आणली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सुजय विखे म्हणतात, “साई संस्थानाने तिरुपती बालाजी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा. आम्ही म्हणतो, व्हीआयपींना फक्त पहाटे चार ते सहा वाजेपर्यंतच दर्शन द्यावे. ही व्यवस्था अमलात आणल्यास सर्वसामान्य भक्तांना दिवसभरात सोप्या प्रकारे दर्शन घेता येईल.” शिर्डी मंदिरात अनेकदा व्हीआयपी दर्शनामुळे रांगा थांबवल्या जातात आणि सामान्य भक्तांना वाट पाहावी लागते, ही समस्या सुजय विखे यांनी प्रकाशात आणली. त्यांच्या मते, व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास ते सामान्य भक्तांचा प्रवास सोपा करणार आहे. शिर्डी मंदिरामध्ये दिवसा व्हीआयपी दर्शनाचा प्रकार बंद करण्याच्या मागणीमागे मुख्य कारण म्हणजे सामान्य भक्तांना होणारा त्रास. अनेकदा व्हीआयपींच्या दर्शनामुळे रांगा थांबवल्या जातात, ज्याचा परिणाम सामान्य भक्तांच्या दर्शनावर होतो. ही समस्या सोडवण्यासाठी सुजय विखे यांनी तिरुपतीच्या धर्तीवरील व्यवस्थेचा अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे. ही मागणी साई संस्थानातून पुढे जाणार का यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहील. त्यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्य साईभक्तांवर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.

Sujay Vikhe: शिर्डीत दिवसा व्हीआयपी दर्शन नको – माजी खासदार सुजय विखे Read More »