DNA मराठी

ताज्या बातम्या

Dunki Advance Booking: काय सांगता! Shahrukh Khan ची ‘डिंकी’ पहिल्या दिवशी करणार ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई; जाणून व्हाल थक्क

Dunki Advance Booking: सुपर स्टार शाहरुख खानचा  ‘डंकी’ हा चित्रपट 21 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आतापासून या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.  हे जाणून घ्या कि, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपट  शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘डिंकी’चे अॅडव्हान्स बुकिंग कधी सुरू होत आहे ते या लेखात जाणून घ्या.  पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘डिंकी’च्या तिकिटांची प्री-सेल शनिवार, 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. काही ठिकाणी शुक्रवार, 15 डिसेंबरपासून आंशिक बुकिंग सुरू करू शकतात, परंतु अधिकृतपणे चित्रपटाचे पूर्ण बुकिंग शनिवार म्हणजेच 16 डिसेंबरपासून सुरू होईल.  परदेशात ‘डिंकी’चे अॅडव्हान्स बुकिंग गेल्या आठवड्यातच सुरू झाले असून, या चित्रपटाला प्री-सेल्समध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जगभरात ‘डिंकी’ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू  चित्रपटाची जगभरातील अॅडव्हान्स बुकिंग लक्षात घेता, त्याला US$2.50 दशलक्ष किंवा त्याहून अधिकची ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. परदेशी बाजारात ते US$3 दशलक्ष ओलांडण्याची शक्यता आहे.  याव्यतिरिक्त, चार दिवसांच्या वीकेंडमध्येही, चित्रपटाने US$15 दशलक्ष पेक्षा जास्त कमाई करणे अपेक्षित आहे. रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा ‘डिंकी’ जवळपास 80 कोटींची कमाई करू शकतो, असे बोलले जात आहे. तथापि, ही अंदाजे आकडेवारी आहे. यामध्ये आकडेवारी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.   हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदारपणे उभा राहण्यासाठी सज्ज झाला आहे. जर हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर राहिला तर 2023 मध्ये पठाण, जवान आणि नंतर डंकी असे ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याची शाहरुख खानची हॅटट्रिक असेल. आता ‘डिंकी’ बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करते हे पाहायचे आहे.  शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू आणि विकी कौशलसह अनेक कलाकारांनी ‘डंकी’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Dunki Advance Booking: काय सांगता! Shahrukh Khan ची ‘डिंकी’ पहिल्या दिवशी करणार ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई; जाणून व्हाल थक्क Read More »

Maharashtra Women Rape News :  धक्कादायक, विधवेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने राजस्थानला नेले अन् घडलं असं काही …..

Maharashtra Women Rape News : महाराष्ट्रातील एका विधवा महिलेसोबत राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने वर्षभर लैंगिक छळ सहन केला आणि कशीतरी त्या क्रूरांच्या तावडीतून सुटून थेट वर्धा जिल्ह्यात आली आणि तिने हिंगणघाट पोलिसांना आपला त्रास कथन केला.   हिंगणघाट शहरातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेच्या पतीचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर ती इतर लोकांच्या घरात भांडी धुवून आपला उदरनिर्वाह करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी पीडित मंगला छाया नावाच्या महिलेच्या घरी भेटली. त्याने पीडितेला राजस्थानमध्ये घरगुती मदतीची गरज असल्याचे सांगून आमिष दाखवले. यासाठी निवास आणि भोजनाच्या सुविधांसोबतच तुम्हाला चांगले पैसेही मिळतील. त्यानंतर पीडित महिला मंगला आणि पूनमसह प्रथम राजस्थानमधील रतलाम गावात पोहोचली. तेथे आरोपीने स्टॅम्प पेपरवर त्यांची सही घेतली. तक्रारीनुसार, काही दिवसांनी शंकर राठोड आणि दिलीप राठोड त्या गावात पोहोचले. त्यांनी पीडितेचे आधार कार्ड आणि मोबाईल हिसकावून घेतला. शंकरने ते दोन लाख रुपयांना विकले. यादरम्यान तिचा लैंगिक छळ करण्यात आला. त्याचा छळ आणि मारहाणही होऊ लागली. सुमारे एक वर्ष हे सर्व सहन केल्यानंतर पीडितेने आईची तब्येत बिघडल्याचे सांगून तेथून पळ काढला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आनंदसह मंगला, पूनम, शंकर आणि दिलीप राठोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Maharashtra Women Rape News :  धक्कादायक, विधवेला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने राजस्थानला नेले अन् घडलं असं काही ….. Read More »

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर

Madhi Devasthan : आज श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून जबरदस्त राडा झाला.   समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्ष बदलासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये हाणामारी झाली.  या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली. त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून दोन गटात मागील काही दिवसांपासून धूसफूस सुरू होती. यामुळे आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान देवस्थानच्या सभागृहामध्ये विश्वस्तांच्या बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू असतानाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली असताना काही स्थानिक युवक पडले. अखेर या शाब्दिक चकमकीचे रुपांतर लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाले.  दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितांमध्ये चांगलीच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने काहीजण जखमी झाले. या सर्व जखमींना उपचारासाठी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.  जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Madhi Devasthan : मढी देवस्थानच्या अध्यक्ष निवडीवरुन जबरदस्त राडा; वाचा सविस्तर Read More »

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा

Gutkha Ban – दोन महिन्यापूर्वी अहमदनगर शहरामध्ये दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते  हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.  कुलकर्णी ज्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गुटखा आणि अवैध्य व्यवसायाच्या विरोधात त्यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.  हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा देखील उपस्थित झाला मात्र नगर जिल्ह्यातील परिस्थिती काही बदलली नाही, यामुळे राज्यातील गुटखा बंदी हि फसलेली बंदी आहे. तसेच ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.  शाळा व महाविद्यालय परिसरातील गुटखा, तंबाखू अशा अवैद्य टपऱ्या काढण्याची मागणी कुलकर्णी यांनी नगर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या कारणावरून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची  घटना घडली होती. या घटनेला दोन महिने होऊन गेले व नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सुमारे 32 आमदारांनी या हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता व याबाबत शिक्षक  आमदार विक्रम काळे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला आहे.  मात्र या हल्ल्याच्या घटनेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली नसून जिल्ह्यातील अवैद्य गुटखा विक्री आणि अवैध धंदे तसेच सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.सध्याची नगर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता गुटखाबंदी ही फसलेली बंदी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.  गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले… ही जी शासनाने गुटखाबंदी केली आहे. त्यामुळे गुटखा विक्री करण्याचे प्रमाणही वाढले असून यामध्ये पोलिसांचे हप्ते वाढले असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. गुटखा हा शरीराला घातक असल्यामुळे तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनामध्ये थोडी चलबीचाल झाली मात्र कुठल्याही प्रकारचं धोरणात्मक निर्णय किंवा ॲक्शन सरकारकडून होताना दिसत नाही असे खंतही त्यांनी व्यक्त केली.  प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष राज्यातील सर्वच भागात गुटखा आणि मावा खुलेआम विक्री जोरात सुरू आहे. मात्र अन्न औषध प्रशासन याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असून या मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या या महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून लावण्यात येत असताना महानगरपालिका ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करत.  संपूर्ण जिल्ह्यात याच प्रकारे सर्व अवैद्य धंदे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

Gutkha Ban : गुटखाबंदीने पोलिसांचे हप्ते वाढले…हेरंब कुलकर्णींचा थेट निशाणा Read More »

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण

Nilesh Lanke : – अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेत आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.  यामुळे जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. या प्रकरणात कारवाईची मागणी देखील त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे.   विधानसभेत लंके म्हणाले, ठेकेदारास काम देण्यासाठी गैरमार्गाचा अनेकदा अवलंब करण्यात आला आहे. खोटी कागदपत्रे जोडणे, ठेका मिळाल्यानंतर काम पुर्ण नसणे, कॅपॅसिटीपेक्षा कोटींची जास्त कामे देण्यात आली.  एका ठेकेदारास सुरूवातील अपात्र ठरविणे व त्याच ठेेकेदाराला लगेच दोन दिवसांत पात्र ठरविण्यात आले आहे. टेेंडर रद्द करून पुन्हा करणे, टेेंडर नोटीसमधील अटी बदलणे अशा गैरमार्गाचा अवलंब केल्याच्या तक्रारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करूनही काहीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी नमुद केले.   जल जीवन कार्यक्रमांतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील मौजे जामगांवसह सहा गावांची पाणी पुरवठा योजनेचे काम घेताना ठेकेदारांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराकडे कोणतीही कागदपत्रे नसताना काम देण्यात आले आहे. या ठेकेदाराने काम पुर्ण झाल्याचे दाखलेही खोटे सादर केले असून त्यावर संबंधित विभागाच्या जावक क्रमांकाचा उल्लेख नाही तसेच सही देखील बनावट आहे. शासन निर्णयाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचे लंके यांनी सांगितले.   ठेका घेतलेली सर्व कामे 25 ते 30 टक्के पुर्ण आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था यांच्याविषयी नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधीनींनी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पुराव्यासह वारंवार तक्रारी करण्यात येऊनही चौकशी करण्यात येत नाही.  ठेकेदारासबंधी माहीती मागविल्यानंतर माहीती देण्यात येत नाही. बनावट कागदपत्रे सादर करून ठेकेदाराने कामे मिळविली आहेत. या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी आ. लंके यांनी यावेळी बोलताना केली.

Nilesh Lanke : जलजीवन योजनेत घोटाळा…लंकेकडून कारवाईची मागणी; अनेक चर्चांना उधाण Read More »

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक

Bachchu Kadu: आ.बच्चू कडू आपल्या आक्रमक आंदोलने आणि रोखठोक भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात चर्चेत राहतात. राज्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहे.  आता नगरमध्येही प्रहारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, आणि महानगरपालिका मधील  दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधि आठ दिवसात वितरित करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुक्काम व ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.  जिल्हाप्रमुख अभिजीत दादा पोटे यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात, केंद्र शासनाने दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग अधिनियम लागू केला आहे.  दिव्यांगांना समाजात सहजतेने जगता यावे यासाठी शासनाने विविध योजना लागू केल्या आहेत तथापि ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच संजय गांधी निराधार योजना आदी विभाग आजही दिव्यांगंच्या बाबत उदासीन आहेत. यामुळे दिव्यांगांच्या योजना व त्यासाठी असलेल्या राखीव निधी वाटपाबाबत दिरंगाई होऊन प्रशासनाकडून शासन निर्णयाला केराची टोपली दाखविली जात होती. त्यामुळे अनेक दिव्यांगांना त्यापासून वंचित राहावे लागत होते.  ही बाब शासनाचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने कठोर पावले उचलून दिव्यांग अधिनियम 2016 नव्याने पारित केला आहे. ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना त्यांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी दिव्यांगांचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवून दिव्यांगाना वाटपाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांची माहिती विहित नमुन्यात अद्यावत भरून ठेवण्याच्या शासनाने सूचना दिलेल्या आहेत. तसेच पंचायत राज संस्थांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवून तो वाटपाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.  तसेच सदरील निधी हा दिव्यांगाना रोख स्वरूपात देण्यात यावा वस्तू स्वरूपात दिल्यास त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरोवर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून दिव्यांगांना गरज नसलेली वस्तू वारंवार वाटप होताना आढळून आलेले आहे. त्यामुळे या निधीचा अपव्यय होत आहे.तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांनी दिव्यांगांसाठी असलेला राखीव निधी आठ दिवसात वितरित करावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व कार्यालयांचा ताबा घेवुन दिव्यांगांसह मुक्काम व ठिय्या आंदोलन उभारण्यात येईल इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत  पोटे यांनी दिला आहे.

Bachchu Kadu : ..अन्यथा प्रहार कार्यालयात घुसून मुक्काम आंदोलनं करणारं!! ‘त्या’ प्रकरणात प्रहार आक्रमक Read More »

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा

Satyajit Tambe : केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कांद्यामुळे तापमान वाढला आहे.  केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीवर बंदी लावली आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहे यातच आता आमदार सत्यजीत तांबे या प्रकरणात केंद्र सरकारवर निशाणा साधत कांद्याच्या निर्यातीवरील बंदीवर तातडीने फेर विचार करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी, अशी मागणी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्न, महावितरण व महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नांकडे  सरकारचे लक्ष वेधले. तसेच कांदा निर्यात बंदीवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे फेर विचार करण्याची मागणी करावी असे मुद्दे आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडले.  वीज कंपन्यांमध्ये रिक्त जागांवर कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. तसेच आजच्या घडीला 42 हजार कंत्राटी वीज कामगार कार्यरत असून कंत्राटी वीज कामगार विजेची कामे करत असतात. कामगारांना कोणतीही सुरक्षा साधनांचा पुरवठा कंपनीमार्फत केला जात नाही. मागील तीन वर्षांत विजेचा धक्का (शॉक) लागल्यामुळे 80 वीज कामगारांना जीव गमवावा लागला, अशी खंत आ. तांबे यांनी सभागृहात बोलून दाखवली.  या कामगारांना वीजेपासून संरक्षण करणाऱ्या साहित्याचा वाटप होते का? याकडे सरकारने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असा कंत्राटी वीज कामगारांचा सुरक्षेसंदर्भातील गंभीर मुद्दा अधिवेशनात आमदार तांबे यांनी मांडला.  मुलभूत सुविधांपासून वीज कामगार वंचित लाईनमन व अन्य कामगारांना सुरक्षेच्या साधनाशिवाय खांबांवर चढणे, बिघाड दुरुस्त करणे, अशी जोखमीची कामे करावी लागतात. सुरक्षा संदर्भातील साधने पुरविणे हे कंपनीचे काम असते. मात्र, कंपनी याकडे दुर्लक्ष करते. तसेच कामगारांना वेळेवर पगार दिला जात नसून, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी व विमा काढला जात नाही. अशा मुलभूत गरजांपासून कामगारांना वंचित राहावं लागत आहे असं आमदार सत्यजीत तांबे म्हणाले.

Satyajit Tambe :  सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत टाकले… ‘त्या’ प्रकरणात तांबेंचा सरकारवर निशाणा Read More »

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई कारवाई करत संगमनेर शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास फिर्यादी उषा अशोक लोंगानी त्यांचे नातवाला घराकडे घेऊन जात असतांना पाठीमागुन बाईकवर दोन आरोपींनी येवुन त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते. त्यांनतर त्यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपी विरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर दिनेश आहेर, स्था.गु.शा.अहमदनगर यांनी विशेष पथक नेमुण या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.  या आदेशा प्रमाणे पोनि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण  गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.  स्थागुशा पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत आरोपीचे नांव सचिन ताके रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर असे असल्याचे निष्पन्न झाले.  पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, या प्रकरणातील आरोपी त्याचा आणखी एक साथीदारासह अहमदनगर शहरातील चांदणी चौक परिसरात येत आहे.  यानंतर या बातमीनुसार  पोलीस पथकाने चांदनी चौक येथे सापळा लावला आणि एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.  

Ahmednagar Police: चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..!

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख ) Maharashtra News: शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरवॉल मधून गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले होते.  मात्र याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी मात्र याचे व्हिडिओ काढून फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या आदी सोशल मीडियाच्या स्टेटसला ठेवल्याने तसेच काही नागरिकांनी गेवराई येथील अधिकाऱ्यांना संपर्क केल्याने गेवराई नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि आठ दिवसात दोन वेळेस गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने एयरवाल बंद केले.  पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्या जवळील एअरवॉलला अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने गेल्या आठ दिवसापासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती.  सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. परंतु गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असल्याने याविषयी सध्या नागरिकात मात्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.  या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होती,  तर काही जण मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्याने पाईपलाईनच्या एअरवॉलमधून वाया जात असलेले पाणी हे तत्परतेने गेवराईचा नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने बंद केले. तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैठण-गेवराई या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनवर असणाऱ्या एअरवॉलला कोणत्याही नागरिकांनी कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नये जेणेकरून पाण्याची नासाडी होऊन पाणी वायाला जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी तसेच आसपासच्या नागरिकांनी घ्यावी.  तसेच कोणी अशा प्रकारची छेडछाड करत असल्याचे नगरपरिषदेच्या फिरत्या पथकास निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांच्या आदेशावरून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. – ए.बी. लाड  पाणीपुरवठा प्रमुख, गेवराई नगरपरिषद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने घेतली दखल..! Read More »

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

Ahmednagar Police : ट्रान्सपोर्टची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले असून या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. अरुण सुखदेव लंके (रा.चिखली ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,’कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,’एक मालवाहतूक ट्रक (एम.डब्लू.ए ३९४९) या गाडीत बेकायदा विनापरवाना दारूची वाहतूक होत आहे’ ही माहिती प्राप्त होताच गुन्हेशोध पथकाच्या अंमलदारांनी कायनेटिक चौकात सापळा लावून ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रॅकच्या कॅबिनमध्ये सात देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.त्याच्या ताब्यातील १० लाख ५२ हजार ८०० रु. किमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून यामध्ये वाहतूक ट्रक व देशी-विदेशी दारूचा सामावेश आहे. पो. कॉ. कैलास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण सुखदेव लंके या ट्रक चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ.गणेश धोत्रे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.

Ahmednagar Police: ट्रान्सपोर्ट ट्रॅकमधून विनपरवाना  दारूची वाहतूक; कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई Read More »