DNA मराठी

ताज्या बातम्या

Corona Virus: अर्र.. पुन्हा कोरोना, 24 तासात 702 रुग्णांची भर, ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

Corona Virus : देशातील अनेक भागात कोरोना हळूहळू वाढत चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 702 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,097 वर पोहोचली आहे.  गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने संसर्गाची नवीन आकडेवारी जाहीर केली. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोविड-19 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी देशात संसर्गाची 752 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. अचानक प्रकरणे का वाढू लागली? आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्दी आणि कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांमुळे अलिकडच्या काळात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. यापूर्वी, 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. 2020 च्या सुरुवातीपासून चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, परिणामी 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराला घाबरण्याची गरज आहे का? आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटी झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे. JN.1 प्रकाराला घाबरण्याची गरज नाही, असे बहुतांश आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संसर्ग झाल्यास काय करावे? जर तुम्हाला कोविड-19 ची लागण झाली असेल, तर लगेच स्वतःला अलग करा. तुमची तब्येत बिघडली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मास्क घालण्याची खात्री करा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.

Corona Virus: अर्र.. पुन्हा कोरोना, 24 तासात 702 रुग्णांची भर, ‘इतक्या’ जणांचा मृत्यू Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »

Rishabh Pant: क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी संघात परतणार ऋषभ पंत

Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा भारतीय संघात दिसणार आहे. ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मैदानाबाहेर आहे. यामुळे तो मैदानावर कधी परतणार याची चर्चा सध्या सूरू आहे.  तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत IPL 2024 मध्ये खेळताना दिसू शकतो. असे झाल्यास दिल्ली कॅपिटल्ससाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असेल. मात्र अद्याप त्याच्या पुनरागमनाबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दावे केले जात आहेत. ऋषभ पंत रस्ता अपघातात जखमी झाला होता संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. एवढेच नाही तर दुखापतीमुळे तो वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघात सहभागी होऊ शकला नव्हता.

Rishabh Pant: क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी संघात परतणार ऋषभ पंत Read More »

Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्….

Thane News: ठाणे जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या मुलीवर बापाने बलात्कार केला.  पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपले हे घृणास्पद कृत्य लपवण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्काराची खोटी स्टोरी तयार केली.  आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की त्याच्या सावत्र अल्पवयीन मुलीचे 24 डिसेंबर रोजी तीन लोकांनी अपहरण केले होते. यानंतर भिवंडी तालुक्यातील एका गावात तिच्यावर बलात्कार झाला. निवेदनाच्या आधारे, प्रथम पोलिसांनी मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. पण तपासात पोलिसांना वडिलांची भूमिका संशयास्पद वाटली. पोलिसांनी आरोपीच्या जबानीत तफावत असल्याची चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पित्याने 10 वर्षांच्या मुलीवर त्याच्याच घरात बलात्कार केला होता, घटनेच्या वेळी मुलीची आई घरी नव्हती. आरोपीने पीडितेला खोटे सांगण्यास सांगितले होते. स्थानिक न्यायालयाने आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नुकतेच नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका बापाने आपल्या 18 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडितेने स्वतः पोलिस स्टेशन गाठून तिच्या सावत्र वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.  मुलीने आपल्या जबानीत सांगितले की, आरोपीने 22 डिसेंबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ती घरी झोपली असताना आरोपीने हा गुन्हा केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्…. Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार, आढळले ‘इतके’ रुग्ण; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट

Maharashtra Corona:  पुन्हा एकदा राज्यात कोरोना वाढत चालला आहे. नवीन व्हेरियंट आता हळूहळू अनेक शहरांमध्ये पसरत आहे. यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत. तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वतः ट्विट करून संसर्ग झाल्याची माहिती दिली.  सोमवारी राज्यात 28 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. कोविडचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. यानंतर ठाणे आणि पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 77 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात 29, रायगडमध्ये 17 आणि पुण्यात 23 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या JN.1 या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्गात एका 41 वर्षीय व्यक्तीला जेएन.1 ने धडक दिली. आतापर्यंत राज्यात जेएन-1 ची लागण झालेल्या एकूण 10 रुग्णांची पुष्टी झाली आहे. रविवारी महाराष्ट्रात 50 नवीन कोरोना बाधित आढळून आले. ज्यामध्ये जेएन-1 ची लागण झालेले 09 रुग्ण आहेत. जेएन-1चे सर्वाधिक पाच रुग्ण ठाण्यात आहेत. याशिवाय पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे ग्रामीण आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. रविवारी आढळलेल्या नवीन जेएन-1 रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि एक महिला रुग्ण आहेत. यामध्ये एक 9 वर्षांचा मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षीय पुरुष आणि इतर रूग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. पुण्यात सापडलेला एकच रुग्ण परदेशात गेला आहे. नुकताच तो अमेरिकेहून परतला आहे.  राज्यात आढळलेल्या 9 जेएन – 1 प्रकरणांपैकी 8 जणांना कोविड लसीचे दोन डोस मिळाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार, आढळले ‘इतके’ रुग्ण; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट Read More »

Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल

प्रतिनिधि शेख नदीम Sillod News : सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी अजिंठा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत झन्ना मन्ना खेळणाऱ्या 7 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपयाचा नगद व जुगार खेळणाच्या साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवना परिसरातील देशी दारूच्या दुकाना समोरील पत्र्याच्या शेडात झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी सकाळच्या सुमारास धाडी टाकली असता दादाराव काळे,रमेश काळे (दोघे रा.खुपटा),गजानन वाघ,शेख रसूल,विजय बावस्कर,रामराव पवार (सर्व रा.शिवना),हिरामण बावस्कर (रा.सोयगाव ) यांना रंगेहाथ पकडले . आरोपींविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपये नगद व जुगाराचा साहित्य जप्त करण्यात आला आहे .

Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल Read More »

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट!

MP Sujay Vikhe : खासदार डॉ. सुजय विखे पाटील  यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. या प्रकरणात ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत जानेवारी महिन्यात दिल्ली येथे अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. ते उदरमल ता. नगर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.  कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यासाठीची चर्चा अमित शाह यांच्या सोबत करणार असून यातून कांदा निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार  असं देखील ते म्हणाले. तसेच कांद्याचा भाव स्थिर होण्यासाठी एक मासिक कोटा निश्चित करून कांद्याला हमी भाव मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, राजेंद्र तोरडमल, देविदास आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सदरील भेट घेतली जाणार असून निश्चितच शेतकरी हिताचा विचार केला जाईल असे देखील खासदार सुजय विखेंनी बोलताना स्पष्ट केले.

MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदी, खासदार डॉ. सुजय विखे घेणार अमित शाह यांची भेट! Read More »

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Ahmednagar News : अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चापडगांव व आखेगांव ता. शेवगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे 05 आरोपींना 2,49,000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद केले आहे. फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर 21 डिसेंबर 2023 रोजी हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असतांना रात्री 01.00 ते 02.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी तसेच त्यांचे कुटुंबियांना चाकुचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही., गॅस शेगडी, 6 शेळ्या असा एकुण 1,08,700 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता.  तसेच दिनांक 24 डिसेंबर रोजी फिर्यादी अभय राधाकिसन पायघन यांचे घरामध्ये रात्री 01.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करुन फिर्यादीची आई मंगल पायघन हिचे डोळयाच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन पांडु काटे यांना मारहाण करुन 50,000 रुपये रोख रक्कम दरोडा टाकुन चोरुन नेली होती.  या घटनेनंतर शेवगांव पोलीस ठाण्यात भादवि कलम 392, 452, 504, 506, 34 व भादवि कलम 394, 452, 457, 380, 506, 511, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला होता.  या घटनेचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा सदरचा गुन्हा हा दिपक गौतम पवार रा. टाकळीअंबड, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला असुन ते सध्या त्यांचे टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. यानंतर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळीअंबड, ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले. मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Ahmednagar News: ‘त्या’ प्रकरणात 05 आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई Read More »

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्….

Maharashtra News:  लातूरमध्ये नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.  लातूरमध्ये 23 वर्षीय मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील सातळा गावात ही घटना घडली आहे.दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता नाथराव मुंडे (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23) असे आरोपी मुलाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वरने त्याचे माध्यमिक शिक्षण अर्धवट सोडले होते. सध्या तो शेतीची कामे करतो. दरम्यान, तो मित्रांसोबत दारू पिण्यास शिकला. गावातील नदीकाठावरील शेताच्या शेजारी बांधलेल्या घरात तो आई-वडिलांसोबत राहतो. ज्ञानेश्वरचा लहान भाऊ कृष्णा पुण्यात एका खासगी कंपनीत काम करतो. दरम्यान, शुक्रवारी ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त गावाबाहेर गेले होते. घरी फक्त आई संगीता आणि मुलगा ज्ञानेश्वर होते. दरम्यान दारूचे व्यसन असलेल्या ज्ञानेश्वरने दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले. अलीकडेच या कुटुंबाने त्यांची म्हैस विकली होती, त्यातून त्यांना काही पैसे मिळाले. मात्र आईने पैसे नसल्याचे सांगून काहीही दिले नाही. त्यानंतर रागाच्या भरात ज्ञानेश्वरने घरातील जीवनावश्यक वस्तू विकायला सुरुवात केली. याला आईने विरोध केला असता रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आईला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याने कुलर चालू केला आणि दरवाजा बाहेरून लावला. आणि काही माल विकण्यासाठी सोबत घेतला. दरम्यान, गावातील दोन मुले ज्ञानेश्वरच्या घरी गावकऱ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी आली.  दोन्ही मुलांनी पाहिले की दरवाजा बाहेरून बंद होता आणि आतमध्ये कुलर चालू होता. दोघेही घरात शिरले असता संगीता मुंडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.  आजूबाजूच्या लोकांना तातडीने बोलावून संगीताला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वरचे वडील नाथराव मुंडे यांच्या फिर्यादीवरून मुलगा ज्ञानेश्वर मुंडे याच्याविरुद्ध किनगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरला अटक करण्यात आली.

Maharashtra News: धक्कादायक! आईने दारूसाठी पैसे दिले नाही, मुलाने केला कोयत्याने वार अन्…. Read More »