DNA मराठी

ताज्या बातम्या

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे. यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली. मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.  तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अहमदनगर न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. पंकज जावळे यांच्या या अर्जावर आज (4 जुलै) दुपारनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.   एसीबीने एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून आयुक्त पंकज जावळे आणि देशपांडे दोघेही फार आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.  छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील एसीबीचे पथकाने अहमदनगर महापालिकेत कारवाई करून पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनवाईत त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी Read More »

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण

Ahmednagar News:  पारनेर तालुक्यातील निघोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निघोज – वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रविण भुकन यांच्या मालकीच्या  जत्रा या हॉटेलमधील प्रविण भुकन या़च्यावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   यामध्ये प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री दोन वाजता नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.   या प्रकरणानंतर गणेश भुकन यांनी रात्री निघोज पोलीसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली असा आरोप गणेश भुकन यांच्याकडून करण्यात आला आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी हप्ता दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निघोज आणि परिसरातील असून भुकन हे सध्या नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.  त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते शुद्धीवर आल्यावर पोलीसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.  गेली काही दिवसांत निघोज आणी परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निघोज परिसरात चर्चा सुरू आहे.

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण Read More »

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग प्रकरणात मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग दरम्यान झालेल्या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली असून आमचे सरकार या घटनेच्या तळापर्यंत जाऊन कटकारस्थान आणि जबाबदार व्यक्तींना योग्य ती शिक्षा देईल, असे म्हटले आहे. यासोबतच राज्य सरकार या घटनेची चौकशी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.   राजकारण करणाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, सीएम योगी यांनी या घटनेवर राजकारण करणाऱ्या पक्षांनाही फटकारले आणि पीडितांबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी अशा घटनेवर राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे सांगितले.  पीडितांच्या जखमा भरून काढण्याची, पीडितांप्रती सहानुभूती दाखवण्याची हीच वेळ आहे. सरकार या प्रकरणी आधीच संवेदनशील असून कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. सीएम योगी म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. 112 लोकांचा मृत्यू झाला  2 जुलै रोजी हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव येथे भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर उपदेशक मंचावरून खाली उतरत असताना भक्तांचा जमाव त्यांच्या दिशेने सरकत होता. दरम्यान, लोक भोले बाबाला हात लावण्यासाठी आतुर झाले आणि त्यानंतर सेवा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले असता तेथे चेंगराचेंगरी झाली. सीएम योगी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त डीजी आग्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम तयार करण्यात आली असून त्यात विभागीय आयुक्त अलीगढ यांचा समावेश आहे आणि त्यांना विलंब न करता अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. घटना पाहता राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी तेथे तळ ठोकून आहेत आणि राज्य सरकारचे तीन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण, संदीप सिंह आणि असीम अरुण घटनास्थळी तळ ठोकून आहेत आणि जखमींवर उपचाराची व्यवस्था करत आहे. यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, भारत सरकार आणि राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तसेच राहुल गांधींही या घटनेवर दु:ख व्यक्त केला आहे.

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग प्रकरणात मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा Read More »

Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत 122 भाविकांचा मृत्यू, भोले बाबांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

Hathras Stampede: 2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली.  माहितीनुसार, सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील रतीभानपूर गावात भोले बाबांचा सत्संग सुरू होता, त्यामध्ये सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी यांचे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. स्थानिक लोक साकार हरी यांना ‘विश्व हरी भोले बाबा’ असेही म्हणतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2 जुलै रोजी जेव्हा सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी हजारो लोकांमध्ये पोहोचला तेव्हा अनेकांचे नियंत्रण सुटले. मोठ्या संख्येने लोक त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले, त्यानंतर तेथे चेंगराचेंगरी झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शेतात सत्संग मंडप उभारण्यात आला होता. सत्संग संपल्यानंतर बाबांची गाडी तिथून निघू लागली. लोक त्याच्या पायांना स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली. शेकडो लोकांच्या अकाली मृत्यूनंतर, हातरस चेंगराचेंगरीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेकांना तो बाबा कोण हे जाणून घ्यायचे आहे, त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी 50 हजारांहून अधिक लोक कडक उन्हातही कार्यक्रमस्थळी पोहोचले. चेंगराचेंगरीमुळे 122 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नाव- साकार हरी, भोले बाबा म्हणतात सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, त्यांचा वादांशी दीर्घकाळ संबंध आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी साकार विश्व हरी भोले बाबा यांनी पोलिस खात्यातील नोकरी सोडून 17 वर्षांपूर्वी सत्संग सुरू केला होता. आता उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात या बाबाचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत. लैंगिक शोषणासह 5 प्रकरणांमध्ये आरोपी मिळालेल्या माहितीनुसार, सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी याच्यावर लैंगिक शोषणासह इतर पाच गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी आहे. असेही म्हटले जाते की अनेक प्रसंगी त्यांनी आपल्या अनुयायांना संकटातून बाहेर काढण्यास मदत केली. कोरोनाच्या काळात ते चर्चेत आले. आता त्याच्यावरील अनेक प्रकरणांच्या तपासाला वेग येणार आहे. अनेक वर्षांपूर्वी पोलिसांतून बडतर्फ करण्यात आले होते सूरज पाल हे देखील 28 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना बाबा इटावा येथे तैनात झाले होते. सूरज पाल यांच्यावर नोकरीच्या काळात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आपले नाव आणि ओळख बदलली आणि तो बाबा झाला. फॉलोअर्स मीडियापासून अंतर राखतात सूरज पाल बाबा आणि त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर राखतात. त्यांच्या एका अनुयायाने सांगितले की, त्यांच्या आयुष्यात कोणीही गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेने हे शरीर त्याच भगवंताचे अंश आहे हे त्यांना कळले. त्यांचा खरे नाव सूरज पाल असून तो कासगंजचा रहिवासी आहे.

Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत 122 भाविकांचा मृत्यू, भोले बाबांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप Read More »

Ahmednagar News : दुधाला 40 रुपये हमीभाव द्या, शेतकऱ्यांची सातारा ते अहमदनगर शेतकरी दिंडी

Ahmednagar News:  दुधाला 40 रुपये हमीभाव, दूध मुल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी, दुधाची एफ.आर.पी निश्चिती यांसह विविध मागण्यांसह सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील दुध उत्पादन संघटना समितीच्या सदस्यांनी शेतकरी दिंडी सातारा ते राज्याचे दुग्धविकास मंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या गावी काढली होती. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे या दिंडीतील शेतकरी व अधिकारी यांच्यात बैठक संपन्न झाली.  दरम्यान 1 जुलै रोजी शिखर शिंगणापूर येथून निघून ही शेतकरी दिंडी आज नगर शहरात पोहचताच प्रशासन आपल्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित विभागाचे अधिकारी तसेच दूध उत्पादक शेतकरी यांची बैठक घेतली. परंतु या बैठकीत अद्याप कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याचे शेतकर्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दुध उत्पादन संघटना समितीच्या, महाराष्ट्र राज्य वतीने समितीच्या वतीने दिनांक 01/07/2024 पासून शिखर शिंगणापूर तालुका मान जि. सातारा ये येथून श्री शंभू महादेवांना दुधाचा अभिषेक करून तेथील भाविकांना फुकट दूध वाटप करून, महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तेथून शेतकरी दिंडी लोणी अहमदनगरच्या दिशेने निघून दरम्यान गोरक्षनाथ गड येथे रात्री मुक्काम केला. दरम्यान आपल्याकडून संघर्ष समितीच्या मागण्या बाबत. आपण सकारात्मक असून.  सदर मागण्याच्या चर्चेसाठी दिनांक 02/07/2024 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर मध्ये बैठकीसाठी आपण बोलवले आहे. तरी आपण आमच्या खालील मागण्या बाबत सकारात्मक भूमिका घेऊन लिखित स्वरूपात आमच्या मागण्या मान्य करावेत. काय आहे मागण्या दूध उत्पादन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा  दूध मुल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी दुधाची एफ.आर.पी निश्चित करण्यात यावी 11 मार्च ते 30 जुलै अनुदान एक रक्कमी त्वरित वितरण करावे. भाकड जनावरांना 2000/- रुपये चार खर्च मिळावा. अन्न भेसळ खात्याकडून दूध भेसळीचे तातडीने सर्वेक्षण करून त्यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी.  दुधखरेदी दराची 2017 भारतीय नियमाप्रमाणे इतर राज्यात 3.2 फॅट 8.3 च्या गुणवत्ते खरेदी करावे.

Ahmednagar News : दुधाला 40 रुपये हमीभाव द्या, शेतकऱ्यांची सातारा ते अहमदनगर शेतकरी दिंडी Read More »

Lal Krishna Advani: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली, AIIMS मध्ये दाखल

Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची बुधवारी रात्री अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.  देशाचे माजी उपपंतप्रधान अडवाणी यांच्यावर एम्सच्या युरोलॉजी विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या 96 वर्षांचे आहेत. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतरत्न आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याला वयोमानाशी संबंधित समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. नुकतेच एनडीएच्या संसदीय दलाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यासंबंधीचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2014 पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते हे विशेष. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला होता. ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये गृहमंत्री होते. 10व्या आणि 14व्या लोकसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली. भारत सरकारने त्यांना यावर्षी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविले. लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधान म्हणूनही हे पद भूषवले होते. 2015 मध्ये, त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

Lal Krishna Advani: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली, AIIMS मध्ये दाखल Read More »

Ahmednagar News: जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांचे अपहरण अन् बेदम मारहाण

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शेतकरी नशिर शेख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शेतीच्या किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी दि. 21 रोजी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास गावातीलच अलीम बन्नोमियाॅ शेख व दोन अनोळखी व्यक्तींनी शेतीच्या किरकोळ कारणामुळे नशिर शेख यांच्यासह कुटुंबीयातील महिलांना जबर मारहाण करून नशीर शेख यांना राहत्या घरातून बळजबरीने चार चाकी वाहनातून अपहरण करुन आज्ञात ठिकाणी नेऊन लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेत शेवगाव-पाथर्डी रोडवर अपरात्री आज्ञातस्थळी  सोडून देऊन मारेकरी निघून गेले.  या प्रकरणात  फिर्याद जखमी नशिर शेख यांचा मुलगा आजिम नशिर शेख यांनी शेवगाव पोलिसात दिली असून आरोपी अलीम बन्नोमियाॅ शेख यांच्यासह दोन साथिदारावर भारतीय दंड संहिता कलम ४५२, ३६५, ३६७, ३४, ३२३ अंतर्गत शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सदर घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Ahmednagar News: जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांचे अपहरण अन् बेदम मारहाण Read More »

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती. या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »