DNA मराठी

ताज्या बातम्या

Maharashtra Election: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Election: जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अकोले विधानसभा मतदारसंघात ९, संगमनेर १३, शिर्डी ८, कोपरगाव १२, श्रीरामपूर १६, नेवासा १२, शेवगाव १५, राहुरी १३, पारनेर १२, अहमदनगर शहर १४, श्रीगोंदा १६, तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला मतदार आहेत. २०२ तृतीयपंथी मतदार असून सैनिक मतदारांची संख्या ९ हजार ५७५ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे ५४ हजार नवमतदारांची भर पडली असल्याची माहितीही सालीमठ यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९४ ठिकाणी ३ हजार ७६३ मतदान केंद्र आणि दोन सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने शिर्डी मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गजराजनगर (बुऱ्हाणनगर) जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व इमारतीत प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यात १९ हजार ९६० दिव्यांग व ८५ वर्षावरील ५५ हजार ८०१ एवढे मतदार आहेत. यापैकी गृह मतदान सुविधेसाठी २ हजार ६८८ मतदारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान व्यवस्थेचा भाग म्हणून ३४३ क्षेत्रात जिल्ह्याची विभागणी केली असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३ हजार ५८० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच अवैधरित्या वाहतुक करण्यात येणारे मद्य, रोकड आदी मिळून २८ कोटी २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीशी निगडीत ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती ओला यांनी यावेळी दिली.

Maharashtra Election: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश Read More »

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन

Ajit Pawar: लोकसभेप्रमाणे यंदा देखील सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागला आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती तर आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केला आहे. लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. असं अजित पवार एका सभेत बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी सावळमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे. त्यामुळे मला मतदान करून मला देखील खुश करा असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला फक्त 19 जागा जिंकता आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन Read More »

Eknath Shinde: CM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, जर मुलगी बहिण गुन्हा असेल तर…

Eknath Shinde: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत बोलताना लाडकी बहिण योजनेवरील विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. जर लाडकी बहिण योजना राबवणे गुन्हा असेल तर ते मला मारू शकतात आणि असे हजारो गुन्हा मी करण्यास तयार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते कुर्ल्यातील एका जाहीर सभेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्ष म्हणतात की ते लाडकी बहिण योजना बंद करू. तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल?…ते मुंबई हायकोर्टात गेले पण फेटाळले गेले, MVA लोक नागपूर कोर्टात योजना बंद करण्यासाठी गेले. ही योजना आणि इतर योजना बंद करू असे त्यांचे म्हणणे आहे… ते म्हणतात मुली बहिणीला पैसे देणे गुन्हा आहे, मी एकदा नाही तर दहा वेळा असा गुन्हा करायला तयार आहे. तसेच सर्व महिलांच्या सुरक्षित आणि सशक्त भविष्यासाठी त्यांच्या दृष्टीकोनाचा भाग म्हणून ही योजना कायम राहील असे आश्वासन नागरिकांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलारविवारी त्यांनी महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर (कुर्ला) आणि मुरजी पटेल (अंधेरी पूर्व) यांच्या समर्थनार्थ दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित केले. केंद्र आणि राज्य प्रशासन यांच्यातील सहयोगी प्रयत्नांवर प्रकाश टाकत शिंदे यांनी लाडकी बहिण सारख्या कल्याणकारी उपक्रमांचे प्रदर्शन केले ज्याने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत नोव्हेंबरचा हप्ता दिला. निवडणुकांनंतर डिसेंबरचा निधीही असाच ॲडव्हान्स दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आणि महाराष्ट्रातील महिलांना अधिक पाठिंबा देण्यासाठी सध्याच्या 1,500 रुपयांच्या वाटपात वाढ करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी ‘लाडकी बहिण योजने’साठी नोव्हेंबरचा हप्ता यशस्वीरित्या वितरित केल्याची घोषणा केली आणि निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला. असं ते म्हणाले. या योजनेद्वारे राज्य सरकारने राज्यातील मुलींना आधार देण्याची आणि लोकांचे जीवनमान सुधारण्याची आपली वचनबद्धता सातत्याने पूर्ण केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार कार्यक्रमादरम्यान शिंदे यांनी लोककल्याणासाठी आपल्या समर्पणाला दुजोरा दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये अपूर्ण आश्वासनांवर विरोधकांवर टीका केली आणि हिमाचल प्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी याची तुलना त्यांच्या प्रशासनाच्या वास्तविक वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करण्याशी केली.

Eknath Shinde: CM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, जर मुलगी बहिण गुन्हा असेल तर… Read More »

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक

Maharashtra Crime News: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांचा विश्वास संपादन करून मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची शेवगाव येथे शाखा उघडून फिर्यादी व इतर लोकांचे एकुण 67,40,000 रूपये ठेवी स्विकारुन, ठेवी परत न करता स्वत:चे फायदयाकरीता वापरून फिर्यादी व इतरांची आर्थिक फसवणुक केली होती. याबाबत शेवगावमध्ये भादंवि कलम 420, 406, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. गजानन उत्तमराव कोहिरे, (वय 45, रा.सुलसगाव, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), मोहन रूस्तम माघाडे, (वय 32, रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा), निता मोहन माघाडे, (वय 27, रा. रा.जिजामातानगर, ता.सिंदखेडराजा, जि.बुलढाणा) असे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra Crime News: मातृत्व सिंदखेडराजा अर्बन को.ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात 3 आरोपींना अटक Read More »

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

Sandeep Mitke : संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांनी नगर शहर,आर्थिक गुन्हे शाखा, श्रीरामपूर,शिर्डी ,शेवगाव याठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक गुंतागुंतीचे, संवेदनशील आणि क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच शेवगाव दंगल कौशल्याने हाताळून आरोपी जेरबंद केले.शिर्डी येथील वेश्या व्यवसाय ची पाळेमुळे उखडून टाकण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह गौरविण्यात आले आहे. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना काळामध्ये संदीप मिटके यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र शहरातील जनतेची काळजी घेतली. या काळात अनेक गोरगरीब जनतेला फूड पॅकेट व किराणा साहित्य वाटप करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामपूर येथील संवेदनशील गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा अधिकारी यांना उत्कृष्ट तपासाबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.

Sandeep Mitke : संदीप मिटके यांच्यासह राज्यातील अकरा पोलीस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर Read More »

Shrirampur News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह जेरबंद

Shrirampur News : श्रीरामपूर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला मुद्देमालासह अटक केली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  श्रीरामपूरमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो दत्तनगर, श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकाचे पोलीस अंमलदार मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड अशांचे पथक तयार करून संशयीतवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाने  29 ऑक्टोबर रोजी सुतगिरणी फाटा, रेल्वे फाटकजवळ, दत्तनगर, श्रीरामपूर येथे संशयीत आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. इम्तीयाज उर्फ बबलू अजीज शहा (वय 32, रा.काझीबाबा रोड, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर) असं आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 30,000 रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 1,000 रुपये किंमतीचे 2 काडतुस असा एकुण 31,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 1038/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Shrirampur News : गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गावठी कट्टा बाळगणारा इसम मुद्देमालासह जेरबंद Read More »

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट

Rohit Pawar : 2019 प्रमाणे 2024 लाही राज्यामध्ये कर्जत-जामखेड हा मतदार संघ लक्षवेधी राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार हे उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने असल्याने ही लढत मोठी रंगतदार आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपाने गाजणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदर रोहित पवार यांनी सहकुटुंब येत आपला उमेदवारी अर्ज कर्जत येथे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर कर्जत शहरातून एक भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील हजारो लोकांचा सहभाग दिसून आला. रॅली नंतर एका मोठ्या सभेचा आयोजनही करण्यात आलेलं होते. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी मी 2019 प्रमाणे आताही एका बलाढ्य पक्षा विरुद्ध लढत असलो तरी विजय पुन्हा माझाच होईल असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक जिंकण्यासाठीच असून पुढील पाच वर्षासाठी कोणती विकास कामे करायचे याचे प्लॅनिंग मी केलेले आहे. राम शिंदे यांच्यावर टीका करताना पवार यांनी, त्यांना विकासाबद्दल काहीही कळत नसल्याचा टोला लगावला. त्यांनी विकास कामे केले किंवा मी केली यासाठी त्यांनी समोरासमोर येऊन कोणी किती विकास कामे केली हे सांगावे असे खुले आव्हान रोहित पवार यांनी राम शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत 170 ते 180 जागांवर निवडून येईल असा दावा यावेळी रोहित पवार यांनी केला. विरोधकांनी जाणीवपूर्वक मतं खाण्यासाठी सुपारीबाज उमेदवार उभे केले आहेत, मात्र जनतेला विकासा कोण करेल याची माहिती असल्याने महाविकास आघाडी सोबत राज्यातील जनता राहील असा विश्वासही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Rohit Pawar : रोहित पवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदेंशी बिग फाईट Read More »

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे?

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सध्या ती वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दिवाळीच्या दरम्यान तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘पुकी’ सोबतचे फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Gues the Pookie’. तिचा पुकी कोण आहे, तिचा नवरा झहीर इक्बाल किंवा तिचा नवीन गोंडस पाळीव मित्र एक मजेदार कॅप्शनसह कोण आहे हे ठरवण्यासाठी अभिनेत्रीने हे तिच्या फॉलोवर्सवर सोडले आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले – गर्भधारणेबद्दल अभिनंदन! मात्र, याला जोडप्याने दुजोरा दिलेला नाही.फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाचा लेहेंगा परिधान करताना दिसत आहे. तर तिचा पती झहीर निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये आहे. फोटोंमध्ये दोघे हसताना दिसत आहेत आणि सोनाक्षीने तिचे पिल्लू धरले आहे. सोनाक्षीच्या सुंदर फोटोंवर तिच्या पतीने किस आणि हार्ट इमोजी दिले आहेत. 7 वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीरने 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली. दोघांनीही मुंबईत रिसेप्शन दिलं, ज्यामध्ये सलमान खान, संजय लीला भन्साळी, काजोल, तब्बू, यो यो हनी सिंगसह फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. झहीर देखील एक अभिनेता आहे आणि त्याने 2019 मध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला. झहीरचे वडील इक्बाल रतनसी दागिने आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आणि ते बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत. यामुळेच झहीरने सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘नोटबुक’मधून सुरुवात केली. झहीरची बहीण सनम रतनसी ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. दरम्यान, सोनाक्षीच्या व्यावसायिक कामाबद्दल बोलताना, अभिनेत्री तिच्या पतीसोबत ‘तू है मेरी किरण’ या आगामी प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करण्यास तयार आहे. याआधी सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती.

Sonakshi Sinha पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, चाहते म्हणाले- कोण आहे? Read More »

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

Maharashtra Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप देखील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून जागावाटापाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे या जागेवर कोणता पक्ष उमेदवार देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागू आहे. माहितीनुसार, महायुतीच्या 24 आणि महाविकास आघाडीच्या 33 जागांवर निर्णय होऊ शकलेला नाही. महाआघाडीत आघाडी वाढवण्यासाठी भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा छोट्या पक्षांसाठी सोडल्या आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर काँग्रेस-शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद) यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. दुसरीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संतुक मारोतराव हुंबर्डे यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेसने दिवंगत खासदार रवींद्र चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. जो जास्त जागा जिंकतो तो मुख्यमंत्री होतोज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील तोच मुख्यमंत्री होणार अशी अंतर्गत चर्चा म.वि. यामुळे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. तीन घटक पक्षांमध्ये प्रत्येकी 85 जागांवर निवडणूक लढवण्याचा करार झाला होता, मात्र काँग्रेसने 102 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने (यूबीटी) 84 जागांवर तर राष्ट्रवादीने (शरद) 76 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विदर्भ, मुंबई आणि मराठवाड्यातील सुमारे 15 जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीने काटेल जागेवर माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्राचे मुंबई-कोकण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुंबईतील पक्ष मुख्यालय टिळक भवन येथे कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. भाजपने काल तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवार जाहीर केले आहे. महायुतीच्या 21 जागांवर सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 146 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने आपल्या कोट्यातील चार जागा युवा स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय (आठवले) आणि जनसुराज्य शक्ती पक्षासाठी सोडल्या आहेत. कलिना जागेवर आरपीआयने अमरजीत सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Election: महायुतीच्या 24 तर मविआच्या 33 जागांवर निर्णय बाकी, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस Read More »