DNA मराठी

ताज्या बातम्या

एकापेक्षा जास्त Credit Card असेल तर काय होणार? जाणून घ्या नियम

Credit Card :  आज आपल्या देशात शॉपिंगसाठी किंवा इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर होत आहे. कोणा कोणाकडे तर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतात पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड असावेत नाही ना तर जाणून घ्या. नियम काय सांगतात?  असा काही नियम आहे की जो तुम्हाला क्रेडिट कार्ड ठेवण्यास प्रतिबंधित करतो? या प्रश्नाचे अगदी साधे आणि सरळ उत्तर आहे, नाही. एखाद्या व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड असावेत असा कोणताही नियम नाही. पण तुमचे आर्थिक स्वावलंबन राखण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर एका ठराविक मर्यादेपर्यंतच करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल तर तुमच्याकडे कितीही क्रेडिट कार्ड असले तरी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. फायदे आणि तोटे आता आम्ही तुम्हाला अधिक क्रेडिट कार्ड असल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर कोणते धोके निर्माण होऊ शकतात ते सांगू आणि अधिक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते देखील सांगू. फायदे पहिला आणि सर्वात मोठा फायदा असा आहे की एकाधिक क्रेडिट कार्ड्स असल्याने, तुम्ही तुमच्या खर्चाचे अधिक चांगल्या प्रकारे विभाजन करून व्यवस्थापित करू शकता. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील वाढतो आणि तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने तुमचे अतिरिक्त खर्च देखील करू शकता. दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक क्रेडिट कार्डमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात. ज्याप्रमाणे काही कार्ड्स मोफत एअरपोर्ट लाउंज सुविधा देतात, त्याचप्रमाणे काही कार्ड तुम्हाला पेट्रोल भरून रिवॉर्ड मिळवण्याची परवानगी देतात. अधिक क्रेडिट कार्ड्स असल्यास, तुम्हाला विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात. तोटा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला दर महिन्याला अनेक बिले भरावी लागतील आणि जर तुम्ही ही बिले भरण्यात अक्षम असाल तर तुम्हाला दंडालाही सामोरे जावे लागू शकते. प्रत्येक क्रेडिट कार्डला वार्षिक फी, जॉईनिंग फी आणि ट्रान्झॅक्शन फी भरावी लागते. तुमच्याकडे जितके जास्त कार्ड असतील तितके जास्त शुल्क तुम्हाला द्यावे लागेल.

एकापेक्षा जास्त Credit Card असेल तर काय होणार? जाणून घ्या नियम Read More »

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या

One Nation One Election :  केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.  केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता वन नेशन, वन इलेक्शनची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. वन नेशन, वन इलेक्शन लागू झाल्यानंतर लोकसभा किंवा राज्यसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहिती आहे का? वन नेशन, वन इलेक्शनला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असेल, पण प्रत्यक्षात येण्याआधी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यामध्ये आपल्या शिफारशी दिल्या आहेत.   त्रिशंकू सभागृहाच्या बाबतीत काय? वन नेशन, वन इलेक्शन लागू केले तर त्यानंतरच्या निवडणुका घेतल्या जातात. अशा परिस्थितीत लोकसभा किंवा राज्यसभेत त्रिशंकू सभागृहाची स्थिती निर्माण झाली तर काय होईल? हा प्रश्न अतिशय समर्पक आहे आणि आपण अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात तो वारंवार पाहिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशी शिफारस केली आहे की अशा परिस्थितीत त्या विधानसभा किंवा लोकसभेसाठी पुन्हा निवडणुका घेता येतील. मात्र लोकसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक होणार आहे. अविश्वास प्रस्ताव  राज्य किंवा केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला किंवा सरकार पडले. इतर कोणताही पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकली नाही, तर तेथे पुन्हा निवडणुका घेता येतील, अशी शिफारस माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली.  अशा परिस्थितीत, नवीन राज्य विधानसभा किंवा लोकसभेचा कार्यकाळ हा फक्त मागील लोकसभेच्या उर्वरित कालावधीसाठी असेल. उदाहरणार्थ, एखादे सरकार साडेतीन वर्षांत पडले आणि पुन्हा निवडणुकांची गरज भासली, तर पुन्हा निवडणुका नक्कीच होतील, पण नव्या सरकारचा कार्यकाळ केवळ दीड वर्षाचा असेल. पंचायत निवडणुकांचे काय? त्याच्या नावाप्रमाणेच, वन नेशन, वन इलेक्शन, संपूर्ण देशात एकाच वेळी निवडणुका होतील का? लोकसभा आणि विधानसभा व्यतिरिक्त यात नगरपालिका, पंचायत इत्यादींचाही समावेश असेल का? यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरुवातीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, असा प्रस्ताव दिला आहे.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांशी अशा प्रकारे जोडल्या जाव्यात की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या 100 दिवसांत नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका पूर्ण होतील. मार्चमध्ये अहवाल सादर करण्यात आला होता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस अगोदर या वर्षी मार्चमध्ये वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल सरकारला सादर केला होता.

One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनला मंजुरी पण सरकार पडल्यास काय होईल? जाणून घ्या Read More »

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला

Raj Thackeray : केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मताने व नेशन व इलेक्शन प्रस्ताव पास केल्यानंतर काही जणांनी याला समर्थन तर काही जणांनी विरोध केला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारला टोला लावत राज्यात आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या असा टोला लावला आहे.  राज ठाकरे म्हणाले की, ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला   केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.  बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का ? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो…  पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या. असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray: आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या, ‘एक देश एक निवडणूक’ वरून राज ठाकरेंचा मोदींना टोला Read More »

Chandrashekhar Bawankule : ‘सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे’, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सल्ला

Chandrashekhar Bawankule :  शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापला आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.  माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या अश्या बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाहीय, असं बोलनही योग्य नाहीय, कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधीने सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने ओबीसी, एस सी, एस टी यांचं आरक्षण काढून टाकू क्लियर आहे त्यांच्या बोलण्या मधे. आता बघा हे लोक आता मोदींच्या विरोधात प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार, मोदींनी कधीही संविधान बदलण्याची भाषा केली नव्हती. दहा वर्ष मोदी होते कधी संविधान बदललं नाहीय आणि आताही संविधान बदलणार नाहीय आणि तो बदलूच शकत नाहीय.  आता राहुल गांधीनी पोटातलं ओठांवर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहे आम्हला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजी म्हटलं होत.. की आरक्षण विकासाला बाधा आहे, हेच राजीव गांधींनी म्हटलं होत की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागत आणि हेच आता राहुल गांधींनी म्हटलं की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. तीन पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबाविण्याची आहे  राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.  तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसपूस आहे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहे, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा, काँग्रेसकडे जातं आहे, शरद पवार कडे जातं आहे. काँग्रेसकडे नाना पटोले सारखे दहा नेते तयार झाले आहे.  महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री साठी चढाओढ आहे पण आमच्याकडे डबल इंजिन सरकार आलं पाहिजे  2029 पर्यंत केंद्रात मोदीच सरकार आहे आणि राज्यातलं सरकार एका विचारच आलं आणि दोन्ही सरकार एका विचाराचे आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला फायदा होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रात डबल इंजिनच महायुतीच सरकार पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : ‘सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे’, चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सल्ला Read More »

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार

Ahmednagar News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण आरक्षण लागू व्हावे यासाठी आज  बुधवारपासून (दिनांक 18 सप्टेंबर) सात जण नेवासा फाटा येथे उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास हे सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा सकल धनगर जमातने दिला आहे.  दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत घेतलेली बैठक आम्हाला मान्य नाही व तिथे त्या बैठकीत सहभागी झालेल्या समाजाच्या शिष्टमंडळाला आमची मान्यता नाही, असे स्पष्टीकरणही सकल धनगर समाजाने दिले आहे.  धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा येथे संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केले जाणार आहे.  यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत. उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात शासनाने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही व प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी स्पष्ट केले.  या सात जणांपैकी राजू मामा तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (तालुका पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी तेरा दिवस उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पन्नास दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष झाले तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग तागड यांनी व्यक्त केला.  दहा वर्षांपासून तेच ऐकतोय  या संदर्भात सोरमारे यांनी सांगितले की, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर वा राहुरी येथे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले व आताही आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील दहा वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय, अशी खंत व्यक्त करून सोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केले आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.  शिष्टमंडळच मान्य नाही  मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई व अन्य उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होते. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही, असा दावाही सोरमारे यांनी केला.

Ahmednagar News: धनगर आरक्षण! …नाहीतर नदीत उड्या टाकून जलसमाधी घेणार Read More »

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन

Ahmednagar News: जामखेड गेले १० दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्रीगणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. जामखेड शहरात मोठया मंडळाचे १४ व लहान मंडळाचे १० असे २४ तर एक गाव एक गणपती १० व ग्रामीण भागात एकुण ५५ मंडळाची म्हणजे एकुण ८९ मंडळांची श्री . ची . स्थापना करण्यात आली होती . सातव्या दिवसापासुन शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती . दहाव्या दिवशी शहरातील१४ व ग्रामीण भागातील १७ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले . प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.  मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण असून, ढोल-ताशा लेझीम फड ढोलीबाजा-बेन्जोबाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने शहर व परिसर दणाणून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने मास्थून निघाले. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते गणेशमूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी  जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत मेनरोड गजबजून गेला होता. हा सारा परिसरच जणू गणपतीमय होऊन गेला होता. भगव्या टोप्या, प‌ट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण  दिसत होते. दरवर्षी प्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्र मंडळाने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे ; प्रा . मधुकर राळेभात ; सभापती शरद कार्ले ; माजी सभापती डॉ .भगवान मुरूमकर व अमित चिंतामणी यांनी केला . तसेच   मोठ्या हौसेने या वर्षी आमदार रोहित पवार यांनी मेनरोड वर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळ यांचे सत्कार त्यांनी केले. गणरायाचे विसर्जन पाहण्या- साठी जामखेडकरांची मेनरोडवर गर्दीची लाट पसरलेली होती. मेनरोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीतून एक विलोभनीय चित्र पाहत होते.  दोन्ही आमदारांनकडून संघर्ष मित्र मंडळाचे कौतुक अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक घेतले आहेत. या वर्षी मंडळाची पहिल्या दिवशाची आरती आमदार राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली. शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्रमंडळाची मिरवणूक आकर्षक होती. गणपती विसर्जन मिरवणुक अगदी शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली . यावेळी दोन्ही ही आमदारांनी संघर्ष मित्र मंडळांचे कौतुक केले.  दोन्ही आमदार  थिरकले !  2024 च्या विनासभेत एकचं तरी विसर्जन होणार : जामखेडकर जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गाण्याच्या ताळावर  बेभानपणे थिरकले होते . विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागाताचे स्टेज स्वतंत्र होते . परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धाच दिसत होती . यावेळी ही जणू विधान सभेची विसर्जन मिरवणुक तर नाही ना ? 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचं तरी विसर्जन होणार असं जनतेतं चर्चेचा विषय चर्चीला जात होता . कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेन व उत्साहात पार पडला .

Ahmednagar News: आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले, जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन Read More »

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर…

OYO Room : आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाकडे  आधार कार्ड आहे. आधार कार्ड हे ओळखपत्राप्रमाणे काम करते. बँक खाते उघडण्यापासून कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. कोणत्याही हॉटेल किंवा ओयोमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याकडे आधार कार्ड मागितले जाते. तुम्हीही हॉटेल किंवा ओयोमध्ये जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फसवणुक होऊ शकते  आम्ही हॉटेल किंवा OYO बुक करतो. ज्यासाठी आम्हाला आधार कार्ड जमा करण्यास सांगितले जाते. जर तुम्ही हॉटेल किंवा ओयो रूम बुक करताना तुमचे आधार कार्ड जमा केले तर तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. आधारचा दुरुपयोग कसा होतो ते जाणून घेऊया. वास्तविक, आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासह सर्व महत्त्वाची माहिती असते. अशा परिस्थितीत कोणीही तुमच्या आधार कार्डमधून डेटा चोरू शकतो आणि मोठी बँकिंग फसवणूक होऊ शकते. त्यामुळे हॉटेल किंवा ओयो रूम बुक करताना मास्क केलेले आधार कार्ड वापरावे. मास्क केलेल्या आधार कार्डमध्ये 12 अंकांऐवजी फक्त 4 अंक असतात. म्हणजे तुमच्या आधार क्रमांकाचे 8 अंक लपलेले आहेत. अशा स्थितीत तुमच्या आधार कार्डद्वारे फसवणूक शक्य होणार नाही. मास्क केलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करावे मास्क केलेले आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइट http:uidai.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला My Aadhar Card चा पर्याय दिसेल. यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा टाका. यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. OTP एंटर करा आणि सबमिट करा. आता तुम्हाला आधार डाउनलोड पर्याय दिसेल. आता तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता.

OYO Room:  OYO रूममध्ये बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी करा नाहीतर… Read More »

Jio – Airtel ची धाकधूक वाढणार, BSNL चा नवा धमाका, 300 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च

BSNL Recharge: जर तुम्ही देखील स्वस्त रिचार्ज प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी बीएसएनएलने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. या नवीन रिचार्ज प्लॅन अंतर्गत तुम्हाला तब्बल 300 दिवसांच्या सिम वैधतेची ऑफर मिळणार आहे.   या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यात डेटा, फ्री कॉल्स आणि एसएमएसचाही समावेश आहे. BSNL ने 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे जो 300 दिवसांची सिम वैधता देतो. म्हणजेच ग्राहकांना दिवसाला केवळ तीन रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी मोफत नॅशनल रोमिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS मिळतात. 60 दिवसांनंतर, इनकमिंग कॉल सुरू राहतील परंतु डेटा, कॉल आणि एसएमएस मिळविण्यासाठी टॉप-अप करावे लागेल. BSNL चा दुय्यम सिम वापरणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. पहिल्या दोन महिन्यांसाठी मोफत डेटा, कॉल आणि एसएमएसचा लाभ घेऊन ते याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. मोफत सेवा 60 दिवसांनंतर बंद होत असली तरी सिम 240 दिवस ॲक्टिव्ह राहण्याची हमी बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांनी किमती वाढवल्यानंतर बीएसएनएल आकर्षक प्लॅनसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कमी किमतीत उत्तम सेवा देण्यावर बीएसएनएलचा भर आहे. या रणनीती अंतर्गत, BSNL आपले 4G नेटवर्क देखील वाढवत आहे. अनेक दूरसंचार मंडळांमध्ये 4G सेवा सुरू झाल्या आहेत आणि BSNL ने दूरसंचार मंत्रालयाच्या सहकार्याने 5G चाचण्याही सुरू केल्या आहेत.

Jio – Airtel ची धाकधूक वाढणार, BSNL चा नवा धमाका, 300 दिवसांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च Read More »

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम

Sanjay Gaikwad : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तत्वानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काल रात्री बुलढाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात माध्यमांशी बोलताना  मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.  यावेळी ते म्हणाले की, स्टेटमेंट मी केले, मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आरक्षण संपणाऱ्या बद्दला जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पलानिग काँग्रेसने केले. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलीय. आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील असं ते म्हणाले.  तर माझ्या कार्यक्रममध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जी जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे. असेही या वेळी ते म्हणाले.  तसेच आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणला विरोध करणाऱ्यांना जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे. असेही संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम Read More »