DNA मराठी

ताज्या बातम्या

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी

Ahmednagar News :  मुकुंदनगर परिसरात मौलाना असलम शेख यांना 27 डिसेंबर रोजी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणी विरोधात परिसरातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयमध्ये निवेदनाद्वारे आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात आरोपी असणाऱ्या अनिस सय्यदने मौलाना असलम शेख यांना गॅस कनेक्शनच्या वादातून जबरी मारहाण केली. या मारहाणीत मौलाना असलम शेख यांच्या उजव्या डोळ्याला मार लागला आहे.  या घटनेनंतर आरोपी विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आरोपी विरोधात आणखी कलम वाढवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.

Ahmednagar News: आरोपी विरोधात कारवाई करा! ‘त्या’ प्रकरणात समस्त मुस्लिम समाजाची मागणी Read More »

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe News: 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडे मधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल हे दोनही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  राहुरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी खासदार सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना साखर व हरभरा डाळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ज्या गतीने कामे मार्गी लागली ती कामे विरोधी पक्षाकडे तीन वर्ष सत्ता असूनही लागली नाहीत असे मत यावेळी सुजय विखेंनी मांडले.  तसेच पुढे ते म्हणाले की, साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नसून येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने हे वाटप केले जात आहे असे त्यांनी सांगितले. हा आपल्यासाठी एक प्रकारे मोठा सण असून या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबीयांनी लाडू बनवून श्री रामांना वहावे व श्रीरामांची पूजा करावी आणि त्यांना लाडूचा नैवेद्य दाखवावा हा उद्देश यामागे असून आपल्यासाठी ही दुसरी दिवाळी आहे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले.  तरी अतिशय शुद्ध हेतूने सदरील उपक्रम राबविण्यात येत असून विरोधकांनी यावर कसलेही राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच पुढे त्यांनी निळवंडे संदर्भात भाष्य केले. विखे घराणे निळवंडेचे पाणी येऊन देणार नाही अशी वल्गना नेहमी विरोधकांनी करून घाणेरडे राजकारण केले, मात्र आम्ही सर्व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. यासाठी आमच्या शासनाने सर्वाधिक निधी मंजूर केला आणि विखे घराण्याचे पालकमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निळवंडे ला पाणी सोडण्यात आले असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, येत्या 22 तारखेला निळवंडे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे. तसेच कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले व सत्तेचा वापर हा केवळ जनकल्याणासाठीच केला जाईल. विखे घराने जे काम हाती घेतले ते पूर्णत्वास जातेच त्यामुळे कुणीही काळजी करू नये असे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागत असून विकासक दृष्टी ठेवणारे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत असे प्रतिपादन केले.  तसेच त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत विरोधकांची सत्ता असल्यावर कोणतीही विकासकामे करण्यात आली नाही. केवळ सत्तेचा उपभोग घेण्यात आला असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  विद्युत खाते असताना देखील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज न देऊ शकणाऱ्यांनी इतरांवर आरोप करणे थांबवावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात हे कुठपर्यंत योग्य आहे, असा सवाल विचारून येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त जनतेला द्यावे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वन खात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार असून प्रत्येकाच्या शेताला पाणी देखील मिळणार आहे.  निळवंडेच्या माध्यमातून परिसरातील तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून मिळतील याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे असे त्यांनी सांगितले. तसेच निळवंडे बाबत आमचे योगदान नाही असे म्हणणाऱ्यांनी आम्ही निळवंडे साठी काय काय केले हे तपासले पाहिजे. तुम्ही घरी बसून बाता मारता, मात्र आम्ही प्रत्यक्षात नागरिकांसाठी काम करतो. तुमचे 50 वर्षांमध्ये निळवंडेसाठी योगदान काय? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विरोधकांना विचारला. या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश दादा बनकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे, अमोल भनगडे, दादा पाटील हारदे, मयूर हारदे, विजय बलमे, सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे, बाबासाहेब गाढे, संदीप घाडगे, महमद भाई इनामदार, दत्तू गाढे, सोसायटी चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, राजेद्र दिवे, शंकर राव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sujay Vikhe News : शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल- खा.डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव

Priyanka Gandhi :  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जमीन खरेदीशी संबंधित प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात प्रियांका गांधींचाही उल्लेख आहे. मात्र या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. काय प्रकरण आहे हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील फरीदाबाद येथील जमीन खरेदीशी संबंधित आहे. माहितीनुसार, 2005-2006 दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरिदाबादच्या अमीपूर गावात प्रॉपर्टी डीलर एचएल पाहवा (थम्पीच्या जवळ) मार्फत सुमारे 40.8 एकर जमीन खरेदी केली होती, जी डिसेंबर 2010 मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल 2006 मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी 2010 मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले. ईडीचे म्हणणे आहे की वाड्रा आणि थंपी यांचे दीर्घ संबंध आहेत आणि समान व्यवसाय करण्याव्यतिरिक्त दोघेही अनेक गोष्टी एकत्र करतात. हा एक मोठा खटला आहे, जो फरारी शस्त्र विक्रेता संजय भंडारीशी संबंधित आहे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत रॉबर्ट वाड्रा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका नवीन प्रकरणात आरोपी केले आहे ज्यात त्यांनी लंडनमधील एका घराचे नूतनीकरण केले आणि त्यात वास्तव्य केले. संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात हे घर कथितपणे ‘गुन्ह्याच्या कमाईचा’ भाग आहे. संजय भंडारी 2016 मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. या प्रकरणात वाड्रा यांचे नाव प्रथमच समोर आले असून ईडीने निवेदन जारी करून ते सार्वजनिक केले आहे. परदेशात कथित अघोषित संपत्ती असलेल्या व्यक्तींवरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपांची चौकशी करणे हा या तपासाचा मुख्य उद्देश आहे.  ईडीने या प्रकरणी यूएईस्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.

Priyanka Gandhi:  प्रियांका गांधी यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रात नाव Read More »

Corona Virus: अर्र.. पुन्हा कोरोना, 24 तासात 702 रुग्णांची भर, ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

Corona Virus : देशातील अनेक भागात कोरोना हळूहळू वाढत चालला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 702 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,097 वर पोहोचली आहे.  गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने संसर्गाची नवीन आकडेवारी जाहीर केली. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोविड-19 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी देशात संसर्गाची 752 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. अचानक प्रकरणे का वाढू लागली? आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्दी आणि कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांमुळे अलिकडच्या काळात संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. यापूर्वी, 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती. 2020 च्या सुरुवातीपासून चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, परिणामी 5.3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराला घाबरण्याची गरज आहे का? आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटी झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे. JN.1 प्रकाराला घाबरण्याची गरज नाही, असे बहुतांश आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. संसर्ग झाल्यास काय करावे? जर तुम्हाला कोविड-19 ची लागण झाली असेल, तर लगेच स्वतःला अलग करा. तुमची तब्येत बिघडली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मास्क घालण्याची खात्री करा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करा.

Corona Virus: अर्र.. पुन्हा कोरोना, 24 तासात 702 रुग्णांची भर, ‘इतक्या’ जणांचा मृत्यू Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »

Rishabh Pant: क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी संघात परतणार ऋषभ पंत

Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा भारतीय संघात दिसणार आहे. ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मैदानाबाहेर आहे. यामुळे तो मैदानावर कधी परतणार याची चर्चा सध्या सूरू आहे.  तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत IPL 2024 मध्ये खेळताना दिसू शकतो. असे झाल्यास दिल्ली कॅपिटल्ससाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असेल. मात्र अद्याप त्याच्या पुनरागमनाबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे दावे केले जात आहेत. ऋषभ पंत रस्ता अपघातात जखमी झाला होता संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. एवढेच नाही तर दुखापतीमुळे तो वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघात सहभागी होऊ शकला नव्हता.

Rishabh Pant: क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी संघात परतणार ऋषभ पंत Read More »

Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्….

Thane News: ठाणे जिल्ह्यात नात्याला लाजवेल अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांच्या मुलीवर बापाने बलात्कार केला.  पोलिसांनी सांगितले की, आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपले हे घृणास्पद कृत्य लपवण्यासाठी आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्काराची खोटी स्टोरी तयार केली.  आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की त्याच्या सावत्र अल्पवयीन मुलीचे 24 डिसेंबर रोजी तीन लोकांनी अपहरण केले होते. यानंतर भिवंडी तालुक्यातील एका गावात तिच्यावर बलात्कार झाला. निवेदनाच्या आधारे, प्रथम पोलिसांनी मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. पण तपासात पोलिसांना वडिलांची भूमिका संशयास्पद वाटली. पोलिसांनी आरोपीच्या जबानीत तफावत असल्याची चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पित्याने 10 वर्षांच्या मुलीवर त्याच्याच घरात बलात्कार केला होता, घटनेच्या वेळी मुलीची आई घरी नव्हती. आरोपीने पीडितेला खोटे सांगण्यास सांगितले होते. स्थानिक न्यायालयाने आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नुकतेच नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एका बापाने आपल्या 18 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडितेने स्वतः पोलिस स्टेशन गाठून तिच्या सावत्र वडिलांविरोधात तक्रार दाखल केली.  मुलीने आपल्या जबानीत सांगितले की, आरोपीने 22 डिसेंबर रोजी तिच्यावर बलात्कार केला. ती घरी झोपली असताना आरोपीने हा गुन्हा केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार अन्…. Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार, आढळले ‘इतके’ रुग्ण; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट

Maharashtra Corona:  पुन्हा एकदा राज्यात कोरोना वाढत चालला आहे. नवीन व्हेरियंट आता हळूहळू अनेक शहरांमध्ये पसरत आहे. यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत. तर दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी स्वतः ट्विट करून संसर्ग झाल्याची माहिती दिली.  सोमवारी राज्यात 28 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली आहे. कोविडचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. यानंतर ठाणे आणि पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 77 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ठाण्यात 29, रायगडमध्ये 17 आणि पुण्यात 23 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या JN.1 या नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्गात एका 41 वर्षीय व्यक्तीला जेएन.1 ने धडक दिली. आतापर्यंत राज्यात जेएन-1 ची लागण झालेल्या एकूण 10 रुग्णांची पुष्टी झाली आहे. रविवारी महाराष्ट्रात 50 नवीन कोरोना बाधित आढळून आले. ज्यामध्ये जेएन-1 ची लागण झालेले 09 रुग्ण आहेत. जेएन-1चे सर्वाधिक पाच रुग्ण ठाण्यात आहेत. याशिवाय पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे ग्रामीण आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. रविवारी आढळलेल्या नवीन जेएन-1 रुग्णांमध्ये 8 पुरुष आणि एक महिला रुग्ण आहेत. यामध्ये एक 9 वर्षांचा मुलगा, 21 वर्षांची महिला, 28 वर्षीय पुरुष आणि इतर रूग्ण 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. पुण्यात सापडलेला एकच रुग्ण परदेशात गेला आहे. नुकताच तो अमेरिकेहून परतला आहे.  राज्यात आढळलेल्या 9 जेएन – 1 प्रकरणांपैकी 8 जणांना कोविड लसीचे दोन डोस मिळाले आहेत. सर्वांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार, आढळले ‘इतके’ रुग्ण; जाणुन घ्या लेटेस्ट अपडेट Read More »

Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल

प्रतिनिधि शेख नदीम Sillod News : सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी अजिंठा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत झन्ना मन्ना खेळणाऱ्या 7 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपयाचा नगद व जुगार खेळणाच्या साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवना परिसरातील देशी दारूच्या दुकाना समोरील पत्र्याच्या शेडात झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी सकाळच्या सुमारास धाडी टाकली असता दादाराव काळे,रमेश काळे (दोघे रा.खुपटा),गजानन वाघ,शेख रसूल,विजय बावस्कर,रामराव पवार (सर्व रा.शिवना),हिरामण बावस्कर (रा.सोयगाव ) यांना रंगेहाथ पकडले . आरोपींविरोधात अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 3330 रुपये नगद व जुगाराचा साहित्य जप्त करण्यात आला आहे .

Sillod News: शिवना येथे जुगार खेळणाऱ्या 07 आरोपीन विरुध्द गुन्हा दाखल Read More »