DNA मराठी

ताज्या बातम्या

Devendra Fadanvis

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट

Hindi Language Controversy: त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी 23 जूनच्या रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अ‍ॅकडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत ठरले. ही सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे आता पुढची सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार हे उपस्थित होते.

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट Read More »

IMG 20250622 WA0014 1024x683

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Uddhav Thackeray: शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी उबाठाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल. उबाठाची अवस्था धोकादायक आणि जिर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदु सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत, तर त्यांना सोडून ज्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी, आमदार, खासदार जात आहेत त्यावर तो पक्ष जिर्ण अवस्थेत आहे. 2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांंनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झालाच शिवाय मुळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले त्यामुळे उबाठा सेना हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश Read More »

War

Maharashtra News: पुस्तकं नाही वाचणारे युद्धं पेटवतात

Maharashtra News: “घरात असलेल्या गीता आणि कुराण यांच्यात कधी लढाई होत नाही; जे लोक त्यांच्यासाठी लढतात ते कधीच ती पुस्तकं वाचलेली नसतात.” ही वाक्यं केवळ एक उपहासात्मक निरीक्षण नाही, तर आजच्या सामाजिक वास्तवावर बोट ठेवणारा आरसा आहे. भारताच्या मातीत गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथसाहिब या सर्व धर्मग्रंथांचा सन्मान करणारी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विविध श्रद्धा, संस्कृती आणि विचारांची ही भव्य गंगा एकत्र वाहत आलेली आहे. पण दुर्दैवाने आज याच ग्रंथांच्या नावाने भिंती उभारल्या जात आहेत. रस्त्यावर रण मांडणारे, सोशल मीडियावर द्वेषाची भाषा करणारे, “धर्मरक्षक” असल्याचा दावा करणारे कितीजण खरेच हे ग्रंथ उघडून वाचतात? गीता सांगते “अहिंसा परमो धर्म:” आणि “कर्मण्येवाधिकारस्ते”; तर कुराण म्हणते “La ikraha fid deen”, म्हणजे धर्मात जबरदस्ती नाही. या पवित्र ग्रंथांनी माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा संदेश दिला आहे, त्याग, क्षमा, सहिष्णुता आणि न्याय यांचा मार्ग दाखवला आहे. पण जो माणूस पुस्तकाच्या मुखपृष्ठात अडकून राहतो, तो त्या मूळ संदेशापर्यंत कधी पोचतच नाही. राजकारण, सत्तालालसा आणि समाजात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हे ग्रंथ हत्यारासारखे वापरण्याचा प्रकार वाढला आहे. यात बळी जातो तो सामान्य नागरिकांचा  जो धार्मिकतेपेक्षा माणुसकीला महत्त्व देतो, पण अशा विभाजनाच्या जाळ्यात अडकतो. मूळ समस्या ही धार्मिक ग्रंथ नव्हे, तर त्यांचं गैरवाचन (किंवा अजिबात न वाचन) आहे. शिक्षणाची उणीव, विवेकाचा अभाव आणि सत्तेच्या खेळींमुळे समाजात कृत्रिम तणाव निर्माण केला जातो. मग प्रश्न येतो  आपण खरोखरच आपल्या श्रद्धेला समजून घेतोय का? समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण धार्मिकतेच्या नावे उभ्या राहणाऱ्या भिंती पाडायला हव्यात वाचून, समजून, आणि विचार करून. फक्त गीता किंवा कुराण हातात घेऊन फोटो काढणं सोपं आहे, पण त्यातील तत्वज्ञान अंगीकारणं आणि आचरणात आणणं हेच खरं आव्हान आहे. आज गरज आहे ती वादाच्या नाही, संवादाच्या. आणि तो संवाद सुरू होईल जेव्हा आपण ग्रंथांना हत्यार न समजता, विचारांची शिदोरी मानू. कारण शेवटी गीता आणि कुराण कधीही भांडत नाहीत माणूसच ते वाचायचं टाळतो आणि मग संघर्ष सुरू होतो.

Maharashtra News: पुस्तकं नाही वाचणारे युद्धं पेटवतात Read More »

IMG 20250623 WA0003 1024x576

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू

Ahilyanagar News : शहरातील माणिक चौक या ठिकाणी असलेले पक्के अतिक्रमण महानगरपालिकेच्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व्यापारी शहर प्रमुख विशाल वालकर यांनी आज महानगरपालिकेच्या समोर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषण सुरू केले. महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली असताना देखील सुद्धा कारवाई केली नाही उलट अनेक ठिकाणी मोजक्या कारवाई करून वेळ मारून देण्याचा प्रकार घडलेला आहे असेच उदाहरण शहरातील माणिक चौक भागांमध्ये पाहायला मिळालेले आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिक ठिकाणी रस्त्याची, ड्रेनेजची कामे चालू आहेत. त्यापैकी एकमुखी दत्त मंदीर चौक, सोपानराव वडेवाला समोर, माणिक चौक येथे आशा टॉकीज चौक ते कापड बाजार येथे चालु असलेल्या ड्रेनेज लाईन व काँक्रीटीकरणचे कामाच्या रस्त्यात अडथळा निर्माण करणारे ओटे, पत्रा शेड इ. अतिक्रमण हटवुन काम पुर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर मालमत्ता सि.स.नं. ३६१८/२ या ठिकाणी सन २०१९ पासून अशोक छल्लानी व भागीदार यांनी या मालमत्तेमध्य बेकायदेशीर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कुठलीही परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम करुन गाळे बांधून महानगरपालिकेच्या जागेमध्ये १० फुटाचा ओटा, पत्र्याची शेड बांधून मोठे अतिक्रमण केले आहे. तसेच अशोक छल्लानी व इतर भागीदार यांनी त्या बेकायदेशीर बांधकाम केलेल्या गाळ्यांमध्ये भाडेकरी टाकले असुन सदर जागेवर डी.एस.पी. फुटवेअर व फुटी फुटवेअर व इतर दुकाने या दोन दुकानदारांनी दुकानासमोर महापालिकेच्या जागेमध्ये वीजेचा खांब पत्रा शेडच्या आत घेऊन रस्त्यावर १० फुट X २० फुट ओटा व पत्राशेड बांधुन मोठे अतिक्रमण केले आहे. तरीपण संबंधीत मालमत्ताधारक हा महानगरपालिकेला न जुमानता वारंवार अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमणाबाबत वालकर यांनी मनपास दिनांक ३० मे २०२५ रोजी आयुक्त रितसर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जाकडे महापालिका, अतिक्रमण विभाग व प्रभाग समिती नं. २ या विभागांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून तक्रारीचे निरसन करण्याची विनंती केली होती. परंतु सदर सर्व विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले होते.त्यामुळे दि.१३ रोजी उपोषणाला बसण्याचे आवाहन केले होते, त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने मला दिनांक ०9 रोजी पत्र देऊन अश्वासन दिले की, नगर रचना विभागामार्फत माकींग करुन अहवाल सादर झाला की, उचित कारवाई करण्यात येईल असे पत्र देवून संबोधले होते, या करीता मी उपोषण स्थगित केले होते. प्रभाग समिती क्र. २ ने नगर रचना विभागाला रितसर अभिप्राय मिळावा या करीता मागणी केली होती, त्या मागणीचा रोड मार्कीग करुन अतिक्रमण केलेला अभिप्राय त्यांना दि. ९ रोजी प्राप्त झालेला आहे. तरी देखील आज पर्यंत महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अद्याप केलेली नाही व रोडचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. दरम्यान, वालकर यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेने त्या ठिकाणी जाऊन फक्त पत्राची शेड बाजूला केली मात्र पक्के बांधकाम तसेच ठेवले आहे. त्यामुळे आज पासून माणिक चौक येथील अतिक्रमण कारवाईच्या संदर्भात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे वालकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

अतिक्रमणाची दाखल न घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाचे विशाल वालकर यांचे उपोषण सुरू Read More »

ABS System

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा

ABS System: जानेवारी 2026 पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS सिस्टिम अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. याच बरोबर नवीन दुचाकीसोबत दोन हेल्मेटही अनिवार्य करण्यात आले आहेत. ही ABS सिस्टिम नेमकी काय? याबद्दल जाणून घेऊया.. का घेण्यात आला निर्णय? जानेवारी 2026 पासून, देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकींमध्ये ABS अनिवार्य असेलरस्ते अपघात, त्यातून होणारे मृत्युला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या एबीएस 125 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठीच सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या देशातील अंदाजे 40 टक्के दुचाकींना एबीएस सुरक्षा प्रणाली नाही पण, आता सर्वच प्रकारच्या इंजिन असलेल्या दुचाकींसाठी हे सक्तीचे करण्यात आलयं. एबीएस काय आहे? अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम एक सेफ्टी फीचर असून जे वाहनाच्या ब्रेक सिस्टममध्ये वापरले जाते. ABS बाईक किंवा कोणत्याही वाहनाला ब्रेक लावताना टायर लॉक होण्यापासून रोखते. घसरण्याचा धोका होतो कमी अचानक ब्रेक लावल्यानंतर वाहनांचे संतुलन बिघडते त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. हे टाळण्यासाठी आणि वाहन घसरून अपघात होऊ नये यासाठी एबीएस फायदेशीर ठरते. एबीएसमुळे ब्रेक लावल्यानंतरही चाकं लॉक न होता फिरत राहतात. तसेच रस्ता ओलसर किंवा घसरट असतानाही वाहनावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे वाहन अपघाग्रस्त होण्यापासून टाळते ABS कसे काम करते? ABS मध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स असतात जे टायर्सच्या वेगाचे सतत निरीक्षण करते. ब्रेक लावताच, सेन्सर्स टायरच्या वेगाचे निरीक्षण करते. जर, टायर अचानक लॉक होऊ लागला तर, ABS काही काळासाठी त्या टायरवरील ब्रेक प्रेशर कमी करते आणि बाईक संतुलित होताच, ही प्रणाली लगेच पुन्हा ब्रेक लावते. ABS चे किती प्रकार आहेत? सिंगल चॅनेल एबीएस: फक्त पुढच्या चाकावर काम करते ड्युअल चॅनेल एबीएस : पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर काम करते आणि हे अधिक सुरक्षित मानले जाते.

भारीच…, दुचाकींमध्ये येणार ABS सिस्टिम; आता घसरून पडणं विसरा Read More »

Nana Patole

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Nana Patole : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला असेही ते म्हणाले. चंदीगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व दस्तावेज देण्याचा आदेश आयोगाला दिला होता पण  आपली चोरी पकडली जाणार या भितीने आयोगाने मोदी सरकारच्या मदतीने अत्यंत घाईने अवघ्या ४८ तासात नियम ९३ बदलल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संध्याकाळी ५८ टक्के असलेले मतदान दुसऱ्या दिवशी ६५ टक्क्यांच्या वर वाढवण्यात आले. ही वाढ ८ टक्क्यांची असून ते जवळपास ७६ लाख मतदान आहे. हे ७६ लाख मतदान कसे वाढले, यावर निवडणूक आयोग सविस्तर खुलासा करत नाही. संध्याकाळी ५ नंतरच्या मतदानाचे सीसीटीव्ही फूटेज देण्याची मागणी केली पण माहिती देता येणार नाही असा नियमच करून टाकला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आठवडाभराच्या आतच १७ डिसेंबर २०२४ ला निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालयाला पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायद्याच्या नियम ९३ मध्ये बदल करण्याची विनंती केली. नियम ९३ नुसार मतदानानंतरचे दस्तऐवज आणि माहिती मागवता येते. पण ही माहिती जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. १९ डिसेंबर रोजी आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र पाठविले होते त्याचा दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० डिसेंबरला निवडणूक आयोग व कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊन त्याच रात्री १०:२३ वाजता नवीन नियम अधिसूचितही करण्यात आला. मतदान प्रक्रियेत काही घोटाळा केलेला नाही तर नियम बदलण्याची घाई कशासाठी केली. यावरून दाल में कुछ काला है हे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र व हरियाणाप्रमाणेच इतर राज्यातही मतांवर दरोडा टाकला आहे. काँग्रेस पक्ष ही लढाई सुरुच ठेवली असून सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगाने 48 तासात नियम 93 बदलला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप Read More »

Iran Israel Conflict 1

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असणाऱ्या तणावामुळे संपूर्ण जगात एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेअर बाजार कोसळत आहे. तर दुसरीकडे आज इराणने इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणने पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर केला. हा हल्ला दक्षिण इस्रायलमधील एका रुग्णालयाला टार्गेट करून करण्यात आला, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी, इस्रायलने इराणच्या अणुसुत्रांवर हवाई हल्ले केले होते. प्रत्युत्तरादाखल, तेहरानने क्लस्टर युद्धसामग्रीने सुसज्ज क्षेपणास्त्रे डागली. हा हल्ला आतापर्यंतच्या संघर्षातील सर्वात मोठा चिथावणी मानला जातो. युद्धबंदी किंवा राजनैतिक तोडगा निघण्याची शक्यता दिसत नाही. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला इस्रायली संरक्षण दलाने (IDF) शुक्रवारी इराणच्या अनेक लष्करी आणि अणुतळ तळांना टार्गेट केले. त्यापैकी, इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित असलेल्या स्थळांना विशेषतः लक्ष्य केले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की “आम्ही आमच्या लष्करी योजनेत वेळापत्रकापेक्षा पुढे गेलो आहोत आणि इराणच्या सर्व अणुस्थळांना, अगदी फोर्डोसारख्या मजबूत ठिकाणांना देखील टार्गेट करू शकतो.” इराणने क्लस्टर बॉम्बने प्रत्युत्तर दिले इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने शुक्रवारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वर्षाव केला. यामध्ये पहिल्यांदाच क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, ज्यामुळे इस्रायली रुग्णालयाचे गंभीर नुकसान झाले. या हल्ल्यात 74 लोक जखमी झाले, त्यापैकी बहुतेकांना किरकोळ दुखापत झाली किंवा त्यांना पॅनिक अटॅकमुळे उपचारांची आवश्यकता होती. इराणला नेतान्याहू यांचा इशारा पंतप्रधान नेतान्याहू यांनी कडक शब्दात इशारा दिला की, “इराणच्या नेतृत्वाला या हल्ल्याची संपूर्ण किंमत मोजावी लागेल.” त्यांनी असेही म्हटले की इस्रायल आपल्या लष्करी रणनीतीत अपेक्षेपेक्षा खूप पुढे गेला आहे. अमेरिका दोन आठवड्यात मोठा निर्णय घेऊ शकते व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन आठवड्यात निर्णय घेतील की अमेरिका इस्रायलला लष्करीदृष्ट्या पाठिंबा देईल की नाही. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची मान्यता मिळाल्यास इराण “काही आठवड्यांत” अण्वस्त्रे तयार करू शकेल अशी घोषणा या घोषणेत करण्यात आली आहे. आयआरजीसीमध्ये गुप्त चर्चा आणि मोठे बदल सूत्रांनुसार, ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्यात अनेक फोनवरून संभाषण झाले आहे. दरम्यान, इराणने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) च्या गुप्तचर विभागाच्या नवीन प्रमुखाची नियुक्ती केली आहे. ब्रिगेडियर जनरल माजिद खादेमी यांना नवीन गुप्तचर प्रमुख बनवण्यात आले आहे. ते इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले मोहम्मद काझेमी यांची जागा घेतील. अमेरिकेने कतारमधून आपले लष्करी विमान हटवले वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने कतारमधील आपल्या एका प्रमुख हवाई तळावरून सुमारे 40 लष्करी विमान हटवले आहेत. इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून अमेरिकन मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.

युद्ध भडकले, इराणने इस्रायलवर डागली क्लस्टर क्षेपणास्त्रे Read More »

IMG 20250619 WA0008

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…”

Ahilyanagar News : बोल्हेगाव (अहिल्यानगर) येथील जमीन क्रमांक 34/3 च्या विक्री व्यवहारात कृषीच्या आडून अकृषिक जमीन विकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून सत्ताधारी वरदहस्त आणि स्थानिक प्रशासनातील हलगर्जीपणा यांचा थेट पुरावा म्हणावा लागेल. मिलिंद बाबासाहेब कोरडे यांनी संबंधित व्यवहारात फसवणुकीचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर तहसील कार्यालयाने नियमांची पुस्तके उघडून विविध शाखांना अहवाल मागवले कुळकायदा संकलन, गौणखनिज विभाग, महसूल खाते… सर्वांनी आपले कर्तव्य निभावल्याचे दाखवत पत्रव्यवहारांचा ढिगारा तयार केला. पण थेट कारवाई शून्य. विशेष म्हणजे, ड्रेनेज, रस्ते, गटारीसाठी वापरलेल्या गौणखनिजांची चलने सादर करण्यास सांगण्यात आलेले असतानाही संबंधितांनी ती सादर केली नाहीत. तलाठ्यांमार्फत नोटीस बजावली गेली, तरीही दुर्लक्ष. महाखनिज प्रणालीवरही परवानगी नोंदली गेल्याचा ग ना बाबद नोंदी आढळून येत नाही. हे सर्व घडत असतानाही प्रशासन ‘बघ्याची भूमिका’ घेत आहे. खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा स्पष्ट पुरावे, अहवाल आणि नियमभंग समोर आहे, तेव्हा कारवाई टाळण्यामागे नेमकं कोण आहे? स्थानिक पातळीवरील काही कर्मचाऱ्यांना ‘सिस्टिम’चा आधार वाटतो कारण त्यांच्या पाठिशी उभे असतात वरिष्ठ अधिकारी वा राजकीय हात. इथेही तसाच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. लोकांनी कायद्याचा आधार घेतला, पण कायदा प्रशासनाच्या फाईलमधून बाहेरच पडलेला नाही. हे चित्र धोक्याचं आहे. कारण जेव्हा कायदा दुर्लक्षित होतो, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.

“वरिष्ठांचा आशीर्वाद, प्रशासनाची ढिसाळ कामगिरी!” अधिकारी म्हणताय “मै हु ना…” Read More »

Iran Israel Conflict

बंकर बस्टर, बॉम्बर आणि युद्धनौका…, इराणविरुद्ध अमेरिकेचा प्लॅन तयार

Iran-Israel Conflict: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावात अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवली असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या लष्करी कारवायांची पुष्टी केली आहे, ते म्हणाले की “आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिकता आहे.” पेंटागॉनने लढाऊ विमाने तैनात केली आहेत, टँकर आणि युद्धनौकांना मोक्याच्या ठिकाणी इंधन भरत आहेत, जे अमेरिकेच्या हालचाली आणि संभाव्य कारवाईचे संकेत देतात. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, “आता आमचे इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे,” ज्यामुळे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या अटकळाला बळकटी मिळाली आहे. तथापि, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की मंगळवारपर्यंत, कोणतेही अमेरिकन विमान इराणी हवाई क्षेत्रात प्रवेश केलेले नाही आणि आतापर्यंतचे सर्व लष्करी कारवाया पूर्णपणे बचावात्मक आहेत. मध्य पूर्वेतील अमेरिकन लढाऊ विमानांची तैनाती जरी अचूक संख्या गुप्त ठेवण्यात आली असली तरी, माहितीनुसार, सुमारे एक डझन एफ-16 लढाऊ विमाने सौदी अरेबियाला पाठवण्यात आली आहेत. अमेरिकन लढाऊ विमाने संपूर्ण प्रदेशात गस्त घालत आहेत. डिएगो गार्सियामध्ये बी-52 बॉम्बर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. 30,000 पौंड वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेऊ शकणारे बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स सध्या तैनात नसले तरी, ते अमेरिकेकडे एक शक्तिशाली पर्याय आहेत. इराणच्या पर्वतांमध्ये असलेल्या फोर्डो अणुस्थळाला फक्त मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर (GBU-57) सारख्या शक्तिशाली बॉम्बनेच लक्ष्य करता येते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, “अशा हल्ल्यासाठी आवश्यक विमाने आणि शस्त्रे फक्त अमेरिकेकडेच आहेत.” युरोपमधूनही धोरणात्मक तैनाती माध्यमांच्या वृत्तानुसार, मध्य पूर्वेतील ओपन-सोर्स इंटेलिजन्सवर लक्ष ठेवणाऱ्या ऑरोरा इंटेलने वृत्त दिले आहे की अमेरिकेने इंग्लंड, स्पेन, जर्मनी आणि ग्रीससह युरोपियन तळांवर इंधन भरणारी विमाने आणि लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत. ही माहिती सार्वजनिक विमान वाहतूक ट्रॅकिंग वेबसाइट्सद्वारे मिळवण्यात आली आहे. अमेरिकन सैन्याची संख्या 40,000 पर्यंत पोहोचली मध्य पूर्वेतील अमेरिकन सैन्याची संख्या आता सुमारे 40,000 पर्यंत वाढली आहे, जी पूर्वी सामान्यतः 30,000 होती. काही लष्करी तळांवरील कुटुंबांना स्वेच्छेने स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि लष्करी प्रतिष्ठानांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि इराणमधील तणाव आणि येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात व्यावसायिक जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे ही संख्या 43,000 पर्यंत पोहोचली होती.

बंकर बस्टर, बॉम्बर आणि युद्धनौका…, इराणविरुद्ध अमेरिकेचा प्लॅन तयार Read More »

Police

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Ahilyanagar News : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २६ जुन २०२५ रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Ahilyanagar News : मोठी बातमी! जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी Read More »