DNA मराठी

ताज्या बातम्या

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. मात्र तरही देखील या प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. तर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित काही नवीन आणि धक्कादायक माहिती शेअर केली आहे. पत्रकार परिषदेत पश्चिम विभागाचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंह दहिया यांनी सैफ प्रकरणाशी संबंधित अनेक खुलासे केले. त्यांनी सांगितले की, सैफवरील हल्ल्याची तक्रार अभिनेत्याच्या घरून आली नव्हती तर रुग्णालयातून आली होती. पोलिसांना लीलावती रुग्णालयातून कळले की सैफवर हल्ला झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सैफ सुमारे 3 वाजता ऑटोने रुग्णालयात पोहोचला. त्याच वेळी, एसीपी दहिया यांनी असा दावाही केला की सैफ प्रकरणात अटक करण्यात आलेली व्यक्ती ही खरी आरोपी आहे आणि यात कोणताही गोंधळ नाही. त्यांनी सांगितले की पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, जे ते न्यायालयात सादर करतील. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशहून भारतात आलाएसीपी दहिया यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, आरोपी पश्चिम बंगालमार्गे भारतात दाखल झाला होता. तो काही दिवस कोलकात्यातही राहिला. पोलिसांनी असेही सांगितले की, ज्या महिलेच्या आधार कार्डवरून आरोपीने सिम घेतले होते, तिचा जबाब कोलकातामध्ये नोंदवण्यात आला आहे. आरोपींच्या फिंगरप्रिंटबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही. हे नमुने पुणे सीआयडीकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्नसैफ अली खान हल्ला प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांनी दिलेली नाहीत. घटनेच्या रात्री प्रत्यक्षात काय घडले हे पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्याचवेळी, आरोपी 11 व्या मजल्यावर राहणाऱ्या सैफच्या घरी चोरी करायला का गेला, तो खालच्या मजल्यावर चोरी करू शकला असता, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. हल्ला रात्री 2 वाजता झाला आणि पोलिसांना रात्री 3 वाजता कळवण्यात आले. एवढेच नाही तर आरोपी सकाळपर्यंत सैफच्या अपार्टमेंटच्या बागेत लपून का बसला होता?

Saif Ali Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा Read More »

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »

Weight Loss Seed : वजन होणार कमी, ‘हे’ बियाणे करणार मदत, जाणून घ्या सर्वकाही…

Weight Loss Seed : आज अनेकजण वाढत्या वजनामुळे अनेक अडचणींना तोंड देत आहे. याच बरोबर वजन कमी करण्यासाठी पैसे खर्च करून अनेक उपाय देखील करत आहे. मात्र वजन कमी होत नाही. जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही एका बियाण्याच्या मदतीने तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. होय, तुम्ही जवसाचे बियाणे तुमचे वाढलेले वजन कमी करू शकतात. जवसाचे बियाणे शरीराच्या विकासासाठी खुप महत्त्वाचे असतात. माहितीनुसार, जवसाच्या बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकद्रव्ये आढळतात. जवसाच्या बियाण्यांमध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटीऍसिड, हेल्दी प्रथिने, फिनोलिक कंपाऊंड आणि खनिजे आढतात. अशाप्रकारे होईल वजन कमीतुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर हे बियाणे तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकते. या बियाणेमुळेचरबी कमी होते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर एक चमचा जवस, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गूळ घ्या. कढईत एक चमचा जवस एक ग्लास पाण्यात उकळत ठेवा. दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि चव वाढवण्यासाठी यात एक चमचा लिंबाचा रस आणि गूळ मिक्स करावा. हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्या आणि प्या. हे खास पेय आपण रिकाम्या पोटी घ्या. यामुळे वजन झटपट कमी होते.

Weight Loss Seed : वजन होणार कमी, ‘हे’ बियाणे करणार मदत, जाणून घ्या सर्वकाही… Read More »

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता

Pratap Sarnaik : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलवली होती. यामध्ये एसटीच्या सद्यस्थिती मंत्री सरनाईक यांनी विशद केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. हि वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी असा प्रस्ताव मांडला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली असून त्याबद्दल त्यांचे मंत्री सरनाईक यांनी आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ साली या २५ हजार वसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस मिळून ३० हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल भविष्यात ” गाव तिथे एसटी… मागेल त्याला बस फेरी..!” आपणं देऊ शकतो. “आज आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटी वर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल मी त्यांचा शतशः आभार आहे.” अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.

Pratap Sarnaik : महामंडळाला मिळणार 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस, खरेदीसाठी अजित पवारांची मान्यता Read More »

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक

Parner News : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात क्रांती शुगर या खासगी कंपनीचे नऊ संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात सहा दिवसांपूर्वी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, या कारखान्यात 17 सभासदांच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्याचे खासगीकरण संबंधित असून या घोटाळ्याची व्याप्ती 249 ते 300 कोटी पेक्षा जास्त असल्याची सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र सरकारने आतापर्यंत या प्रकरणात एसआयटी स्थापन न केल्याने पारनेर पोलीस स्टेशन समोर साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात मिळाली माहिती अशी की, या कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्ज असल्याचे दाखवले आणि विक्रीची बेकायदा प्रक्रिया करण्यात आली. तसेच फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क कारखान्याचा विक्रीसाठी देण्यात आले. त्यामुळे या व्यवहारात सरकारचा दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला असा देखील आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्यादिवशी कारखान्याची विक्री केली त्याच दिवशी क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरिता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेऊन कर्ज पुरवठा केला. त्यामुळे पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता फक्त 32 कोटी रुपयांना खरेदी करून त्यावर 249 कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. त्यामुळे कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने 17 हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करून या प्रकरणात एसआयटीची मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पारनेर पोलीस ठाण्यात क्रांती शुगर अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एसआयटीची स्थापना करा नाहीतर आंदोलन करणार…, पारनेर तालुक्यात ‘त्या’ प्रकरणात शेतकरी आक्रमक Read More »

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले

GBS Syndrome : सोलापूरमध्ये ‘गिलेन-बॅरे सिंड्रोम’ या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी, जीबीएसचे 19 नवीन संशयित रुग्ण आढळले. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या मते, आतापर्यंत गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे एकूण 101 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 81 रुग्ण पुण्यातील, 14 पिंपरी चिंचवडमधील आणि सहा रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे जो उपचार करण्यायोग्य आहे. सध्या पुण्यात 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांमध्ये 19 मुले आहेत ज्यांचे वय 9 वर्षांपेक्षा कमी आहे. 50 ते 83 वर्षे वयोगटातील 23 रुग्ण आहेत. जीबीएस ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून परिधीय मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते तेव्हा असे होते. यामुळे मज्जातंतूंमध्ये जळजळ होते ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे किंवा पक्षाघात आणि इतर लक्षणे उद्भवतात. मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये मेंदू आणि पाठीचा कणा समाविष्ट असतो. 68 पुरुष आणि 33 महिलारविवारी पुण्यात जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली, असे राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. संक्रमित लोकांमध्ये 68 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. सोलापूरमध्ये संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या जलद प्रतिसाद पथके (RRTs) आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सिंहगड रोडच्या बाधित भागात संसर्ग प्रकरणांवर लक्ष ठेवून आहेत.

GBS Syndrome: मोठी बातमी! सोलापूरमध्ये GBS सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, 19 नवीन रुग्ण आढळले Read More »

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. देशात समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनणार आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केले जाईल. हे राज्याबाहेर राहणाऱ्या रहिवाशांना देखील लागू होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव न करता सुसंवादी समाजाचा पाया रचेल. यामुळे सर्व लोकांना समान अधिकार मिळतील. कोणाविरुद्धही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही आमचे वचन पूर्ण करत आहोत. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे याचे एक उदाहरण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत उभा आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री धामी यांनी पुष्टी केली होती की जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केला जाईल. यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले होते की सरकार यूसीसी लागू करण्यास वचनबद्ध आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले गृहपाठ पूर्ण झाला आहेधामी म्हणाले होते की राज्य सरकारने त्यांचे “गृहपाठ” पूर्ण केले आहे. जानेवारी 2025 पासून राज्यभरात यूसीसी लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही त्यावर प्राधान्याने काम केले. युसीसीचा मसुदा तयार होते. पण एक कायदा आणला गेला. आता आम्ही सोमवारी ती वचनबद्धता पूर्णपणे आणि औपचारिकपणे पूर्ण करणार आहोत.” “हे पंतप्रधानांच्या एकसंध भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल जिथे कोणत्याही धर्म, लिंग, जात किंवा समुदायाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा Read More »

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Guillain Barre Syndrome । सावधान! राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचं थैमान, तुम्हालाही आहेत का ‘ही’ धोकादायक लक्षणे?

Guillain Barre Syndrome : कोरोनानंतर राज्यात आता पुन्हा एका नवीन आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील अलर्ट झाला असून केंद्राचं पथक राज्यात दाखल झाले आहे. या आजाराचं नाव गुलेन बॅरी सिंड्रोम असे आहे. पुण्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या ७३ वर पोहोचली आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीला कमकुवत करतो. या आजाराचा फटका नवजात बालकांना देखील बसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे या आजारावर उपचार करता येत आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणेहे लक्षात घ्या की गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे अचानक दिसतात. विशेष म्हणजे ही लक्षणे काही दिवसांत किंवा आठवडाभरात झपाट्याने वाढतात. सामान्य लक्षणांमध्ये अंग दुखणे, चालताना तोल जाणे, अशक्तपणा, हातापायांना मुंग्या येणे, चेहरा सुजणे, चालताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे यांसारखी लक्षणे या आजारात दिसतात. उपचारउपचारामध्ये इंट्राव्हेन्स इम्युनोग्लोब्युलिन (IVIG) किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज यांसारख्या इम्युनोथेरपीचा समावेश असून मज्जातंतूंचे नुकसान कमी करण्यासाठी या उपचारपद्धतीचा आधार घेण्यात येतो.

Guillain Barre Syndrome । सावधान! राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम आजाराचं थैमान, तुम्हालाही आहेत का ‘ही’ धोकादायक लक्षणे? Read More »