DNA मराठी

ताज्या बातम्या

रतन टाटांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा, ‘या’ व्यक्तीला मिळणार तब्बल 500 कोटी रुपये

Ratan Tata : देशातील सर्वात लोकप्रिय उद्योगपती पैकी एक असणारे रतन टाटा यांचे 4 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मृत्युपत्राबद्दल बरीच चर्चा होत आहे. तर दुसरीकडे नुकतंच त्यांचे मृत्युपत्र उघडण्यात आहे आहे. ज्यामधे अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहे. होय, रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात अशा व्यक्तीचे नाव देखील समविष्ट आहे. ज्याची माहिती फार कमी लोकांना आहे. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात या व्यक्तीच्या नावावर 500 कोटी रुपयांची मालमत्ता नोंदवली आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची 500 कोटी रुपयांची मालमत्ता मोहिनी मोहन दत्ता यांना दिली आहे. मोहिनी मोहन दत्ताबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. मोहिनी मोहन दत्ता ही जमशेदपूर येथील ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक आहे. दत्ता यांचे कुटुंब स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते. 2013 मध्ये, एजन्सी ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाली, त्यानंतर दत्ता कुटुंबाचा स्टॅलियनमध्ये 80% हिस्सा होता. उर्वरित 20% हिस्सा टाटा इंडस्ट्रीजकडे होता. मोहिनी दत्ता टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक देखील राहिल्या आहेत. मोहिनी मोहन दत्ता रतन टाटांच्या जुन्या सहचाऱ्या होत्या. रतन टाटा यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की दत्ता हे त्यांचे जुने मित्र होते. ते टाटा कुटुंबाशीही जवळचे होते. दत्ताच्या एका मुलीने 2021 पर्यंत 9 वर्षे टाटा ट्रस्टमध्ये काम केले. त्यापूर्वी ती ताज हॉटेल्समध्ये काम करायची. ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारात, दत्ता यांनी सांगितले की ते पहिल्यांदा जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये रतन टाटा यांना भेटले. तेव्हा रतन टाटा 24 वर्षांचे होते. दत्ताने दावा केला होता की ते एकमेकांना 60 वर्षांपासून ओळखतात.

रतन टाटांच्या मृत्युपत्रात मोठा खुलासा, ‘या’ व्यक्तीला मिळणार तब्बल 500 कोटी रुपये Read More »

अनेकांना दिलासा, गृहकर्ज होणार स्वस्त, रेपो दरात 0.25 टक्के कपात

RBI Repo Rate Cut: आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मोठी घोषणा करत अनेकांना दिलासा दिला आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा एमपीसी बैठकीत दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे सध्याचा रेपो दर आता 6.25 टक्के झाला आहे. आरबीआयने शेवटचा रेपो दर मे 2020 मध्ये कमी केला होता, परंतु 2022 मध्ये तो वाढवण्यास सुरुवात केली. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, आम्ही मॅक्रो अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या चांगली आहे. लवचिक चलनवाढ लक्ष्यीकरणाचे चांगले परिणाम दिसून आले. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत राहील. एमपीसीने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली. रेपो रेट 6.25 टक्क्यांवर घसरला. आरबीआयने व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. महागाई दर कमी झाल्यामुळे किंमत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमपीसीचे 6 सदस्य दर कमी करण्याच्या बाजूने होते. ईएमआयवर काय परिणाम होईल?व्याजदरात कपात केल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. जर बँकांनी ही कपात त्यांच्या ग्राहकांना दिली तर मासिक ईएमआय कमी होऊ शकतो.

अनेकांना दिलासा, गृहकर्ज होणार स्वस्त, रेपो दरात 0.25 टक्के कपात Read More »

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी

Sonu Sood Arrest Warrant: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदविरुद्ध फसवणुकीच्या कथित प्रकरणात लुधियाना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. माहितीनुसार, न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले. हा खटला लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या 10 लाख रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये त्यांनी बनावट रिझिका कॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवल्याचा दावा केला होता. सोनू सूदला साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्यात आले होते परंतु तो हजर राहिला नाही, त्यामुळे अटक वॉरंट जारी करण्यात आले. सोनू सूदला न्यायालयासमोर हजर करालुधियाना न्यायालयाने आपल्या आदेशात, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले. आदेशात म्हटले आहे की सोनू सूद, (मुलगा, पत्नी, मुलगी) रहिवासी, घर क्रमांक ६०५/६०६ कासाब्लँक अपार्टमेंट्स, यांना समन्स किंवा वॉरंट रीतसर बजावण्यात आले आहे परंतु ते हजर राहिले नाहीत (समन्स किंवा वॉरंटची सेवा टाळण्यासाठी फरार झाले आणि पळून गेले). तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. आदेशात पुढे असे म्हटले आहे की तुम्हाला हे वॉरंट १०-०२-२०२५ रोजी किंवा त्यापूर्वी परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये ते कोणत्या तारखेला आणि कोणत्या पद्धतीने अंमलात आणले गेले आहे किंवा ते का अंमलात आणले गेले नाही याचे कारण प्रमाणित करणारे पृष्ठांकन असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात अभिनेता सोनू सूदविरुद्ध अटक वॉरंट जारी Read More »

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा

Maharashtra News: अली पब्लिक स्कुल शाळेची कोणतीही मान्यता दर्शवणारे फलक लावण्यात आली नसल्याने कारवाई करण्यात यावी याबाबत गट शिक्षक अधिकारी पंचायत समितीकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जात म्हटले आहे की, अली पब्लिक स्कुल, व्हिडिओकॉन कंपनीमागे, ग्रामपंचायत नागरदेवळे, बु-हाणनगर, अहमदनगर या ठिकाणी सदर शाळा ही तीन ते चार वर्षापासून सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुले-मुली शिक्षण घेत असुन त्या ठिकाणी शिक्षणासोबत मुलांकरीता हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही शाळा चालू असताना सदर शाळेने कोणतेही मान्यता असलेले फलक लावण्यात आले नसुन यामध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ शकते असे आमचे निदर्शनास आले आहे. सदरील गरीब विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असुन सदर विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होऊ नये याकरीता आपण योग्य ती कारवाई करावी. याबाबत चौकशी करुन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती. अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

Maharashtra News: मान्यता दर्शवणारे फलक नाही, अली पब्लिक स्कुलवर कारवाई करा Read More »

Hyundai Car Discount : खर्चात होणार बचत, ‘या’ कार्सवर मिळतोय 70 हजारांचा डिस्काउंट

Hyundai Car Discount : तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात काही कार्सवर तब्बल 70 हजारांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये सर्वात भारी कार खरेदी करु शकतात. माहितीनुसार, सध्या ह्युंदाई त्यांच्या जुन्या मॉडेल्सवर मोठी सूट देत आहे. या ऑफर फक्त निवडक 2024 मॉडेल्सवरच वैध आहेत. यामध्ये Aura, i20, Grand i10 Nios आणि Exter यांचा समावेश आहे. Hyundai Exterह्युंदाईची एंट्री लेव्हल एसयूव्ही एक्सटर भारतीय बाजारपेठेत टाटा पंचशी स्पर्धा करते. हे मॉडेल गेल्या वर्षी बाजारात आले. सध्या या कारवर 40 हजारांची रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या कारमध्ये ग्रँड आय10 निओस आणि ऑरा सारखेच इंजिन आणि गिअरबॉक्स आहे. तुम्ही ही कार सीएनजी व्हर्जनमध्ये देखील खरेदी करू शकता. Hyundai Auraहोंडा अमेझ आणि मारुती डिझायरशी स्पर्धा करणाऱ्या ह्युंदाई ऑरावरही मोठी सवलत उपलब्ध आहे. या कारच्या 2024 मॉडेलवर 53000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याचे इंजिन आणि गिअरबॉक्स ग्रँड आय10 निओससारखेच आहेत. त्याचा सीएनजी प्रकार देखील बाजारात उपलब्ध आहे. Hyundai Aura i20ह्युंदाई आय20 ही कंपनीची प्रीमियम हॅचबॅक आहे. या कारवर 65,000 रुपयांपर्यंतची ऑफर उपलब्ध आहे. तथापि, स्पोर्टियर एन लाईन आवृत्तीवर कोणतीही सूट मिळत नाही. ह्युंदाई आय20 ही टाटा अल्ट्रोज आणि मारुती बलेनो सारख्या कारशी स्पर्धा करते. Hyundai Grand i10 Niosसवलतीच्या यादीतील चौथी कार म्हणजे Hyundai Grand i10 Nios, ज्याच्या 2024 मॉडेलवर 68,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही ऑफर सीएनजीसह सर्व प्रकारांवर लागू आहे. ही कार 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह येते.

Hyundai Car Discount : खर्चात होणार बचत, ‘या’ कार्सवर मिळतोय 70 हजारांचा डिस्काउंट Read More »

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी 3 सदस्यांचा सहभाग असलेल्या 20 समिती स्थापन केल्या असून दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या 20 समिती 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.   सर्व 20 समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू Read More »

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (NA) परवानगी आवश्यक असणार नसल्याची घोषणा केली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानीव अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एनए करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे, हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीचा उद्योगासाठी वापर करावयाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही एनए परवानगी घेणे आवश्यक नाही. त्यासाठी या उद्योग घटकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी (Development permission) घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे (तलाठी) जावे. त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दप्तरात करावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. औद्योगिक जमिनीसाठी एनएची आवश्यकता असणार नाही. तसेच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही Read More »

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त

Maharashtra News: नगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ड्रायव्हरकडून परस्पर टायरची विक्री करून फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक केली आहे. आरोपीकडून 19,94,650 ( 97 टायर) जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर 2024 रोजीकंटेनर क्रमांक पीबी-13-एडब्लू-5064 यावरील चालकाने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा  सुपा पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम 316 (4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास करण्यासाठी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी  पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश लोढे, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार करुन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन तपास करणेबाबत आदेश दिले होते.   पथकाने यापुर्वी गुन्हयाचे तपासात दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी आरोपी 1) इरशाद निशार अहमद, (वय 55, रा.रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा, (वय 24, रा.जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना 2,52,000 रूपये किंमतीचे सीएट कंपनीचे 12 टायर अशा मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशनला हजर केले होते. दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पथक गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना आरोपी नामे अन्सार, (रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश) हा मुंबई येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने मुंबई येथे जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेऊन, दोन संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) अन्सार अहमद (नयाबअली, वय 23, रा.सरायबीर भद्र, ता.सदर, जि.प्रतापगड, उत्तरप्रदेश), 2) जैद खान अजिम खान मोहमंद, (वय 27, रा.आझादनगर, घाटकोपर वेस्ट, मुंबई) असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाच्या विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 3) जावेद खान, रा.प्रतापगड, उत्तरप्रदेश (फरार) 4) शरिफ खान, रा.राणीगंज, उत्तरप्रदेश (फरार) 5) जोशेफ अली, रा.पिरथीगंज, उत्तरप्रदेश (फरार) अशांनी मिळून इरशाद निशार अहमद याचे मदतीने मिळून केला असल्याची माहिती सांगीतली. तसेच गुन्हयांतील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गुन्हयातील टायर हे सुरत येथील शिवलाल शहा, रा.पाल, सुरत, गुजरात याचे मार्फतीने योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, आळाफाटा, पुणे यास विक्री केले असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शिवलाल शहा, रा.सुरत याचा राहते घरी जाऊन शोध घेतला तो मिळून आल्याने त्यास पुर्ण नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 6) शिवलाल हसमुखलाल शहा, वय 58, रा.ए 602, मरोधर रेसीडेन्सी,  पाल, सुरत, गुजरात असे असल्याचे सांगीतले.गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती सांगीतली. दिनांक 31/01/2025 रोजी पथक गुन्हयातील मुद्देमाल हा योगेश गुंजाळ, रा.बेल्हे, पुणे याचेकडे असल्याने त्याचा गुप्त बातमीदार व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना योगेश गुंजाळ हा त्याचे साथीदारासह बेल्हे गावात तांबेवाडी परिसरात टायर विक्री करण्याकरीता आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 7) योगेश अरूण गुंजाळ, वय 36, रा.दत्तनगर, बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे 8) वैभव भगवंता चौधरी, वय 31, रा.चौधरी मळा, जामगाव, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. तपास पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 15,12,000/-रू किं.त्यात 72 सीएट कंपनीचे टायर, 80,000/- रू किं.त्यात 3 मोबाईल असा एकुण 15,92,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे योगेश अरूण गुंजाळ याचे उर्वरीत टायर बाबत विचारपूस करता त्याने सागर उर्फ महाराज शरद रूकारी यांना 10, दत्तात्रय शिवाजी सोमवंशी यांना 4, संकेत अशोक जाधव यांना 5 व राहुल संदीप औटी यांना 6 अशांना कंपनीकडून  टायर खरेदी केलेले असून टायरचे बील नंतर देतो असे खोटे सांगुन विक्री केल्याची पंचासमक्ष माहिती दिली.पथकाने पंचासमक्ष त्यांनी हजर केलेले 25 टायर किंमत रूपये 4,02,650/- असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील कारवाई सुपा पोलीस करत आहे.

Maharashtra News: टायरची विक्री अन् फसवणुकीच्या गुन्ह्यात 5 आरोपी अटक, 97 टायर जप्त Read More »

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा

Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे. स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठीवादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा Read More »

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार

Maharashtra Government: महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला. त्यानुसार राज्य स्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आजच्या सुधारित जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार नाही. तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नव जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार अनेक शासकीय विषयात समावेशअनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार असून, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे. प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे. या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी असावे. प्रमाणपत्र देण्याचा अधिकारशासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असेल. काय म्हणाले बावनकुळे?सुधारित निर्णय सरकारने केला असून, आता सरकारी सेवा व सुविधांसाठी लागणारी कागदपत्रे सुलभपणे मिळतील. जेणेकरून सरकार आपल्या दारी असल्याचे दिसून येईल. विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना महिला वर्गाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच पुरस्कार विजेत्यांनाही या पदावर नेमले जाणार आहे. या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तसेच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केले जाईल.

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार Read More »