DNA मराठी

हायलाईट

asia cup 2025

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने आशिया कपच्या इतिहासात आठव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. मात्र या सामन्यानंतर एक अभूतपूर्व घटना घडली ज्याची चर्चा सध्या जोराने सुरू आहे. भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. सामना संपल्यानंतर जवळजवळ दोन तास स्टेजवर नाट्य सुरू राहिले. नक्वी ट्रॉफी हातात घेऊन उभे राहिले, परंतु भारतीय संघाने स्पष्ट केले की ते त्यांच्याकडून कप स्वीकारणार नाहीत. नक्वी यांच्या उपस्थितीला आक्षेप भारतीय खेळाडूंनी सांगितले की जोपर्यंत मोहसीन नक्वी स्टेजवर आहेत तोपर्यंत आम्ही ट्रॉफी घेणार नाही. यामुळे समारंभ अनिश्चित राहिला आणि शेवटी, टीम इंडियाने ट्रॉफी नाकारण्याचा त्यांचा निर्णय कायम ठेवला. आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. पहिल्या सामन्यातील तणाव या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण होते. दोन्ही देशांमधील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी झाला होता, ज्यामध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा यांच्याशी हस्तांदोलन करणे टाळले. त्यानंतर, संपूर्ण भारतीय संघानेही पाकिस्तानी खेळाडूंपासून अंतर राखले. सामन्यानंतरही भारतीय खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी मैदानावर आले नाहीत. या घटनेने वाद निर्माण झाला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रारही केली. नक्वी यांचे विधान मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेदरम्यान अनेक भारतविरोधी विधाने केली. सूर्यकुमार यादव यांनी आपला विजय देशाच्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना समर्पित केल्यामुळे त्यांना अंतिम सामन्यातून बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. आयसीसीने नक्वी यांची मागणी फेटाळून लावली. या विधानांमुळे भारतीय खेळाडू आणखी संतप्त झाले. पाकिस्तानी संघाचा दृष्टिकोन स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी संघाने अनेक वेळा वादग्रस्त वृत्ती स्वीकारली. हस्तांदोलनाच्या मुद्द्याव्यतिरिक्त, खेळाडूंनी मैदानावर चिथावणीखोर उत्सव देखील केले. हरिस रौफच्या 6-0 च्या हावभावाची आणि बंदुकीच्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पंचांना काढून टाकण्याची आणि सूर्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करून वाद आणखी वाढवला. तथापि, त्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. तणावपूर्ण वातावरणात खेळला गेलेला अंतिम सामनाही अत्यंत आक्रमक होता. सामन्यापूर्वी किंवा नंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन केले नाही. भारतीय खेळाडूंनी मैदानावर त्यांच्या कामगिरीने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवून जेतेपद पटकावले.

Asia Cup 2025 : भारताने दाखवली लायकी टीम इंडियाने नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार Read More »

laxman hake

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरात हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सध्या या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर जारी केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात लक्ष्मण हाके सभा घेत मराठा आरक्षणासाठी काढलेला जीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे.

Laxman Hake : मोठी बातमी, अहिल्यानगरमध्ये खळबळ; लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर हल्ला Read More »

nitesh rane attack on uddhav thackeray

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव अशी टीका राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीएम केअर फंडमधून शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर आता या मागणीवर प्रतिक्रिया देत स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी विचारला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, स्वतः मुख्यमंत्री असताना काय केलं त्यांनी. पंतप्रधान मोदी आणि आम्ही सगळे जमिनीवरचे आहोत. घरात बसून राजकारण करणारे लोक नाही. कधी तरी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव असं माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले. तर दुसरीकडे त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, सकारात्मक गोष्ट आहे. दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला. आमच डबल इंजिनच सरकार आहे, याचा फायदा आमच्या राज्याला होणार. केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलं नाही. या संकटाच्या काळात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या राज्याला भरभरून देतील.

Nitesh Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी स्वतःचा कुर्ता खराब करण्यासाठी रस्त्यावर उतराव; मंत्री राणेंचा हल्लाबोल Read More »

affair

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या

Panvel Crime: पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तु काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दत्तु काळे यांचा मुलगा दिपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे.

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या Read More »

modi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत

Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहीसर येथील भारतीय विमानतळ प्राधीकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार करीत असलेले उपाय इत्यादींबाबत अतिशय सविस्तर चर्चा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी केली. गडचिरोली पोलाद सिटी गडचिरोली येथे पोलाद सिटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीत सुमारे 1 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक यापूर्वीच आलेली आहे. हा जिल्हा नक्षलमुक्त करुन विकासाच्या अमाप संधी यातून निर्माण होणार आहेत. 3 संरक्षण कॉरिडॉर संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र हा एक भक्कम भागिदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात 10 ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. भारताला लागणार्‍या एकूण शस्त्र आणि दारुगोळ्यापैकी 30 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात एक तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगार सुद्धा निर्माण होईल. राज्य सरकारने यासंदर्भात 60,000 कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पूरग्रस्तांसाठी मागितली मदत Read More »

asia cup 2025 final

Asia Cup 2025 Final : 41 वर्षांत प्रथमच, आशिया कपच्या फायनलमध्ये भारत – पाकिस्तान; कोण मारणार बाजी?

Asia Cup 2025 Final : आशिया कपच्या इतिहासात प्रथमच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार आहे. सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने एकही सामना न गमावता फायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे. सुपर फोर टप्प्यात बांगलादेशला हरवून पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुपर फोरच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान तीन सामन्यांपैकी दोन विजय आणि एका पराभवासह दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत पहिला सामना आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी, तीनपेक्षा जास्त संघांचा समावेश असलेल्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ पाच वेळा अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक उत्सव असेल. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सुपर 4 सामना 25 सप्टेंबर रोजी सुपर 4 सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने आले. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या डावात 135 धावा केल्या. मोहम्मद हरिसने 23 चेंडूत 31 धावा केल्या, तर मोहम्मद नवाजने 25 धावा जडून संघाला चांगली सुरुवात दिली. लक्ष्य पाठलाग करताना बांगलादेश फलंदाजीत कमकुवत ठरला. सलामीवीर परवेझ हुसेन इमॉन शून्यावर बाद झाला, तर तौहिद हृदयॉयने फक्त पाच धावा जोडल्या. शमीम हुसेनने 30 धावा केल्या, परंतु संघ अखेर 124 धावांवर गुंडाळला गेला. पाकिस्तानने सामना 11 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

Asia Cup 2025 Final : 41 वर्षांत प्रथमच, आशिया कपच्या फायनलमध्ये भारत – पाकिस्तान; कोण मारणार बाजी? Read More »

shahrukh khan

Shahrukh Khan : शाहरुख खान विरोधात मानहानीचा खटला; समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव

Shahrukh Khan : समीर वानखेडे यांची नेटफ्लिक्सच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीज विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नेटफ्लिक्स आणि शाहरुख खान यांच्या रेड चिलीस इंटरटेनमेंटच्या विरोधात समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीजमध्ये समीर वानखेडे यांच्याशी सबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबरच त्या पात्राच्या तोंडून सत्यमेव जयते या डायलॉगनंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याच म्हणत सत्यमेव जयतेची विटंबना केल्याचाही याचिकेत आरोप समीर वानखेडे यांनी केले आहे. जवळपास 2 कोटींची ही मानहानीची याचिका असून ती वसूल झाल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणार असल्याचे याचिकेत म्हणण्यात आलेल आहे.

Shahrukh Khan : शाहरुख खान विरोधात मानहानीचा खटला; समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव Read More »

maharashtra rain

Maharashtra Rain Alert : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा टाहो

Maharashtra Rain Alert: जालना जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या सोयाबीन, मका, कपाशी या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हे पूर्ण पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नुकसानीची पाहणी काल महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्या आदेशावरून अधिकारी जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेत शिवारात आले असता, या अधिकाऱ्यांसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने गुडघ्या इतक्याला पाण्यात बुडालेल्या सोयाबीनच्या शेतात बसून या अधिकाऱ्यांसमोर टाहो फोडला आहे व अधिकाऱ्यांना व सरकार आम्हाला वाचवा कारण आमचे पूर्ण पीके पाण्यात बुडाली आहे, कर्ज काढून आम्ही हे खरिपाचे पिके पेरणी केली आता काढणीला आली होती. मात्र, पूर्ण पिके गेली आहे, असा टाहो या शेतकऱ्याने फोडला. तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे. फक्त फसवे आश्वासन देऊ नका कृषी मंत्री काल आले व गेले त्यांनी ठोस भूमिका घेत तात्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा किंवा आदेश द्यायची होती. मात्र, तसे न करता त्यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत पंचनामे करण्याचे आदेश दिले असे म्हणत कृषीमंत्र्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण पीक पाण्यात बुडाली आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशावरून आले असून आम्ही रितसर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहोत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Maharashtra Rain Alert : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा टाहो Read More »

team india

Asia Cup 2025 टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 41 धावांनी पराभव

Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये भारतीय संघाने शानदार एन्ट्री केली आहे. भारताने सुपर ४ च्या सामन्यात बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करत आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताच्या या विजयानंतर श्रीलंका अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील विजेता भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर, बांगलादेशचा कर्णधार झहीर अलीने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाची सुरुवात पुन्हा एकदा स्फोटक झाली, अभिषेक शर्माने पाचव्यांदा २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावले. २० षटकांत, भारतीय संघाने ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. १६९ धावांच्या प्रत्युत्तरात, बांगलादेश १९.३ षटकांत १२७ धावांवर ऑलआउट झाला आणि सामना ४१ धावांनी गमावला. बांगलादेशची सुरुवात खराब १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बांगलादेशची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने तन्झिद हसनला १ धावात ४ बळी घेऊन बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना परवेझ हुसेन इमोनने सलामीवीर सैफ हसनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. परवेझ २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडल्या. सतत विकेट पडताना सलामीवीर सैफ हसनने ५१ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकारांसह ६९ धावा केल्या. सैफ आणि परवेझ व्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. संपूर्ण संघ १९.३ षटकांत १२७ धावांतच संपला. भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली, ४ षटकांत १८ धावांत २ बळी घेतले. कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावांत ३ बळी घेतले आणि वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत २९ धावांत २ बळी घेतले. अक्षर पटेल आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने सहा विकेट गमावून १६८ धावा केल्या. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, त्यांनी ६.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७७ धावा जोडल्या. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ७५ धावा केल्या, ज्यात पाच षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्याने २९ चेंडूत ३८ धावा केल्या आणि गिलने १९ चेंडूत २९ धावा केल्या. शिवम दुबे दोन धावांवर बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने पाच आणि तिलक वर्मा पाच धावांवर बाद झाला. अक्षर पटेल १० धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून तन्झीम हसन सकीब, मुस्तिफुझ रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीनने प्रत्येकी एक बळी घेतला, तर रिशाद हुसेनने दोन बळी घेतले.

Asia Cup 2025 टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशचा 41 धावांनी पराभव Read More »

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार

Sunil Tatkare : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्हयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. दरम्यान शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणार्‍या उपाययोजना जाहीर करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार Read More »