DNA मराठी

ट्रेंडिंग

dhananjay munde on manoj jarang

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

Dhananjay Munde on Manoj Jarang : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा.. नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी कधीही जात पाहून राजकारण केलेले नाही. गेले 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय आहे. परळीत आंदोलन झालं, त्याला जागा देण्यासाठी मी जरांगेंना मदत केली. मराठा आरक्षणासाठी सभागृहात आवाज उठवला, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा, असे मनोज जरांगेंना वाटते. मी 17 तारखेच्या सभेत त्यांना दोनच प्रश्न विचारले होते. त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही. मराठा समाजाला खरंच ओबीसी की EWS मध्ये जाऊन फायदा आहे का? यावर उत्तर द्या असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आता पकडेल्या आरोपींसह माझी जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा. आमची नार्को टेस्ट करा. सर्व प्रकरणाची चौकशी सरकारनं नाही तर, सीबीआयने करावी अशी देखील मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde : माझी अन् जरांगेंचे ब्रेन मॅपिंग करा, नार्को टेस्ट करा; धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर Read More »

aslam shaikh

Aslam Shaikh: माझे नाव दोन मतदार याद्यांमध्ये ही निवडणूक आयोगाची चूक ; आमदार अस्लम शेख

Aslam Shaikh: माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडलं आहे का? माझे नाव दोन मतदार याद्यांमध्ये असणं, ही निवडणूक आयोगाची चूक आहे. याची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे, अशी भूमिका काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आज मांडली. जगभरात तंत्रज्ञानानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने दुबार मतदार शोधणे सहज शक्य आहे, मात्र असे असताना देखील मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहेत. आता तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे व मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असल्याचे मान्य केले आहे. आमदार आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याची कबुलीच दिली आहे. मालाड विधानसभेत 17 हजार मुस्लिम दुबार मतदार असल्याच्या आशिष शेलार यांच्या आरोपाला उत्तर देताना शेख म्हणाले, आशिष शेलार यांच्या भावाचा पराभव झाल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. जर मालाड पश्चिम मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असतील तर ते शोधुन काढणं, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीचे नते वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम माझ्या कार्यालयासमोर आयोजित करित आहेत. मी भाजपाच्या नेत्यांना विनंती करतो, रस्त्यावर कार्यक्रम घेण्यापेक्षा माझ्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करावा, आम्ही त्यांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देऊ. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची की स्वतंत्रपणे लढवायची याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पण कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्र निवडणूक लढण्याची आहे. मुंबई महानगरपालिकेवर कॉंग्रेसचाच महापौर बसेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

Aslam Shaikh: माझे नाव दोन मतदार याद्यांमध्ये ही निवडणूक आयोगाची चूक ; आमदार अस्लम शेख Read More »

img 20251105 wa0026

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने ५ नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकाचे नेतृत्व भारत सरकारच्या सहसचिव आर. के. पांडे यांनी केले. त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, तसेच गृह मंत्रालयाचे आशिष गौर, उपस्थित होते. पथकासोबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते. पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी पावसाचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकाने संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शेतकरी बबनराव दानवे यांच्या संत्रा फळबागेची व पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी पथकाने भविष्यात अशा आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर पथकाने देवराई येथील बंधारे व पारेवाडी येथील पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत पथकाने आवश्यक त्या ठिकाणी पुनर्बांधणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सोमठाणे खुर्द येथील शेतकरी मोहन शिदोरे यांच्या शेतातील तूर व बाजरी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून पथकाने संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या तातडीच्या मदतीची माहितीही जाणून घेतली. केंद्रीय पथकाने संपूर्ण पाहणीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत नुकसानग्रस्तांना दिलासा देत त्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावातील नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले

Sunil Tatkare: तळागाळातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या निवडणुकीला सज्ज झाला असून आता राज्य व जिल्हास्तरावर महायुती म्हणून सामोरे जात असताना कशाकशापध्दतीने सामोरे जायचे हे ठरवायचे आहे.यासंदर्भात पुढील तीन दिवसात चर्चा होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. पालघर, ठाणे शहर, ग्रामीण मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी या जिल्हयांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्या- त्या जिल्ह्याचे संपर्कमंत्री, आमदार, माजी खासदार उपस्थित होते. सोमवारपासून सुरू झालेल्या या बैठकांना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते ती माहिती सर्वांनी सादर केली. आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची आणि माझी चर्चा झाली. त्यामुळे येत्या मंगळवारी दुपारी मंत्रीमंडळाची बैठक झाल्यावर समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आम्ही ज्या भावना जिल्ह्याने मांडल्या त्या मला ज्ञात आहेत. शिवाय भाजप – शिवसेनाच्याही बैठका झाल्या. त्यांच्या नेत्यांना त्या ज्ञात आहेत.त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत आम्ही नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या त्या महायुती म्हणून ठरवणार आहोत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जी काही राजकीय समीकरणे आहेत ती समजून घेत आहोत. त्यामुळे जाहीर झालेल्या निवडणुकीनंतर पक्षाचे कार्यकर्ते निवडणूकीच्या मोडवर गेले आहेत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने जाहीरपणे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती नको असे त्यांच्या तिन्ही आमदारांनी आणि जिल्हाप्रमुखांनी मत व्यक्त केले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही जाहीरपणे याबद्दल मत व्यक्त केलेले नाही आणि कधी केलेही नव्हते. अजितदादांसमोर रायगड जिल्हाध्यक्षांनी याबद्दल सर्व माहिती दिली ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही रायगडमध्ये बायकॉट करण्याचा संबंधच नाही. शिवसेनेने गेले काही दिवस स्वच्छपणाची भूमिका रायगड जिल्हयात मांडलेली आहे. त्याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहे त्यामूळे योग्यवेळी योग्य निर्णय होईल असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. भाजप आणि शिवसेनेसोबत वेगवेगळ्या पातळीवर संवाद सुरू आहेच. रायगड पुरते बोलायचे झाले तर रायगडमध्ये शिवसेनाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणार नाही अशी उघड भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीला सज्ज; पुढील तीन दिवसात चर्चा; महायुतीवर सुनिल तटकरे स्पष्टच म्हणाले Read More »

Maharashtra Election: पुण्यात भाजपचा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’; ‘या’ आमदारांवर मोठी जबाबदारी

Maharashtra Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘‘शतप्रतिशत भाजपा’’ असा निर्धार करण्यात आला असून, भाजपा पक्षश्रेष्ठींनी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांनी नियुक्ती करीत ‘एक पाऊल पुढे’ टाकले आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात भाजपा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याच्या तयारी करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपाने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी यांची घोषणा केली. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री पवार यांचे ग्रामीण भागात चांगले वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हक्काचे दोन हुकमी एक्के बाहेर काढले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये ‘‘जिल्हा निवडणूक प्रमुख’’ अशी जबाबदारी देण्यात आली आहे. तर दक्षिण पुणे जिल्हा (बारामती) निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांना जबाबदारी सोपवली आहे. लांडगे आणि कूल दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक पातळीवर आव्हान देणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. मध्यंतरी आमदार महेश लांडगे यांनी ‘‘पुणे जिल्ह्याचे विभाजन करा आणि उत्तर पुणे जिल्ह्याला ‘‘शिवनेरी’’ असे नाव द्या’’ अशी जाहीर मागणी केली होती. यावरुन अजित पवार विरुद्ध महेश लांडगे असा राजकीय संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही लांडगे यांनी पवार यांच्याविरोधात दंड थोपाटले होते. 2017 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता खेचून आणली आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला काबिज केला होता. दुसरीकडे, आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती कांचन कुल यांनी 2019 मध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी, 2009 मध्ये राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला मदत केली, त्यावरुन नाराज झालेल्या राहुल कुल यांनी सुरूवातीला रासप आणि 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. पवार कुटुंबियांना थेट आव्हान देणारा नेता म्हणून कुल यांची ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल यांना मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुणे उत्तर आणि दक्षिण दिग्विजय करण्यासाठी भाजपाने ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’ राबवण्याचे निश्चित केले आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. पुणे जिल्ह्यात देवाभाऊंची ‘‘कमांड’’ विशेष म्हणजे, पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे असे मातब्बर असताना नवख्या गणेश बिडकर यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये माजी खासदार अमर साबळे, विधान परिषद आमदार अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे असे नेते आहेत. त्यांच्याकडे जबाबदारी न देता आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तसेच, पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे धुरा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी पहिल्याच टप्प्यात पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर ‘‘कमांड’’ मिळवली आहे, असे चित्र आहे. पुण्यात बिडकर, पिंपरी-चिंचवडमध्ये जगताप… पुणे महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर यांची नियुक्ती झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांना जबाबदारी दिली आहे. बिडकर आणि जगताप हेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाबाहेर नाहीत. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरुन काही प्रमाणात कुरबुरी होत्या. पुण्यात घाटेंना आणि पिंपरी-चिंचवडमध्ये काटेंना शहराध्यक्षपदी संधी दिल्यामुळे बिडकर आणि जगताप यांच्यात नाराजी होती, असे बोलले जाते. या ‘गृहकलहाचा’ परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होवू नये. या करिता शहराध्यक्षांना निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी न देता पुण्यातून बिडकर आणि पिंपरी-चिंचवडमधून जगताप यांच्याकडे धुरा दिली आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर झाल्यास, जगताप आणि बिडकर यांना भाजपाच्या ‘‘परफॉर्मन्स’’ची जबाबदारीही घ्यावी लागणार आहे. किंबहुना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत दोन हात करण्यासाठी स्थानिक पातळीवर रणनिती आखावी लागणार आहे.

Maharashtra Election: पुण्यात भाजपचा ‘‘देवाभाऊ पॅटर्न’’; ‘या’ आमदारांवर मोठी जबाबदारी Read More »

rahul gandhi

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतांची चोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकामध्ये मत चोरीचा आरोप केला होता. तर आता त्यांनी हरियाणामध्ये तब्बल 25 लाख मतांची चोरी झाली असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत या तरुणीने 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप Read More »

crime

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला…

Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका आयटी क्षेत्रातील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे. ‘दैवी शक्ती अंगात येते’ या नावाखाली या भोंदू जोडीने अभियंता आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व मानसिकपणे मोठी फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा बळी ठरलेले अभियंता दीपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्याच काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज आमच्यात अवतरतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात’ असा दावा करत डोळस कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेदिका हिने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा आभास निर्माण केला. त्यानंतर त्यांनी डोळस यांना सांगितले की, पूजा करून आणि धन ‘दैवी शक्ती’साठी वापरल्यास त्यांच्या मुलींचे आजार दूर होतील. या बहाण्याने दोघांनी डोळस दांपत्याकडील सर्व बँक ठेवी आणि बचत निधी आपल्या खात्यात वळवून घेतला. एवढ्यावर न थांबता, डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात जमा करण्यात आले. तरीही मुलींच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने डोळस यांनी कारण विचारले असता, खडके-पंढरपुरकर जोडीने त्यांच्या घरात ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी पैसे मागितले. त्यांनी पुण्यातील मालमत्ता विकण्यास सांगितले, आणि जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा घरावर आणि वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले. 2018 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीतून या भोंदू जोडीने एकूण 14 कोटी रुपये डोळस यांच्याकडून घेतले. पोलिस तपासात समोर आले आहे की, या पैशातून दोघांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटी परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या घटनेनंतर डोळस कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा आर्थिक फसवणुकीने पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला… Read More »

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Maharashtra Election : जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत. जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे. संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील. जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, पाथर्डी नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील. राहाता नगरपरिषदेकरिता मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील. राहुरी नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार,राहुरी) नेमले गेले आहेत. देवळाली प्रवरा नगरपरिषदेकरिता श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील. नेवासा नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील. शिर्डी नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतिश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेकरिता श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील. सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त Read More »

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Sharad Pawar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संपूर्ण राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली असून सर्व राजकीय पक्षाकडून बेरीज वजाबाकीचे राजकारण सुरू झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी वैयक्तिक कारणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. संपूर्ण जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू अशी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी पक्षाचे सोपवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आता कोणत्या पद्धतीने पक्षाला एकत्र करून निवडणुकीचा सामना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल

Maharashtra Local Body Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान याद्या जाहीर होणार असल्याची माहिती देखील राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तर 31 ऑक्टोबरच्या मतदान यादीनुसार मतदान होणार असं देखील आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच बरोबर 2 डिसेंबरला मतदान होणार आणि 3 डिसेंबरला निकाल येणार असल्याची माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय खर्च मर्यादा अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्ष पदासाठी- 15 लाख सदस्य-5 लाख ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 11 लाख 25 हजार ब वर्ग नगर परिषद सदस्य -3 लाख 50 हजार क वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 7 लाख 50 हजार क वर्ग नगर परिषद सदस्य – 2 लाख 50 हजार नगर पंचायत अध्यक्ष- 6 लाख नगर पंचायत सदस्य – 2 लाख 25 हजार असा असणार नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुक कार्यक्रम अधिसूचना प्रसिद्धी उमेदवारी अर्ज दाखल करणे – 10 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस – 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार – 21 नोव्हेंबर मतदान – 2 डिसेंबर मतमोजणी – 3 डिसेंबर

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल Read More »