DNA मराठी

क्राईम

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक

Railway Scam: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 23 हून जास्त  तरुणांची फसवणूक करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे.   आरोपी अधिकाऱ्याने 23 हून अधिक लोकांना रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रेल्वेत नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपी अधिकारी मध्य रेल्वेमध्ये मुख्य डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (CDMS) आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने राजेश रमेश नायक याला ताब्यात घेतले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नायकने दोन भावांना रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी सीबीआयकडे जाऊन रेल्वे अधिकारी राजेश नायक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. झडतीदरम्यान सीबीआयने विविध कागदपत्रे जप्त केली. 23 हून अधिक लोक कथितपणे फसवणुकीचे बळी ठरल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे.

Railway Scam: धक्कादायक! रेल्वेत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली 23 जणांची फसवणूक; अधिकाऱ्याला अटक Read More »

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद

Ahmednagar News: 07 मार्च 2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे संदीप नवनाथ माळी रा. मळेगाव ता. शेवगाव याने वाढदिवसानिमीत्त तलवारीने केक कापलेचा स्टेटस मोबाईलला ठेवला होता.  व समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर प्रसिद्ध करून दहशत करत आहे.  या माहितीवरून पोनि/ दिगंबर भदाणे यांनी  पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक व लोकेशन मदतीने सदर इसमाचा शोध घेऊन त्याला  बोधेगाव ता. शेवगाव मधून अटक केली. त्याची दोन पंचासमक्ष  अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक पितळी मुठ असलेली दोन फुट लांबीची एक पांढरे रंगाची लोखंडी तलवार मिळून आली. यानंतर आरोपी व तलवार ताब्यात घेउन शेवगाव पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.   सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोहेकाँ/नाकाडे, पोहेकॉ दराडे, पोशि/शाम गुजाळ, पोशि/बप्पासाहेब धाकतोडे, पोशि/ संपत खेडकर, नगर दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,नितीन शिंदे यांनी कारवाई केली.  तसेच पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी शेवगाव तालुक्यातील जनतेस आव्हान केले आहे की वाढदिवसानिमित्त तलवारीने केक  कापत असेल व  हत्यार बाळगून समाजामध्ये दहशत निर्माण करत असेल व अवैधरित्या गावठी कट्टा व तलवारी चाकू व चोरीच्या उद्देशाने कुणी संशयितरित्या फिरत असतील तर  शेवगाव पोलिसांच्या ०२४२९ २२१२३३ या क्रमांकावर ती संपर्क करावा खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी केले.

Ahmednagar News: धडाकेबाज कारवाई! दोन फुटी तलवारीसह आरोपी जेरबंद Read More »

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  या माहितीनुसार कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात रविवारी ही घटना घडली. 50 वर्षीय अंबादास तलमले यांनी त्यांची 42 वर्षीय पत्नी अलका, 19 वर्षांची मुलगी प्रणाली तलमले आणि 17 वर्षांची मुलगी तेजू तलमले यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारेकरी पती अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पती अंबादास याचा पत्नीसोबत वाद सुरू होता. दरम्यान, काल पहाटे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यादरम्यान अंबादासचा संयम सुटला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, रागाच्या भरात अंबादासने पत्नी व दोन मुलींवर कुऱ्हाडीने वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. या खुनाची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी तिन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तसेच आरोपी अंबादास याला अटक केली. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. घटना घडली त्यावेळी अंबादास यांचा मुलगा घरी नव्हता, तो कामावर गेला होता.

Chandrapur Crime : महाराष्ट्र हादरला! तिहेरी हत्याकांडाने खळबळ Read More »

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

Jamkhed News : जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  दिड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या रागावरून गोळीबार करण्यात आल्याची बातमी मिळाली आहे.   या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले.  गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत.   बाबुलाल पठाण  हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे  हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.  याचाच मनात राग धरून 3 मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे  पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

Jamkhed News: धक्कादायक! मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल Read More »

Sanjay Gaikwad  :  ‘शिकारी आमदार’ च्या अडचणीत वाढ, वाघाच्या दातांचा हार जप्त, गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि आमदार संजय गायकवाड अचानक चर्चेत आले आहे. त्यांनी 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.  गायकवाड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून हा दावा केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी वाघाची शिकार केल्याचा दावा केला असून त्याच वाघाचे दात गळ्यात घातले आहेत. यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचे कथित दातही जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा दावा खरा ठरल्यास त्यांना एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे संजय गायकवाड यांनी दावा केला आहे की, आपण 37 वर्षांपूर्वी वाघाची शिकार केली होती आणि त्याचे तुकडे गळ्यात घातले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी शुक्रवारी दात असलेली जपमाळ जप्त केली आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठवली. वाघाचे दात खरेच काढले आहेत का, याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. आमदाराविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिका-यांनी सांगितले की लॅबचे निकाल 20 ते 25 दिवसांत येण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्याचे दावे खरे ठरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाचे नेते असून त्यांनी अलीकडेच वाघाची शिकार केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.  गायकवाड यांचे दावे खरे ठरले तर ते मोठे संकटात सापडू शकतात. कारण या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Sanjay Gaikwad  :  ‘शिकारी आमदार’ च्या अडचणीत वाढ, वाघाच्या दातांचा हार जप्त, गुन्हा दाखल Read More »

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी

Maratha Reservation : अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनमाड रोड बोल्हेगाव फाटा येथील अनिधीकृत बांधकाम, अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरूषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.  संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका हद्दीतील नगर – मनमाड हायवे लगत बोल्हेगाव फाटा येथे अजय बारस्कर याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून या अनधिकृत बांधकामाचा वापर त्याच्या व्यवसायसाठी गेल्या अनेक वर्षापासुन करत आहे.   या बेकायदा व्यवसायातून त्याने मोठया प्रमाणावर पैसा गोळा केला आहे. तसेच नगर मनमाड हायवे व अंतर्गत बोल्हेगाव फाटा मुख्य रस्त्यामध्ये बेकायदा पत्र्याची शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने काढून वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण केलेला आहे. या ठिकाणी अनेक वेळा लहान, मोठे अपघात झालेले आहेत, सदर ठिकाणी या व्यक्तीने स्वतःचे अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदा पद्धतीने, कोणतीही पूर्व परवानगी न घेता महापुरुषांचे अर्धपुतळे उभारुण प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले आहे. यामुळे या व्यक्तीने केलेले अनिधकृत बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे तसेच वाहतूकीस अडथळा करून उभारलेले पत्रा शेड, व्यवसायिक गाळे, दुकाने इ. ची अतिक्रमणे तात्काळ हटविण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.  याच बरोबर या निवेदनात अतिक्रमण वाचविण्यासाठी बेकायदेशीर बसविलेल्या महापुरुषांचे पुतळे म.न.पा ने ताब्यात घेवून या बेकायदा कृती करण्याऱ्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे संबंधीत व्यक्तीबरोबर येत्या आठ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात यावे नाहीतर आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलन आणि अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Maratha Reservation: शहरातील ‘ते’ अनिधीकृत बांधकाम हटवा, मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजची मागणी Read More »

Sameer Wankhede :  मोठी बातमी! समीर वानखेडेला आणखी एक झटका, ‘त्या’ प्रकरणात आता दिल्लीत होणार तपास

Sameer Wankhede :  बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करुन चर्चेत आलेले माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच ईडीने आयआरएस अधिकारी वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात वानखेडे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले होते. उच्च न्यायालयाने दिलेला हा तात्पुरता दिलासा अजूनही कायम आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, समीर वानखेडेविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास दिल्लीला वर्ग केला आहे. केंद्रीय एजन्सीने असा युक्तिवाद केला की कार्यवाही आता दिल्लीतून चालविली जात असल्याने, वानखेडे यांनी या प्रकरणात कोणत्याही दिलासासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जावे. न्यायमूर्ती प्रकाश डी नाईक आणि नितीन आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाविरोधात गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आलेल्या वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. हा तपास ईडीच्या दिल्ली युनिटकडे वर्ग करू नये, अशी मागणी करणारा अंतरिम अर्ज वानखेडे यांनी दाखल केला होता. त्याचवेळी, प्रशासकीय कारणामुळे तपास मुंबईहून दिल्लीला वर्ग करण्यात आल्याचा युक्तिवाद केंद्रीय संस्थेने न्यायालयात केला. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे दिल्लीला पाठवण्यात आली असून आता मुंबईत काहीच नाही. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाने आता गुरुवारी (15 फेब्रुवारी) सीबीआय एफआयआर विरुद्ध वानखेडे यांच्या याचिकेसह या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले. मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कॉर्डेलिया क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला न अडकवण्याच्या बदल्यात सुपरस्टार शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने वानखेडेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  मात्र, वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून 2021 च्या कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे आपल्याला गोवण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Sameer Wankhede :  मोठी बातमी! समीर वानखेडेला आणखी एक झटका, ‘त्या’ प्रकरणात आता दिल्लीत होणार तपास Read More »

Ahmednagar News: कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण 20,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना झेंडीगेट परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल चालु असुन कत्तलीकरीता काही गौवंशीय जनावरे आणल्याची माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून दराडे यांनी रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी, अंमलदार यांना नमुद ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून पोलिसांनी 02.15 च्या सुमारास छापा टाकुन कारवाई केली. पोलीसांनी पंचासमक्ष तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकुन 20,55,000 रु किं.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.  या प्रकरणात पोलिसांनी 1) अरबाज खलील शेख, वय 23 वर्षे, रा. कोठला, अहमदनगर, 2) फैजल अस्लम शेख, वय 20 वर्षे, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर, 3) सलीम शब्बीर कुरेशी, 4) फैजान अब्दुल कुरेशी, रा. झेंडीगेट, अहमदनगर यांचेविरुध्द पो.कॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि.कलम 269, महा. प्राणी रक्षा अधि सन 1995 चे सुधारीत सन 2015 चे कलम 5 (अ), 5 (क ), 9, 9(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास पोना/ए पी इनामदार हे करीत आहेत.

Ahmednagar News: कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या 04 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल Read More »

Samruddhi Mahamarg : धक्कादायक, 24 तासांत समृद्धी महामार्गावर दोन अपघात; 6 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर सुरू असणारी अपघाताची मालिका थांबतच नाही.   पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर 24 तासांत संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई लेनवरील अब्दीमंडी गावाजवळ शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात शिवाजी थोरात (वय 58 वर्षे), राहुल आनंद निकम (वय 47 वर्षे), अण्णा रामराव माळोदे (वय 71 वर्षे) यांचा मृत्यू झाला.  मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सर्व छत्रपती आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संभाजीनगर येथून मोटारीने नाशिककडे जात होते. संभाजीनगर येथून निघाल्यानंतर समृद्धी महामार्गावर मुंबई लेनवरील अब्दीमंडी गावाजवळील मुरमुरा फॅक्टरीजवळ भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. यामध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मृतांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले. कारला धडकलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अहमदनगरमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला या अपघाताच्या 24 तास आधी अहमदनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात  रात्री अकराच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तुटलेल्या ट्रेलरला धडक बसली. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  तीन दिवसांपूर्वी याच परिसरात कल्याणमधील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्विफ्ट कारमधून पाच जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात होते. कारने खराब झालेल्या कंटेनर ट्रेलरला मागून धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला.  दरम्यान कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Samruddhi Mahamarg : धक्कादायक, 24 तासांत समृद्धी महामार्गावर दोन अपघात; 6 जणांचा मृत्यू Read More »

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस 

Ahmednagar News:  अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवर गोळीबार, प्राणघातक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  अहमदनगर शहरामध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत पुणे,मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामीनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असुन गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत.  गुन्हेगारांना कायदयाचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली. नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

Ahmednagar News: व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस  Read More »