DNA मराठी

क्राईम

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी

Ahmednagar News: अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अहमदनगर न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. पंकज जावळे यांच्या या अर्जावर आज (4 जुलै) दुपारनंतर अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.   एसीबीने एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून आयुक्त पंकज जावळे आणि देशपांडे दोघेही फार आहेत. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे.  छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील एसीबीचे पथकाने अहमदनगर महापालिकेत कारवाई करून पंकज जावळे आणि स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनवाईत त्यांना अटकपूर्व जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ahmednagar News: मोठी बातमी! अटकपूर्व जामीनसाठी पंकज जावळे यांचा अर्ज, आज होणार सुनावणी Read More »

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण

Ahmednagar News:  पारनेर तालुक्यातील निघोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निघोज – वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रविण भुकन यांच्या मालकीच्या  जत्रा या हॉटेलमधील प्रविण भुकन या़च्यावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   यामध्ये प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री दोन वाजता नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.   या प्रकरणानंतर गणेश भुकन यांनी रात्री निघोज पोलीसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली असा आरोप गणेश भुकन यांच्याकडून करण्यात आला आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी हप्ता दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निघोज आणि परिसरातील असून भुकन हे सध्या नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.  त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते शुद्धीवर आल्यावर पोलीसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.  गेली काही दिवसांत निघोज आणी परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निघोज परिसरात चर्चा सुरू आहे.

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण Read More »

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग प्रकरणात मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग दरम्यान झालेल्या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली असून आमचे सरकार या घटनेच्या तळापर्यंत जाऊन कटकारस्थान आणि जबाबदार व्यक्तींना योग्य ती शिक्षा देईल, असे म्हटले आहे. यासोबतच राज्य सरकार या घटनेची चौकशी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.   राजकारण करणाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, सीएम योगी यांनी या घटनेवर राजकारण करणाऱ्या पक्षांनाही फटकारले आणि पीडितांबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी अशा घटनेवर राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे सांगितले.  पीडितांच्या जखमा भरून काढण्याची, पीडितांप्रती सहानुभूती दाखवण्याची हीच वेळ आहे. सरकार या प्रकरणी आधीच संवेदनशील असून कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. सीएम योगी म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. 112 लोकांचा मृत्यू झाला  2 जुलै रोजी हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव येथे भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर उपदेशक मंचावरून खाली उतरत असताना भक्तांचा जमाव त्यांच्या दिशेने सरकत होता. दरम्यान, लोक भोले बाबाला हात लावण्यासाठी आतुर झाले आणि त्यानंतर सेवा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले असता तेथे चेंगराचेंगरी झाली. सीएम योगी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त डीजी आग्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम तयार करण्यात आली असून त्यात विभागीय आयुक्त अलीगढ यांचा समावेश आहे आणि त्यांना विलंब न करता अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. घटना पाहता राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी तेथे तळ ठोकून आहेत आणि राज्य सरकारचे तीन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण, संदीप सिंह आणि असीम अरुण घटनास्थळी तळ ठोकून आहेत आणि जखमींवर उपचाराची व्यवस्था करत आहे. यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, भारत सरकार आणि राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तसेच राहुल गांधींही या घटनेवर दु:ख व्यक्त केला आहे.

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग प्रकरणात मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा Read More »

Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत 122 भाविकांचा मृत्यू, भोले बाबांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

Hathras Stampede: 2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना घडली.  माहितीनुसार, सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील रतीभानपूर गावात भोले बाबांचा सत्संग सुरू होता, त्यामध्ये सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी यांचे प्रवचन ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. स्थानिक लोक साकार हरी यांना ‘विश्व हरी भोले बाबा’ असेही म्हणतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2 जुलै रोजी जेव्हा सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी हजारो लोकांमध्ये पोहोचला तेव्हा अनेकांचे नियंत्रण सुटले. मोठ्या संख्येने लोक त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले, त्यानंतर तेथे चेंगराचेंगरी झाली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, शेतात सत्संग मंडप उभारण्यात आला होता. सत्संग संपल्यानंतर बाबांची गाडी तिथून निघू लागली. लोक त्याच्या पायांना स्पर्श करण्यासाठी धावले आणि चेंगराचेंगरी झाली. शेकडो लोकांच्या अकाली मृत्यूनंतर, हातरस चेंगराचेंगरीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेकांना तो बाबा कोण हे जाणून घ्यायचे आहे, त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी 50 हजारांहून अधिक लोक कडक उन्हातही कार्यक्रमस्थळी पोहोचले. चेंगराचेंगरीमुळे 122 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नाव- साकार हरी, भोले बाबा म्हणतात सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, त्यांचा वादांशी दीर्घकाळ संबंध आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, कासगंज जिल्ह्यातील पटियाली येथील बहादूर नगर येथील रहिवासी साकार विश्व हरी भोले बाबा यांनी पोलिस खात्यातील नोकरी सोडून 17 वर्षांपूर्वी सत्संग सुरू केला होता. आता उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेशात या बाबाचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत. लैंगिक शोषणासह 5 प्रकरणांमध्ये आरोपी मिळालेल्या माहितीनुसार, सूरज पाल उर्फ ​​बाबा साकार हरी याच्यावर लैंगिक शोषणासह इतर पाच गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी आहे. असेही म्हटले जाते की अनेक प्रसंगी त्यांनी आपल्या अनुयायांना संकटातून बाहेर काढण्यास मदत केली. कोरोनाच्या काळात ते चर्चेत आले. आता त्याच्यावरील अनेक प्रकरणांच्या तपासाला वेग येणार आहे. अनेक वर्षांपूर्वी पोलिसांतून बडतर्फ करण्यात आले होते सूरज पाल हे देखील 28 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना बाबा इटावा येथे तैनात झाले होते. सूरज पाल यांच्यावर नोकरीच्या काळात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने आपले नाव आणि ओळख बदलली आणि तो बाबा झाला. फॉलोअर्स मीडियापासून अंतर राखतात सूरज पाल बाबा आणि त्यांचे अनुयायी मीडियापासून अंतर राखतात. त्यांच्या एका अनुयायाने सांगितले की, त्यांच्या आयुष्यात कोणीही गुरू नाही. व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांची अचानक देवाशी भेट झाली आणि तेव्हापासून त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला. भगवंताच्या प्रेरणेने हे शरीर त्याच भगवंताचे अंश आहे हे त्यांना कळले. त्यांचा खरे नाव सूरज पाल असून तो कासगंजचा रहिवासी आहे.

Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरीत 122 भाविकांचा मृत्यू, भोले बाबांवर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप Read More »

Ahmednagar News: महानगरपालिकेच्या आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार

Ahmednagar News:  अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय साहाय्यकाने लाच मागितल्या प्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, यामुळे शहर खळबळ उडाली आहे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यवसायिक यांच्याकडे नऊ लाख तीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर हे प्रकरण आठ लाख रुपयांमध्ये मिटवण्याचा ठरलं होते.  त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 24 रोजी तक्रार अर्ज दिला होता या प्रकरणांमध्ये  19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे.  संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी कारल्याने संयुक्त कारवाई केली आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला.  आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती मात्र उशीर झाला आहे पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली.  तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचेही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Ahmednagar News: महानगरपालिकेच्या आयुक्तांवर 8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई, आयुक्त पंकज जावळे फरार Read More »

Ahmednagar News: जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांचे अपहरण अन् बेदम मारहाण

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील कांबी येथील शेतकरी नशिर शेख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना शेतीच्या किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आली आहे. शुक्रवारी दि. 21 रोजी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास गावातीलच अलीम बन्नोमियाॅ शेख व दोन अनोळखी व्यक्तींनी शेतीच्या किरकोळ कारणामुळे नशिर शेख यांच्यासह कुटुंबीयातील महिलांना जबर मारहाण करून नशीर शेख यांना राहत्या घरातून बळजबरीने चार चाकी वाहनातून अपहरण करुन आज्ञात ठिकाणी नेऊन लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेत शेवगाव-पाथर्डी रोडवर अपरात्री आज्ञातस्थळी  सोडून देऊन मारेकरी निघून गेले.  या प्रकरणात  फिर्याद जखमी नशिर शेख यांचा मुलगा आजिम नशिर शेख यांनी शेवगाव पोलिसात दिली असून आरोपी अलीम बन्नोमियाॅ शेख यांच्यासह दोन साथिदारावर भारतीय दंड संहिता कलम ४५२, ३६५, ३६७, ३४, ३२३ अंतर्गत शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सदर घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Ahmednagar News: जमिनीच्या किरकोळ वादातून शेतकऱ्यांचे अपहरण अन् बेदम मारहाण Read More »

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती. या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Arif Shaikh: मोठी बातमी! गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा निधन

Arif Shaikh: एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख (उर्फ आरिफ भाईजान) याचे मुंबईतील जेजे रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफला 2022 मध्ये NAI ने अटक केली होती. तेव्हापासून तो आर्थर रोड कारागृहात होता. आरिफ आणि त्याचा भाऊ शब्बीर शेख यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या काही जवळच्या साथीदारांविरुद्ध टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. आरिफ अबुबकर शेख यांना श्वास घेण्यास त्रास आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 63 वर्षांचे होते. आरिफ शेखच्या कुटुंबात कोण आहे? त्याच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, आरिफ शेखला दोन मुली आहेत. त्यांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. तब्येत एकदम बरी होती. अधिकारी आम्हाला काहीच सांगत नाहीत आणि आम्ही जेजे हॉस्पिटलमधून माहिती गोळा केली आहे. अशी माहिती नातेवाईकांनी दिली.  NIA ने फेब्रुवारी 2022 मध्ये दाऊद, त्याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील यांच्यासह इतरांविरुद्ध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ-दहशतवाद, मनी लाँडरिंग, बनावट भारतीय नोटा चलनात आणल्याबद्दल आणि इतर आरोपांबद्दल गुन्हा नोंदवला होता. दहशतवादी निधी उभारण्यासाठी मालमत्ता संपादन करण्यात आणि लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसोबत सक्रिय सहकार्याने काम केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. जामीन का फेटाळला? आरिफ आणि त्याचा भाऊ शब्बीर यांना अटक केल्यानंतर विविध न्यायालयांनी जामीन अर्ज फेटाळला. तो दाऊदच्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेट, डी-कंपनीचा सदस्य असल्याचे कारण देण्यात आले. शेखचा भाऊ आणि मोहम्मद सलीम कुरेशी, ज्याला सलीम फ्रूट म्हणूनही ओळखले जाते, त्याच्यावर टोळीच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्यासाठी डी-कंपनीच्या नावावर मोठ्या रकमेचा वापर केल्याचा आरोप होता. दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या मृत्यूनंतर त्याने सिंडिकेटचा कारभार हाती घेतल्याच्या आरोपावरून कुरेशीला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. एनआयएने शेखचा गौरव ग्रीन कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, मंगल नगर, मीरा रोड येथील फ्लॅटही जप्त केला होता. एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 च्या कलम 25 (1) अंतर्गत दहशतवादाची रक्कम म्हणून फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.

Arif Shaikh: मोठी बातमी! गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आरिफ शेखचा निधन Read More »

National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल

National News: एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती देताना कुल्लाकुरिचीच्या डीएमने मृत्यूला दुजोरा दिला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी दारू विक्रेत्याला अटक विषारी दारूप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी अवैध दारू विक्रेते के. कन्नूकुट्टी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 200 लिटर अवैध दारू जप्त केली आहे. तपासणी केली असता त्यात मिथेनॉल आढळून आले. पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच अवैध दारूविक्री रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्टॅलिन यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झाले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल Read More »

Vasai Murder Case : अफेअर, नोकरी आणि खून… जाणुन घ्या वसईच्या आरती हत्याकांडाची इनसाईड स्टोरी

Vasai Murder Case : वसई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खडबड उडाली असून अनेक चर्चांना उधाण आला आहे.  शहरात भरदिवसा रस्त्याच्या मधोमध 20 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आरती यादवचे नुकतेच आरोपी रोहित यादवसोबत ब्रेकअप केला होता. याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. 30 सेकंदात 15 वार  पोलिसांनी सांगितले की, वसईमध्ये एका नराधमाने प्रेयसीच्या डोक्यावर अवघ्या 30 सेकंदात लोखंडी कुंड्याने 15 वेळा वार करून रस्त्यातच तिची निर्घृण हत्या केली. ही घटना वसई (पूर्व) येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी 9.45 वाजता घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. रोहितने आरतीवर मागून मोठ्या लोखंडी रेंचने हल्ला केला. त्यामुळे आरती रस्त्यावर पडते. यानंतर रोहित तिचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर हल्ला करतो. …तर आरतीचा जीव वाचला असता घटनेच्या वेळी डझनभर लोक तेथून गेले, परंतु सर्वजण केवळ प्रेक्षक राहिले. एका प्रत्यक्षदर्शीने रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, त्यामुळे तो घाबरला आणि मागे हटला. तोपर्यंत घटनास्थळी लोकांची गर्दी जमली असली मात्र तरी देखील 20 वर्षीय आरती यादवला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी रोहितला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर आरतीचा जीव वाचू शकला असता, असे पोलिसांनी सांगितले. आरतीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली होती. आरती ही उत्तर प्रदेशची रहिवासी होती आणि आरोपी रोहित हा हरियाणाचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी (18 जून) सकाळी आरती वसईतील एका खासगी कंपनीत कामासाठी घरून निघाली. त्यानंतर रोहित तिथे आला आणि तिला विचारू लागला की तिचे कोणत्या मुलासोबत अफेअर आहे. यानंतर आरती निघू लागली असता रोहितने हातातील मोठ्या कुंड्याने तिच्या डोक्यात वारंवार वार केले. रोहित आरतीच्या रक्ताने माखलेल्या शरीराजवळ बसून राहिला. काही वेळाने वालीव पोलिसांनी येऊन त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. हल्ला करताना रोहित म्हणत होता, “तू माझ्याशी असं का केलंस?” आरोपींनी आरती यादव यांच्यावर इंडस्ट्रियल कुंड्याने सुमारे 15 वार केले. आरतीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आरोपीने त्याला हे काम मिळवून दिल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि आरती गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. रोहितला अचानक संशय आला की ती आपली फसवणूक करत आहे आणि ती दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यावरून दोघांमध्ये अनेक भांडण झाले आणि अखेर आरतीचे ब्रेकअप झाले. याचा राग आल्याने रोहितने आरतीची हत्या केली. पोलिसांनी कारवाई केली नाही : आरतीची बहीण मृत आरती यादवची बहीण सानिया यादव हिने आरोप केला आहे की, रोहित गेल्या तीन-चार दिवसांपासून तिच्या बहिणीचा छळ करत होता. शनिवारी त्यांनी आरतीला मारहाण केली होती. आरतीचा मोबाईल तुटला. सानियाने सांगितले की, कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी रोहितवर कारवाई करण्याऐवजी त्याला इशारा देऊन सोडून दिले. तिची बहीण आरती यादवला न्याय मिळवून देणार असल्याचे सानियाने सांगितले. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून त्याची चौकशी सुरू आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Vasai Murder Case : अफेअर, नोकरी आणि खून… जाणुन घ्या वसईच्या आरती हत्याकांडाची इनसाईड स्टोरी Read More »