DNA मराठी

क्राईम

crime

Crime News: आईने तिच्या दोन्ही मुलांना मारले नंतर केली आत्महत्या, नेमकं कारण काय?

Crime News: कर्नाटकातील बेंगळुरूमधील बागलागुंटे परिसरातील एका महिलेने प्रथम तिच्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खडबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख 27 वर्षीय विजयालक्ष्मी अशी झाली आहे. विजयालक्ष्मीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या एक आणि चार वर्षांच्या दोन मुलांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयलक्ष्मी आणि तिचे कुटुंब मूळचे रायचूर जिल्ह्यातील होते. विजयालक्ष्मीचा पती बेंगळुरूमधील एका मॉलमध्ये काम करत होता आणि घटनेच्या वेळी तो कामावर होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी विजयालक्ष्मी घरी परतल्यावर त्याला त्याची पत्नी आणि दोन मुले फासावर लटकलेले आढळले. पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढले, त्यांना ताब्यात घेतले आणि शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवले. घरगुती कलह हे कारण असू शकते प्राथमिक तपासानुसार, घरगुती कलहामुळे विजयालक्ष्मीने हे टोकाचे पाऊल उचलले असावे. तथापि, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. शिवाय, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, ज्यामुळे मृत्यूचे कारण अस्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आत्महत्या आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Crime News: आईने तिच्या दोन्ही मुलांना मारले नंतर केली आत्महत्या, नेमकं कारण काय? Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

Nilesh Ghaywal : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या परदेशवारीबाबत नवीन माहिती समोर आली आहे.घायवळविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला विशिष्ट अटींवर २०२२ मध्ये न्यायालयीन जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींमध्ये पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश होते. मात्र न्यायालयीन आदेश असूनही पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात का आला नाही हा प्रश्न उपस्तित होतो. तसे झाले असते तर घायवल देशाबहेर जाण्याचा प्रश्न च उद्भवला नसता. परिणामी घायवळ याला २०१९ मध्ये तत्काळ (तत्काळ) योजनेतून मिळवलेला पासपोर्ट वापरून परदेशात जाणे शक्य झाले. तत्काळ योजना आणि पडताळणी तत्काळ योजनेत अर्जदाराला जलद पासपोर्ट मिळतो. या प्रक्रियेत पासपोर्ट आधी दिला जातो आणि नंतर काही दिवसांत पोलिस पडताळणी केली जाते. पडताळणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढे पासपोर्ट एक्ट नुसार पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करता येते. पोलिसांचा पडताळणी अहवाल विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, घायवळने २०१९ मध्ये तत्काळ योजनेतून मिळवलेल्या पासपोर्टसाठी झालेल्या पोलिस पडताळणी (पीव्ही) अहवालात त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच घरावर भेट दिली असता तो “उपलब्द नाही (नॉट अव्हेलेबल)” असल्याची नोंद करण्यात आली होती. वास्तविक पाहता पोलिसांनी गुन्हयाची माहिती अवहालात देणे अपेक्षित होते परंतु तसे झालेले दिसत नाही. यामुळे त्याचा पासपोर्ट कायम ठेवण्यात अडचण आली नाही. पासपोर्टविषयी पुढील कारवाई घायवळने पासपोर्ट अर्ज करताना स्वतःविरुद्ध असलेले गुन्हे लपवून चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करुण 2019 मध्ये पासपोर्ट मिळवला होता. पोलिसांनी आरोपी देशा बाहेर गेल्यानंतर हा प्रकार पासपोर्ट कार्यालयला निदर्शनास आणून दिला. त्या नंतर त्याचा पासपोर्ट जप्तीबाबत कारणे दाखवा नोटीस (एससीएन) जारी करण्यात आली आहे. तसेच पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट करण्यात आले आहे.

Nilesh Ghaywal : घायवळने माहिती लपवली; पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस Read More »

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण

Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे. फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले. “माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Crime News : पुण्यात तलवारीचा थरार, घरात घुसून महिलेस व मुलास मारहाण Read More »

img 20251006 wa0006

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीची वातावरण निर्माण होत आहे. यातच आता पोलिसांवरच हल्ल्यांच्या घटना घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे. रविवारी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली ज्यामुळे पुण्यातील कायद्याव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री डेक्कन परिसरात गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल काटकर (बकल क्र. 7835) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना लॉ कॉलेज रोडसमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार काटकर हे शनिवारी रात्री ड्युटी संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रात्री सुमारे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी अज्ञात कारणावरून त्यांच्यावर कोयत्याने वार केला. यात त्यांच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक तपासात ‘कट मारल्याच्या’ वादातून हल्ला झाल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून डेक्कन पोलीस ठाण्याने त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यावरच असा हल्ला होणे हे अत्यंत गंभीर असल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे.

Pune Crime News: धक्कादायक, गुन्हे शाखेच्या हवालदारावर कोयत्याने हल्ला Read More »

kotwali police

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई

Ahilyanagar Police: नगर शहरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना गुटखा बाळगणारे एका इसमास चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी गायकवाड 2 ऑक्टोबर पहाटे 5 च्या सुमारास काळया रंगाच्या गाडीमधे एक इसम गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीवरून दिपक पोपटराव लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर बी एन एस कलम 123.223.274.275 प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपासही कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे.

Ahilyanagar Police: विनापरवाना गुटखा बाळगणारे इसमास अटक, कोतवाली पोलिसांची कारवाई Read More »

nilesh ghaywal

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप

Nilesh Ghaywal : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला निलेश घायवळ सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याने पासपोर्ट आणि व्हिसा सहज मिळवून परदेश गाठल्याने प्रशासनावरच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे. आता त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आल आहे. घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या अन बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावावर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी एकाच व्यक्तीच्या दोन नावांनी व दोन वयोगटात ओळखपत्रे मिळवण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओळखपत्रातील विसंगती 1. पती – निलेशकुमार बन्सीलाल गायवळ • क्रमांक: DRD1360288 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 47 2. पती – निलेश बन्सीलाल गायवळ • क्रमांक: TKM8217994 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 48 3. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: SAO7387947 • मतदारसंघ: कोथरूड, पुणे • दाखवलेले वय: 42 4. पत्नी – स्वाती निलेश गायवळ • क्रमांक: TKM8218026 • मतदारसंघ: कर्जत-जामखेड, अहमदनगर • दाखवलेले वय: 33 अहमदनगर व पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने व वयात बदल करून ही ओळखपत्रे मिळवण्यात आली. इतकेच नव्हे, तर कर्जत-जामखेड मतदारसंघात घायवळ दांपत्याची नावे सलग क्रमांकावर नोंदवली गेल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ नावातील फेरफार व खोट्या माहितीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, घायवळ हे सर्व कुणाच्या आश्रयाने करतो? प्रशासनातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दुहेरी ओळखपत्रे बनवली गेली? हे प्रश्न आता पुढे येत आहेत. यामुळे त्याच्या जवळील असलेल्या राजकीय मंडळींवरही संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे हे प्रकरण प्रशासन किती गांभीर्याने घेत आणि काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nilesh Ghaywal : दोन जिल्ह्यात काढली बायको अन् स्वतःची ओळखपत्र…, निलेश घायवळचा आणखी एक प्रताप Read More »

vishal

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक

Vishal Brahma Drug Case : स्टुडंट ऑफ द इयर 2 या बॉलिवूड चित्रपटात काम करणारा अभिनेता विशाल ब्रह्मा याला चेन्नई विमानतळावर ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, सिंगापूरहून AI-347 या फ्लाइटमधून उतरल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे 40 कोटी (अंदाजे US$1.2 अब्ज) किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. नायजेरियन टोळीने अडकवले तपासात असे दिसून आले की 32 वर्षीय विशालला नायजेरियन ड्रग्ज टोळीने आमिष दाखवले होते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विशालला कंबोडियाला सुट्टीचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु तो परत आल्यावर त्याला ड्रग्जने भरलेली ट्रॉली बॅग देण्यात आली, जी तो घेऊन भारतात परतला. या टोळीचा हेतू असा होता की सुरक्षा एजन्सी त्याच्या अभिनेत्याच्या रूपामुळे त्याच्यावर संशय घेऊ नयेत. विशालला टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या भूमिका असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून प्रसिद्धी मिळाली. तो “बिहू अटॅक” चित्रपटातही दिसला. मात्र त्याच्या अलीकडील अटकेमुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. तपास सुरूच, टोळीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न संचालनालय (डीआरआय) आणि इतर तपास संस्था आता संपूर्ण नेटवर्क उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. नायजेरियन टोळ्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी कट आणि भारतातील त्याची मुळे तपासण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक Read More »

court

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

Ahilyanagar Crime News : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणात आरोपी विनोद मोहन मुरकुटे (वय ३३, रा. मुरकुटे वस्ती) यास श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी शिक्षा सुनावली. भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम २७(१) अंतर्गत आणखी तीन वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. प्रकरणाची हकीगत अशी की, ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी प्रमोद आतार (वय १९, रा. आतारवस्ती, कर्जत) हा आपल्या चुलत चुलत्यासोबत उसाचे वाढे गोळा करत असताना, आरोपी विनोद मुरकुटे याने पिस्तुलातून गोळी झाडून फिर्यादीच्या पायावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कर्जत, त्यानंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वैज्ञानिक विश्लेषक महेश कदम तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे (गायके) यांनी केला. सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांचा स्वीकार करत न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.

Ahilyanagar News : मोठी बातमी, गोळीबार प्रकरणात आरोपीस तीन वर्षांची शिक्षा Read More »

affair

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या

Panvel Crime: पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत करंजाडे सेक्टर 7 परिसरात सख्ख्या भावाने भावाचाच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या बिट मार्शल पथकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ तपासादरम्यान आरोपी नागेश वाल्या काळे हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला राहत्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मृत दत्तु काळे याचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. म्हणून डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दत्तु काळे यांचा मुलगा दिपक याच्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी नागेश काळे यास अटक करण्यात आली आहे.

Panvel Crime : पत्नीशी अनैतिक संबंध अन् सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या Read More »

sawedi land scam the then board officer and then talathi were suspended, what's next, what's the matter.

Sawedi land scam – तत्कालीन मंडळाधिकारी व तत्कालीन तलाठी निलंबित, पुढे काय, काय आहे प्रकरण.

Sawedi land scam – अहिल्यानगर, २२ सप्टेंबर २०२५ –  सावेडी (गट क्रमांक २४५) येथील जमीन फेरफार प्रकरणातील गंभीर अनियमितता आढळल्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना व तत्कालीन तलाठी प्रमोद दत्तात्रय गायकवाड यांनाही तातडीने शासनसेवेपासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर भाग यांच्या पत्रावरून आणि त्यानुसार तयार झालेल्या तपास अहवालाच्या आधारे लागू करण्यात आले आहेत. अहवालात दिलेल्या निष्कर्षानुसार १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्तावेजांमध्ये फेरफार करताना कोणत्याही सक्षम न्यायालयाचा आदेश न घेता व कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ३४ वर्षांनंतर नोंदी करण्यात आल्या आहेत. ही कृती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ या नियमांचे उल्लंघन ठरते, असे अहवालात नमूद आहे. अहवालातील मुख्य ठळक निष्कर्षः मुद्दे – सावेडी जमीन घोटाळा प्रकरण या निष्कर्षांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तलाठी प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्धही लेखी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. नागरिकांची प्रतिक्रिया व मागणीस्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर नाराजी लक्षात येत आहे. अनेक नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की अशा प्रकारच्या चुका सामान्य माणसाच्या आयुष्याला उध्वस्त करण्याची हिंमत करतात; त्यामुळे केवळ निलंबनापुरते मर्यादित न राहता कठोर प्रशासनिक आणि कायदेशीर कारवाई व्हायला हवी. काही नागरिकांनी प्रशासकीय निष्क्रियतेविरुद्ध आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी व्यक्त केली आहे. शासनाची दिशा आणि पुढील पावले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चालू तपास व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निलंबनात्मक आदेश लागू राहतील. परंतु अधिकार्यांच्या निलंबनानंतर पुढील अभ्यास व नोंदींचा आराखडा कसा असेल, ही बाब प्रशासनाच्या अंतर्गत निर्णयांवर अवलंबून राहील. काही वर्तुळांत असेही मत आहे की प्रशासकीय तपास संपल्यानंतर सहा–सात महिन्यांनी फेरविचार करून अधिकार्‍यांना कामावर परत आणण्याचे पर्यायही विचारात घेतले जाऊ शकतात, मात्र या अधिकाऱ्यांच्या चुकी मुले अनेक वर्ष हे प्रकरण न्यायलयात चालणार यात शंका नाही,

Sawedi land scam – तत्कालीन मंडळाधिकारी व तत्कालीन तलाठी निलंबित, पुढे काय, काय आहे प्रकरण. Read More »