DNA मराठी

Blog

Your blog category

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आले आहे. यात 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यात भाजपकडून 19 शिवसेनेकडून 16 राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुढील 1-2 दिवसात खाते वाटप होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर मागच्या सरकारमध्ये असणाऱ्या उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. या नेत्यांनी घेतली शपथशिवसेना मंत्री1 गुलाबराव पाटील2 दादा भुसे3 संजय राठोड4 उदय सामंत5 शंभुराजे देसाई6 संजय शिरसाट7 प्रताप सरनाईक8 भरतशेठ गोगावले9 प्रकाश अबिटकर राज्यमंत्री10 आशिष जैस्वाल11 योगेश कदम भाजप मंत्री 1 चंद्रशेखर बावनकुळे2 राधाकृष्ण विखे पाटील3 चंद्रकांत पाटील4 गिरीश महाजन5 गणेश नाईक6 मंगलप्रभात लोढा7 जयकुमार रावल8 पंकजा मुंडे9 अतुल सावे10 अशोक उईके11 आशिष शेलार12 शिवेंद्रराजे भोसले13 जयकुमार गोरे14 संजय सावकारे15 नितेश राणे16 आकाश फुंडकर राज्यमंत्री 317 माधुरी मिसाळ18 पंकज भोयर19 मेघना बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री 1 हसन मुश्रीफ2 धनंजय मुंडे3 दत्ता भरणे4 आदिती तटकरे5 माणिकराव कोकाटे6 नरहरी झिरवाळ7 मकरंद पाटील8 बाबासाहेब पाटील राज्यमंत्री9 इंद्रणिल नाईक

Maharashtra Cabinet Expansion :महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, विखे पाटलांसह ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ Read More »

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी !

Amrita Khanwilkar : 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसं होत हे शेयर केलं ! अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली. बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खास केल्या आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या ! 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले. अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. ” वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या. अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Amrita Khanwilkar : उत्तम काम सोबतीला आव्हानं 2024 वर्षात अमृताने केल्या ‘या’ खास गोष्टी ! Read More »

Woman’s Rights: काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

Woman’s Rights: काही महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत. कुटुंबातील वादविवाद वकील आणि पोलिसांपर्यंत पोहोचणे योग्य नाही, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना त्यांनी सरकारने महिलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील होण्याची गरजही व्यक्त केली. भोपाल येथे जनसुनावणीसाठी आलेल्या रहाटकर यांनी सांगितले की, महिलांवर होणाऱ्या हिंसा आणि अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी कायदे बनवले गेले आहेत. मात्र, काही महिला या कायद्यांचा चुकीचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. महिलांवर हिंसा आणि अत्याचार थांबवण्यासाठी हे कायदे तयार करण्यात आले आहेत, पण जर या कायद्यांमुळे पुरुषांवर अन्याय होत असेल, तर ते चुकीचे आहे. काही महिलांच्या चुकीच्या वागण्यामुळे महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी बेंगळुरूमधील इंजिनिअर अतुल सुभाष प्रकरणावर देखील भाष्य केले. या वेळी त्या म्हणाल्या की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत. समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहताना असे वाटते की कुठेतरी काहीतरी कमी किंवा चूक आहे. महिलांच्या हिंसा व अत्याचारापासून रक्षणासाठी जे कायदे बनवले गेले आहेत, त्यांचा काही महिला चुकीचा वापर करत असल्याचे दिसते. हे मान्य होऊ शकत नाही. हे कायदे महिलांच्या सन्मानासाठी आहेत. मात्र, जर पुरुषांवर अत्याचार होत असेल, तर ते चुकीचे आहे. काही महिलांच्या या वागण्यामुळे देशातील हजारो महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या कायद्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. असे होणे टाळायला हवे. आम्ही “राष्ट्रीय महिला आयोग तुमच्या दारात” हा उपक्रम सुरू केला आहे. आयोगाकडे देशभरातून तक्रारी येतात. परंतु, गाव-खेड्यांतील महिलांना दिल्लीपर्यंत पोहोचणे अवघड जाते. म्हणून आम्हीच त्यांच्या दारात पोहोचण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय महिला आयोग केंद्राच्या नियमांनुसार कार्य करते, तर राज्य महिला आयोग राज्य सरकारच्या नियमांनुसार कार्य करते. दोघेही आपापल्या स्तरावर काम करत असतात. राष्ट्रीय महिला आयोग महिलांशी संबंधित विषयांवर संशोधन करून त्यांचे अहवाल केंद्र सरकारला सादर करतो, ज्यायोगे नवीन कायदे तयार करण्यात मदत होते. असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या.

Woman’s Rights: काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर Read More »

Sukanya Samriddhi Yojana:  ‘ही’ योजना मुलींना करणार मालामाल, देते 3 पट परतावा; जाणून घ्या फायदे

Sukanya Samriddhi Yojana :  तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरकार एक जबरदस्त योजना गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे.  या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या मुलीचा भविष्य चांगलं करू शकतात. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करु शकता.  10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे वडील आपल्या मुलासाठी या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेत 8.2 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक आणि किमान ठेव मर्यादा 250 रुपये आहे. अशा परिस्थितीत मुलीचे वडील त्यांच्या खिशानुसार या योजनेत रक्कम जमा करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागते. 21 वर्षांनंतर, योजना परिपक्व होते आणि गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली जाते.  तुम्ही त्यात दरवर्षी ठराविक रक्कम जमा केल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट जास्त रक्कम मिळेल. येथे गणना जाणून घ्या. 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीवर प्रथम गणना जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षांत तुम्हाला एकूण 22,50,000 रुपये जमा होतील. 8.2 टक्के व्याजानुसार तुम्हाला 46,77,578 रुपये व्याज मिळेल.  हे व्याज तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला गुंतवलेली रक्कम आणि व्याजासह एकूण 69,27,578 रुपये मिळतील, जे एकूण गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे. 1 लाख रुपयांच्या वार्षिक ठेवीवर दुसरी गणना तुम्ही SSY मध्ये वार्षिक 1,00,000 रुपये जमा केल्यास, 15 वर्षांत एकूण 15,00,000 रुपये जमा केले जातील. SSY कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला एकूण ठेवीवर 8.2 टक्के व्याजदराने 31,18,385 रुपये व्याज मिळेल. 15 लाखांची दुप्पट रक्कम 30 लाख रुपये असेल.  अशा परिस्थितीत हे व्याज गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट आहे. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 46,18,385 रुपये मिळतील, जे गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट असेल. 50 हजार रुपयांच्या वार्षिक ठेवीवर तिसरी गणना जर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर या योजनेत वार्षिक 50,000 रुपये जमा केले तर तुम्ही मासिक 4,167 रुपये गुंतवाल. तुम्ही 15 वर्षांत एकूण 7,50,000रु.ची गुंतवणूक कराल.  8.2 टक्के व्याजदरानुसार, तुम्हाला एकूण 15,59,193 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील, जे दुप्पट आहे.  अशा प्रकारे तुम्हाला मॅच्युरिटीवर रु.7,50,000+15,59,193= रु. 23,09,193 मिळतील. 23,09,193 रुपये हे तुमच्या गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट आहे.

Sukanya Samriddhi Yojana:  ‘ही’ योजना मुलींना करणार मालामाल, देते 3 पट परतावा; जाणून घ्या फायदे Read More »

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा

Health Tips: राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुमचा उत्कर्षच होईल.  परंतु कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो, काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात.  आपल्यामधील काहीच मान्य करतात की त्यांचा स्वभाव रागीट आहे. आज आपण जाणणार आहोत की राग येण्यास कसे ओळखावे. राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स  राग येण्याचे संकेत  जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर कधी दुःख सुध्दा येतात जेव्हां नात्यांच्या धाग्यांना रागाने ओढतोड केली जाते त्यात अनेक नात्यांची धागी मात्र तुटून जातात. ती जोडण्यास बराच वेळ लागतो. नातं जितकं मजबुत तितकाच वेळ लागतो तो जोडण्यासाठी. रागाची लक्षणे  धैर्याचा बांध तुटणे. चिडचिडेपणा. अस्वस्थता वाढणे. शंका व संशयी भाव वाढणे. प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरविणे. अपमान करणे. संबधीत व्यक्तीस कमी लेखणे. वर्तमानात सभोवतालचे भान नसणे. पत्नी मूलबाळ आणि नातेवाईक तुमच्याशी बोलण्यास घाबरतात. हे राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते.  रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटते की तूम्हाला राग येतो आहे यासाठी तुम्हास स्वतःच स्वतःवर नियंत्रणासाठी विशेष पाउलं उचलावी लागतील. तर मग हा प्रश्न उठतो की रागाचे नियंत्रण कसे करावे. राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय  1) 10 पर्यंत अंकांची गणना जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल. 2) एक ब्रेक घ्यावा  जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे व शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा. 3) प्राणायाम करून राग घालवा  प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो.  तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो. 4) निवांत झोप  कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. त्याकरीता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देषाचा भागी बनतो. रागास दाबून ठेवणे हे फार चुकीचे ठरते व त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही त्याकरीता स्वतःच्या मनातील विचार सर्वांशी जुळवून घ्या तरच रागाचे प्रमाण कमी होईल.  प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा, न पटल्यास चर्चा करा त्याने नक्कीच कोणता ना कोणता योग्य पर्याय समोर येईल. तर ह्या काही सोप्या आणि छोट्याश्या टिप्स जे आपल्याला मदत करतील रागावर नियंत्रण ठेवायला.

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा Read More »

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन

Ahmednagar News: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद घाट अहमदनगर, जिल्हा समाज कल्याण विभाग व ग्रामपंचायत देहरे यांच्या संयुक्त विद्यामाने दि. 10 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथे दिव्यांगासाठी शिबिर आयोजित करण्यात आले ‍होते. या शिबिरात देहरे व परीसरातील पात्र दिव्यांगाची सहाय्यक साधनांसाठी पुनर्वसन केंद्रांच्या तज्ञाकडून तपासणी व नोंदणी करण्यात आली.   यातील पात्र दिव्यांग व्यक्तीना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या एडीप 2024 या योजने अंतर्गत नजीकच्या काळात सहाय्यक साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हयातील दिव्यांगांना केंद्र शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे विशेष प्रयत्न करत आहे. दिव्यांगांच्या तपासणी बरोबरच “अहमदनगर जिल्हा दिव्यांग सर्वक्षण अभियानाचा” शुभारंभ करण्यात आला. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांने आपले मोबाईल ॲप डीडीआरसीनगर या नावाने तयार केले असुन या ॲपच्या माध्यमातुन जिल्हयातील दिव्यांगांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. जेणे करुन विविध योजना त्यांच्यापर्यत पोहचविण्यास मदत होणार आहे.  या शिबिरासाठी पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे व समन्वयक डॉ. दिपक अनाप यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराप्रसंगी सरपंच सौ. नंदाताई संतोष भगत, उपसरपंच श्री. दिपक जाधव, देहरे सोसायटीचे  संचालक श्री. भानुदास भगत, देहरे सोसायटीचे  खजिनदार श्री. सुभाष, प्राथमिक आरोग्य केंद्र देहरे येथील डॉ. कसबे सर व डॉ. खरे सर उपस्थित होते.

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळद यांचामार्फत दिव्यांग सर्वेक्षण व तपासणी शिबिराचे आयोजन Read More »

Sujay Vikhe: खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू..

Sujay Vikhe: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन अहमदनगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू प्रभू श्रीरामांना चरणी अर्पण केले. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोफत साखर वाटप करण्यात आली होती. या साखरेपासून लाडू बनवून 22 जानेवारी रोजी सर्वांनी प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून अर्पण करावेत असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना केले होते.  दरम्यान आज नगर जिल्ह्यातील माता भगिनींनी बनवलेले नैवेद्यासाठीचे लाडू स्वतः खासदार सुजय विखे यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले असून माता भगिनींनी इतक्या आपुलकीने बनवलेला हा प्रसाद प्रभू श्रीरामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद होत आहे. माझ्या जीवनातील हा एक अविस्मरणीय असा क्षण असल्याचे मी समजतो असे मत त्यांनी यावेळी मांडले. मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या आमच्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील असे सांगून त्यांनी सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभो अशी प्रार्थना प्रभू श्रीरामांच्या चरणी केली.

Sujay Vikhe: खा. सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांना अर्पण केले लाडू.. Read More »

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं

Maruti Wagon R: येत्या काही दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार मारुती वॅगन आर अवघ्या 1.15 लाखात घरी आणू शकता. मारुती वॅगन आरमध्ये तुम्हाला 1061 cc इंजिन मिळते जे 67 bhp पॉवर आणि 34 NM टॉर्क जनरेट करते. ही 5 सीटर कार आहे ज्याच्या व्हील्सचा आकार 13 इंच आहे. याच बरोबर पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, रीयर सीट हेडरेस्ट आणि कप होल्डर देखील कारमध्ये उपलब्ध आहेत. एअर कंडिशनर, हीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, फॅब्रिक अपहोल्स्ट्री, ग्लोव्ह कंपार्टमेंट देखील कारमध्ये देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी  सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर, सीट बेल्ट वॉर्निंग, रियर सीट बेल्ट साइड, इम्पॅक्ट टीम ॲडजस्टेबल सीट्स आणि इंजिन इमोबिलायझर या सुविधाही उपलब्ध आहेत.  cardekho.com वर सेकंड हॅण्ड मारुती वॅगन आर 1.15 लाखात खरेदी करु शकता. आतापर्यंत एकूण ही कार फक्त 26000 किलोमीटर चालली आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली मॅन्युअल ट्रान्समिशन कार आहे.  जर तुम्ही ही कार बाजारात खरेदी करण्यासाठी गेलात तर तिची ऑन रोड किंमत 3.28 लाख ते 4.06 लाख रुपयांच्या दरम्यान असेल. 

होणार बंपर बचत! आता Maruti Wagon R खरेदी करा अवघ्या 1.15 लाखात; जाणुन घ्या कसं Read More »

नागरिकांनो, Personal Loan साठी अर्ज करण्याचा विचार? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होणार फायदा!

Personal Loan : जर तुम्ही अर्थिक गरज भागवण्यासाठी बँकेमधून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे.  हे जाणुन घ्या की, आजच्या काळात वैयक्तिक कर्ज बँकेकडून मिळवणे इतके सोपे नाही. त्‍यामुळे आम्‍ही तुम्‍हाला अशा महत्‍त्‍वाच्‍या गोष्‍टी सांगत आहोत, त्‍या लक्षात ठेवल्‍यास, तुम्‍ही सहज वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.  वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज मानले जाते, ज्यामुळे तुम्ही शिक्षण, लग्न, वैद्यकीय आणीबाणीपासून प्रवासापर्यंत सर्व गोष्टींसाठी कंपन्यांकडून सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. तथापि, येथे तुमचा सिबील स्कोअर चांगला असावा. वैयक्तिक कर्जाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्रकारच्या कर्जासाठी कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची किंवा सुरक्षा म्हणून काहीही ठेवण्याची आवश्यकता नाही. वैयक्तिक कर्जासाठी पात्रता जाणून घ्या तुम्ही कोणतीही नोकरी करत असाल तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. वैयक्तिक कर्जासाठी, तुमचे वय 18-60 वर्षे असावे. मात्र, अनेक बँकांमध्ये वयाचे निकष वेगळे असू शकतात. या कर्जासाठी किमान उत्पन्न असणे आवश्यक आहे, जरी ही किमान उत्पन्न मर्यादा बँक/NBFC नुसार बदलू शकते. तुम्ही एखाद्या संस्थेत किमान एक वर्ष काम करत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ही आवश्यक कागदपत्रे आहेत बँक नोकरी तपशील पत्त्याचा पुरावा आधार कार्ड ITR पॅन कार्ड बँक स्टेटमेंट

नागरिकांनो, Personal Loan साठी अर्ज करण्याचा विचार? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होणार फायदा! Read More »

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

Sujay Vikhe News: आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष पाटील यांच्या वतीने चाळीसगाव येथे व्यास भागवत कथेचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ता प्रदिपजी मिश्रा यांचा प्रभू श्रीराम शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील भव्य कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातही व्हावा या अनुषंगाने सदर ठिकाणी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासमवेत सुजय विखेंनी प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने आणि सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी सुजय विखे यांनी बोलून दाखविला.

Sujay Vikhe News: खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित.. Read More »