DNA मराठी

IND vs OMAN : पैसा वसूल, भारताचा रोमांचक सामन्यात 21 धावांनी विजय

team india

IND vs OMAN : भारताने आशिया कप 2025 च्या ग्रुप सामन्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 21 धावांनी जिंकला आहे. ओमानविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत आठ विकेट्स गमावत 188 धावा केल्या. संजू सॅमसनने 56, अभिषेक शर्माने 38, तिलक वर्मा 29, अक्षर पटेल 26, हर्षित राणा 13 नाबाद, शुभमन गिल 5, हार्दिक पंड्या 1, शिवम दुबे 5, अर्शदीप सिंग 1 आणि कुलदीप यादवने नाबाद 1 धावा केल्या.

ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमान 20 षटकात 4 गडी गमावून फक्त 167 धावाच करू शकला आणि सामना 21 धावांनी गमावला. आमिर कलीमने 64 धावांची शानदार खेळी केली. हम्माद मिर्झा यांनीही 51 धावा केल्या. मात्र, या दोन दमदार खेळी असूनही ओमान जिंकू शकला नाही. ओमानकडून जतिंदर सिंगने 32, जिकरिया इस्लामने 0, विनायक शुक्ला 1 आणि जितेन रामनंदीने 12 धावा केल्या. मात्र, ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला.

आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तथापि, अर्शदीप सिंगने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *